डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावे
यासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलेले व्यक्तिमत्व म्हणजे “भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर”. पण, समाजात आंबेडकर हे नाव फक्त दलित नेते,
भारतीय संविधान, बौध धर्म, आरक्षण आणि जातीयवादा विरोधात लढा यासाठी ओळखले जाते किंवा
मर्यादित ठेवले आहे, याची फार खंत वाटते. आजकाल आंबेडकर किंवा भीम जयंती दिवशी थोडी
फार आंबेडकरांबद्दल माहिती दिली जाते आणि फक्त जातीयवाद, आरक्षण याबद्दल बोलणे सुरु
होते. राजकीय नेत्यांना स्वतःच्या फायद्यासाठी हि तर आधुनिक शस्त्रे झाली आहे. समाजातील
अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कामगारवर्ग, स्त्रिया या सर्वांना
इतरांप्रमाणेच वागणूक आणि समान हक्क मिळावे यासाठी भारतीय संविधानात तरतुदी
केल्या. आपण आंबेडकरांना इतकेच ओळखतो हे एक कटू सत्य आहे.
समाजातील काही घटक हे विशिष्ट
जातीचे किंवा राहणीमानाचे आहे म्हणून त्यांना हीन वागणूक द्यावी...! हा कोणता
न्याय ? अशा प्रश्नांना सडेतोड उत्तरे शोधून डॉ. आंबेडकर
यांनी लोकांसाठी असे प्रयत्न केले कि त्यांना समाजात एक माणूस म्हणून स्थान मिळाव आणि
इतरांप्रमाणेच प्रगतीपथावर चालता यावे. जशा राज्यांना सीमा असतात, तशा जाती...
ह्या लोकांमधील सीमा झाल्या आहेत. ज्या व्यक्तीने ह्या सीमा मिटवण्याचा प्रयत्न
केला, त्या व्यक्तीलाच आपण जातीयवादाच्या किंवा आरक्षणाच्या सिमेत कोंडून ठेवले. ह्या
सीमा मिटवण्यासाठी त्यांनी शिक्षण, नोकरी आणि धर्म या तीन गोष्टी निवडून समाज
परिवर्तनाचा प्रयत्न केला. जोपर्यंत व्यक्तीचे विचार बदलत नाही, तोपर्यंत त्याची
प्रगती होऊ शकत नाही.
एखाद्या धर्मातील जाती आणि
रूढी-परंपरे मुळे त्याला त्याचे विचार बदलण्याची किंवा प्रगती करण्याची संधी मिळू
शकत नाही, तर अशा धर्मावर चालणे काही उपयोगाचे नाही, जर व्यक्तीला चांगले शिक्षण
मिळाले तर त्याचे विचार बदलू शकता. चांगले विचार ठेवणारा व्यक्ती स्वतःची प्रगती
करू शकतो. नंतर तो समाजपरिवर्तन करू शकतो, हे आंबेडकरांनी ओळखले होते. उच्च शिक्षण
आणि नोकरी मिळावी यासाठी आरक्षण लागू केले. पण, आज या गोष्टीचा सदुपयोग पाहिजे तसा
झालेला दिसत नाही. व उलट जातीयभेदभाव वाढत चालेला दिसतोय. हा भेदभाव मिटवण्यासाठी
देखील आंबेडकरांनी धर्म सोडून शांती आणि एकात्मतेचा बौध धर्म स्वीकारला. आणि
त्याचे महत्व तुम्हा-आम्हा पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
परिवर्तना बद्दल काही ओळी आठवल्या.......
पेहेचान अतीत में नही भविष्य में मिलेगी,
अब बस तकदीर एक मौका दे...!
कूछ बाते तो मै नही जानती,
पर, उनसेभी परिचय हो जायेगा...!
गंदगी को साफ करते करते,
कूछ गंदी छीटे अपने उपर भी पडती जायेगी...!
लेकीन, इतनी किमत तो चुकानी पडती है,
एक मौका परीवर्तन लाने का.....!
आज आंबेडकर जयंती निमित्ताने, समाजात जाती
स्वरूपाच्या कुठल्याही सीमा नसाव्यात, सर्वाना समान हक्क आणि वागणूक मिळावी यासाठी
आपण प्रयत्न करूया.
जय भीम!!!
राजश्री जगताप....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा