मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबई ते टोकियो.....!

        भाग २.....
           सोना बाईंना चार पाचच दिवस सुट्या असल्यामुळे, ए दीदी तुझी अजून काय काय शॉपिंग राहिलीय ते लगेच सांग सगळ डन करून टाक आणि दोन महिने घरात जरा शांत निवांत रहा आराम कर, तूप रोटी खा जाडी जुडी हो आणि मग नवऱ्याच्या घरी जा.. बर ओ आज्जी बाई...! तुम्ही जस म्हणाल तसच करते. चल मी तुला माझी जिम लावून देते, जिम कर, जेवण कर.. जिम कर, जेवण कर"… एवढच काम तुला ठीक आहे?, हा चल..! त्याबरोबर मम्मीने शिदोरी उघडली होती, रोजच पौष्टिक आणि आवडीच जेवण तयार असायचं. १जानेवारीपासून जिम सुरु होणार, मग आता काम आटपून घे. महत्वाची शॉपिंग म्हणजे साड्या आणि ड्रेस त्यावर दागिने हे चार दिवसात पूर्ण केल तिघीही संपूर्ण नाशिक फिरलो, चरखा मात्र दिवसभर चालूच होता. हव्या तशा साड्या घेतल्या. मनसोक्त शॉपिंग झाली.
मामाच्या गावाला एक लग्न होत, माझी काही फारशी ओळख नव्हती. हो नाही हो नाही करत.. चल ना लग्नातला मसाले भात, वांग्याची, भाजी आणि बुंदी खाऊन येऊ चल... हा.हा..हा...हा... हब्बड कुठली खाय साठी गावाला जायचं?, हाहाहा... तिघींनी छान पैकी नट्टा-पट्टा केला निघालो पांढूर्ली गावाला. मी नटूनथटून कुठे निघाले का नवरा जाम भारीच खुश व्हायचा.. सारखे व्हिडीओ कॉल चालू... मामाची चिल्लर पार्टी पाच चीन्टर-पिंटर त्यांच्या सोबत मस्त मज्जा गोळा, गारीगार, एक रुपयावाली पेप्सी हाहाहा.. चिप्स, जिलेबी, दहीवडे(गोड), समोसे जबरदस्त चरखा चालू, चीन्टर-पिंटरने दिवसभर दाजींना व्हीडीओ कॉल करून हैराण केल. दोन मावशी, दोन मामा, आजी, माम्या सगळे माझ्यावर भरपूर खुश होऊन जीव ओवाळून टाकत होते. पोरगी किती हुशार आहे सात समुद्रापार एकटी आली, दोघ नवरा बायको किती गुणी आहे एकमेकाला छान जीव लावत्या. आव आई आम्ही कुत्र्या मांजरा वाणी भांडतो.. हा.हा..हा... ते जाऊदे, भांडण व्हत्यात त्यात काय मोठ.. त्याशिवाय संसाराला गोडी नई, पण लक्षात ठीव आज हि लै मोठी गोष्ट ऐ देशापलीकडे बायको ला मोठ्या विश्वासाने पाठवायचं म्हणजे खरच गुणी जावई ए बाई... हा...आआ का?.... अनन.. मी विश्वासान त्याला सोडून आले त्याच काय? बाई त्व्हावाल कितीई कौतुक केल तर ते कमीच पडल... लग्न कुठ लागल? काय झाल? कोण आल? कोण गेल? काहीच माहित नाही आम्ही आपले आमच्या फॉरेनच्या शिंदे बाईं मधीच मग्न होतो. आमच्याच गोंधळात मज्जा करून आलो. आमच्या पप्पांन कडून आपल घर सोडून कुठच राहायला जाण्याची परवानगी नसल्यामुळे त्याचदिवशी पांढूर्ली रीटर्न.
चार दिवस कुठे भुर्कन उडाले कळलेच नाही. सोना बाई त्यांच्या अभ्यासाला परतल्या. दु:खी मन हमारे....!

           पुढे मी ठरवलेलं होत ज्या ज्या नातलगांनी आग्रहाने बोलावलंय त्या सगळ्यांकडे आवर्जून जायच. एक तारखेला जिम बंद का तर म्हणजे नवीन वर्षा निमित्त हाय रे नशिक कर....! मुंबई ची एक मैत्रीण नाशिक मध्ये असल्यामुळे तिच्या मुलीसोबत भेटायला आली. दिवसभर भरपूर गप्पा केल्या. पुढचे पंधरा दिवस सगळ्या साड्यांवर म्याचिंग वस्तू ब्लाऊज आणि सोन्याची खाण अशी सगळीच काम समाप्त केली. त्याबरोबर दणकेबाज खाण पिण, जिम, आराम मम्मीने काय हव नको ते सगळ्या प्रकारच जेवण बनवल. अगदी सगळ्या इच्छा पूर्ण केल्या. “संक्रांत” लग्नानंतर हा पहिलाच सण मी घरी असतांना आलेला होता. पहिल्या संक्रांतीला मम्मीने मला जपान ला साडी पाठवली होती. दुसऱ्या वर्षी तिथेच असल्यामुळे नऊवारी साडी घेतली, हातभार बांगड्या-मेहंदी, गजरे, माझी सगळी तयारी करून दिली, दारात भली मोठी रांगोळी, आवडीच जेवण भावासोबत फोटो, डान्स, व्हिडीओ, नवऱ्याला व्हिडीओ कॉल धम्माल केली. मी पहिल्या वेळेला सासरी गेलेले तेव्हाच ठरवून आले होते. तिथे हळदीकुंकू करेल. मग दोन दिवसाने हळदीकुंकवासाठी पुन्हा सासरी. तिथेपण हीच सगळी धम्माल नुऊवार साडी, फोटो जेवण, नवऱ्यासह घरातले सगळेच खुश. शिशिराचा ऋतू असल्यामुळे गहू, ओंब्या, हरभरा, मेथी, कोथिंबीर, कच्या कौठाची चटणी पिकलेले गुळ-कौठ आणि ह्या सगळ्यांबरोबर शेकोटी आणि कडक आहारावर भाजलेले रताळे, झाडावरचे बोर तोडून खाल्ले. शेतात जाण्याचा खरा उद्देश हा केवळ फोटो काढण्यासाठी होता, पण त्यासोबत पालक-मेथीच भाजी, कोथिंबीर काढून जुड्या बांधल्या, जात्यावर तुरीची डाळ दळली. गावात राहणाऱ्या मुला सोबत लग्न केल्याच साफल्य हा.हा..हा... लहानपणीच्या सगळ्या गोष्टी नव्याने अनुभवल्या. सुखद अनुभव आला. मला कांदे लावायला जाण्याची फार इच्छा होती निघालेही होते त्यासाठी परंतु दुसऱ्या कामामुळे राहून गेल. २६ जानेवारीला नवऱ्याच्या शाळेत जाण्याच ठरल पण तेही शक्य झाल नाही. शाळेतली पोर मला न नेता शाळेत निघून गेली. माझ्यासाठीखाऊ मात्र घेऊन आले.  

          ३० जानेवारी ला पुन्हा मामा कडे पांढूर्लीला गेले, आमच्या चीन्टर-पिंटरच्या शाळेत वार्षिक दिवसाबद्दल डान्स नाटक होते. पण जातांना फार उशीर झाला. माझी मामाने शाळेतूनच उचलबांगडी केली चल... उद्या जा, पण....!, चूप... ए चला पटापट निघा घरी सगळे.. तिथेही माझे भरपूर लाड झाले. माझ्या जपानच्या काही आमच्या दोघ नवरा बायकोच्या गमती जमतीने हास्य कल्होळ झाला. दुसऱ्या दिवशी रिटर्न १ फेब्रुवारी मम्मी आणि मी कल्याण गाठले आम्ही मस्त मज्जा करत गेलो. काका काकींनी आवर्जून आमंत्रण दिलेले होते. तिथेही भारी मेजवानी. भाऊ बहिण आजी सगळ्यांसोबत गप्पा रंगल्या सगळीकडे माझ जपानच चर्चेत होत म्हणा.. संध्याकाळी ठाकुर्ली(रिटर्न) दुसरे काका काकी, भावंड, आजी, आत्या. दुसऱ्या दिवशी बदलापूर सगळी कडे रंगतदार मेजवाणी, साड्या, गप्पा, फोटो... खूप छान वाटत होत. सगळ्यांच्या तोंडात जावया बद्दलच कौतुक ते आले असते तर खूप छान झाल असत. येऊना आम्ही पुन्हा नक्की.
आपण जेव्हा अविवाहित असतो तेव्हा हा जो काही मान-सन्मान आहे या बद्दल एवढी काही फारशी कल्पना नसते. पण वैवाहित जोडीला खूप मान-सन्मान आदर दिला जातो. हा सगळा पाहुणचार घेण्यासाठी आम्ही भारतात नव्हतो. आणि मी गेले तेव्हा मला तो भरभरून सगळ्यांकडून मोठ्या प्रमाणात मिळाला. घरून पप्पांचे फोन चालू होते केव्हा येताय, केव्हा येताय?, पण मी ठरवलेलं होत मम्मी ला बोरिवलीचा “विश्व विपस्सना पॅगोडा” दाखवायचा ती कधीही कुठेही फिरायला जात नाही. जिद्दीने जबरदस्तीने पप्पांना पटवून मुक्काम केला. बहिणी, काका-काकी, मी, मम्मी दिवसभर फिरलो. भरपूर फोटो काढले.
         विश्व विपस्सना पॅगोडा” पाहायला जाण्याचा माझा अजून एक उद्देश होता तो म्हणजे मला जपान मध्ये आल्यापासून “ध्यान” करायची एक चांगली सवय लागली होती. तिथे जाऊन आल्यानंतर मला अजून प्रोत्साहन मिळाले. पॅगोडा मध्ये असतांनाच मला कळाल कि जपान मध्ये सुद्धा “एस. एन. गोएंका” यांनीच “चिबा” आणि “क्योटो” या दोन ठिकाण “पॅगोडा- ग्लोबल विश्व विपस्सना केंद्र” स्थापन केलेले आहे. तात्काळ नवऱ्याला फोन करून कल्पना दिली आणि आपण केव्हा जायचं ते कबुल करून घेतल. मी सगळी माहिती काढून ठेवतो मग ठरवूया, ओकेकेके..... मी तेव्हाच ठरवलं जपान ला गेल्याबरोबर दहा दिवस “विपस्सनेला” जाणार. ह्या सगळ्या महिन्यांमध्ये मला फिरतांना मज्जा मस्ती करतांना, प्रत्येक सुखा बरोबर आनंदासाहित बरच काही शिकायलाही मिळत होत. आयुष्यात प्रत्येक गोष्टीला किती महत्व असते हे ओळखता आल पाहिजे. कुठलीही गोष्ट केवळ मज्जा मस्ती म्हणून न करता त्यातील सार ओळखता आला पाहिजे. दुसऱ्या दिवशी मम्मी सोबत पद्मावत सिनेमा पाहून आले. दोघीही खूप दिवसातून चित्रपट गृहात गेलो होतो. पुन्हा पंधरा दिवस सुरळीत अशी जिम सुरु झाली तूप रोटी खाऊन जाडी होऊ लागले. घरच्यांना फार समाधान होऊ लागल. नवराही फोन वर फोन करत होता. त्याने एकही दिवसाच किंवा कुठल्याही वेळेच अंतर पडू दिल नव्हत. आणि तेव्हाच मला कळाल होत, कि खरच नात्यात थोडा दुरावा तर नक्कीच हवाय तेव्हाच तर त्यातील प्रेम वाढत जात. काही गोष्टी बोलतांना पोकळ वाटतात. परंतु त्या जेव्हा कृतीत घडतात तेव्हा त्यातील संरांश कळून येतो.

             पुन्हा १३ फेब्रुवारीला मम्मी सोबत सासरी गेले. भावाने सांगितलं होत आपण व्हॅलेंटाईन डे ची पार्टी करू बहिणीने त्यासाठी मला छान रेड कलरचा फ्रॉक घेतला होता. पण सासूबाईनचा हट्ट होता सुनबाई आल्याखेरीज राहूनच जा बाई... मग काय राहिले. भावाचा फोन आला. अरे तू आली नाहीस आज परत?, मम्मी एकटीच आली. भ्यायाया... हा.हा..हा... रहा आता तिथेच माझी पार्टी वाचली ना..भो....!!! तेच सांगायसाठी फोन केला तुला.. हट्ट नालायक माणसा हा.हा..हा...बायययय... रात्री मी मस्तपैकी काळ वांग्याचं कालवण, बाजरीच्या भाकरी, मेथीची भाजी, भात, कांदा-लिंबू असा बेत केला सगळे जाम खुश.. नवऱ्याने उद्याच सेलिब्रेशन आजच सरप्राईज पाठवल केक, बुके, मोठ्ठी डेरीमिल्क पाठवली. आणि त्यावर मला आठवल माझी सात वर्षा पूर्वीच्या व्हॅलेंटाईन डे ची बांधणीची लाल साडी मी इथेच ठेवलेली आहे. मी जाम खुश झाले कारण, ती साडी मी कधी वापरलीच नव्हती. आज खूप छान क्षणी तिचा वापर झाल्याच समाधान मिळाल. नवऱ्याला व्हिडीओ कॉल करून केक कापला, भरपूर फोटो काढले. “हम जहा होता है वहा खुशिया हि खुशिया रेहती है.... दुसऱ्या दिवशी माहेर रवाना...

           क्नोक क्नोक एक लग्न पत्रिका आली एएए.... लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला... ह्याही वेळेस माहित नव्हत नक्की कुणाच लग्न आहे. जगताप आहेत आणि आपण नवऱ्यामुली कडून आहोत, चलो इगतपुरी.... त्या निम्मित्ताने पुन्हा राहिलेल्या सगळ्याच नातेवाईकांची भेट झाली. बऱ्याचशा नवीन ओळखी झाल्या. सगळे काका, आत्या कंपनी पुन्हा भेटले. येतांना वडनेर दुमाला आत्याच्या सासरी जाण झाल. आता ज्यांची भेट राहिली अस फारस कुणी राहील नव्हत. मी जपान मधून येतांनाच ठरवून आले होते ओळखीतल्या सगळ्यांनाच भेटायचं अगदी जे कोणत्याही स्वरुपात संपर्कात नाहीत त्यांना सुद्धा, कुणावर राग आहे कुणाशी थोडफार वाकड आहे अशांना सुद्धा भेटायच. या मागेही माझा एक फार मोठा उद्देश होता तो नंतरच्या लेखात पाहू.
आली शिवजयंती, उत्सव म्हणून नाही पण हौस म्हणून सहजच दारात भली मोठी शिवरायांची त्यांच्या कल्याणी सोबत रांगोळी काढली. खूप छान वेळ गेला, आवडता छंद जे जोपासायला मिळाला. रांगोळीच रेखांटन पप्पांनी करून दिल, रंग संगती मम्मी आणि सोना बाई, फोटो भाऊ राया.. आमच्या घरात आम्हा पाचही जणांना चित्रकलेची आवड असल्यामुळे एकमेकांस सहाय्य करू अवघे धरू सुप्पंत... हा.हा..हा...  
       
          सोनी तुझ्या वाढदिवसाला मैसूर आणू आणि बासुंदी करूया... मम्मीईईई..... हो मम्मीच बनवणार आहे. ए हा.. सोनी.! आयडीया.....! काय?, पाहिजे तर आपण शिरा पण बनवूया हा.हा..हा... तिला गोड आवडत नसल्यामुळे भयंकर चिडली, तुम्ही दोघ पण इथून निघा.. तुमच्या दोघांच्या वाढदिवसाला मी पिठलं भाकर लसणाचा ठेचा करेल... आम्हाला आवडतो बाबा... हा.हा..हा.... जेवढ्या वस्तू बेडरूम मध्ये होत्या तेवढ्या अंगावर येत होत्या.. ऐ सोन्या हिला बड्डे चा ताप चढतोय चल पळ बाहेर... मी तीन वर्षा पूर्वी तिच्यासाठी सरप्राई बड्डे पार्टी केली होती दिवसभर ती त्याच आठवणीत रमलेली होती. आजही तशीच सरप्राई बड्डे पार्टी दिली. फुगे, केक, डिनर, गिफ्ट, फोटो, व्हिडीओ. हे सगळ फार छोटस असत परंतु ह्याच आठवणी वर्षानुवर्षे सुखावत असतात.

         सकाळीस माझी आवडती हिरोईन “श्रीदेवी” गेल्याची बातमी आली. मी आदल्या रात्रीच इंस्टाग्राम वर सहजच “ए जिंदगी गले लगाले” ची एक पोस्ट केली होती, त्यामुळे मला जास्तच वाईट वाटल. मला तिचे सगळेच चित्रपट, गाणी आवडतात. हिरो हिरोईन हे अपल्या मनाच्या फार जवळ असतात. दैनंदिन आयुष्यातला भाग असल्या सारखे मला भासतात. कुठल्यान कुठल्या प्रकारे अपण त्यांचे अनुसरण करत असतो. दिसणे, हसणे, वागणे, पेहराव, नटणे-मुरडणे बऱ्याच बऱ्याच बऱ्याच गोष्टी त्यांच्या सारख्या करू इच्छितो. आणि मुख्य म्हणजे “श्रीदेवी” चे बरेचशे रोल हे फारच प्रेरणादाई होते. बऱ्याच लोकांनी तिच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका केल्या, तिला तिरंग्याचा सन्मान मिळाला त्याबद्दल टीका झाली, तिच्या मरणाच्या कारणा वरून टीका झाल्या. पण मला हे सगळ फार चुकीच वाटल. तिने तिच्या आयुष्यात तेवढी मेहनत केलेली होती त्यामुळे तिला हा सगळा सन्मान मिळाला. त्याचप्रमाणे स्त्री सौंदर्य टिकवून ठेवणे हे जगातलं सगळ्यात अवघड काम आहे, ते तिने तिच्या वयाच्या ५४ वर्षापर्यंत टिकवून ठेवले. केवळ मेकअप ने हे कदापि शक्य नसते. त्याप्रकारची काळजी आणि मेहतन फार आवश्क असते. तिला हे सगळ जरी गडगंज संपत्ती मुळे करणे शक्य असल तरी त्यासाठी योग्य ती काळजी घेणे फार अवघड असते. मनुष्याची सगळीच कामे फक्त पैसा करत नसतो. तो त्या गोष्टी करतो म्हणून त्याच्याकडे पैसा असतो. पण आपला समाज टीका करण्यात फार हुशार आहे. आणि फिल्म स्टार म्हंटल्यावर समाजाकडे टीका करण्यासठी हक्क आणि अधिकार हे मोठ्या प्रमाणत आहेत. त्यामुळे सगळेच जण वयैक्तिक मत मांडू शकता. दिवसभर मी टीव्ही समोरून हलले नव्हते आणि श्रीदेवीच्या शेवटच्या अंत्यसंस्कारावेळी लाईट गेली. मी खूप रडले. फार वाईट वाटत होत मला. दुखी मन मेरे....
दिवसभरत तीचीची गाणी पहात होते.

