स्वप्नांचा कणा “विचार”.......!
विचारांना वास्तवात आणणं म्हणजेच स्वप्नं
पूर्ण करण..... कुठलीही वस्तू निर्माण होण्याआधी प्रथम ती वैचारिक स्वरुपात
निर्माण होते.

माझ्या स्वप्नांच्या
आड येणारी माणस मला मुळीच खपत नाही. नेहमीच आशावादी, सकारात्मक विचारांचा सहवास
गरजेचा आहे. आपला एक सशक्त विचार आपलं संपूर्ण जीवन साकारू शकतो. तसेच एखाद्या प्रयत्नशील
गोष्टीत स्वतःला झोकऊन टाकणारी लोक मला आवडतात. अशा प्रकारची लोक आपल्या आजूबाजूला
असतील तर आपला प्रत्तेक प्रयत्न साफल्य होऊ शकतो. आपल्या सोबत राहणाऱ्या लोकांच्या
नकारात्मक विचारांचा आपल्या विचारपद्धतीवर आणि विचारांवर परिणाम होण्याची शक्यता
असते. त्यामुळे आपला सभोवताल आपण विचारपूर्वक निवडावा. समानता--समानतेला आकर्षित
करते, म्हणजेच लोक स्वतःसार्ख्याच लोकांकडे आकर्षित होतात. अर्थात समान विचारधारा
असणारे लोक. एकत्र राहू शकता.
लोह चुंबकामध्ये एका चुंबकाचा
उत्तर ध्रुव दुसर्या चुंबकाच्या उत्तर ध्रुवाला दूर लोटतो आणि दक्षिण ध्रुवाला
आकर्षित करतो. म्हणजेच दोन विरुद्ध प्रकारचे लोकही एकमेकांकडे आकर्षित होऊ शकतात.
परंतु यातही आपआपसात ताळमेळ, सामंजस्य असेल तरच ते एकत्रित राहू शकता. मग
त्यांच्या इच्छा, आकांक्षा वेगळ्या असल्या तरीही त्यांची विचार करण्याची पातळी
बहुतांशी सारखीच असते. आपल्याहि जीवनात अशा अनेक प्रकारचे लोक येतातात, आणि मग
त्यांची नि आपली सोबत कायमस्वरूपी राहते. आणि ज्यांची जमेची बाजू नसते ते अपोआप
एखाद्या निर्जन झाडाच्या पानाप्रमाणे गळून पडतात. त्यांचा सहवास आपण होऊनच नाहीसा
होण्यास मदत होते.
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण फार कठीण अशी गोष्ट नसते.
त्यासाठी योग्य ती मेहनत योग्य त्या वेळेला करण गरजेच आहे. वेळोवेळी योग्य निर्णय
घेण महत्वाच असत. स्वप्नांचा पाठलाग करण्याची हि एक पद्धत असते. स्वतःचा दृष्टीकोन
इतका सशक्त असला पाहिजे कि आपला सभोवताल हि त्या विचाराशी एकरूप झाला पाहिजे.
समोरच्याचे विचार आपल्या विचारांशी अनुरूप होऊन कृती करण्यास भाग होईल. सर्वात आधी स्वतःला माहिती पाहिजे “आपल्याला नक्की काय हवय”, केव्हा हवय, आणि ते कसं मिळवता
येईल. त्या मेहनती साठी योग्य अशी रूपरेखा आपल्या समोर असण गरजेच आहे. योग्य दिशेने
पाऊल टाकता आल पाहिजे. अर्थात तीही एक कलाच आहे.
नाहीतर आपली दशा
त्या माणसांसारखी होईल जे स्वप्न बघतात देवा मला इतका पैसा भेटावा इतका पैसा भेटवा
की तो मोजता मोजता नाकी नऊ यावेत मग, काय...? देवही शहाणा..! त्याला Cashier,
Conductor ची नौकरी देतो.
तर सांगायचा मुद्दा असा कि फक्त चांगले विचार, सकारात्मक गोष्टी, किंवा
चांगली संगत असून स्वप्न साकार होत नसतात, तर त्यासाठी योग्य मेहनत हि देखील
तितकीच गरजेची आहे. मग कोणतही स्वप्नं का असेना साकार होईलच......
राजश्री जगताप
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा