मुख्य सामग्रीवर वगळा

परदेश....!

परदेश....! 



               परदेश म्हंटल कि विमान प्रवास आला,   परदेशात जाण्याचे स्वप्न हे प्रत्येकाचे असते, एकदा तरी आयुष्यात विमानात प्रवास करावा असं स्वप्न प्रत्येक जण पाहत असतो. त्यातल्या त्यात काही काळासाठी परदेशात राहण्याची संधी जर मिळाली तर सोन्याहून हि पिवळ. पूर्वी परदेश म्हटलं कि तोंडात बोट घालण्यासारखी (आश्चर्याची) गोष्ट होती. अरे बापरे....! साता समुद्रा पार कोण जाणार कोणाच्या बापजन्मात होण्यासारखी गोष्ट नाही, असं वाटत असे. कारण सुरवातीच्या इ. स. १८०० काळापर्यंत विमान सेवा उपलब्ध नव्हती. त्यावेळेस बोटीनेच परदेशी जाव लागत असे. सात समुद्र पार बोटीने जाणे म्हणजे कित्येक महिन्यांचा प्रवास असे आणि त्यामुळे कुणाचे परदेशात जाण्याचे धाडस फारसे होत नसे. त्यात भारत म्हणजे गुलामगिरीत अडकलेला देश, गुलामगिरीतून  बाहेर पडणे शक्य नव्हते तर परदेशी जाणे कठीणच. महात्मा गांधी, नेताजी सुभाष चंद्र बोस, स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे अनेक थोर सामाजसुधारक होते ज्यांनी अपार कष्ट आणि प्रयत्न करून विदेशी जाण्याचे धाडस केले. धाडस म्हणण्यापेक्षा विदेशात पाउल टाकण्याचा अजरामर प्रयत्न सफल केला. आजकालच्या तुम्हा आम्हा युवा पिढीला परदेशात शिक्षण, नौकरी, उद्ध्योग धंदे, आणि इतर काही कामानिम्मित जाण्यासाठी ताकद मिळवून दिली.

       आधुनिक जगातील पहिले विमान उड्डाण अमेरिकेच्या राईट बंधुंच्याही अगोदर एका भारतीयाने केले होते, विश्वास बसणार नाही परंतु हे सत्य आहे...! मुंबईतील वेदविद्या पारंगत श्री. शिवकर बापुजी तळपदे ह्यांनी भारद्वाज मुनींच्या “वैमानिक शास्त्र” या पुरातन ग्रंथावरून एका विमानाची निर्मिती केली.१ व मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर सर्व लोकांसमक्ष १८९५ वर्षांच्या जून महिन्यात त्या विमानाचे उड्डाण करून दाखवले. प्रस्तुत मानवविरहित विमान १५०० फुट उंच उड्डाण करून मग ते जमिनिवर खाली आले. पुढे तब्बल ८ वर्षांनंतर म्हणजे १९०३ या वर्षी विमान विद्देचे जनक मानल्या जाणार्या अमेरिकेच्या राईट बंधूंच्या विमानाने केवळ १२० फुटाचे उड्डाण केले होते.

         हि झाली इ. स. १८००, १९०० सालची गोष्ट परंतु सध्याच्या म्हणजेच २०१८ सालापर्यंत जगात विमान सेवा हि फार झपाट्याने वाढली आहे. आता मात्र दिवसातून कित्येक विमाने उड्डाण घेतात्त याचा काही अंदाज नाही. त्याचप्रमाणे त्यांमध्ये सर्व प्रकारच्या सुख सुविधा उपलब्ध आहेत. अवघ्या काही तासांतच परदेशी पोहोचणे सोयीस्कर झाले आहे. 

          आता Main मुद्दा असा कि काही लोकांना Passport आणि Visa हा कसा मिळवावा हेच माहित नसत, त्यातल्या त्यात दोन्हीतला फरक सांगनही फार कठीण काम असत. त्यामुळे विदेश म्हंटल कि ते पेचात पडतात.
तर...! सांगायचं अस Passport म्हणजे पारपत्र. आपल्या देशाकडून मिळालेले एक दस्तावेज आहे जे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रवाशाची ओळख आणि राष्ट्रीयता प्रमाणित करते. साध्या भाषेत आपण ओळख पत्रही म्हणू शकतो. कारण यावर नाव, छायाचित्र, जन्म तारीख, लिंग आणि पत्ता प्रस्तुत केलेले असते. तरीदेखील केवळ Passport च्या आधारावर आपण विदेशी प्रस्थान करू शकत नाही. तर कोणत्याही देशात प्रस्थान करण्यासाठी Visa आवशक आहे. आणि हा Visa वेगवेगळ्या स्वरूपातला असू शकतो परंतु, मुखत्वे Visa हा Passport वरती दिलेला एक Stamp असतो. याचीही Process काही दिवसांची अथवा महिन्यांची असू शकते. पूर्वी बरेच महिने अथवा वर्ष लागत असे Passport मिळवण्यासाठी परंतु आता अवघ्या महिन्याभरात अथवा त्याहीपेक्षा लवकर मिळू शकतो.   
  
        Visa मिळवण हि तशी फारच किचकट गोष्ट असते. सर्व प्रथम Visa चे प्रकार (Working, Student, Dependent, Family etc.) आणि त्यानुसार बरीचशी कागदपत्रे हवी असतात, जसे Invitation letter, Residence Proof, Bank Balance, Purpose of Visit, Schedule of stay etc. etc.......! यासाठी लागणारा वेळ सांगू शकत नाही. छोट्या छोट्या कारणासाठी Visa reject होऊ शकतो. अगदी Proper Documentation असेल तर वेळेवर मिळण्याचे Chances असतात.

         आता यात सर्वात गमतीदार गोष्ट म्हणजे Passport Visa other documantation या सर्वांच्या पेचात पडण्याची वेळच माझ्यावर आलीच नाही. माझ्या होणाऱ्या पतीदेवांनी सर्व Documantation Online करून दिले. एक Passport Verification साठी जाणे सोडून मला कुठलीही तसदी घ्यावी लागली नाही. तसेच Dependent Visa साठी Marriage Certificate ची आवशकता होती, १ मे ला लग्न झालं २मे ला Marriage Certificate Application दिले आणि मोठ्या उम्मेदिने Request करून ८ दिवसांच काम अवघ्या ४ तासात करून मिळाल. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी मुंबईला Visa Application दिले पुढील सहा दिवसात ९ मे ला Visa मिळाला आणि त्याच दिवशी Banglore साठी Domestic Flight ने पाहिला विमान प्रवास झाला. आणि पुढील तीन दिवसातच International प्रवास होता तो म्हणजे जपान साठी. 

ज्यापद्धतीने “चट मंगनी, पट बिहा” {साहेबांच्या सुट्टीचा काळ २०दिवसांचा असल्यामुळे} त्याच प्रमाणे चट Passport... पट Visa... झट Japan....

                 Communication ची जुनी पद्धत सर्वाना माहित आहेच. पूर्वी पत्र आणि तार याशिवाय पर्याय नव्हता. पत्र आणि तार पोहचण्यासाठी कित्तेक दिवस लागत असे. Telephone तर मध्यस्थी काळात उपलब्ध झाला. परंतु आता फक्त Call च नाहीतर VIdeo Call सुद्धा करता येतो. त्यासाठी अनेक Apps उपलब्ध आहे, त्यामुळे परदेशात राहण आज सोयीस्कर झालयं आणि लांब असल्याची भावनाही उत्त्पन्न होत नाही. हव तेव्हा आपण कुणाही सोबत बोलू शकतो, पाहू शकतो. Communication gap हा आजच्या युगात राहिलेलाच नाही त्यामुळे परदेशही हा स्वदेशा प्रमाणेच वाटू लागला आहे.
        तरीदेखील, लग्न होऊन विदेशी जाताना माहेराशी पुन्हा कधी गाठ होईल याची काही खात्री नसते 
म्हणूनच....

सारे रिश्ते नाते तोड के बाबुल का घर पिछे छोड के
अपना नसीब काही और जोडके, हम तो चाले परदेस बाबुल
हम तो चाले परदेस(१९८८) मंदाकिनी (Daughter of) शशी कपूर...   

शेवटी परदेश हा परदेशच......! 


       परदेशात राहण सोप्प नाही, आप्तस्वकीयांना दूर सोडून राहण फार कठीण आहे. जेव्हा त्यांची आठवण येते तेव्हा ती नाकारणे मनास पटत नाहि. तस म्हणायला तर आराम आहे इथे पण जे मन स्वदेशीच राहत ते परदेशी कस राहील.....! Boarding Pass हातात मिळे पर्यंत काही ह्या भावनेला महत्त्व नव्हते, जसा Boarding पास हातात आला तशी मनात परदेशी रवाना झालेली Flight, Landing होता होता पुन्हा Takeoff होऊन स्वदेशी आली हो... तास भर ओलांडला होता त्यामुळे घरचेहि Airport वरून रवाना झाले असतील या विचारांनी गदारोळ माजला, अस वाटू लागल, आले २ मिनटात अस सांगून घरी पळून जाव. जबरदस्तीने मनाला परदेशाची लालच दाखून ना ना स्वप्न दाखवत मन रमवल आणि संपूर्ण Airport दर्शन हातात हात घेऊन पार पाडलं.  

        लहानपणापासूनच जमिनीवरून आकाशात उडणारे विमान पाहत आलो, आता आपण स्वत: विमानात बसून उडणार... वाह..! आपली Flight दिसेल का कुणाला? आपल्याला कोणं उड्या मारून टाटा करणार? संपूर्ण आयुष्य सिनेमातील रीळ प्रमाणे बदलू लागले. आयुष्यातील शेवटच्या श्वासात ज्याप्रमाणे संपूर्ण जीवन आठवत अगदी तशीच स्थिती झाली. जसकाही धरती सुटतेय, आता आपला आत्मा आकाशात संचार करू लागलाय. Runway वर हळू हळू सरकणारे जहाज सरकन भुर्र..र्र..र्र...! उडू लागले, आकाशाला गवसणी घातली. Air India कि तरफ से “आपकी यात्रा मंगलमे हो” शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. स्वर्गात चालोय.... हा..हा..आहा... 

सोचा कहां था, ये जो, ये जो हो गया
माना कहां था, ये लो, ये लो हो गया
चुटकी कोई काटो, ना हैं, हम तो होश में
क़दमों को थामो, ये हैं उड़ते जोश में
बादल पे पांव है, या छूटा गांव है
अब तो भई चल पड़ी, अपनी ये Flight 🛫 है
बादल पे पांव है… ⛅️
आसमां का स्वाद है, मुद्दतों के बाद है
सहमा दिल धकधक करे, ये दिन है या ये रात है
हाय तू मेहरबां क्यूं हो गया, बाखुदा क्या बात है
बादल पे पांव है… 
चल पड़े है हमसफ़र, अजनबी तो है डगर
लगता हमको मगर, कुछ कर देंगे हम अगर
ख्वाब में जो दिखा, पर था छिपा बस जायेगा ओ नगर
बादल पे पांव है, या छूटा गांव है
अब तो भई चल पड़ी, अपनी ये Flight 🛫 है



         विमान सेवा सुरु झाल्याबरोबर हवाई सुंदरी च्या Announsments ने सारे लक्ष वेधून घेतले. Window च्या पलीकडे बघत मनात आले येवढ मोठ निरभ्र दिसणार आकाश यात कसं बर Pilot विमान चालवेल ह्या मोकळ्या ढाकळ्या आकाशात कसा त्याला मार्ग सापडत असेल. कस बर योग्य Destination याला कळत असेल, विचार करता करता हळूच मागे वळून पाहिलं, पुढे पाहिलं, कुणी ऐकल तर नाही ना.... हा..हा..हां...आ...! अश्या अनेक शंका कुशंका, लहान मुलांना पडतात तसे अनेक प्रश्न पडू लागले. पण जसजशी वेळ सरत होती तसतसे प्रश्नांचही निरसन होत होत. विमान किती उंचीवर उडत आहे? बाहेरील तापमान कितीकिती oC ने बदलतेय? किती तास झाले किती उरलेत याच मोजमाप सारख चाललेल होत. बघताच सुखरूप Landing झाल. अर्ध्या तासात Japan Imigratiion पार पडले. Non Resident In India (NRI) ची मोहर लागली. जेवढा मोठा आनंदाचा क्षण होता तितकच दुःखाहि वाटत होते. 
     असा हा परदेश.... हवा हवा सा..., पण नको.....! 


राजश्री जगताप 


१. https://en.wikipedia.org/wiki/Shivkar_Bapuji_Talpade
२. Images from google.



https://www.facebook.com/JagtapRajashri12/?pnref=lhc




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...