माझा एकटेपणातील एकांत....!

आपण एकटे जन्माला येतो आणि
एकटेच मरतो... परंतु, या दोन वास्तविक गोष्टींमध्ये किती भ्रम आणि भाकड कथा उभ्या
करून त्याच्या आधारावर आयुष्य काढण्याचा प्रयत्न करतो. नाते-संबंध, मित्र-मैत्रीण,
प्रेम, लग्न-मुलं, जात-धर्म, गावं-शहर-राज्य-देश-विदेश या सर्वांशीच जोडून
प्रत्तेक घडामोडीत आयुष्य उभ करतो. म्हणजेच आपण Carrier, family या सर्वच गोष्टींत
नैपुण्य मिळवून आपला एकांत संपवतो. अर्थात आपण आपल्या एकांताला एकटेपणा समजून
त्यापासून दूर पळतो. ह्या सर्व कल्पनांवर एक नवीन जग उभ करतो. परंतु हे सर्व करून
सत्य कधी बदलत नसत.
नात्यांच्या काही मित्र-मैत्रिणींच्या
गोतावळ्यात समाधानी नसलो कि प्रेम या भावनेकडे वळतो. त्यातही आपण आपल्या इच्छा
अपेक्षांना प्राधान्य देतो आणि मग ह्याच प्रेमाचे रुपांतर एकमेकांचे शोषण करण्यात होऊन
जाते. नंतर लग्न हि पायरी चढून अजून एकमेकांना बांधून टाकतो, दर पंधरवाड्याला ऐकायचं
काही सुनवायच, लग्ना आधीचच आयुष्य छान होत... हाहःहा...!
त्यात दोघांचे सूर जुळले नाही कि मग मुलं जन्माला घालून त्यांच्यात सुख
शोधायचं, त्या मुलांसाठी सगळच सोडून द्यायचं काही दिवसांनंतर पुन्हा तिचं राडारड, मी तुझ्या साठी हे सोडलं -ते सोडलं तरी आज “एकटीच”... Specially हि गोष्ट
स्त्रियांच्या बाबतीत होते. याची झळ पुरुषांना नाही लागत म्हणा. मग अजूनच दु:ख...
मग का नाही आपण त्या एकांताच्या
स्वभावात रुजत? का नाही त्याला आपल बनवत?
गेब्रीअल गार्सिया मार्खेस (Gabriel
García Márquez) हे कोलंबियातील नोबेल
पुरस्कृत विश्व विख्यात साहित्यकार होते. यांनी “एकांत के सौ वर्ष” हे
काल्पनिक नाटक (उपन्यास) १९६७ मध्ये लिहिलेल आहे. वाचनात आल आहे कि याचे रुपांतर
३७ भाषांमध्ये झालेलं आहे. त्यांनीही त्यात एकांताचा सुरेख असा मार्ग सांगितला आहे.
मी MPSC (Maharashtra Public Service
Commission) म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. त्यात Banking
क्षेत्राच्याही परीक्षा देत असे. खास करून Sales Tax Inspector च्या पदासाठी तयारी
करायची ठरवून चालले होते. पप्पांचा Support नेहमीच असायचा मला, बरीचशी Guideline
त्यांच्याच कडून मिळालेली होती, कारण पप्पा MPSC through च Police Officer झालेले आहेत.
मम्मी ला हि ह्या पदांच्या अभ्यासाची आणि परीक्षेची रूपरेखा माहित असल्यमुळे तिहि
अधून मधून माझ्या अभ्यासाची चौकशी करत असे. खर सांगायचं तर तिच्या कडे जर Degree
असती तर तीही पप्पानं सोबत ह्या Exams pass करू शकली असती. त्या दोघांचही माझ्या अभ्यासावर
कायम लक्ष असायच.
Office आणि Study यांचा ताळमेळ बसवून
छानच Routine चालेलं होत. पहाटे ३ ला उठून अभ्यासाला बसायचं कारण संपूर्ण दिवसात
जेवढा अभ्यास होत नाही तेवढा पहाटेच्या ३ तासात होतो. ६.०० ते ७.०० Tiffin बनवून ७.३०
पर्यंत Office गाठायचं. ४.३० ला रूम वर परतून थोडी झोप काढून ६.३० ते ८.०० Typing Class
पूर्ण करायचा. ८.०० ते ९.०० जेवण आटपून थोड टंगळमंगळ करत Notes काढणे, Question Paper
Solve करणे, १२.०० पर्यंत जेवढा होईल तेवढा अभ्यास करणे, काही Online Apptitude Test
देणे. एवढे करून देखील मेहनत कुठे तरी कमी पडत होती. कारण STI (Sales Tax
Inspector) च्या Exam मध्ये २ गुणांनी हुकले. आपण Select होऊ शकत नाही, याच खूपच दुखः
झाल. याचा अर्थ असा काही वाटायला लागला कि आपल्याला काहीच येत नाही. खूपच मेहनत
लागेल ज्याची क्षमता आपल्यात नाही. नाही होऊ शकत हे, Negative Thinking सुरु झाली.
त्यामुळे खूपच खचून गेले. ७, ८ दिवस पुस्तक उघडलीच नाही.
माझा एकांत एकटेपणात बदलू लागला. एकांतातील
सर्वच गोष्टी विरुद्ध व्हायला लागल्या, स्वप्न भंग झाल्यावर Negative Thinking
सुरु होते. एकटेपणा हा उदासीनता आणि नकारात्मक भावना आणतो. जीर्ण झालेल्या पाना
प्रमाणे मन कोलमडून पडते. एकटेपणात जास्तीत जास्त भूतकाळच मानवाला जखडून ठेवतो मग तो चांगला असो किंवा
वाईट... त्रासच होतो. कुणाच्या तरी लालसेत मन खिन्न-विखीन्न होते. रोम अन् रोम भयभीत होऊन
जाते. सर्वांपासून एकटे, अंधारात वेगळे सुटून गेल्याची भावना येते. तसेच आपली
कोणालाही गरज नाही या विचारांनी पिडात्मक बनवते. एखाद्या आजारपणा पेक्षाही घातक हा
एकटेपणा... घाव, निर्जनता, रिकामेपण हे मृत्युस कवटाळू शकते.
पण अशी परिस्थिती येताना पाहून स्वत:हच स्वतःला सावरणे
गरजेचे असते.

