

मीरा ताईंची आणि माझी ओळख ही फेसबुक वर झाली. "माझ्या लग्नातील शालू" हा लेख त्यांनी वाचला होता त्यानंतर त्या माझ्या फेसबुक पेजच्या फॉलोवर झाल्या माझ्या प्रत्येक फोटोला, लेखाला त्यांची कमेंट असायची. त्यानंतर एकदा मेसेंजर वर बोलणे झाले, फोन नंबर दिल घेतले. मग काय आम्ही बऱ्याच वेळ फोन वर बोलायचो. त्यात जवळची ओळख आमची अशी की आम्ही दोघीही नाशिक मधल्या. त्या मला नेहमी म्हणतात फेसबुक वर मैत्री करणे थोडे कठीण असते आपण लगेच कुणावर विश्वास ठेवू शकत नाही. परंतु मी जेव्हा तुझे लेख वाचते तेव्हा तुझ्या सोबत बोलत असल्याचा भास होतो. इतके खर आणि स्वच्छ मनाने लिहिते. त्यामुळे तुझ्यासोबत मैत्री करतांना पटकन विश्वास बसला. अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया आणि माझ कौतुक त्या नेहमी करत असतात. मी नशिकला भारतात लवकरात लवकर याव अशी त्या वाट पाहत होत्या. त्यात मी गरोदर आहे असे समजेल तेव्हा तर तू बाळंतपणासाठी घरीच ये असे त्यांचे कडक सांगणे होते. माझी बरिच काळजी त्या फोन वर व्हाट्सअप वर घेत असे. मला बाळ झाल्यानंतर ही त्या मी एकटिने जबाबदारी पार पाडल्याच भरपूर कौतुक करत असे. मी भारतात आल्याबरोबर माझा फोन बंद पाहून मेसेंजर ला संपर्क साधुन त्या मला साडी आणि बाळाला गिफ्ट घेऊन त्यांच्या कुटुंबा समवेत भेटायला आल्या. त्यात आमची भेट ही महिलादिना दिवशी ८ मार्च २०२० ला झाली त्यामुळे आमच्या भेटीचा दिवस मला फार छान लक्षात राहिल. त्यात महिलादिना दिवशी मैत्रिणींकडून एकमेकिंना साडी मिळाली महिलांची आवडती वस्तु म्हणजे सोने पे सुहागा.
आता मीरा ताईं बद्द्ल सांगायच झाल तर त्या माझ्या पेक्षा वयाने फार मोठ्या आहेत. माझ्या मम्मीच्या वयाच्या जवळपास परंतु सोशल साईट वर सुरवातीला मावशी काकू म्हंटल तर हसायला येते म्हणून ताईच म्हणायचे तर त्या कायमस्वरुपीच्या ताईच झाल्या. त्यांचा स्वभाव अतिशय प्रेमळ आहे. फार सहनशक्ती शील स्त्री आहे. आयुष्यात मोठे मोठे संघर्ष केल्यानंतर त्यांच्या पदरी जे काही आज यश आहे त्याचा मला फार अभिमान वाटतो. अवघड परिस्थितीत मुलांच संगोपन करुण त्यांची शिक्षण, घर, संसार मुलांना दुचाकी चार चाकी वाहन घेणे हे सगळ सुखा सुखी मुलांना पुरवने एका आई साठी मोठा संघर्ष असतो आणि आज त्या हया संघर्षला हरवून जिंकल्याच कौतुक कराव तेवढ कमीच आहे. त्यांची मुले संकेत आणि श्रावणी. संकेत सोबत माझी भेट होणे बाकी आहे. पण श्रावणी फार गोड आणि नाजुक, हळूच प्रेमाने थोडच बोलणारी, तिही बिचारी पेचात पडली की राजश्री मावशी म्हणू की दीदी. असो ते फार महत्वाच राहत नाही जेव्हा मन जुळली जातात. प्रत्युष च आणि तीच छान जमल तास दोन तास त्याला घेऊन फिरवत होती खेळत होती.
माझ्या मम्मी पप्पांना देखील फार कौतुक वाटल फेसबुक च्या मैत्रिणी अस वाटत नाही नात्यातलेच असल्यासारखे वाटले. माझ्या मम्मी ला देखील एक छान मैत्रीण मिळाली.
Lockdown संपल्यावर मी नक्की एकदातरी भेटायला येईल ताई. आपल्या मैत्री बद्द्ल लिहायला थोडा उशीर झाला बरं. अजुन काही राहिल असेल माझ्याकडून तर तुम्ही पूर्ण करा😉 मी थोडक्यातच लिहिले आहे.
छान छान मैत्रिणी असणे अहो भाग्यच.
राजश्री जगताप.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा