मुख्य सामग्रीवर वगळा

नणंद.....


नणंद.....

         मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. पण मनु हिम्मतवान असल्यामुळे तिने नवऱ्याशी या विषयावर चर्चा केली परंतु पैशांच्या विषयावर दोघांची नेहमीच भांडण होऊ लागली. संसारात प्रेम नाही अस अजिबात नव्हत. पण एकमेकांना मानाच स्थान देण हे फार अवघड जात होत, त्याच कारण म्हणजे तिच्या नवऱ्याचा स्वभाव आड येत होता. कारण मनुच म्हणणं होत कि आपल्या कोणत्याही निर्णयात नवरा-बायकोला सामील करून घेणे, एक विश्वासात घेणे हे जमल तर अशी भांडण होणार नाहीत. प्रत्येक भांडणा नंतर तिला शास्वती मिळत होती. सगळ ठीक आहे, सगळ ठीक होणार आहे, तू कशाचीच चिंता करू नको, खर तर तिलाच मुर्खात काढल जाऊ लागल कि तूच जास्त चिंता करते. तुझे विचार दुषित आहेत. पण अशा भांडणाला जोडून तिला प्रेमहि मिळत होत, मग काय सगळच काही सभादून जात असे. सगळ्याच चुका माफ.

         मनु नेहमीच नवऱ्याला म्हणू लागली आपण घर घेऊया.... पण त्यावरही तिला बोल मिळू लागले. सासरचे सर्वच बोलू लागले. नणंद तर म्हणाली घर घ्या-घर घ्या म्हणते त्याच्यात काय राहणार आहात का???? कंपनीने दिलंय न घर..?? सहा महिने झाले लग्न होऊन, तू आज आलीय आणि तुझ्यासाठी घर घेऊ का..? मनु ताडकन उत्तरली... अग बाई...! हा कसला प्रकार??? मनु ला काही हि भाषा कळेना, असा हिशोब जर असेल तर उद्या तू चाळीस वर्षा नंतरही असंच म्हणशील “चाळीस वर्षे जाहली तुला येऊन” कारण प्रत्येक वस्तूच्या किमती वाढत जातात ना,? तसच वर्षाने माझी वाढत जाईल, नाही का...? वर्षा-वर्षाने जर बायकोची किंमत ठरत असेल तर तू घेतलेल्या शिक्षणावर मला दया येतेय रे......! शिक्षणातील गणितात बाजी मारणारा, कौटुंबिक गणितात इतका कच्चा असू शकतो का..? आणि त्यांच्या ह्याच भांडणाचा लाभ घेत बाई ने (नंदेने) दोन महिन्यात घर घेतलं. तेही भावाच्या मदतीनेच आणि ह्या व्यवहाराचा काहीहि एक भाग मनु ला सांगितला नाही. त्याच वेळेस नणंद हे नात किती आप्पलपोटी असत हे तिला कळून चुकल. परंपरेने नणंद हे नात खराब का होत आलय हे आज मनु ने अनुभवलं ऐकण्यात आणि अनुभवण्यात किती फरक असतो गं “मनु”...! 

       सासू ने मनुला तिचा इतिहास सांगितला होता. “माझ्या एका नंदेने माझी चूल खंदून नेली व्हती”. नवरा घरात नव्हता, मी एकटी ढसाढसा रडूले, तो आल्यावर त्याला सगळ सांगितलं, ती रात्र माझ आख्ख घरदार उपाशी झोपल... मग, दुसऱ्या दिवशी बहिणी कडून गरजू भांडे आणले. आन जोमान संसार उभा केला. आमच्या नंदा लै वाईट होत्या बाईईई....! सगळ्या नंदाना मी पुरवल. मनु ला चटकन सासूचा इतिहास आठवला. कारण, आज तिच्या सोबत घडलेली गोष्ट हि तिला परंपरेने चालत आलेली वाटली. ती अशी कि, हि सुद्धा एक चूल खंदून नेण्यासारखीच गोष्ट आहे. भावजई ची चूल न होऊ देता स्वतःची चूल बनवली. मनु ला फार काही-काही बोलावस वाटल, अगदी सासूला हे आठवून द्याव जे तुमच्या नंदांनी तुमच्या सोबत केल आज तेच तुमची मुलगी तुमच्या सुनेसोबत करतेय. तरी ती नवऱ्याकडे भांडली, बडबडली. पण चुका “न”स्वीकारणारी लोक म्हणजे सासर घर गंअंअ... मनु.... कुणालाही बोलून काहीच फायदा नाही, उलट शेवटी मनुच वाईट ठरली.

        हे सगळ आयुष्यभर सोसाव लागणारच असा समज करून मनु संसार करू लागली. द्रुष्ट लागण्या जोग्या संसारात पैशांच्या व्यवहारावरून नेहमीच वाद विवाद भांडण होऊन मनु कंटाळली. तीच एक साध म्हणणं नवऱ्याला होत, ज्या नंदेला नवऱ्याने टाकून दिलीय तीच तू कर नक्कीच तिचा आधार तूच बनून रहा पण, ज्या नंदेला नवरा आहे, त्या दोघांचे हात पाय सुधृढ आहे, दोघ नोकरीला आहेत, ज्यांनी मुलांना जन्माला घातलय त्या स्वतःच्या मुलांचा खर्च हे आई बाप करू शकत नाही का..? भावाच्या पैशांवर आपल्या मुलांची शिक्षण चालवण, महिन्याच्या-महिन्याला त्याच्याकडून पैसे घेत राहण हे खरच किती योग्य आहे...? मनु ला तिच्या स्वतःच्या कुटुंबाची काळजी भेडसावत असे, स्वतःच्या मुलांच भविष्य आहे, पुढे हीच लोक उद्या तुझ्या मुलांसाठी करतील का? आज तुझ्याकडे पैसा आहे पण उद्या तुझ्या गरजेला कोण आहे? हे एका शब्दात छाती ठोक पने आणि आत्मविश्वासाने सांग, सांगू शकतोस??? नाही सांगू शकत तू..... भांडणामध्ये मनु म्हणाली माझ्या माहेरी हि दे पैसे, देऊ शकतोस का? का? मी का देऊ पैसे? तुझा बाप माझ्या घरी जाऊन माझ्या आई बापाला बघत नाही... अरे बापरे हो का? अस आहे तर....., तुझी बहिण तुझ्या स्वतःच्या आई बापाला बघते सांभाळते म्हणून तू तिला पैसे पुरवतो..?? नाही हे तूच सिद्ध केलस, तुझ्याच शब्दात... म्हणजे, किती नालायक बाई असेल ती स्वतःच्या आई बापाला सांभाळण्याचे पैसे भावाकडून वसूल करते. तिला तिच्या ह्या कृतीची जराही लाज वाटत नाही. याचा अर्थ तिने तिच्या नवऱ्याला भर पगारी माहेरचा नौकर ठेवलेलं आहे. त्या दोघही नवरा बायकोला जनाची नाहीच पण मनाची सुद्धा लाज वाटत नाही. आणि ह्या नंदेची अशी वागणूक बघून ज्या नंदेला टाकून दिलंय तिच्या साठी देखील मनु ला आता वाईट वाटत नाही. मनुच्या मनात जो काही तिच्या बद्दल कोमल कोपरा होता, तो कोमेजला. आणि आता तिच्या मुलासाठी त्याच्या नावांवर पैसे टाकणे हे देखील मनुला चूक वाटू लागल. कारण, काय रे.. तुझ्या आई बापाची परिस्थिती इतकी वाईट असतांना देखील तू मोठा झालाच ना? अगदी तू कमवेपर्यंत तुझ्या नावणार कुणी पैसे टाकले होते का? नव्हते ना? तरी तू शिक्षण नोकरी मिळवलस ना...? मग तोही एक मुलगा आहे, त्यालाही कमवता येईलच ना..? स्वतःच्या पायावर उभ राह्यासाठी माणसाला सक्षम बनवावं, दुर्बल नाही...

आणि हो माझ्या माहेरी तुझी फुटकी कवडी देखील नको, ते तर तुझ तोंड उघडायसाठी मी बोलले आणि तू उघडलस... अभिनंदन....

        बरं मनु सासरी असतांना नणंद आली तिने काही फिनेल च्या बाटल्या आणल्या आणि तिच्या आईला गावात विकायला सांगितल्या, आधीच्या बाटल्यांचे किती रुपये आले? किती बाटल्या विकल्या,? सगळी विचारपूस करून त्याचा हिशोब तिने आई कडून घेतला. १४५ रुपयाची एक बाटली होती अशा तीन बाटल्या विकल्या गेल्या होत्या आईने ४०० च रुपये दिले आणि वरचे ३५ रुपये नाहीत, अस सांगितल्या बरोबर ती भांडू लागली, दे-दे असतील तुझ्याकडे, खोट नको बोलूस....... हा.हा..हा....... मनु ला मनातच इतक हसू आल तीच, कि हीच बाई भावाकडून इतके पैसे घेते त्याचा हिशीब असेल का हिच्या कडे खरच...? किंवा हि त्याला त्याचे पैसे परत देणार आहे का...? नाही, म्हणजे जर हि हिशोबाची एवढी पक्की आहे तर, ए सवाल तो बंता है ना बोस्स्स्स..... पण मनु ने व्यवहारिक गोष्टी आणि त्यावरील चर्चा नवऱ्याशी बंद केली असल्यामुळे तिने हा प्रश्न स्वतः पुरताच ठेवला. तिला इच्छा असून देखील झाकली मुठ सव्वा लाखाची. नाही-नाही अशे कित्येक लाख रुपये मुठीत साठलेत हे तीच तिलाच मनुलाच माहित बरं... जाऊदे मनु अशा गोष्टी आपण शांत पने बघून घ्यायच्या, आपल्याला माणसाची ओळख पटलेली आहे, बाकी योग्य वेळेवर सोडून दे. चूक बरोबर नियती ठरवतेच.

कथेचा सारांश:-- नाते जपणे हे त्या लोकांवर असते ज्यांनी बाहेरून एका मुलीला आपल्या घरात आणलेले आहे. तीच सर्वस्व तिने सोडलेलं आहे. तिच्यासोबत कसे वागाव हे सासरच्या लोकांच्या लक्षात आल पाहिजे. आपण स्वतः अनुभवलेल्या नात्यांतील वाईट गोष्टी आपल्या मुलांच्या नात्यात होऊ नयेत याची जबाबदारी देखील त्या घरातल्या माणसांनीच घ्यावी. नाहीतर, हि नाती पिढ्यानपिढ्या अशीच बदनाम होत राहतील. नाही लाखात एखादी नणंद “मानी” असते बरं, जिला नवऱ्याची इज्जत आणि स्वतःचा स्वाभिमान असतो. ती फक्त राखीपौर्णिमा आणि भाऊबिजेची वाट पाहत असते. आणि त्या ओवाळणीची तिला किंमतही असते. नाहीतरी अशा सालभर आपल ताट भावासमोर ठेवणाऱ्या बहिणींना त्या ओवाळणीची काही एक गरज नाही किंमत तर मुळीच नाही......

टीप: कथा वाचून कोणत्याही भावाच्या खाली झालेला जाळ घरा बाहेरच विझवून जाव, त्याचा धूर देखील घरात नेऊ नये. नाहीतर आज पुन्हा हे सिद्ध होईल कि नंदेच नात भावाच्या घरात नेहमीच आग लावत असत....

टीप दुसरी: (अतिशय कळकळीची):--- लेख फॉरवर्ड किंवा कॉपी पेस्ट करावयाचा असल्यास नावासहित करावा नाव एडीट करू नये......     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...