आला समुद्रही रंगा,
त्याचा धीटाईचा दंगा.
वेड्या लहरींचा पिंगा, बाई
झाला कि सुरु.
कधी रडावस वाटल तर आणखीनच छान, कारण अश्रू वयाला जात नाहीत याचा आनंद...
सागराशी जे एकरूप होतात....!

समुद्र किनारी जाण्याच अजून एक महत्वाच
कारण म्हणजे अथांग पसरलेला हा सागर विचारांवर किंवा स्वप्नांवर कधीच कोणतीच सीमा
लागू देत नाही. जिथपर्यंत आपली नजर “ठहरते” तिथपर्यंत आपण विचार करू शकतो किंवा
स्वप्न पाहू शकतो. आणि मुख्य म्हणजे एकांतात जेव्हा विचारांवर अडथळा येत नाही
तेव्हा बरेच प्रश्न सोडवून त्यावर तोडगा काढून योग्य ते निर्णय घेण्याची पात्रता
अंगी येते.
वरती मोकळ निवांत लांब वर पसरलेल
आभाळ, खाली अथांग असा सुंदर सागर आणि या दोघांच्या सहवासा मध्ये स्वप्न
रंगवणारी “मी”....! मला दुसरीत असतानाचा “सांकव” धडा आठवला सुलभा
नाव तिचं तिलाही ह्या अथांग सागराच फारच कुतूहल.
खूपच सुखद क्षण होते हे सर्व, आयुष्यातले.... कधीही न विसरण्यासारखे.
आता पुन्हा माझा हरवलेला एकांत मलाच शोधत माझ्या
पाशी येत होता. एखाद्या दिवशी जर मला समुद्र किनारी जायला जमल नाही तर काहीतरी
चुकल्या सारख वाटत असे. रोज सकाळी लवकर उठण्याची सवय असल्यामुळे रविवार काही अपवाद
नव्हता. मग रविवारी सकाळीच ६.३० ते ८.३० आमची भेट होऊ लागली. समुद्राच्या पाण्यावर
पडलेली सुंदर तांबडी सूर्य किरणे समुद्राच संपूर्ण रूपच बदलवून टाकत असे. सागरातले
मोती जणू काही सागरावरच आल्याचा भास होत असे.
पूर्ण Nariman Point चा पट्टा
Jogging करणाऱ्यांनी भरलेला असे. तेव्हा मात्र कळाल कि लोक का समुद्र किनारी घर
घेण्याची इच्छा किंवा स्वप्न ठेवतात ते.
तेव्हा... गाण्याचा खरा आस्वाद कळाला.
मग प्रत्येक रविवार किंवा Bank Holiday -Morning Walk at NPT.
मला आयुष्यात स्वतःसाठी फारच सुंदर वेळ मिळत गेला
आणि त्या वेळेचा मी पुरेपूर सद्उपयोग करण्याचा नेहमी प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नांना
यश आले नाही पण त्यातला आनंद मात्र कशाच्याच तुलनेत नाही. एकांतात माणूस घडतो,
त्यासाठी वेळ नसेल तरी काढावाच.
लग्ना नंतरही House Wife असल्यामुळे माझ्या घरातील कामांना छंदाची जोड मी कायम
राखली.
घर मे है बस छ:ह हि लोग चार दिवारे, छत और मै
रात साहुली, एक सहेली गोरा चीटां दीन है
दोस्त
घर मे है बस छ:ह हि लोग चार दिवारे, छत और मै
टेहेलने निकले तनहा, परछाई मै भी उसके पिछे चलू
निले अंबर के कागज पर, पंछी होकर चित्र बनू
इंद्र धनुष के तिरछी डाली पर चिपकी गिली नीली ओस
घर मे है बस छेःह हि लोग चार दिवारे, छत और मै
(Poem by Nana
Patekar from Movie: Ab tak
chappan-2)
छंदाना नेहमीच गाण्यांची जोड असावी पण आधी शब्द असावेत नंतर सूर...
कारण हि छंदाची जोडच आयुष्यभर सुखकर अशी अनंत साथ ठरू शकते.
अगदी “एकांत के सौ वर्ष” प्रमाणेच....!
(छायाचित्रे: सौजन्य google images)
राजश्री...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा