Finally Changed My Wardrobe.....!
आपल्या भारतातली चैत्र पालवी म्हणजे जपान चा
“सकुरा” (चेरी ब्लोस्सम). आज मराठी नवीन वर्षाची सुरवात आहे, मला काही फारस लक्षात
नव्हत. पण आज आमच्या येथील वातावरण हे फारच बदलल. पाच महिन्यापासून जी थंडी होती. आणि
जिचा मला भयंकर कंटाळा आलेला होता शेवटी आज ती संपली. कडक ऊन पडले. तसे बऱ्याच
दिवसापासून उन्हाला सुरवात झाली, परंतु थंड हवा चालूच होती त्यामुळे कपडे हे
थंडीचेच घालावे लागत होते. थंडी, पाऊस, बर्फ, हे काही दिवस असेल तर फार छान अनुभव येतो.
परंतु पाच सहा महिने म्हणजे नको नकोस वाटत. आणि मुख्य म्हणजे छान छान कपड्यांच्या
ऐवजी डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत सगळ काही प्याक करून फिरणे
उफ्फ्फ्फ... त्यामुळे फारस बाहेर जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही आणि सतत घरात
बसल्यामुळे नैराश्य जनक वातावरण पसरण्याची शक्यता असते. आम्ही दोघेही प्रत्येक
परिस्थिती आणि वातावरण यांना छान पद्धतीने सावरतो त्यामुळे त्या नैराश्याला येथे
फारशी जागा ठेवत नाही.
आज
उठल्याबरोबर बाहेर पाहीले आणि सकाळीस फिरायला जाण्याची इच्छा झाली. ऐ.ऐ..ऐ....
सत्या उठ चल बाहेर बघ किती छान वातावरण आहे. पटापट ब्रेकफास्ट करू फिरून येऊ आणि
मग जेवणाच बघू. अग दिवसभर असच वातावरण राहील दुपारी आरामात जाऊया... नही आत्ताच
जायच... आणि मी आज माझ Wardrobe change करणार.... कारण ज्याकेट ची आवशकता नाहीईईई.....
कोणते घालू इंडियन?? हो मस्त इंडियन घाल. निसर्ग नेहमी आपला आनंद वाढवत असतो. जो किती
किती प्रकारचे बदल करत असतो ना?, निसर्गाच्या देणगीनेच आपल्याला हव तस जगण्याची
उम्मेद वाढते.
माझ्या घराच्या खिडकीतूनच छान अशी “सकुराची”
झाडे दिसतात. दिवसभर त्याची पुष्पऋष्टी होत असते, मन अगदी प्रसन्न होते. पुढे
संपूर्ण रस्त्याच्या दुतर्फा भल्या मोठ्या रांगेत सगळीकडेच सकुराच सकुरा पाहायला
मिळतो. ह्या फुलांमध्ये बऱ्याच रंग छटा असतात. पांढऱ्या श्वेत रंगापासून सौम्य
गुलाबी, तपकिरी, लाल, हिरवा, पिवळा, जांभळा सगळे रंग सौम्य असल्यामुळे मनाला शांत
सुखवणारे भासतात. मी आधीच्या लेखांमध्ये देखील सकुरा चे वर्णन केलेले आहे. कारण हा
जपान मधील सगळ्यांचाच सर्वात अवडता ऋतू आहे. खूप दिवसातून बरेच फोटो व्हिडीओ आज
मला मनसोक्तपणे घेता आले. स्वतःचेही आणि निसर्गाचेही.... दोहो पार्क जवळ
पोहचल्यावर दोघानांही वाटले जेवण बनवून आणले असते तर पार्क मध्ये अजून वेळ बसलो
असतो, चला मग पुरी भाजीच बनवायची आहे अर्ध्या तासात बनवून पुन्हा एक पर्यंत येऊ
इथे, नको आता राहूदे जेवण घरीच ठीक आहे. पुन्हा येत राहू...
