किती ग खट्याळ..?,
बाई तू...!
महत्वाची काही काम असतील तर त्याच तारखेला तू
येऊन धमकतेस, कुठे सहलीला जायच ठरल तर तुझी वाट बघून बघून थकवतेस, लांबच्या
प्रवासाच्या आधीच तू येऊन जावीस अस ठरवलं तर नेमकी त्या महिन्यात तू उशिरा येतेस.
पूजेला बसायचं म्हणून, पूजेला जायच म्हणून, झालेल्या नवरी ला सुद्धा किती छळतेस
तू..? तुझ्या किती-किती विनवण्या करवतेस. काय-काय खावे तुझ्या आगमनासाठी गुळ, चिंच,
मटण, अंडी, आंबे, पपई थोडक्यात काय तर गोड, तिखट, आंबट, गरम असे किती-किती नाना तऱ्हेचे
घरगुती उपाय आणि तेही नाही झाले तरी अवेळी येणाऱ्या तुला पुढे ढकलायला औषधी उपाय. किती
ग खट्याळपणा करतेस तू....?,!
एखाद्या अपेक्षित बाईला अचानकच दर्शन देतेस, तिच्या महिनाभराच्या
स्वप्नांवर पाणी फेरतेस.. किती ग दुःख देतेस तू..?,!
किती
ग खट्याळपणा करतेस बाई तू...?,! बाई चा जन्म नको-नको हे उच्चार तोंडातून
निघेपर्यंत छळतेस तू....!
किती ग खट्याळ..?, बाई तू...!
राजश्री जगताप...!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा