मुख्य सामग्रीवर वगळा

हम पांच…..!


हम पांच…..!


बम चिक चिक बम, चिक बम बम,
बम चिक चिक बम... 
एक दुसरे से करते है प्यार हम ,
एक दुसरे के लिए बेकरार हम...!
एक दुसरे के है पहरेदार हम,
एक दुसरे के लिए बेकरार हम... 
एक दुसरे से करते है प्यार हम...!

        लग्नाचा तिसावा वाढदिवस म्हणजे त्या जोडप्याच्या संसाराची बरीचशी छान अशी प्रगति झालेली असते हे नव्याने काही सांगायला नको. नौकरी ची काही वर्षे शिल्लक, छान अस घर बनलेलं असत, मुल मोठी होऊन शिक्षण, नौकरी, लग्न, होऊन छान अशी लागारीला लागलेली असतात. बऱ्यापैकी मोठ्या-मोठ्या चिंतांच निरसन झालेलं असत. तसेच वायोमर्यादेनुसार छोट्या मोठ्या आजाराच शिकारही माणूस झालेलं असत. पण तरी देखील या सर्व गोष्टींना नाजूक पद्धतीने जे जोडप सांभाळत त्यांचा संसार दृष्ट लागण्या जोगा असतो.

        संसार करण्याची कला माणसाला अवगत पाहिजे हे हि तितकच खरं, नवरा बायको च नात अनेक प्रकरांच असत, त्यात प्रत्तेक जण आपापल्या परीण नैपुण्य मिळवत. पण ह्या अनेक प्रकारांमध्ये सुद्धा अस नात बनल पाहिजे कि लहान-थोरांना ते एक उदाहरण म्हणून दिल गेल पाहिजे. तसच काही नात आमच्या मम्मी-पप्पांच आहे. नात्याची गुरुकिल्ली हि सत्याच्या बळावर बनत असते. एकमेकांसोबत सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा संवाद असला पाहिजे.
        हेच मम्मी-पप्पांनी केल. त्यांच्या सोबत घडलेला कोणताही प्रसंग ते एकमेकांना सांगितल्या शिवाय राहत नाही. कोणतेही निर्णय घेतांना ते एकमेकांचा सल्ला घेतात. कधीहि कोणतीही चूक त्यांच्याकडून झाली तर ते त्वरित एकमेकांना साथ देतात आणि तीच वेळ त्यांच्या नात्याला घट्ट करत जाते. पप्पांनी कधीच मम्मी पासून कोणतेच व्यवहार लपवले नाही. Infact तिला विचारल्याशिवाय केलेच नाही. आणि तिनेही त्यांना विचारल्याशिवाय घराच्या बाहेर कधी पाऊलही टाकले नाही.
       हिच गोष्ट आज आपली पिढी करू शकत नाही. त्यामुळे आजकालचे वैवाहिक जीवन हे फक्त एक आधार म्हणून रटाळ पद्धत्तीने जगल जातंय. एकमेकांचे सल्ले घेण तर दूरच पण एकमेकांचे निर्णय, बदल, इच्छा-अपेक्षा, आवक-जावक सांगण एवढ काही महत्वाच त्यांना वाटत नाही. आपआपल्या शिक्षणाचा नौकरीचा अभिमान बाळगून नवरा बायकोच नात कुठतरी लांबच हरवलेल असत. बरीच जोडपी ह्या नात्याला ”Granted” गृहीत धरून आयुष्य कसतरी ढकलतात, चाललाय संसार म्हणून चाललाय...
नाही...! ते..ही संसार करतात.. पण, बऱ्याच गोष्टी Adjust करून किंवा मन मारून.... आणि तसही नाहीच जमल तर झाले वेगळे... किस्साच खतम...! त्यामुळे मला माझ्या आई-वडिलांचाच्या वागण्याचा फार अभिमान वाटतो. एकमेकांना एका धाग्यात बांधून रेशीम वीण विणण्यासाठी एकमेकांना मान-सन्मान देणे, एकमेकांच्या इच्छा-अपेक्षा पुरती करणे, महत्वाच म्हणजे प्रत्तेक गोष्टीच Sharing करण योग्य रित्या जमल पाहिजे ते त्यांनी खूप छान पद्धतीने निभवल. यात बरंचस श्रेय मी मम्मी ला देईल.. Sorry Dad.... but that’s true...! and this Bittertruth is bond of your strong Relationship. तिने तिच्या अपेक्षांना कुणावर ओझं होऊ दिल नाही. माहेर हे तिच्या साठी एखाद्या नातलगा प्रमाणे तिने ठेवलं. एका Police Officer ची पत्नी असल्यमुळे तिने कधीच कुठलीच अपेक्षा अथवा अट्टहास केला नाही ना कुठे येण्याजाण्यासाठी, ना काही घेण्या-देण्या साठी. पावलापावलावर सगळ्या गोष्टी स्वीकारत गेली. त्यामुळे पप्पांना सगळच सोईस्कर झाल.
