मुख्य सामग्रीवर वगळा
नवरीचे मनोगत....


        लग्नानंतर १३ दिवसांतच जपान ला येण्यासाठी Flight Tickit Book होत. मनात फारच उत्सुकता होती. परंतु घरच्यांपासून सात समुद्रा पार इतक लांब जायचं आणि पुन्हा किती दिवसांत माहेरी यायला भेटेल याची काहीच कल्पना नव्हती. या विचारांपुढे ति उत्सुकता नगण्य होती.
       पण त्या अगोदर Domestic Flight (Air India) प्रवास झाला तो म्हणजे तारखेला Chatrapati Shivaji International Airport -BOM  ते Kempegowda International Airport -BLR. वाजता ची Flight होती. नाशिक मधून ११ वाजताच मुंबईत पोहचलो होतो. माझा Japan Visa मिळण्याची तारीखही तीच होती. त्याला अनुसरूनच पुढील नियोजन केलेलं बहुतेक. १२ वाजेच्या आत Visa Collect झाला. आम्ही दोघेही खूपच खुश झालो. आनंदाने दोघांचेही डोळे चमकत होते. कारण त्या दरम्यान आमची सर्वच कामे खूपच सुरळीत झाली होती. अगदी Marriage Certificate सुद्धा आम्हाला काही तासांतच मिळालेलं होत. कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती उद्भवली. बऱ्याचदा Tourist किंवा Dependent Visa मिळवतानाची Process फारच Lengthy असते, बरीच त्रासदायकही एवढे करून सुद्धा Visa काही कारणास्तव लांबनीला टाकला जातो, त्यात मिळेलच याचीही काहीच खात्री नसते. यामुळेच आमच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.

हम तो ऊँचे गगन में उड़ने लगे
एक दूजे से जैसे जुड़ने लगे
ओ रब्बा कोई तो बताए, मित होता है क्या
जैसा मुझे मिल गया सबको मिलता है क्या
       
       मी हळूच गालावर Kiss...केलं, ए..ए....! hmmmm, खुश होऊन एकमेकांना शुभेच्या दिल्या.

त्यांनतर २-वाजे पर्यंत चा वेळ आम्ही Hanging Garden मध्ये बसलो.
१० दिवसांचा शब्द साठा, बंद बरणी उघडल्या बरोबर त्यातील
पाकोळ्या मोकळा श्वास घेत हवेत संचार करू लागल्या.
       माझा नवरा तसा खूपच साधा आणि मी खूपच खोडकर म्हणजे साधीच हं...!  हाहा...हा
गळ्यात हात टाकण, मस्ती करण, थोड चिडण-थोड चिडवण, तोंड वाकड करण... तो आपल शांततेत बोलतोय, हसतोय, खुश होतोय.
मस्ती नको ग शांत बस, अस मस्ती करायला आपण काय Couple आहोत का..?,  अं...!अं...!  मग काय आहे...?,   म्हणजे Married Couple आहोत. कस शांत, सोबर, Matuared असाव...!  
“हम्मम” तुम्हाला बर माहित Unmarried Couple अस वागतात ते...!
त्यावर तो- हाहा...हा....!
       Airport ला आल्यावर मला सर्व माहिती सांगितली. Domestic Flight साठी अशी Procedure International साठी तशी ह्या Window मध्ये हि Formality त्या Window मध्ये ति अशा प्रकारे Airport & Flight Wikipidia शिकवत चाललो होतो. “शाळेत भरती झाले कि Teacher सोबत लग्न केलय”, हम्म्म्म् ...!