पुरी भाजी आणि
श्रीखंड हा बेत असा काही खास पाडव्याचा नव्हता. पण योगायोग जुळून आला. परवा मी
सहजच म्हणाले होते मला श्रीखंड पुरी हवीय. तू उद्या दही घेऊन ए मी तुला बनवून
देतो. रात्री दही लावून ठेवतो, परवा मस्त पुरी-भाजी, श्रीखंड कर. हो चालेल....! माझ
सणवार बघून कशाचा येवढा कल नसतो परंतु योगायोग नेहमी खूप छान येतो आणि सगळ काही माझ्या
हाताने सुंदर पद्धतीने साजर केल जात. स्वयंपाक करता करता सहजच जाणवलं, सणावाराला
गोड बनविण्याची संकल्पना कशी काय उदयास आली असेल बर?, गोड खाल्यावर माणूस गोड
बोलतो गोड वागतो हा.हा..हा... कितपत खर आहे ओ हे? वाकडा माणूस काही खाल्ल तरी
वाकडाच राहतो. पूर्वी माणसा कडे फारस अन्न उपलब्ध नव्हत, जे काही शेतात पिक येत
होत त्यानुसार सण-वार केले जात होते. ज्या पिकांचा हंगामा असायचा ते ते पदार्थ बनत
होते. भरपूर प्रमाणात गहू निघाला कि पोळ्या, रवा-शिरा, शेवया, मालपोहे वैगरे
वैगरे... उसापासून गुळ, साखर, मोठ्या प्रमाणता ताज्या दुधाची उपलब्धी म्हणून
कुठलाही सण आला कि गोड-धड करा, बाई सण-वार हाय पुरण टाक, गॉड-धौड करायचं म्हणजे
करायचच... पण माझ्या मनात एक अजून एक असा विचार डोकावला ज्या बाई कडे शेती गोती
नव्हती तिच्याघरात धन-धान्य नव्हत तिने बिचारीने कसे सण साजरे केले असावेत वाण्यानेही
उधारी पाधारी वर समान दिल तर दिल आणि नाही दिल तर तिचे मुल बाळ ह्या सणांच्या
नावाने अजून किती दु:खी कष्टी होत असतील तिच्या मनावर काय परिणाम होत असेल? ह्या
सगळ्या पदार्थांच नाव ऐकून किती वाईट वाटत असेल. नाही म्हणजे तसे दिवस आपण नाही
कधी पाहीले नाही अनुभवले, परंतु स्वतःच्या दु:खाने मनुष्याच बळ वाढत आणि दुसऱ्याच्या
दु:खाने आत्मबळ वाढत असत. आज आपल्याकडे सगळ काही उपलब्ध असल्यामुळे आपल्याला ह्या
सगळ्या दिवसांचं फारस महत्व वाटत नाही. पण आज परिस्थिती फार बदलली आहे. रोजच्या
जेवणात ताटाला गोड धड लावलेलं असलच पाहिजे अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टी झाल्या
मुळे ह्या सगळ्या दुःखाची सर मनुष्याने संपवली आहे.
चला मग या बसा जेवायला,
ताट तयार आहे. बाकी सुखा दुःखाचा संगम म्हणजेच आयुष्य...
पुरी-भाजी, श्रीखंड,
मसाला आंबट काकडी, फळे.
बटाटयाची भाजी मला
मिरची कापून आणि लसून, जिरे-मोहरी, कांदा अशी फोडणी देऊन त्यापेक्षा... मिरची,
लसून, जिरे, धणे, मीठ असा खरडा करून कांदा मोहरीची चमचमीत फोडणी देऊन बटाटे चांगले
परतून वरतून हळद पसरवणे आहा.....! त्या फोडणीचा काय सुंगध आणि चव.... अप्रतिमच.....
श्रीखंड मेड बाय पतीदेव....
सण पण साजरा झाला आणि जपानीज-मराठी नवीन वर्षाच्या हवामानाचे स्वागतही
जल्लोषात झाले..... आणि माझ Wardrobe बदलल हे सगळ्यात जास्त महत्वाच.... हा.हा...हा.....
राजश्री जगताप....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा