जात्यावरील ओवी....
“जात” म्हणजे दळणाच जात,
हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी
देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं
आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून.
ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई”
म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी
एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे.
जात का म्हणू नये?
देवा घरोट घरोट
तुझ्या मनातली गुट
साऱ्या दुनियाच पोट
घरी कर्माचा मरोट
तुझ्या मनातली गुट
अरे जोडता तोडलं
त्याले नात म्हणू
नये
ज्याच्यातून येत पीठ
त्याले जात म्हणू नये
घरोट का म्हणायच?
त्यात आहे घर घर
आपल्या घराची
अरे त्यात आहे घर घर
भरल्या आभाळाची
ओवी सुचते कशी?
अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पीठहे
तस तस माझ गाण
पोटातून येत व्हटी
ह्या ओव्या म्हणजे
नक्की काय तर, रोज सकाळी लवकर उठून जात्यावर दळायला बसायव लागत असे. अर्थात!, हे
काम फार कष्टाचं आणि सगळ्या कामात अवघड काम असल्यामुळे त्याचा विसर पडावा
त्याचप्रमाणे विरंगुळा वाटावा आणि त्याहीपेक्षा मनातली सु:ख-दु:ख वाटली जावीत.
ह्या उद्देशाने ओवी हि संकल्पना तयार झाली. त्यावरही एक ओवी आहे. सासुरवाशीन आपलं स्वतःच
मन मोकळ कुठे करणार?, तर त्या जात्या पाशी. आणि ते जात जणू काही सगळी गाऱ्हाणी
ऐकून घ्यायचं आणि तुमची सु:ख-दु:ख माझ्यापाशी मोकळी करा, व्यक्त व्हा आणि उद्या
आपण पुन्हा भेटू. जणू काही हा संवादच असल्याचा भास, जात्यावरील काम करण्याची ताकत
असावा.
साऱ्या ग कामामध्ये
दळन अवघड
गाण्याच्या नादामध्ये
बाई वढीते दगड
जात्या तू ईश्वरा
कुण्या डोंगराचा ऋषी
खोलते तुझ्यापाशी
माझ्या हृदयाच्या
राशी
ह्या ओव्यांमध्ये संपूर्ण स्त्री जीवनाशी निगडीत
विषयांचा उल्लेख दिसतो. त्यामध्ये सासर, माहेर, लग्न, हळद, सु:ख-दु:ख, निसर्ग, पंढरीचा
पांडुरंग विठ्ठल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर(भीमाच्या ओव्या) अशा अनेक संपूर्ण
संसारातील ओव्या ह्या जात्यावरील कामाने रचल्या आहेत.
भीम भीम म्हणू भीम माझा
गुरु भाव
सोन्याची सळई देते
तांदळाला घाव
भीम भीम म्हणू साखरेचा
खडा
अंन नाव घेता घेता
रंगल्या ग दात दाढा
भीम भीम म्हणू भीम
सखरेची पुडी
नाव घेतल्यानी
सुद्धा झाली माझी कुडी
बुद्धाच्या मंदिराला
सोन्याची कवाड
माझीया बाळाला लैई बुद्धाची
आवड
पांढऱ्या साडीला ग
नेसते घाई घाई
बाबासाहेबाची दीक्षा
घेती माझी आई.....
ओवी लिहिलीय कुणी
माहित नाही, पण मी ऐकलीय “लीलाबाई शिंदे” यांची...
संसारातल कोणत्याही प्रकारच दु:ख हे स्त्री
हि पूर्वीपासून तिच्या कलेने कमी करत आलेली आहे. कुठल्याही कामच ओझ तिने कधी होऊ
दिल नाही.
पण..,पण...,पण....,
मी जेव्हा जात्यावर
दळायला बसले, एकदम खुश होऊन डाळ दळली आणि त्याचबरोबर मात्र माझ्या मनात आल.....! आपल्याला
राग आल्यावर आपण भांडे-कुंडे आपटतो. अनं आताच्या काळात जर जात्यावर दळाव लागल असत
तर, काय,? “जात आपटल” असत???...., बाई.ईई.....! मिक्सरच बरा.. आपटता येतो..... हा.हा..हा....
राजश्री जगताप....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा