मुख्य सामग्रीवर वगळा

#आज_माझ्या_बाबांचा_वाढदिवस_आहे: #प्रत्युष👨‍👦😘

                     हॅलो मम्माचे फेसबुक फ्रेंड्स आणि फॉलोवर्स मी प्रत्यूष बोलतोय. माझा जन्म जपान त्सुकुबा येथे झाला हे तुम्हाला सगळ्यांना माझ्या मम्माने सांगितलेच आहे. मी मम्मा-डैडी सोबत जपान मध्ये साडे तीन महिने राहिलो आम्ही खूप खूप मज्जा केली, मी मम्मा डैडीला खूप खूप नवीन नवीन गोष्टी शिकवल्या. आम्ही खूप लांब लांब फिरायला गेलो. उशिकू दायबुत्सु चा बुद्धा पाहिला(जगातील सगळ्यात उंच बुद्धा), माउंट फुजी पाहिला(जपान मधील सगळ्यात मोठे आणि प्रसिद्ध ठिकाण) खूप खूप फिरलो, पण तरीही तुम्हाला खर सांगू?..... मला आई बाबांना कधी भेटेल असे झाले होते. मी कधी त्यांच्याकडे भारतात येईल असे झाले होते. मला सगळ्यात जास्त माझे बाबाच आवडतात ते कसे विचारताय?, थांबा हं सांगतो.....
       ऐका....

मी मम्माच्या गर्भात असल्यापासून माझे बाबच माझे फार फार लाड करतात. ते तेव्हाच म्हणायचे तो बघ भारतात आला कि माझ्याचकडे जास्त राहील. तो माझच ऐकेल, त्याचे सगळ्यात जास्त मीच लाड करील आणि आज खरच तसेच जाहले. मी आई बाबांनाच मम्मी पप्पा म्हणणार होतो, पण सगळ्यात पहिले आई आणि नंतर बाबा हेच शब्द बोलायला शिकलो म्हणून मी त्यांना आई बाबाच बोलायचं ठरवलं. मी भारतात आल्याबरोबर मला बाबांनीच हातात उचलून घेतल, त्यांच्या स्पर्शानेच मला समजले कि हे माझे बाबाच आहेत. मी भर झोपेत असतांना देखील पटकन डोळे उघडून मिचीमीची त्यांच्याकडे बघत होतो. आम्हा दोघांनाही फार फार फार आनंद झाला. आणि त्यांना त्यांचे आनंदाश्रु आवरताच आले नाही. आणि मग काय मी पण रडायला लागलो. बहुतेक मला पण नसतील आवरले हो..... हा.हा..हा.... मी घरी आल्याबरोबर बाबांनी खूप साऱ्या खेळणी टॉवेल, ब्लांकेट, ड्रेस असे खूप खूप काय काय माझ्यासाठी घेऊन आले. ते कामावर गेले तरी त्यांना तिथे करमत नव्हत. मला पण ते घरात नसतांना आवडत नाही, ते आल्याशिवाय मी दुदू पीत नव्हतो, झोपत नव्हतो खेळत नव्हतो. ते घरी आल्यावरच मला आनंद होतो. आता मी मोठा झालो मला माहित आहे बाबा कामावर जाऊन येतात. तोपर्यंत मी जेवतो, झोपतो, खेळतो. मग ते घरी आल्याबरोबर मला दम राहत नाही, मी लगेच उचलून घ्यायल रडतो. ते खाली ठेवायला लागले तर त्यांची कॉलर घट्ट पकडतो. बाबा मला अजिबात रडू देत नाही जे हव ते माझ्यासाठी करतात. आम्ही लेगेच फिरायला जातो. मला त्यांच्या सोबतच फिरायला आवडते. बाबा मना थूप थूप प्याल कलतात. माझे खूप सारे टोपण नाव त्यांनी ठेवलेले आहे. “सुमो बाबू, सौंदऱ्याचा नाना, बाबूच्या-गबुच्या, गुंडूरलावा(एका रांगेत आईच्या मागे तुरुतुरु चालणारे पक्षी), हुशार बगळा, सुंदर बाळ” बराक ओबामा अशा भरपूर भरपूर कित्येक नावाने ते मला आवाज देतात. सगळ्यात जास्त माझी काळजी बाबाच घेतात. नवीन नवीन पदार्थ, फळे तेच मला खाऊ घालतात. मला नाचवतात मी आनंदाने नाचतो. गाणी म्हणायला शिकवतात ते माझ्यासाठी अंगाई गीत शिकले. “तुझे सुरज कहु या चंदा”, रोते रोते हसना सिखो, हसते हसते रोना”, नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी मे क्या है”, हमारी हि मुठ्ठी आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा”, लुक चूप लुक चूप जाओना, ऐसे छूप छूप मुझे सताओना ओ मेरे नन्हे मुन्ने प्यारे प्यारे राजा आओ मेरे गले लग जाओना अले आओना”, पापा केहेते है बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा”, “सून सून सून मेरे नन्हे सून, सून सून सून मेरे मुन्ने सून, प्यार कि गंग्गा बहे, देश मे ऐका रहे...., हे त्यांच्या आवडीच गाण ते नेहमी माझ्यासाठी म्हणतात असे खूप गाणी ते म्हणतात.
प्रत्येक पदार्थ मी त्यांच्याच हातून खायला सुरवात केलीय. कालन त्यांना बगाच अत्त मी कछ कछ तोंड कलतो. मला काय खायला द्यायच हे बाबाच सुचवतात. पुन्हा जे काही मी खाल्लय त्याने मला कोणता त्रास होतो का? मला ते पचते का? हे ते लक्ष ठेवून असतात. घरी नसले तरी फोन करून मम्माला आईला सारखे विचारत असतात. माझ्या व्याक्सीनेशनसाठी एकदा ते आले होते पण माझ इंजेक्शन बघायच्या आधीच रडायला लागले. असे ते छोट्या छोट्या गोष्टींवरून रडतात. मी जपान ला पुन्हा निघून जाईल ह्या विचाराने सुद्धा रडतात. माझ कौतुक सगळ्यात जास्त तेच करतात. मी किती हुशार आहे हे ते सगळ्यांना पटवून पटवून सांगतात. माझ्या प्रत्येक हालचालीवर, हावभावावर त्याचं लक्ष असत. माझे खूप खूप फोटो व्हिडीओ काढत असतात. माझा प्रत्येक महिन्याचा वाढदिवस ते साजरा करतात. माझ्या मासिक वाढदिवसाला ते नेहमी माझ्या बदलत्या वयानुसार म्हणजे चौथ्या आणि पाचव्या वाढदिवसाला कपडे खेळणी, सहाव्या वाढदिवसाला मला बसण्यासाठी बेबी सोफा, सहाव्या वाढदिवसाला झोका, सातव्या वाढदिवसाला चालण्यासाठी वॉकर, पियानो, डफली, बाहुली अशा भरपूर खेळणी मला भेट आणत असतात. मला सगळ्या गोष्टी बाबाच शिकवतात आणि मी पण त्यांचच ऐकतो. खायचं कस, खेळायचं कस, कुणाला काय म्हणायचं, खेळणी वापरायच्या कशा हे सगळ सगळ बाबाच शिकवतात. चालायला बोलायला पलंगावरुन उतरायला बाबांनिच शिकवले.

        त्यांच्या कामाचा ताप खूप जास्त असतो तरीही ते कधीही थकलेले भागलेले नसतात. मला ते त्यांच्या गणवेशात खूप आवडतात. आज त्यांच्या ह्या नोकरीच संपूर्ण जगाला कौतुक आहे. पोलीस खाते हे खूप मोठे आणि नावाजलेल आहे. आयुष्यभर जनतेसाठी झटतात त्यामुळे मला त्यांचा फार आदर आहे. आपल्या देश हितासाठी त्यांनी त्याचं आयुष्य आणि कुटुंब पणाला लावलेलं असत. आमच्या बाबांचा सगळे जण खूप आदर करतात.

      बरेचशे सरकारी नोकरी असणारे लोक हे घर घेण्याचा विचार करत नाही, सरकार कडून मिळालेल्या खोल्यांमध्येच आयुष्य काढतात परंतु पुढे त्यांना खूप मोठ्या संकटांना सामोरे जावे लागते, त्याच्या कुटुंबाची परिवाराची घर नसल्यामुळे खूप हेळसांड होते. आता हेच बघाना करोना वायरस आल्यापासून केवळ एक घरच असे आहे जे मनुष्याला सुखरूप ठेवू शकते. न कोणते कामाचे ठिकाण, न बाहेर कुठे माणूस राहू शकतो. केवळ फक्त म्हणजे फक्त आपले स्वतःचे घरच आजच्या वाईट प्रसंगात मनुष्याला उपयोगी पडले. बऱ्याचशा लोकांची मानसिकता असते आपले उत्त्पन्न चांगले आहे, त्यामुळे कशाला स्वतःच हक्काच घर घेत बसायचं?, नोकरी सोबत मिळालेल घरच आपल आहे. पण आज घर आणि घराची किंमत त्यांच्या लक्षात येत असेल. हे मी येवढा लहान असतांना कस काय बोलतोय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना?,
पण खर सागायचं जाहल तर मी जन्माला आलो जपान या देशात, नंतर भारतात आलो. आणि आज बाबांनी बनवलेल्या घरातच सुखरूप आहे. शेवटी ह्क्काच घरच उपयोगी पडत माणसाला. माझी मम्मा पण म्हणते देश विदेश मी फिरून आले, माऊ मामा दुसऱ्या शहरातून आले परंतु संपूर्ण जगात वाईट वेळ पसरलेली असतांना बापाच्याच घरात त्यांच्या छत्रछायेखाली सुखात सुखरूप वाढतोय. लॉकडाऊन मध्ये सुद्धा आनंदी आहोत. बाहेरील वाईट वातावरणात सुद्धा आपण घरात निवांत आहोत याच समाधान वाटत. म्हणूनच मला पण हे सगळ जवळून पाहायला मिळाल्यामुळे मी शिकलो आहे. मी लवकर लवकर मोठा होऊन माझ्या सामाजिक नैतिक जबाबदारी आणि कर्तव्यांसोबत माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, मुलांसाठी घर घेणे हि देखील एक जबाबदारी वेळेत पूर्ण करेल. बाबांकडून मला आज हि फार मोठी गोष्ट शिकायला मिळाली.
         मी घरी आल्यापासून बाबा फारच उत्साही आनंदी असतात. माझ्यामुळे त्यांची झोप देखील फार कमी झालीय, ते आराम करायचं सोडून माझ्यासोबत खेळत बसतात, पण मी त्यांना अजिबात त्रास देत नाही, त्यांच गुणी बाळ आहे. आणि ह्याच कारणाने माझे अजून जास्त लाड होतात. बाबांनी जसे मम्मा, माऊ, मामा यांना सांभाळले त्यापेक्षा जास्त प्रेमाने मला ते सांभाळताय. आज त्यांचा ५३ वा वाढदिवस आहे. तरीही ते एखाद्या तरुणाला लाजवेल इतके सुंदर, सुधृढ आहेत. तुम्हाला खूप खूप आयुष्य लाभो बाबा. तुमचे खूप खूप वाढदिवस साजरे करण्याचा आनंद आम्हाला लाभो.
आज ह्या करोना विषाणूणे जो काही जगात ठेहराव आलाय याचा सामना आपण सर्व मिळून करूया यासाठी तुम्ही सर्व आमच्या बाबांना आणि समस्त पोलीस विभागाला सहकार्य करा आणि त्यांच्या पुढील कामासाठी त्यांना शुभेच्छा देऊ...
जय हिंद.....! जय भारत.....!
वन्स अगेन हैप्पी बर्थडे बाबा...🎂🎉🎁🍫🍰🍭🧁🍧🍼🍺🛍🧸🎈
तुमचा लाडका प्रत्यूष(सुमो बाबू)......❤️👨‍👦😘

राजश्री जगताप✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...