मुख्य सामग्रीवर वगळा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


डॉ. बाबासाहेब आंबेडकर 


    समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावे यासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलेले व्यक्तिमत्व म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर. पण, समाजात आंबेडकर हे नाव फक्त दलित नेते, भारतीय संविधान, बौध धर्म, आरक्षण आणि जातीयवादा विरोधात लढा यासाठी ओळखले जाते किंवा मर्यादित ठेवले आहे, याची फार खंत वाटते. आजकाल आंबेडकर किंवा भीम जयंती दिवशी थोडी फार आंबेडकरांबद्दल माहिती दिली जाते आणि फक्त जातीयवाद, आरक्षण याबद्दल बोलणे सुरु होते. राजकीय नेत्यांना स्वतःच्या फायद्यासाठी हि तर आधुनिक शस्त्रे झाली आहे. समाजातील अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कामगारवर्ग, स्त्रिया या सर्वांना इतरांप्रमाणेच वागणूक आणि समान हक्क मिळावे यासाठी भारतीय संविधानात तरतुदी केल्या. आपण आंबेडकरांना इतकेच ओळखतो हे एक कटू सत्य आहे.
      समाजातील काही घटक हे विशिष्ट जातीचे किंवा राहणीमानाचे आहे म्हणून त्यांना हीन वागणूक द्यावी...! हा कोणता न्याय ? अशा प्रश्नांना सडेतोड उत्तरे शोधून डॉ. आंबेडकर यांनी लोकांसाठी असे प्रयत्न केले कि त्यांना समाजात एक माणूस म्हणून स्थान मिळाव आणि इतरांप्रमाणेच प्रगतीपथावर चालता यावे. जशा राज्यांना सीमा असतात, तशा जाती... ह्या लोकांमधील सीमा झाल्या आहेत. ज्या व्यक्तीने ह्या सीमा मिटवण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीलाच आपण जातीयवादाच्या किंवा आरक्षणाच्या सिमेत कोंडून ठेवले. ह्या सीमा मिटवण्यासाठी त्यांनी शिक्षण, नोकरी आणि धर्म या तीन गोष्टी निवडून समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला. जोपर्यंत व्यक्तीचे विचार बदलत नाही, तोपर्यंत त्याची प्रगती होऊ शकत नाही.
       एखाद्या धर्मातील जाती आणि रूढी-परंपरे मुळे त्याला त्याचे विचार बदलण्याची किंवा प्रगती करण्याची संधी मिळू शकत नाही, तर अशा धर्मावर चालणे काही उपयोगाचे नाही, जर व्यक्तीला चांगले शिक्षण मिळाले तर त्याचे विचार बदलू शकता. चांगले विचार ठेवणारा व्यक्ती स्वतःची प्रगती करू शकतो. नंतर तो समाजपरिवर्तन करू शकतो, हे आंबेडकरांनी ओळखले होते. उच्च शिक्षण आणि नोकरी मिळावी यासाठी आरक्षण लागू केले. पण, आज या गोष्टीचा सदुपयोग पाहिजे तसा झालेला दिसत नाही. व उलट जातीयभेदभाव वाढत चालेला दिसतोय. हा भेदभाव मिटवण्यासाठी देखील आंबेडकरांनी धर्म सोडून शांती आणि एकात्मतेचा बौध धर्म स्वीकारला. आणि त्याचे महत्व तुम्हा-आम्हा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
परिवर्तना बद्दल काही ओळी आठवल्या.......
पेहेचान अतीत में नही भविष्य में मिलेगी,
अब बस तकदीर एक मौका दे...!
कूछ बाते तो मै नही जानती,
पर, उनसेभी परिचय हो जायेगा...!
गंदगी को साफ करते करते,
कूछ गंदी छीटे अपने उपर भी पडती जायेगी...!
लेकीन, इतनी किमत तो चुकानी पडती है,
एक मौका परीवर्तन लाने का.....!

      आज आंबेडकर जयंती निमित्ताने, समाजात जाती स्वरूपाच्या कुठल्याही सीमा नसाव्यात, सर्वाना समान हक्क आणि वागणूक मिळावी यासाठी आपण प्रयत्न करूया.


जय भीम!!!
राजश्री जगताप....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...