मुख्य सामग्रीवर वगळा
माझा एकटेपणातील एकांत....!

       जेव्हा जेव्हा एकांत मिळतो तेव्हा तेव्हा एकटेपणाची जाणीव होऊ शकते आणि तिच जाणीव भरून काढण्यासाठी आपण तत्काळ काहीतरी उपाय शोधून काढतो. काहीच उपाय भेटत नसेल तर झोपून घेतो किंवा स्वप्न रंगवू लागतो. काही जुन्या-गोड आठवणी आठवून स्वतःहाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो. थोड्यावेळासाठी एकांतात राहिलो तर रोम अन् रोम आनंदाने रोमांचित होते. एकांतात शक्यतो Possitive Thinking येते, नसेल येत तरी ठेवणे फार गरजेचे आहे. एकांत हा एक मौनाचाच भाग आहे. मौन केल्यानंतर ज्या प्रकारे बुद्धी तल्लख होते, चेहऱ्यावर चमक येते त्याचप्रकारे इथेही झाल पाहिजे. एकांतात स्वतःच अस्तित्व नक्की काय...? आणि कशात आहे हे कळते. आणि या दोन प्रश्नांची उत्तरे मिळविणे म्हणजेच स्वताःहाचा शोध लागणे....!
        आपण एकटे जन्माला येतो आणि एकटेच मरतो... परंतु, या दोन वास्तविक गोष्टींमध्ये किती भ्रम आणि भाकड कथा उभ्या करून त्याच्या आधारावर आयुष्य काढण्याचा प्रयत्न करतो. नाते-संबंध, मित्र-मैत्रीण, प्रेम, लग्न-मुलं, जात-धर्म, गावं-शहर-राज्य-देश-विदेश या सर्वांशीच जोडून प्रत्तेक घडामोडीत आयुष्य उभ करतो. म्हणजेच आपण Carrier, family या सर्वच गोष्टींत नैपुण्य मिळवून आपला एकांत संपवतो. अर्थात आपण आपल्या एकांताला एकटेपणा समजून त्यापासून दूर पळतो. ह्या सर्व कल्पनांवर एक नवीन जग उभ करतो. परंतु हे सर्व करून सत्य कधी बदलत नसत.
       नात्यांच्या काही मित्र-मैत्रिणींच्या गोतावळ्यात समाधानी नसलो कि प्रेम या भावनेकडे वळतो. त्यातही आपण आपल्या इच्छा अपेक्षांना प्राधान्य देतो आणि मग ह्याच प्रेमाचे रुपांतर एकमेकांचे शोषण करण्यात होऊन जाते. नंतर लग्न हि पायरी चढून अजून एकमेकांना बांधून टाकतो, दर पंधरवाड्याला ऐकायचं काही सुनवायच, लग्ना आधीचच आयुष्य छान होत...  हाहःहा...!
त्यात दोघांचे सूर जुळले नाही कि मग मुलं जन्माला घालून त्यांच्यात सुख शोधायचं, त्या मुलांसाठी सगळच सोडून द्यायचं काही दिवसांनंतर पुन्हा तिचं राडारड, मी तुझ्या साठी हे सोडलं -ते सोडलं तरी आज एकटीच... Specially हि गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत होते. याची झळ पुरुषांना नाही लागत म्हणा. मग अजूनच दु:ख...

       मग का नाही आपण त्या एकांताच्या स्वभावात रुजत? का नाही त्याला आपल बनवत?
गेब्रीअल गार्सिया मार्खेस (Gabriel García Márquez) हे कोलंबियातील नोबेल पुरस्कृत विश्व विख्यात साहित्यकार होते. यांनी “एकांत के सौ वर्ष” हे काल्पनिक नाटक (उपन्यास) १९६७ मध्ये लिहिलेल आहे. वाचनात आल आहे कि याचे रुपांतर ३७ भाषांमध्ये झालेलं आहे. त्यांनीही त्यात एकांताचा सुरेख असा मार्ग सांगितला आहे.

              मी ४ वर्षे मुंबईत नौकरी निमित्त एकटीच Hostel वर राहत होते. परंतु एकटेपणा कधी जाणवला नाही. कारण तेव्हा पुस्तकांशी फारच सुंदर अशी मैत्री केलेली होती. पुस्तकांशी केलेली मैत्री हि आयुष्यभर उपयोगीच ठरते. कोणत्याही पुस्तकातून कोणत्याच प्रकारची हानी कधीही होऊ शकत नाही. कधी ऐकलय का अस...? हे पुस्तक वाचून वाईट झाल किंवा ते पुस्तक वाचून वाईट झाल... कधीच नाही...!  त्यातल्या त्यात Carrier Develop करण्यासाठी पुस्तकांशी मैत्री म्हणजे संपूर्ण आयुष्य घडवण्याचा प्रश्न...
       मी MPSC (Maharashtra Public Service Commission) म्हणजेच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत होते. त्यात Banking क्षेत्राच्याही परीक्षा देत असे. खास करून Sales Tax Inspector च्या पदासाठी तयारी करायची ठरवून चालले होते. पप्पांचा Support नेहमीच असायचा मला, बरीचशी Guideline त्यांच्याच कडून मिळालेली होती, कारण पप्पा MPSC through च Police Officer झालेले आहेत. मम्मी ला हि ह्या पदांच्या अभ्यासाची आणि परीक्षेची रूपरेखा माहित असल्यमुळे तिहि अधून मधून माझ्या अभ्यासाची चौकशी करत असे. खर सांगायचं तर तिच्या कडे जर Degree असती तर तीही पप्पानं सोबत ह्या Exams pass करू शकली असती. त्या दोघांचही माझ्या अभ्यासावर कायम लक्ष असायच.