        नऊ-दहा वर्षे नौकरी निम्मित बाहेर असताना देखील, तिथून मुलांवावर लक्ष ठेवणे, त्यांच्या प्रत्तेक गरजेला पुरून उरणे, त्यांच्या अभ्यासाचा संपूर्ण आढावा घेत राहणे, त्यांच्या प्रगतीत येणाऱ्या प्रत्तेक अडथळ्याला बांध घालणे, संपूर्ण कुटुंबाच्या जबादारीच कधीही ओझं न वाटणे. ही जबाबदारी योग्य रित्या पार पाडली तरच त्या व्यक्तीची मुले योग्य दिशेस जाण्यास पात्र होऊ शकतात. आणि ती आमच्या पप्पांनी इतक्या सोप्प्या प्रकारे पार पडली कि आम्हाला कधीच जाणीव होऊ दिली नाही कि आम्ही त्यांच्या पासून लांब आहोत. तस महिन्यातून एकदातरी घरी येण्याचा प्रयत्न ते करत असत. मुलांच्या भवितव्यासाठी नवरा-बायको मध्ये येणार हे अंतर त्यांनी हसतहसत पुसून टाकल. मुलांमुळे किंवा मुलांसाठी हा त्याग करण किती मोठ्ठ असत ते आज मला माझ लग्न झाल्यावर कळतंय.
        पालकांना नेहमी एक भीती असते, आपण मुलांवर केलेले संस्कार त्यांच्यात रुजतील का? ते आपल्या सर्व चांगल्या गोष्टी Follow करतील का? पण तस काही नाही. मला आवर्जून सांगावस वाटेल, कि तुम्ही दिलेल्या सगळ्याच संस्कारांच पालण हे अपोआप आमच्या कडून नेहमी होत असत. तुम्ही दिलेल्या संस्कारांच्या खाजीन्यातल्या सर्वच गोष्टी आम्हाला वेळोवेळी उपयोगी पडतात. तर..., ह्या गोष्टीची चिंता नसावी.
                माझ्या अनुभवात आलेल्या इतर पालकांच्या तुलनेत मला एक गोष्ट इथे प्रकर्षाने सांगावीशी वाटते. ती म्हणजे, बरेच आई-वडील आपल्या मुलांना शंख-नाद करून सांगत असतात. आम्ही तुमच्या साठी हे केल-ते केल, मग आता तुमची जबाबदारी तुम्ही आमच्या साठी अस करा-तस करा.. तुम्ही हे केल पाहिजे-ते केल पाहिजे... चोवीस तास स्वतःह काढलेल्या गरीबीचे किंवा कष्टांचे धडे त्यांच्या समोर गिरवत असतात. का..? तर मुलांनी आपली कर्तव्य विसरू नये म्हणून.
        पण, माझ्या पालकांचं म्हणण जेव्हा बोलण्यातून कळून येत तेव्हा ते फक्त आमच्या सुखाचा विचार करतात. अमच्या आयुष्यात काही कमी राहू नये याची धडपड करतात, मुख्य म्हणजे त्यांना आमच्याकडून फार अशा काही अपेक्षा नाहीत. आता याचा अर्थ असा होत नाही कि ते अब्जपती लागून आलेत. पण तरी ते कधीच त्यांच्या कष्टाचं खापर मुलांवर फोडत नाही. सगळ्यांचेच आई-वडील कष्ट करूनच मुलांना वाढवतात, मोठ्ठ करतात. पण परतफेड म्हणून अशी काही अपेक्षा ठेवण कितपत योग्य आहे..? जर आपल्या मुलांना आपली परिस्थिती पहिल्यापासून चांगल्याप्रकारे माहित आहे, तर त्यांच्या समोर हा डंका का वाजवत बसायच..?, त्यांच्यावर आपले योग्य संस्कार असतील तर, त्यांना कोणत्याही गोष्टीची जाणीव करून देण्याची वेळच आली नाही पाहिजे... मुलांच्या जबाबदाऱ्या त्यांनी स्वतःहून स्वीकारल्या पाहिजे, त्यानाही कसलं ओझं वाटता कामा नये... कारण पुढे भल्यामोठ्या पर्वतासारख आयुष्य त्यांच्या समोर असत, ते जास्तीतजास्त सुखकर कसं होईल हे पालकांनी बघाव. मुल संसार करत असताना आपण काही गोष्टी लादल्या तर ते हेही करू शकत नाही आणि तेही नाही. आजकालच्या Generation ला जबाबदाऱ्या ह्या वैतागून सोडतात, कारण त्यांचे धेय्य वेगळेच असते. त्यांनी आपला तिरस्कार करु नये हे आपल्याच हातात असते. आणि आपण पालक नको-नको त्या अपेक्षांमुळे त्यांच्या बऱ्याच गोष्टीत अडचणी निर्माण करत असतो. हे ते बोलून दाखवत जरी नसले तरी सत्य आहे.....
आमच्या ममी-पप्पांच्या ह्या सगळ्या Practical विचाराणमुळेच आम्हा तिघांना अभिमान वाटतो. म्हणूनच आम्हाला ते संपूर्ण जगतात सुंदर आई-वडील वाटतात.     
      
आता यांच एकमेकांवर एवढ प्रेम आहे याचा अर्थ असा नाही कि ते अजिबातच भांडत नाहीत. उलट त्यांचा तर फंडाच आहेच “भांडा सौख्भारे” अगदी छोट्या-छोट्या गोष्टींसाठीही ते भांडत असतात. सांगितलं तर हसायला देखील येईल. छोट्या म्हणजे अगदी मिरची, कोथिंबिर वरुन सुद्धा, निवडक भाजीपाला घेण हे मम्मी सारखच पप्पांना देखील छान जमत ते आवडीने भाज्या निवडून घेतात. एक किस्सा त्यांचा मला भारी आठवतो. दोघे भाजीला गेले. तिथे हिरव्यागार तिखट मिरच्या होत्या, तर त्यात तिखटाच प्रमाण किती यावरून त्यांच भांडण झाल. कोथिंबीर गावठी कि रांगडी या वरून ते वाद घालू लागले....! मी उशिराने घरी आले घरात बरीचशी शांतता होती. म्हंटल काय झाल, तर बहिण तावातावाने उठून बोलली.., अरे हे लोक...! मिरच्या कोथिंबीर वरून भांडतात.......! मी इतक्या मोठ्याने हसले कि सार वातावरण हास्यमय झाल आणि घडलेल्या किस्स्याचे रूप बदलून गेले. त्यानंतरचा असाच एक किस्सा एकदा एका तलावाकाठी त्यांनी राजहंस पहिले, पण ते राजहंस आहेत कि नाहीत यातच भांडण झाल... अशी हि छोटी-छोटी भांडण अजून बरीच आहेत, हे फक्त उदाहरण बरं,
      तर सांगायचा उद्देश असा कि आम्ही दोघी घरापासून लांब आहोत, आता आम्हाला तुमच्या ह्या छोट्या-छोट्या भांडणांची देखील भीती वाटत्ते. “भांडणाने प्रेम वाढत”, हि म्हण खरच तुमच्या तरुणपणी छान होती. हल्लीच्या युगात आम्हाला ती फार भयानक वाटते. आता तुमच आयुष्य तुम्ही थोड आरामात, सुखात आणि मजेत घालवावं अस आम्हाला वाटत.

      It is the children see their parents live to the fullest, success is met in true sense.
Wish this new year of your 30th years of long & Happy married life be even happier

खिले खिले चेहरों से आज
घर है मेरा
गुले गुलजार क्या कहना
हम तुम यूँ ही मिलते रहे
महफ़िल यूँ ही सजती रहे
बस प्यार की एहि एक धुन
हर सुबह शाम बजती रहे
गले में महकते रहे
प्यार भरी
बाहों के हार क्या कहना
खिले खिले चेहरों से आज
घर है मेरा
गुले गुलजार क्या कहना.......!




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...