        Flight मध्ये बसल्यावर खुशच झाले,
घट्ट हातात हात घेऊन बसलो. पुन्हा आघाव पणा सुरु,
मध्येच गालावर Kiss केल. “शांत बैस”,
अधून-मधून लहर यायची खांद्यावर डोक काय ठेव,
गालाच काय ओढ.
Camere असतात इथे शहाण्या सारख बसं.
मग काय Window Seat असल्यामुळे
Photo, Selfy काढण्यात स्वताला मग्न केल. छान वाटल...!. Runway to Airport पर्यंत Bus होती.
त्यातही माझा आघावपणा, तिथेही तेच.
Banglore Airport च्या बाहेर आल्यावर
तासाच्या अंतरावर Indian Institute of Science, Banglore (IISc) होत. मला पुढचा Plan काही माहित नव्हता, Bus ने उतरलो तेव्हा शांतच होते मी “आघावपणा नमू शकतो, संपू शकत नाही”  हाहाहा...!
       अजून १५ Minutes रिक्षा ने लागणार होते. त्यात मधेच Sweet Shop मध्ये जाऊन येतो म्हणाले, रिक्षा Side ला घेतली आणि आपण मात्र सरळ उतरून Shop मध्ये गेले.
       मीही त्यादिवशी का घाबरले मलाच काही कळाले नाही, रिक्षात बसल्या बसल्या नको ते विचार मनात येत होते. तशी मी फारच बिनधास्त बेधडक सुद्धा पण, का कुणास ठाऊक “डरते न थे मौत से, अब मगर डरने लगे”  अशी काहीतरी भावना वाटत होती. मी स्वतःहाशीच पुटपुटत.... का आज भीती वाटते....? नवी नवरी असल्यामुळे बऱ्यापैकी दागिने अंगावर होते, कदाचित त्यामुळे घाबरते का?.... नाही, अस का वागतेस तू, का पाहिल्यांदा प्रवास करतेय?... एकटीनेच आख्ख Mumbai भ्रमण केलेलं असताना सुद्धा...? मग कसली भीती वाटतेय...? रिक्षावाला रांगड्या आवाजात Phone वर बोलत होता, बहुतेक कर्नाटकी Tone होता तो.. त्यात घाबरन्या सारख काय, तसं तोही बोलता-बोलता रिक्षातून खाली उतरला... बघ आता तर तोही बाहेर गेला मग का घाबरते? अवघ्या १० मिंटाचीच गोष्ट पण भयाण वाटल.
तस त्याच उत्तर मला आजही मिळालेलं नाही म्हणा...!
       काय हो येवढा उशीर, अग हो दुकानात खूपच गर्दी होती, आलो कसा बसा.           ठीके...! मी काही भावना व्यक्त केल्या नाही. स्वतःहाच्याच विचारांत काहीतरी चाललेलं.
       मित्राकडे राहायला जायचं आहे ना, मग एकदमच नको तस जायला...!
काय...???    “हो”...!
राहायला नकोना बरोबर नाही वाटत ते,.... अरे Best Friend आहे तो माझा, इथे येऊन राहायला नाही गेलो, तर योग्य नाही वाटणार... हे मला माहित आहे आणि बरोबरही आहे.
        त्याच कारण अस कि भाऊंना आणि ताईला (जोडप्याला भाऊ-ताई म्हणते हं) मी लग्ना आधीपासूनच ओळखत होते, दोघांणसोबतही कधी-मध्ये फोन वर बोलत असे छानच family आहे ति त्याचं पिल्लू तर खूपच गोड त्यामुळे त्यांच्या भेटीची मलाही तेवढीच उत्सुकता होती.
पण मी कधीच कुणाच्याच घरी राहिलेली नाही, नात्यात आणि मैत्रीत सुद्धा तर थोड “Odd” वाटत राहायला नको ना..., अगदी कळवळून Request च होती जणू...,
त्यावर हलकीशी Smile देऊन मला टाळल....!
        खूपच हैराण झाल्या सारखा वाटल.
        घरी जाऊन Fresh वगैरे होऊन Campus च्या Restaurant मध्येच Dinner केल. त्यानंतर बऱ्याचशा मित्रपरिवारा सोबत माझी भेट घालून दिली. ते सर्वच खूप छान होते.

Image from Internet
       IISc च्या Campus मध्ये बसलेलो असताना
त्याच्या आठवणींन मध्ये तो इतका खुश होता इतका खुश होता,
कि मी त्याला लग्नात सुद्धा इतका खुश नव्हत पाहिलं.
त्याचे डोळे आठवणींच्या आनंदाने लखलखत होते.
डोळ्यात एक चमक दिसत होती. मी त्याच्या डोळ्यात पाहतच राहिले,
याची त्याला काही खबर नव्हती म्हणा, पण मलाही त्याचा फार हेवा वाटत होता. आणि एक बायको म्हणून अभिमानही....
Indian Institute of Science ही भारतातील Top Level ची Institute, Research क्षेत्रासाठी प्रशस्थ ठिकाण. भल्या भल्यांची स्वप्न अधुरी राहतात तिथे जाण्याची आणि माझ्या नवर्याने तर तिथूनच Doctorate Degree मिळवली. स्वप्न पूर्ण Carrier तिथेच घडल. त्यामुळे माझतर नशिबच थोर, वंदन असो त्या भूमीस....!
        खूपच भाग्यवान असल्याचा आनंद मी घेत होते.
त्याच.... इतक कौतुक कराव..... इतक कौतुक कराव.....! अस वाटत होत, कि ते शब्दात करताच आल नाही. राहूनच गेल मुळी.... कदाचित त्याच्याच साठी मला एकांत हवा होता जो आजच्या रात्रीतच मिळेल अस वाटत होत. तशी वेळ रात्री १० वाजताची, पण मनातल्या उन्हात बरचं काही शिजत होत.
       म्हणूनच कधी कधी काही कारणास्तव मिळाल्येल्या अनमोल गोष्टीला सुद्धा मोल राहत नाही. मीरा बाईंनी कृष्णा साठी म्हंटलेल आहे “मन अटकी, मेरे दिल अटकी” तसच काहीतरी माझ्याही मनात खुपत होत. 
       भाऊ आणि ताईंच्या चिमुकलीने तर माझ सगळंच लक्ष वेधून घेतलं. गेल्यापासून काकु-काकु, काकु प्रत्येक गोष्टीत माझ्या जवळच होती. तिचे पप्पा हि तिला म्हणाले आग ज्या काकाने काकूला इथ आणलं त्याच्या सोबत तर तू बोलतही नाहीस, त्याच्या जवळही गेली नाहीस... खेळता खेळताच सहज रित्या “नको” म्हणाली, मला तर हसू आवरेना बिचाऱ्या.... काकासाठी.
सकाळी Breakfast हि माझ्या सोबतच केला. खाऊन झाल आणि लगबगीने ताट उचलत उठली द्या द्या मी ठेवते म्हणत Kitchen मध्ये निघाली, मी ओरडत म्हंटल नको-नको दे आण मी ठेवते... नाही ओ मी ठेवते ना..आआ...!   एखाद्या लळा लाग्लेलेल्या मांजराच्या पिल्लाने साडीच्या अवतीभोवती घोटाळत राहावं तसच ति माझ्या भोवती फिरत होती. खूपच सुखद क्षण होते ते.
        साडी बदलते म्हणत मी Bedroom मध्ये गेली तर लागलीच मझ्या मागे आत आली. आणि दरवाजा बंद करून तिथेच खेळत बसली. थोड्याच वेळात ताई म्हणाल्या जरा Minute दार उघड आणि आत येऊन काहीतरी घेऊन गेल्या तर हि लगबगीने उठून गेली आणि मम्मी ला काहीतरी पुटपुटत दार बंद केल. मला फारच कौतुक वाटल तिचं, मी तयार व्हायचं सोडून तिला कुरवाळत बसले. निघतानाहि मागे लागून रडत होती. पुन्हा येणार आहे मी, अस काहीतरी फसऊन निघालो.
        संपूर्ण IISc च Campus फिरलो, तासा भराची Meeting हि झाली. साहेब भलतेच खुश होते. मलाही खूप छान वाटल. Campus मधेच Lunch करून निघालो ४.३५ ची Return Flight होती.
       Flight मधल्या Washroom मध्ये गेले असता खूपच रडावस वाटल का कुणास ठाऊक पण भरलेल्या अभाळासारखीच अवस्था झाली होती. त्यात ”आभाळाच बर असत हो, भरून आल कि बरसतच” पण, मनाला मात्र खूप नियंत्रणात ठेवाव लागत. कधी भावना न दाखवण्यासाठी, कधी सामोरच्याच्या आनंदासाठी, तर कधी “U Don’t Understand and i can't explain” या अशा अनेक कारणांमुळे चेहऱ्यावर हास्य ठेवणे हे मला फार छान जमत, सहजासहजी नाही येत ते कुणाच्या लक्षात Because “The Best Makeup is a Smile”  Washroom मात्र त्यासाठी अपवादात्मक आहे, तिथे जस पोट रिकाम होत तसच मनही.... आरशा समोर असताना मला “प्रहार” नानापाटेकर यांच्या सिनेमातलं, सुरेश वाडकर यांनी गायलेलं एक सुरेख गीत ओठी आल...,

धडकन जरा रुक गई है, कही जिंदगी बेह रही है
 फुलो मै यादो कि डोली,भीतर ख़ुशी हंस रही है
ये ख़ुशी तुम हो, तुम हि तुम मेरी जानम करू ऐतबार
धडकन जरा रुक गई है,कही जिंदगी बेह रही है
चेहेरोके मेले मे चेहेरे थे गुम
एक चेहेरा था मै, एक चेहेरा थे तुम
जाने क्या तुमने दे दिया,मुझको जहान मिलगया
धडकन जरा रुक गई है,कही जिंदगी बेह रही है
होठो पर बात रहे, बातोंमे सूर बहे
सुरोमे गीत वही, तुम्हारीही बात कहे
मिट जाऊ सपनोकी आगोश मे
भीग जाऊ यादोंकी बौछार मे
धडकन जरा रुक गई है,कही जिंदगी बेह रही है
मिलते ही आखोने रिश्ता पेहेचाना
येहेसास सिनेमे सांसोने जाना
छुपके से प्यार छु गया, दिलाके एक जनम नया
धडकन जरा रुक गई है, कहि जिंदगी बेह रही है

       मग काय ज्याला स्वतःहाच सांत्वन करता येत तो कोणत्याही परिस्थितीत खुश राहून हास्याशी सुरेख संगम साधू किंवा टिकऊ शकतो.
       असा हा पहिला विमान प्रवास ”Honeymoon” च्या जागी एक “Professional Trip” च झाली.
कुणातरी सोबत त्याच्या आठवणींच्या गावाला जाऊन आलो.
       नवीन जोडप्याची नवलाई अस काही वाटलच नाही. तसही मे लग्नाची तारीख आणि १० तारीख उजाडली होती, नव्या नवरीचे दिवस संपलेले होते.....!


                                                                    राजश्री....!




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...