       Office आणि Study यांचा ताळमेळ बसवून छानच Routine चालेलं होत. पहाटे ३ ला उठून अभ्यासाला बसायचं कारण संपूर्ण दिवसात जेवढा अभ्यास होत नाही तेवढा पहाटेच्या ३ तासात होतो. ६.०० ते ७.०० Tiffin बनवून ७.३० पर्यंत Office गाठायचं. ४.३० ला रूम वर परतून थोडी झोप काढून ६.३० ते ८.०० Typing Class पूर्ण करायचा. ८.०० ते ९.०० जेवण आटपून थोड टंगळमंगळ करत Notes काढणे, Question Paper Solve करणे, १२.०० पर्यंत जेवढा होईल तेवढा अभ्यास करणे, काही Online Apptitude Test देणे. एवढे करून देखील मेहनत कुठे तरी कमी पडत होती. कारण STI (Sales Tax Inspector) च्या Exam मध्ये २ गुणांनी हुकले. आपण Select होऊ शकत नाही, याच खूपच दुखः झाल. याचा अर्थ असा काही वाटायला लागला कि आपल्याला काहीच येत नाही. खूपच मेहनत लागेल ज्याची क्षमता आपल्यात नाही. नाही होऊ शकत हे, Negative Thinking सुरु झाली. त्यामुळे खूपच खचून गेले. ७, ८ दिवस पुस्तक उघडलीच नाही.
               
      माझा एकांत एकटेपणात बदलू लागला.  एकांतातील सर्वच गोष्टी विरुद्ध व्हायला लागल्या, स्वप्न भंग झाल्यावर Negative Thinking सुरु होते. एकटेपणा हा उदासीनता आणि नकारात्मक भावना आणतो. जीर्ण झालेल्या पाना प्रमाणे मन कोलमडून पडते. एकटेपणात जास्तीत जास्त भूतकाळच  मानवाला जखडून ठेवतो मग तो चांगला असो किंवा वाईट... त्रासच होतो. कुणाच्या तरी लालसेत मन खिन्न-विखीन्न होते. रोम अन् रोम भयभीत होऊन जाते. सर्वांपासून एकटे, अंधारात वेगळे सुटून गेल्याची भावना येते. तसेच आपली कोणालाही गरज नाही या विचारांनी पिडात्मक बनवते. एखाद्या आजारपणा पेक्षाही घातक हा एकटेपणा... घाव, निर्जनता, रिकामेपण हे मृत्युस कवटाळू शकते.
पण अशी परिस्थिती येताना पाहून स्वत:हच स्वतःला सावरणे गरजेचे असते.  
  
       रोजच Office नंतर ४.३० ते ६.०० या वेळेत एकटीच NPT (Nariman Point) कधी गिरगाव चौपाटीला ला जाऊन बसत असे. Typing English-60wpm, हिंदी-40wpm हे मात्र Regular चालले होते. या वेळेत समुद्रा सोबत खूपच छान गट्टी जमली होती. मला माणसांचा गोतावळा नको वाटू लागला. जास्त कुणात मिसळत नसे. मित्र मैत्रिणींचा सहवास तसा छानच होता पण, त्या दरम्यान कुणीच नको वाटत होत. बऱ्याचशा भावना समुद्र किनारी व्यक्त व्हायच्या, आम्हा दोघांचेही सूत्र फारच जुळतात अस वाटायच, कारण मनात राग, घृणा असेल किंवा खूपच दुखः वाटत असेल तेव्हा जणू काही समुद्रालाही उधान यायचं, लाटांचा वेग वाढून किनार्यावर आपटत असे, कदाचित तोही आपल्या दुखा:त सामील असावा.      
  
                        आला समुद्रही रंगा, त्याचा धीटाईचा दंगा.
                        वेड्या लहरींचा पिंगा, बाई झाला कि सुरु.

कधी रडावस वाटल तर आणखीनच छान, कारण अश्रू वयाला जात नाहीत याचा आनंद... सागराशी जे एकरूप होतात....!
      परंतु जेव्हा जेव्हा पाण्याचा वेग हा फार संथ होत असे तेव्हा तेव्हा किनार्यावर येणारे पाण्याचे प्रत्तेक तरंग हे मनालाही फार शांत आणि सुखद वाटायचे. हळुवार पाण्यात पाय ठेवून उभ राहील कि पायाखाली येऊन जाणारी पाण्याची हलकीशी लाट मनाला गुदगुदल्या करत असे, किती सुंदर नात असत्... किनाऱ्याच सागराशी. शांत समुद्राकडे पाहून मनाची आणि विचारांची स्थिती ही फारच शांत आणि एकांतदायी होत असे आणि त्यामुळेच बऱ्याचशा प्रश्नांची उत्त्तरेही मिळत असे. “आयुष्य कस कोडं असत, पण ते वेळेवर सोडवताहि आल पाहिजे...!”
       समुद्र किनारी जाण्याच अजून एक महत्वाच कारण म्हणजे अथांग पसरलेला हा सागर विचारांवर किंवा स्वप्नांवर कधीच कोणतीच सीमा लागू देत नाही. जिथपर्यंत आपली नजर “ठहरते” तिथपर्यंत आपण विचार करू शकतो किंवा स्वप्न पाहू शकतो. आणि मुख्य म्हणजे एकांतात जेव्हा विचारांवर अडथळा येत नाही तेव्हा बरेच प्रश्न सोडवून त्यावर तोडगा काढून योग्य ते निर्णय घेण्याची पात्रता अंगी येते.
      वरती मोकळ निवांत लांब वर पसरलेल आभाळ, खाली अथांग असा सुंदर सागर आणि या दोघांच्या सहवासा मध्ये स्वप्न रंगवणारी “मी”....! मला दुसरीत असतानाचा “सांकव” धडा आठवला सुलभा नाव तिचं तिलाही ह्या अथांग सागराच फारच कुतूहल.
खूपच सुखद क्षण होते हे सर्व, आयुष्यातले.... कधीही न विसरण्यासारखे.
     
      आता पुन्हा माझा हरवलेला एकांत मलाच शोधत माझ्या पाशी येत होता. एखाद्या दिवशी जर मला समुद्र किनारी जायला जमल नाही तर काहीतरी चुकल्या सारख वाटत असे. रोज सकाळी लवकर उठण्याची सवय असल्यामुळे रविवार काही अपवाद नव्हता. मग रविवारी सकाळीच ६.३० ते ८.३० आमची भेट होऊ लागली. समुद्राच्या पाण्यावर पडलेली सुंदर तांबडी सूर्य किरणे समुद्राच संपूर्ण रूपच बदलवून टाकत असे. सागरातले मोती जणू काही सागरावरच आल्याचा भास होत असे.
        पूर्ण Nariman Point चा पट्टा Jogging करणाऱ्यांनी भरलेला असे. तेव्हा मात्र कळाल कि लोक का समुद्र किनारी घर घेण्याची इच्छा किंवा स्वप्न ठेवतात ते.
तेव्हा... गाण्याचा खरा आस्वाद कळाला.

                                       दर्या किनारी एक बंगलो ग पोरी जई जो जई

           मग प्रत्येक रविवार किंवा Bank Holiday -Morning Walk at NPT.
         मला आयुष्यात स्वतःसाठी फारच सुंदर वेळ मिळत गेला आणि त्या वेळेचा मी पुरेपूर सद्उपयोग करण्याचा नेहमी प्रयत्न केला. बऱ्याच प्रयत्नांना यश आले नाही पण त्यातला आनंद मात्र कशाच्याच तुलनेत नाही. एकांतात माणूस घडतो, त्यासाठी वेळ नसेल तरी काढावाच.
लग्ना नंतरही House Wife असल्यामुळे माझ्या घरातील कामांना छंदाची जोड मी कायम राखली.
       

                    घर मे है बस छ: हि लोग चार दिवारे, छत और मै
                    रात साहुली, एक सहेली गोरा चीटां दीन है दोस्त
                  घर मे है बस छ:ह हि लोग चार दिवारे, छत और मै
                    टेहेलने निकले तनहा, परछाई मै भी उसके पिछे चलू
                  निले अंबर के कागज पर, पंछी होकर चित्र बनू
                    इंद्र धनुष के तिरछी डाली पर चिपकी गिली नीली ओस
                  घर मे है बस छेःह हि लोग चार दिवारे, छत और मै
                        (Poem by Nana Patekar from Movie: Ab tak chappan-2)

             
छंदाना नेहमीच गाण्यांची जोड असावी पण आधी शब्द असावेत नंतर सूर...
कारण हि छंदाची जोडच आयुष्यभर सुखकर अशी अनंत साथ ठरू शकते. अगदी “एकांत के सौ वर्ष” प्रमाणेच....!
(छायाचित्रे: सौजन्य google images)

राजश्री...









      





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...