मुख्य सामग्रीवर वगळा

दुखः.! आमच्या पिढीचे, दिवस बदलता येत नसल्याचे....


दुखः.! आमच्या पिढीचे, दिवस बदलता येत नसल्याचे....


                   “बदल हा अनिवार्य आहे”. तो केलाच पाहिजे बर्याचश्यां रूढ़ि परंपरा बदलत आहेत त्याचप्रमाणे ही सुद्धा बदलन तेवढच गरजेच आहे. म्हणून काय त्यावर हा पर्याय नाही "लग्न करू नका",  किती दिवस निसर्ग चक्र म्हणून हे सगळ चालवत यायच. किती दिवस हि आपली परंपरा किंवा संस्कृती आहे. हे जबरदस्तीन मनावर बिंबवत राहायचं, खरच किती स्त्रिया यात खुश आहेत..? 

          लग्ना च्या दिवसापासूनच मुलाने मुलीला घेऊन वेगळ राहिल पहिजे..... तस आई वडिलांनी खुद्द मुलाला परवानगी द्यावी. लग्ना आधीच हे सूचित करून ठेवाव. लांब राहून नाती तुटत नसतात, ती अजुन चांगली होतात. भांडण होण्याअगोदरच काळजी घेतली तर सगळेच खुश राहतील... आणि एकत्र रहाणे हि संकल्पना खरोखरच किती दिवस फलास येते तीन वर्षे? पाच वर्षे? की दहा वर्षे? शेवटी भांडणांचा कल्लोळच... रुसवे-फुगवे, हेवे-दावे, टोमणे-टाममे, शिवीगाळ, रोजच्या रोज भांडण हे सगळ होईपर्यंत एकत्र राहण्याची हौस असते. शेवटी कंटाळून, मुलाच्या हात जोडत... “जा  बाबा वेगळे रहा” हे म्हंटल जात. त्यापेक्षा हे पाउल उचलण्याची योग्य वेळ आई-वडिलांना ठाऊक असली पाहिजे. वेळो वेळी सूखा-दुःखात एन-जान ठेवून पालकांच्या गरजा पूर्ण करत रहाव. त्यांची काळजीही घ्यावी. रोजच्या रोज चौकशीही करावी,.... येथे “संसार” रेखा आणि राज बब्बर यांच्या हिंदी सिनेमाच उदाहरण मला द्यावस वाटत. बायको घर फोडते, आई वडिलांना मुळापासून वेगळ करते ह्या दृष्टीकोनातून पाहत राहील तर सगळ्याच बायका वाईट ठरतील. आणि चांगले बदल हे कधीहि होणार नसून चांगल्या क्षणांना देखील सगळे मुकणार त्यापेक्षा सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर सुखाचे वारे योग्य दिशेने वाहतील. आणि खरोखरच हि गोष्ट ज्या पुरुषांनी स्वीकारली आहे त्यांना सुखी संसाराचे गूढ नक्कीच कळाले आहे.

          आम्ही मूली जे करतो तसच मुलांनी ही कराव.... “ज्या आई वडिलांना फ़क्त एकच मुलगी असते, ते काय करतात हो???? हा प्रश्न पडत नाही का कधी” कुणाला????......

दुःख आहे आमच्या पिढीचे दिवस बदलता येत नसल्याचे

       
Image from- लेक माहेरचा कट्टा (fb-page)
  
ज्या मुली विदेशात आहेत
, काही मुली नौकरी करू शकत नाही. आपल्या आई वडिलांच्या सुखा-दुःखात सामील होता येत नाही, त्यांच्या वाईट वेळेत त्यांना साथ देता येत नाही, काही मदत हवी असल्यास ती करता येत नाही. त्यांनी काय कराव...???? पालकांना सोडण्याची परंपरा चालवत रहावी.. नाही का...?????  आणि स्त्रियांनी देखील “अगsss ती आपली परंपरा च आहे ना” अस म्हणत तेच रेटत बसाव. सगळ्यात मोट्ठ दुःख तर हेच, की बाईच बाईला साथ देत नाहीए..... उगाच सहन शक्ती वाढून काही उपयोग होतो का..? पाठीमागून म्हणा, चारचौघात बोलतांना म्हणा, किंवा एक प्रकारची पक्की झालेली मानसिकता म्हणा हि खरच किती चांगली आहे..?

         वर्षातून एकदा माहेरी जायच त्यातूनही सासरी गेलच पाहिजे, राहिलच पाहिजे हा हट्ट.. अरेsss बाबा.... वर्षभर तुझ्यासोबतच तर असते, म्हणजे सासरीच असते.. तू स्वतः किती तास बायकोच्या घरी राहू शकतो. वर्षातून बायको एकदा माहेरी गेली तर तिच्या बरोबर एक रात्र राहिला नाही कुठे, तर सकाळी नऊ वाजल्या पासूनच फोन वर फोन कधी येतोय..? आई शप्पत.......................
        मग का मुलींनीच हि गोष्ट स्वीकारत राहावी??    

        काही मुलींचा संसार याही परिस्थिती असेलही सुखात, कारण त्यांचे सासरचे माणस आणि त्या देखील खूपच समजदार असतील. पण सर्वांनाच सगळ काही जमत नसत. म्हणून कुणी वाईट आहे असा अर्थ मुळीच लागत नाही.

टीप:. हा लेख आवडला नसल्यास वाईट किंवा चुकीच्या Comments देऊ नये. हा लेख त्याच स्त्रीयांसाठी आहे ज्यांना आयुष्यात अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. आणि यामध्ये काही बदल व्हावा अस ज्यांना वाटत त्यांच्यासाठी.

                               



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...