मुख्य सामग्रीवर वगळा



झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले,

दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....

 

          २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु:खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर आपण कल्पनाच करू शकत नाही. मनुष्याच्या दु:ख आणि नैराश्येची बरीच करणे ह्या वर्षी उद्भवलेली आहेत.   

           तर ह्या सगळ्या दुःखद परिस्थितीत सुद्धा मनुष्याला आनंदी राहता आल पाहिजे, शांत राहता आल पाहिजे, जबादार नागरिक म्हणून कर्तव्य दक्ष राहून एकमेकांची मदत करता आली पाहिजे, कुटुंबातील जबाबदार सदस्य म्हणून सर्वांची काळजी घेता आली पाहिजे. मिळालेला वेळ आनंदात कसा घालवता येईल आणि भविष्यासाठी एवढ्या मोठ्या जागतिक संकटातूनसुद्धा चांगल्या आठवणींचा संग्रह कसा बनवता येईल याचे उत्तर हे प्रत्येक घरात जर मिळवता आले तर, नक्कीच समाज सुखी ठेवण्यात आपण मोलाच सहकार्य करत राहू.

          त्याचप्रमाणे ज्या घरात छोटे बाळ आहे त्याघरात आनंदी वातावरण हे असणारच त्यात काही शंकाच नाही. बाळामुळे संपूर्ण घर आणि घरातील सदस्य हे उस्ताही असतात. त्याच खान पिन न्हान धून कपडे त्याला नवनवीन गोष्टी शिकवण त्याच्या प्रत्येक बदलत्या हालचाली हसणे चालणे बोबडे बोल अशा कितीतरी गोष्टी असतात ज्या मनुष्याच्या कोणत्याही प्रकारच्या दु:खाला किंवा नैराश्येला, थकव्याला झिटकारून लावत असतो. त्याच प्रमाणे आपण बळावर केलेले संस्कार हे त्याच्या कृतीतून दिसत असतात. मग ते संस्कार बाळ गर्भात असल्यापासून चे का असेनात. बाळ गर्भात असतांना आईच्या अवतीभोवती जे वातारण असते तेच त्या बाळाला आवडत असते. आणि त्याच पद्धतीने त्याची वाढ देखील होते.

          मी माझ्या गरोदरपणात अगदी शांत निसर्गरम्य अशा जपान मधील वातारणात राहिले, माझा सभोवताल अगदी सकारात्मक दृष्टीकोनाने भरलेला होता. त्यामुळे मी व्यक्त केलेली माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होत असे. त्यात दररोज न चुकता मेडिटेशन(ध्यान) योगा नियमित करीत असे. पुढे माझ्या ह्याच नियमित सवई मुळे मी दहा दिवसांची विप्पशना करू शकले. आणि त्याचा फायदा मला आजही होत असतो माझ्या बाळाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी करायला खूप आवडते. तो नेहमी आनंदी हसतमुख आणि शांत कधीही चिडचिडपणा न करता खेळणे, फिरणे, खाणेपिणे, आंघोळ ह्या सगळ्यांना कधीच तो जास्त त्रास देत नाही. त्याचा स्वभावहि फार खुशमिजास असल्यामुळे त्याच्या सभोवतालचे सगळेच फार आनंदी राहतात. आणि आजच्या ह्या घडीला सर्वात महत्वाच जे सुख मनुष्याला हवय ते आम्हाला त्याच्याकडून मिळत.

त्याला रोज संध्याकाळी बुद्धवंदना घेतलेली आवडते. बुद्धांना फुल वाह किंवा दे म्हंटल कि बरोबर त्या त्या कृती तो करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कुठे आहेत आपले बाबा कुठे आहेत, बुद्धा कुठे आहे असे म्हंटल कि बरोबर त्यांच्या फोटोंकडे धाव घेतो. झोपतांना त्याला बुद्धांचे शब्द बुध वंदना हे ऐकवले तर शांतपणे झोप घेतो. आणि त्याच्या ह्याच आनंदी शांत स्वभावामुळे आमचे कुटुंबही आनंदी राहते. आणि हेच सगळ सुख ह्या २०२० च्या कठीण काळात फार महत्वाचे आहे.

#म्हणूनच_मी_माझ्या_बाळाला “#प्रबुद्ध” #असे_संबोधते.

प्रत्यूष ची आई(आजी) नेहमीच त्याला माझा “गौतम बुद्ध” आहे तो अशी हक मारत असते. आणि आणि ह्या अशा जागतिक संकटात माझ हे बाळ त्याच्या आजोळी राहतय म्हणून मी पुढील गीत तिच्यासाठी समर्पित करीत असते.

 

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले,

दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....

बुद्धंम सरणंम गच्छामी

धम्मंम सरणंम गच्छामी

रंगली ती पूर्व दिशा दिनचर्या तरसू

आगमनार्थ झाहले तुझ्या गुरुचे सद्गुरू

चिमण्या पाखराने साधता हे गीत गाईले

भिक्कू संघ साथीला प्रशांत चित्त चालती

 

बुद्ध नाम एक मुखे सुस्वरात बोलती

हर्षभरे जागली वसुंधरेची घरकुले

 

भंन्ते भदंताचे पहा शुद्ध स्नान संपले

सुगंधीमय उपसिकांनी पुष्पहार गुंफले

 

कुंकवाचे जागी त्यांनी अष्टगंध लाविले

अथांगदिव्य पाहुनी निसर्गश्रुष्टी पावली

 

तथागताच्या शिरी केली पिंपळाची सावली

त्या सावलीत काशिनंदा विश्व रे सामावले  

 

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले,

दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....

बुद्धंम सरणंम गच्छामी

धम्मंम सरणंम गच्छामी

Lyricist : B. Kashinanda

 

 

माझ्या बाळा तुला बुद्धांचे आचरण करता यावे. बुध धम्माचे पालन तुला करता यावे. डॉ. बाबासाहेबांसारखा ज्ञानी आणि खूप मोठा व्हावास.. सुख शांतता आनंदी वातावरण तुझ्या सभोवताली नेहमीच राहो.

गुणी प्रबुद्ध(प्रत्यूष) चे काही फोटो आणि व्हिडीओ मी पोस्ट करत आहे.  


राजश्री जगताप........

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...