          मार्च महिना उजाडला दहा तारखेला जपान ला जायच मला फार दुख वाटू लागल मी फार अस्वस्थ होऊ लागले. दोन तीन दिवस मला अजिबात करमत नव्हत घरातून निघण्याची अजिबात इच्छा होत नव्हती. तयारी तशी सुरु होती. पण मन फार खराब झालेलं होत. माझी चिडचिड सुरु झाली होती, वाटत होत कि नवऱ्याला सांगाव तिकीट पुढे ढकल पण खर तर तोही माझी वाट पाहत होता. आणि ते फारस शक्यही नव्हत. मुलीच सगळ काही सुख, सगळी काही माणस, आई-बाप, भाऊ-बहिण, मित्र मैत्रिणी, नाते-गोते सगळ सगळ सगळच.. सारी दुनिया “””नवरा”” ह्या एकाच शब्दावर येऊन ठेपते. तोच सगळ काही असतो. सगळ जग फिरून या पण सर्वस्व नवराच असतो. त्याच जग भलेही केवळ त्याची बायको नसते, तो सगळ्यांना धरून चालतो. तोडत असतो ते केवळ बायकोला तिच्या माहेर पासून, तिच्या जबाबदाऱ्यान पासून त्याच सगळ जिथल्या तिथ सुरळीत चालू असत. उलट बायको मुळे त्यच्या सगळ्याच गोष्टीत भर पडते आणि बायकोच्या सगळ्याच गोष्टी वजा होत असतात. आणि ह्याच सगळ्या विचारांनी माझी घालमेल होत होती, खिन्न-विखीन्न कसतरीच वाटत होत.
त्यासोबत मुंबईच्या मैत्रिणींच येन ठरलेल होत. त्याच दिवशी मम्मीची तब्बेत अचानक फार बिगडली, तीन दिवस हॉस्पिटल मध्येच मुक्कामी भरती झाली. आई शप्पत.... मला अजूनच वेड लागल मी कसल्या कसल्या विचारत होते. त्यात हे अजून काय?,,,, मी मुलगी असल्याची भयंकर चीड मला येत होती. आता ह्याच जागी मुलगा असता तर तो गेला असता का हे सगळ सोडून? त्याच्या जबाबदाऱ्या त्याने कशा पार पाडल्या असत्या. आपण न पैसे देऊ शकतो न इथे काळजी घेण्यसाठी थांबू शकतो. नवरा दहा वेळा काळजी स्तव माहेरची चौकशी करू श्कतो त्यापलीकडे तो काहीच करू शकत नाही. माझ्या डोक्यात विचारांचा गोंधळ माजला होता.
मैत्रीणीं सोबत दोन दिवस थोड्या गप्पा झाल्या, लग्नाचे फोटो व्हिडीओ पाहिला त्यात तिघीही अजूनच रडलो. हॉस्पिटल ला येणे-जाणे झाले. माझ स्वयंपाकात अजिबात लक्ष लागत नव्हत मी काहीही जेवण बनवून ठेवत होते. माझ्या त्या जेवणाला अजिबात चव नव्हती भावाने मम्मी ला जाऊन सांगितले मम्मी दीदी काही पण स्वयंपाक करतेय, पप्पा बिचारे तसच खात होते, मैत्रिणींना कळाल होत. त्यांनाही काहीच छान अस खाऊ घालू शकले नाही. त्याच कारण आल्यापासून मी स्वयंपाक घरात गेलेच नव्हते, दोन-तीन महिने सगळ्या कामाची सवय तुटली होती. घरात कोणती वस्तू कुठे आहे मला काहीच माहित नव्हते. त्यामुळे अजूनच चिडचिड होत होती. कसे तरी चार दिवस ढकलले. मम्मी घरी आली तेव्हा जरा बर वाटल. पुढच्या दोन दिवसात निघायची तयारी सुरु झाली. राहिलेलं सामान गोळा करणे, सासरी पुन्हा एकदा जाऊन आले. तिथून एकटीनेच बरचसं समान आणल. खुश होऊन सगळ्यांचा निरोप घेतला. पुढचे दोन दिवस घरातल वातावरण फार शांत होत. सगळेच दु:खी कष्टी वाटत होते. निघायच्या आदल्या रात्री शेतातल्या भरपूर ताज्या भाज्या घेऊन मावशी मामा भेटायला आले, जावयाला भारतीय भाज्या खायला मिळतील वर्ष होऊन गेल मेथी, शेपू, गवार, शेवगा, कडीपत्ता, वाल ह्या भाज्या खाल्या नसतील त्यांनी, घेऊन जा. मामा ने आणि मी सगळ्या ब्यागांचं वजन करून आणले, नवऱ्याचा फोन आला तेव्हा कळाले भाज्या नेण्यास परवानगी नाही, काढून ठेव राजू तु एकटी येतेस एअरपोर्ट वर काही प्रोब्लेम नको तुला. हो म्हंटल पण मी काहीच काढल नाही, मम्मी ला म्हणाले आला काही प्रोब्लेम तर मी फेकून देईल राहूदे. नाही आला तर पोहचतील तुज्या जावया पर्यंत राहूदे. शेवटी सगळ्या भाज्या जपान पर्यंत पोहचल्या. नवऱ्याने डोक्यावर हात मारला ग्रेट आहेस तू.... मग काय तर काही प्रोब्लेम आला असता तर फेकल्या असत्या हा.हा..हा....

         मला ऐअरपोर्ट वर सोडवायला कुणीही येऊ नका, तिथे काय केवळ पाच ते दहा मिनिटे थांबायला मिळते उगाच तुम्ही दमत बसण्यापेक्षा मी एकटी जाईल बरोबर. एवढ सामान घेऊन कसं जाशील इथे कार मध्ये ठेवल कि एअरपोर्ट वर ट्रॉली मध्ये ठेवेल. दिल्ली ला पुन्हा जमा करून टोकियो च्या फ्लाईट मध्ये द्यावच लागेल ना?, तेव्हा तुम्ही येणार आहात का?, करेल मी बरोबर.. आणि मी ते केल सुद्धा अगदी बरोबर न चुकता.
आता सुरु झाला तो माझा एकांत.....! “एकांत के सौ वर्ष”......! मला एकांत हा नेहमी फार आवडत असतो शक्यतो प्रवासात जास्तच. दुखी झालेल्या मनाला संपूर्ण तीन महिन्याच्या आनंदाने उल्हासित केले. आपण जगात किती सुखी आहोत याची अनुभूती होत होती. मुंबई पर्यंत हेच सगळ आठवत खुश होत, डोळे पाणावत
नाशिक ते मुंबई प्रवास संपला.

मुंबईची पोरगी विमानी बसली
पीरतीच्या देशाला निघाली 
मुंबई ते टोकियो...
पंखावरी प्रीतीच्या ह्या, येईल मी फिरुनी
हाय..! आस्मानी रंगाला गेले मी भुलूनी....

आता आला तो एकांतातील महत्वाचा मुद्दा आज पर्यंत संसारात झालेल्या चुका काय? कशा? कोणत्या? त्या कशाप्रकारे झाल्या?.... ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवायची हि वेळ होती. ह्या सुधरवायच्या कशा? बर त्या आपण जर सुधरवल्या तर नवरा सुधरवेल का? कारण संसारात कुठलीच गोष्ट एकामुळे होत नाही, त्याला दोघेही जबाबदार असतात. मग?, आपण सुधरवू बाकी ज्याच त्याच्यावर अवलंबून राहुदेयुया... काय काय बदल अनिवार्य आहेत हे ओळखून स्वतःला संपूर्ण प्रवासात प्रशिक्षण दिल जो काही अडीच तीन महिन्याचा कालावधी होता त्यात पुरे पुरे स्वतःला एक नवीन विचारांची चालना देऊन सुरवात केली. आणि ती सुरवात सफल झाली.
पुढे दिल्ली पर्यंत आल्यावर माझा आत्मविश्वास फार उंच उंच गगन भराऱ्या घेत होता. आयुष्यातील सगळ्या गोष्टींना सामोरे जाण्याची ताकत आपल्यात असतांनाहि आपण किती विचार करतो. सगळ काही सुराळीत चालेल जास्त चिंता नसावी.
आज सुबह कि पेहेली किरण, चुपकेसे धीरेसे कानो मे केह गई थी.. सब अच्छा होगा...!
और इसी बात पे मिठी सी मुस्कान चेहेरे पे छा गई थी....

सोचा कहां था, ये जो, ये जो हो गया
माना कहां था, ये लो, ये लो हो गया
चुटकी कोई काटो, ना हैं, हम तो होश में
­­­क़दमों को थामो, ये हैं उड़ते जोश में
बादल पे पांव है, या छूटा गांव है
अब तो भई चल पड़ी, अपनी ये #Flight🛫 है
बादल पे पांव है...­­­­
आम्ही दोघेही भेटल्या नंतर फार अनोळखी अस वाटत होतो. फार कमी बोललो, जणू काही कालच लग्न झालेलं आहे. हि सगळी अनुभूती त्या दुराव्यातील प्रेमाचीच होती. नवऱ्या सोबत भेट झाल्यानंतर जाणवल कि मी त्याच्यापासून काही दिवस दूर राहण किती गरजेच होत. मी जो बदल संसारात व्हावा यासाठी झटत होते त्याच साठी तोही प्रयत्न करत होता.
आधी वाटत होत....
“का रे दुरावा”? पण नंतर जाणवल “थोडा विसावा”....
  
तुज्यासवे असुनी तुज्याविना जगायचे रे कसे?
अनोळखी नसुनि अनोळखी मानायचे कसे?
अंतरात राहुणी अंतर कसे?
नाते कोणते जपु अन कसे?
हसता हसता आसु टीपने,
तुज्यासवे......
तुज्याविना…… नकोसा तरी हि हवा
का रे दुरावा असा….
थोडा विसावा……
का रे दुरावा.... (मालिका शीर्षक)

असा हा मुंबई ते टोकियो प्रवास....
समाप्त..

फोटो साठी “क्षणांनी भरलेले आभाळ”...! फेसबुक पेज



राजश्री जगताप.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...