मुख्य सामग्रीवर वगळा

स्वप्नांचा कणा “विचार”.......!


स्वप्नांचा कणा “विचार”.......!

           विचारांना वास्तवात आणणं म्हणजेच स्वप्नं पूर्ण करण..... कुठलीही वस्तू निर्माण होण्याआधी प्रथम ती वैचारिक स्वरुपात निर्माण होते.
           मोठी मोठी स्वप्न पाहण, मोठ्या-मोठ्या मोठ्या उड्या घेण हे मला खूपच आवडत. माझ्या प्रत्तेक स्वप्नाचा मी इतका पाठलाग करते कि जोपर्यंत ते स्वप्नं सत्यात उतरत नाही तो पर्यंत मला चैन पडत नाही. अक्षरशः माझी झोप उडालेली असते, इतकी बेचैनी मनात, वागण्यात, आणि विचारांत असते कि अन्न हि गोड लागत नाही. खुप Saturation होत, मनात एक प्रकारच वादळ उठलेल असत अशा चलबिचल अवस्थेत राहण मला कधी कधी फार कठीण होत, कारण याअवस्थेमुळे माझे सोबती, माझे आप्तस्वकीयही फार काळजीत पडलेले असतात. परंतु त्याचा एक फायदाही मला होतो, त्यांचे आशीर्वाद त्यांच्या कल्पना, त्यांची मनापासून मिळालेली साथ, त्यांची मदत, माझ्यासाठीची त्यांची धडपड, त्यांचे Good Luck माझे स्वप्न पूर्ण करण्याच धैर्य वाढवते. यामुळे ती स्वप्न पूर्ण होतात.
         माझ्या स्वप्नांच्या आड येणारी माणस मला मुळीच खपत नाही. नेहमीच आशावादी, सकारात्मक विचारांचा सहवास गरजेचा आहे. आपला एक सशक्त विचार आपलं संपूर्ण जीवन साकारू शकतो. तसेच एखाद्या प्रयत्नशील गोष्टीत स्वतःला झोकऊन टाकणारी लोक मला आवडतात. अशा प्रकारची लोक आपल्या आजूबाजूला असतील तर आपला प्रत्तेक प्रयत्न साफल्य होऊ शकतो. आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांच्या नकारात्मक विचारांचा आपल्या विचारपद्धतीवर आणि विचारांवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपला सभोवताल आपण विचारपूर्वक निवडावा. समानता--समानतेला आकर्षित करते, म्हणजेच लोक स्वतःसार्ख्याच लोकांकडे आकर्षित होतात. अर्थात समान विचारधारा असणारे लोक. एकत्र राहू शकता.
         लोह चुंबकामध्ये एका चुंबकाचा उत्तर ध्रुव दुसर्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाला दूर लोटतो आणि दक्षिण ध्रुवाला आकर्षित करतो. म्हणजेच दोन विरुद्ध प्रकारचे लोकही एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात. परंतु यातही आपआपसात ताळमेळ, सामंजस्य असेल तरच ते एकत्रित राहू शकता. मग त्यांच्या इच्छा, आकांक्षा वेगळ्या असल्या तरीही त्यांची विचार करण्याची पातळी बहुतांशी सारखीच असते. आपल्याहि जीवनात अशा अनेक प्रकारचे लोक येतातात, आणि मग त्यांची नि आपली सोबत कायमस्वरूपी राहते. आणि ज्यांची जमेची बाजू नसते ते अपोआप एखाद्या निर्जन झाडाच्या पानाप्रमाणे गळून पडतात. त्यांचा सहवास आपण होऊनच नाहीसा होण्यास मदत होते.    
         स्वतःचे स्वप्न पूर्ण करण फार कठीण अशी गोष्ट नसते. त्यासाठी योग्य ती मेहनत योग्य त्या वेळेला करण गरजेच आहे. वेळोवेळी योग्य निर्णय घेण महत्वाच असत. स्वप्नांचा पाठलाग करण्याची हि एक पद्धत असते. स्वतःचा दृष्टीकोन इतका सशक्त असला पाहिजे कि आपला सभोवताल हि त्या विचाराशी एकरूप झाला पाहिजे. समोरच्याचे विचार आपल्या विचारांशी अनुरूप होऊन कृती करण्यास भाग होईल. सर्वात आधी स्वतःला माहिती पाहिजे “आपल्याला नक्की काय हवय”, केव्हा हवय, आणि ते कसं मिळवता येईल. त्या मेहनती साठी योग्य अशी रूपरेखा आपल्या समोर असण गरजेच आहे. योग्य दिशेने पाऊल टाकता आल पाहिजे. अर्थात तीही एक कलाच आहे.
          नाहीतर आपली दशा त्या माणसांसारखी होईल जे स्वप्न बघतात देवा मला इतका पैसा भेटावा इतका पैसा भेटवा की तो मोजता मोजता नाकी नऊ यावेत मग, काय...? देवही शहाणा..! त्याला Cashier, Conductor ची नौकरी देतो.
तर सांगायचा मुद्दा असा कि फक्त चांगले विचार, सकारात्मक गोष्टी, किंवा चांगली संगत असून स्वप्न साकार होत नसतात, तर त्यासाठी योग्य मेहनत हि देखील तितकीच गरजेची आहे. मग कोणतही स्वप्नं का असेना साकार होईलच......  

राजश्री जगताप   


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...