मुख्य सामग्रीवर वगळा

जात्यावरील ओवी....


जात्यावरील ओवी....


      “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे.

जात का म्हणू नये?

देवा घरोट घरोट
तुझ्या मनातली गुट
साऱ्या दुनियाच पोट
घरी कर्माचा मरोट
तुझ्या मनातली गुट
अरे जोडता तोडलं
त्याले नात म्हणू नये
ज्याच्यातून येत पीठ
त्याले जात म्हणू नये
घरोट का म्हणायच?

त्यात आहे घर घर
आपल्या घराची  
अरे त्यात आहे घर घर
भरल्या आभाळाची

ओवी सुचते कशी?

अरे घरोटा घरोटा
तुझ्यातून पडे पीठहे
तस तस माझ गाण
पोटातून येत व्हटी

       ह्या ओव्या म्हणजे नक्की काय तर, रोज सकाळी लवकर उठून जात्यावर दळायला बसायव लागत असे. अर्थात!, हे काम फार कष्टाचं आणि सगळ्या कामात अवघड काम असल्यामुळे त्याचा विसर पडावा त्याचप्रमाणे विरंगुळा वाटावा आणि त्याहीपेक्षा मनातली सु:ख-दु:ख वाटली जावीत. ह्या उद्देशाने ओवी हि संकल्पना तयार झाली. त्यावरही एक ओवी आहे. सासुरवाशीन आपलं स्वतःच मन मोकळ कुठे करणार?, तर त्या जात्या पाशी. आणि ते जात जणू काही सगळी गाऱ्हाणी ऐकून घ्यायचं आणि तुमची सु:ख-दु:ख माझ्यापाशी मोकळी करा, व्यक्त व्हा आणि उद्या आपण पुन्हा भेटू. जणू काही हा संवादच असल्याचा भास, जात्यावरील काम करण्याची ताकत असावा.

साऱ्या ग कामामध्ये
दळन अवघड
गाण्याच्या नादामध्ये
बाई वढीते दगड

जात्या तू ईश्वरा
कुण्या डोंगराचा ऋषी
खोलते तुझ्यापाशी
माझ्या हृदयाच्या राशी
  
         ह्या ओव्यांमध्ये संपूर्ण स्त्री जीवनाशी निगडीत विषयांचा उल्लेख दिसतो. त्यामध्ये सासर, माहेर, लग्न, हळद, सु:ख-दु:ख, निसर्ग, पंढरीचा पांडुरंग विठ्ठल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर(भीमाच्या ओव्या) अशा अनेक संपूर्ण संसारातील ओव्या ह्या जात्यावरील कामाने रचल्या आहेत.

भीम भीम म्हणू भीम माझा गुरु भाव
सोन्याची सळई देते तांदळाला घाव
भीम भीम म्हणू साखरेचा खडा
अंन नाव घेता घेता रंगल्या ग दात दाढा  
भीम भीम म्हणू भीम सखरेची पुडी
नाव घेतल्यानी सुद्धा झाली माझी कुडी
बुद्धाच्या मंदिराला सोन्याची कवाड
माझीया बाळाला लैई बुद्धाची आवड
पांढऱ्या साडीला ग नेसते घाई घाई
बाबासाहेबाची दीक्षा घेती माझी आई.....
ओवी लिहिलीय कुणी माहित नाही, पण मी ऐकलीय “लीलाबाई शिंदे” यांची...

      संसारातल कोणत्याही प्रकारच दु:ख हे स्त्री हि पूर्वीपासून तिच्या कलेने कमी करत आलेली आहे. कुठल्याही कामच ओझ तिने कधी होऊ दिल नाही.
पण..,पण...,पण....,

      मी जेव्हा जात्यावर दळायला बसले, एकदम खुश होऊन डाळ दळली आणि त्याचबरोबर मात्र माझ्या मनात आल.....! आपल्याला राग आल्यावर आपण भांडे-कुंडे आपटतो. अनं आताच्या काळात जर जात्यावर दळाव लागल असत तर, काय,? “जात आपटल” असत???...., बाई.ईई.....! मिक्सरच बरा.. आपटता येतो..... हा.हा..हा....  

राजश्री जगताप....



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...