मुख्य सामग्रीवर वगळा

BAGHBAN


BAGHBAN

बाग को जनम देने वाला बागबान, परिवार को जनम देने वाला पिता..
दोनो ही अपने खून पसीने से अपने पोधो को सींचते हैं….
न सिर्फ अपने पेड़ से उसके साए से भी प्यार करते हैं
क्या मिसाल दूँ मैं तेरी, नाम लूँ मैं किसका”....!

       “माणसाने नेहमी महत्वकांक्षी असावं” हे त्याचं “ब्रीद” वाक्य आहे. अर्थात ते आम्हा तिघांना नेहमीच मोठ्या मोठ्या उदाहरणांतून हे समवून सांगतात. जिद्दी पणा अंगी असल्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट साकारू शकत नाही, ना कोणतेच ध्येय, उद्धिष्ट गाठू शकत. हो पण त्यासाठी आयुष्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे समजलं पाहिजे, त्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. नुसतच आपलं काहीतर मनाला वाटलं म्हणून कराव किंवा कोणतीतरी वेळ मारून नेण्यासाठी झगडाव असं नाही तर, आपल्या प्रत्तेक निर्णयाला, प्रत्तेक कृतीला महत्वं असावं. जो माणूस महत्वकांक्षी असतो तोच उज्वल भविष्य गाठू शकतो. कोणत्याही कामात फक्त मेहनत जिद्द असून चालत नाही तर ती गोष्ट किती महत्वाची आहे यावर आपलं भविष्य ठरत. फक्त जिद्द नाही तर महत्वाच्या गोष्टीत जिद्दी असाव. आणि ज्याला काहीच कळत नसेल, त्याने तर काही घाबरण्याचा विषयच नाही.. कारण त्याला नियती साथ देत असते. Just do it ची भूमिका बाळगायची. त्यांचे हे वाक्य नेहमीच मेहनत करण्यास प्रेरित करीत असते. 

           त्यांच्या काळात Collage मध्ये असल्यापासूनच डोळ्यासमोर मोठ्ठ स्वप्नं ठेऊन ते चार वर्षात पूर्ण करण म्हणजे फारच मोठ्ठी गोष्ट होती. मुख्य म्हणजे घरातली परीस्थीती हलाखीची असताना देखील. ते Police Officer झाले. आजोबा शाळेवर हेडमास्तर होते, तरी तेव्हा कोण एवढ श्रीमंत लागून आलय. पण स्वप्नं पूर्ण करायला पैसा लागत नाही हे एक उदाहरण आम्ही आमच्या पप्पांण कडून शिकलोय. त्यासाठी योग्य निर्णयाची पात्रता अंगी असावी काही ठराविक असे गुण अंगी असावे. मग कोणत्याही गोष्टीत यश मिळवण्या साठीची मजल मारणे सोप्पे जाते.

           पप्पांच M.A. झाल्याबरोबर त्यांच लग्न झाल, वर्षभरातच मी झाले, परंतु त्यांना कधीही त्याचं कुटुंब जड झाल नाही. नाहीतर आजकालचे उच्च शिक्षित मुलं, बाळ जन्माला घालण्यासाठी कित्तेक वर्षांचे Plannings करतात. सध्या काही तर असेही पाहायला मिळतात तब्बल नऊ-नऊ, दहा-दहा वर्ष सुद्धा मुलांची जबाबदारी नको.., असे म्हणतात. काय...? तर, ती त्यांच्या उच्च शिक्षणाची ओळख.... हास्यास्पद गोष्ट वाटते. म्हणूनच आम्हाला आमच्या वडिलांचा खूप आदर वाटतो. शिक्षण पूर्ण झाले नाही न नौकरी हातात तरी त्यांनी अभ्यास करता-करता माझा सांभाळ केला. अर्थात त्यांना मम्मी ने पावला-पावला वर खूप साथ दिली. तिने काही दिवस नौकरी केली, कारण पप्पांच Study Routine १६-१७ तासांच असायचं. त्याच्यासोबत ते मला सांभाळत असे.
या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी त्यांचे छंदहि खूप आवडीने सांभाळले त्यांना मधुबाला फार आवडते, घरात आजोबांनी कुठलातरी देवाचा Photo लावला होता, त्यावर यांनी मधुबालाच एक पोस्टर आणून चीटकऊन दिल, अशा शिव्या पडल्या...हा.हा..हा... त्यांना सिनेमा, गाणी याच तर खूपच वेड आहे. दोस्ती, संगम, मुघल-ए-आजम, दीवार असे कित्तेक सिनेमे ते आवर्जून बगतात. Bollywood चे ते जबरदस्त Fan आहे. आज ५१ व्या वर्षातही अजून ते आम्हाला Youngच वाटतात.

        आम्हा दोघी बहिणीत सहा वर्षांच अंतर आहे. जेव्हा ती जन्माला आली, त्यावेळेस पप्पांना Traning चा Call आला. अशा परिस्थितीत त्याकाळी दोन मुली जर एखाद्या-दुसर्या माणसाला झाल्या असत्या तर मला नाही वाटत तो खुश झाला असता किंवा बायको आणि दोन मुलींचा सांभाळ करायची त्याची कुवत असती. पण आमचे पप्पा तसे नव्हते, त्यांना दोन्ही मुली तितक्याच प्रिय होत्या. माझ्याप्रमाणेच दुसर्या मुलीचही स्वागत त्यांनी तितक्याच मोठ्या.., कदाचित अजून मोठ्या प्रेमाने केलं. त्याच अजून एक कारण, गुपचूप सांगते हं....! तिला Lucky Charm (भाग्यवान मोहिनी) समजतात ते. हा.हा..हां..!

         वर्षभरात Tranning पूर्ण होताच PSI पदासाठी मुंबई येथे Collaba Police Station ला नियुक्ती झाली. आणि त्या येत्या वर्षातच आम्हाला भाऊ पण झाला. म्हणजे आमचे ते दोन वर्ष कौटुंबिक आणि अधिकृत या दोन्हींनसाठी प्रगतीचे ठरले. आमचा सांभाळ करण्यात त्यांनी कोणत्याच प्रकारची कुठलीच उणीव आम्हाला भासू दिली नाही. मला ४-५ वर्षे आजी-आजोबांकडे राहायला ठेवलेल परंतु माझ्याही आयुष्यात कोणतीच कमी राहू नये, यासाठी मलाही मुंबईला घेऊन गेले. माझ्या साठी त्यांना आई वडिलांच्या विरोधात जावे लागले. कारण  मुलगा कमावता असला कि आई वडिलांना धाक पडायला सुरवात होते, नात आपल्या जवळ असल्याने तो आपल्याला सांभाळेल, नसेल तर सांभाळेल कि नाही..?, पैसा पूर्वेल कि नाही..? मुलगा कमावता नसेल तो पर्यंत तो त्यांच्या साठी कसाहि असतो. एकदा कमावता झाला कि त्याचे गुण दिसू लागतात.

       मुलगी आणि मुलगा असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव त्यांनी आम्हा सोबत कधी केला नाही. आम्हा दोघींना कधीच कोणतीच बंधन त्यांनी लादली नाही. स्वतंत्र आयुष्य काय असत ते आम्हाला त्यांचाकडून मिळाल. आमच्या प्रत्तेक गोष्टीत पाठींबा दिला. आम्ही मुली जेवढ्या प्रिय तेवढाच मुलगाही त्यांना प्रिय आहे. मुलींनी अस वागू नये, मुलींनी तस वागू नये, हे मुलींन साठी नाही., अस कधी आम्ही ऐकलच नाही. अगदी त्या बागबान प्रमाणे.......,

ओ धरती तरसे, अम्बर बरसे, रुत आये, रुत जाए हाय
हर मौसम की खुशबू चुनके बागबान बाग सजाये
बागो के हर फूल को अपना समझे बागबान..
हर घडी करे रखवाली, पत्ती पत्ती, डाली डाली सींचे बागबान
बागो के हर फूल को अपना समझे बागबान....

        आम्हा तिघांना योग्य तेवढ शिक्षण देण्याची त्यांनी खूप धडपड केली मी जरा शिक्षणत कमी पडले. पण बाकी दोघांनी माझी ती बाजू समांतर केली. आप-आपले क्षेत्र निवडण्याची स्वतंत्रता त्यांनी दिली. हो पण त्यात आम्हा पालकांसोबत नेहमी खर बोलत जा हे ते नेहमीच सांगतात. त्याच कारणही खूप छान पद्धतीने पटवून देतात, ते म्हणतात आयुष्यात कोणतीही चूक झाली तरी आम्ही तुमची ती चूक सुधारू शकतो. आम्हाला जर खरी गोष्ट माहित असेल तर आम्ही जगासमोर कोणत्याही परिस्थितीत तुमची साथ देऊ शकतो. आणि हे आपण ज्याच्या सोबत नेहमी असतो त्याच्या सोबतहि आमलात आणावं, कारण तो व्यक्ती आपली बाजू इतरांसमोर योग्य रित्या मांडू शकतो. एक म्हण इथे लागू पडते.... Doctor, वकील, आणि Police यांच्या सोबत नेहमी खरे बोलावे, जर खोट बोललात तर Result पण चुकीचाच लागतो. पप्पा Police Officer असल्यामुळे आम्हाला घरातच एका Field च उदाहरण मिळत, त्यांचा हा सल्ला खर बोलण्याचे फायदे सांगतो. आम्ही जे क्षेत्र निवडल त्यात आम्हाला पाठ्बळ देऊन ते स्वतःह आमचा कणा झाले.

        त्याचप्रमाणे माझं लग्न करताना देखील त्यांनी संपूर्ण निर्णय माझ्यावरच सोपवला. ते जमवतांना कुणीतरी त्यांच्या व्यक्तीमहत्वाला गाल-बोट लावले, पण त्या गोष्टीचा तिळमात्रहि विचार न करता तुला काय करायचं आहे..? हे लग्न तुला मंजूर असेल तर, गोळी मार त्याला... यातून त्याच व्यक्तीच व्यक्तीमहत्वं दिसतं, आणि या दोन शब्दातूनच माझं मत बदलून मी लग्नाला होकार दिला. थोडक्यात निर्णय कसे आणि कधी घ्यावे याच मोठ्ठ उदाहरण पुन्हा एकदा मला त्यांच्या कडून शिकायला मिळाल. हे माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठ्ठ उदाहरण आहे.  

         मुंबई पासून त्यांच्या अनेक ठिकाणी कामानिमित्त बदल्या होत गेल्या, विदर्भात खाण्या-पिण्याचे खूपच हाल त्यांनी सोसले, तब्बल नऊ ते दहा वर्षे ते विदर्भात बदली असल्यामुळे तिथून घरी येन-जान करत होते. मुल आणि बायको जवळ नसतांना मांणसाच आयुष्य हे किती कठीण असत हे फक्त एक Police Officer च सांगू शकतो. आणि आता निवासस्थानी म्हणजे नाशिक मध्ये आहे. आज मी विदेशात आहे बहिण-भाऊ शिक्षण घेताय, आणि पप्पांची नौकरीचीहि काही वर्षे राहिलीत. आत्ता त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळतंय.

ओ मधुबन की बहार ले आये,
मौसम रीते रीते हाय मौसम रीते रीते..
जनम जनम की तृष्णा बुझ गयी,
बिरहा के क्षण बीते हाय बिरहा के क्षण बीते...
फिर से सजाये अपने सपने बागबान....

        पप्पांचा स्वभाव मनमोकळा असल्यामुळे, त्यांच्या मनात अस दुसर कोणत तळघर अजिबात नाही. बरेच पुरुष असे असतात कि त्यांच्या मनातल आपण जाणू शकत नाही, ते खूपच आतल्या गाठीचे असतात खुल्या मनाने कुणासोबत बोलत नाही किंवा वागत नाहीत. थोडक्यात खऊट किंवा कपटी स्वभावाचे असतात. त्यांच्या मनात हात जरी घातला तरी हाती काही लागणार नाही अशातले. पण पप्पा अगदी त्या विरुद्धी स्वभावाचे आहे, त्यांनी कधी कुणापासून काही लपवलं नाही, कि खोट बोललं नाही. ते म्हणतात तशी कधी वेळच आली नाही. स्वच्छ मनाचे रहा “दिल खोल के जिने को मिलेगा, वर्णा चाहकर भी जी, ना सकोगे” म्हणूनच आज ते आमच्या नातलागांमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये, तसेच लहान मोठ्यांचे सल्लागार आणि वजनदार व्यक्ती-महत्वं घेऊन आहेत.

        या सगळ्या गुणांन व्यतिरिक्त मला आवर्जून सांगावस वाटेल कि पप्पा खूप छान कवी सुद्धा आहे. त्यांनी बर्याच अशा मार्मिक आणि आयुष्याला कलाटणी देणाऱ्या कविता लिहिल्यात. त्त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग हि त्यांनी कवितेत इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेत कि वाचताना अंग शहारून येते. 
आजकालच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातही त्यांनी स्वताला छान जमवून घेतलय. माझ्या लग्ना आधी मला Facebook वापरण्यास थोड Cybercrime चे धडे देत असत, पण मी विदेशात येणार म्हणून लगेचच Facebook Account Open करून माझ्या साठी एक छान शी कविता लिहून मला Tag कशी करायची ते विचारल आणि तिथ पासून पुढे ते सगळ्याच Social Sites सहज रित्या हातालायला लागले. त्यांचा हा बदल आम्हा सर्वांचा आवडता बदल आहे.   



       पप्पा तुमच्या ह्या सर्व गुणांचा आदर्श आम्ही आमच्या आयुष्यात पावलापावली घेतोय, आम्ही तिघे खूप नशीबवान आहोत... जे तुमच्या छत्रछाये खाली जन्मलो आणी वाढलो.
     
   पप्पा तुम्हाला दीर्घ आणि सुधृढ आयुष्य लाभो हीच सदिच्छा.....                 

औरों की तरह कुछ मैं भी, तोहफ़ा आज लाती
मैं तेरी हसीं महफ़िल में, फूल ले के आती
जी ने कहा, उसे क्या है फूलों की ज़रूरत
जो बहार खुद कहलाये, हर कली का दिल धड़काये
तू जिये हज़ारों साल, ये मेरी है आरज़ू

फूलों ने चमन से तुझको, है सलाम भेजा
तारों ने गगन से तुझको, ये पयाम भेजा
दुआ है ये, खुदा करे, ऐ शोख तुझको
चाँद की उमर लग जाए, आये तो क़यामत आये
तू जिए हज़ारों साल, ये मेरी है आरज़ू

बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये
तू जिए हज़ारों साल, ये मेरी है आरज़ू
Happy Birthday to You Daddy.....!


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...