मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

मार्च, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

परदेश....!

परदेश....!                 परदेश म्हंटल कि विमान प्रवास आला,   परदेशात जाण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचे असते, एकदा तरी आयुष्यात विमानात प्रवास करावा असं स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो. त्यातल्या त्यात काही काळासाठी परदेशात राहण्याची संधी जर मिळाली तर सोन्याहून हि पिवळ. पूर्वी परदेश म्हटलं कि तोंडात बोट घालण्यासारखी (आश्चर्याची) गोष्ट होती. अरे बापरे....! साता समुद्रा पार कोण जाणार कोणाच्या बापजन्मात होण्यासारखी गोष्ट नाही, असं वाटत असे. कारण सुरवातीच्या इ. स. १८०० काळापर्यंत विमान सेवा उपलब्ध नव्हती. त्यावेळेस बोटीनेच परदेशी जाव लागत असे. सात समुद्र पार बोटीने जाणे म्हणजे कित्येक महिन्यांचा प्रवास असे आणि त्यामुळे कुणाचे परदेशात जाण्याचे धाडस फारसे होत नसे. त्यात भारत म्हणजे गुलामगिरीत अडकलेला देश, गुलामगिरीतून  बाहेर पडणे शक्य नव्हते तर परदेशी जाणे कठीणच. महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे अनेक थोर सामाजसुधारक होते ज्यांनी अपार कष्ट आणि प्रयत्न करून विदेशी जाण्याचे धाडस केले....