दुखः.! आमच्या
पिढीचे, दिवस बदलता येत नसल्याचे....
“बदल हा अनिवार्य
आहे”. तो केलाच पाहिजे बर्याचश्यां रूढ़ि परंपरा बदलत आहेत त्याचप्रमाणे ही सुद्धा
बदलन तेवढच गरजेच आहे. म्हणून काय त्यावर हा पर्याय नाही "लग्न करू नका", किती दिवस निसर्ग चक्र म्हणून हे सगळ चालवत यायच. किती दिवस हि आपली परंपरा
किंवा संस्कृती आहे. हे जबरदस्तीन मनावर बिंबवत राहायचं, खरच किती स्त्रिया यात खुश आहेत..?
लग्ना च्या दिवसापासूनच मुलाने मुलीला घेऊन
वेगळ राहिल पहिजे..... तस आई वडिलांनी खुद्द मुलाला परवानगी द्यावी. लग्ना आधीच हे
सूचित करून ठेवाव. लांब राहून नाती तुटत नसतात, ती अजुन चांगली होतात. भांडण होण्याअगोदरच काळजी घेतली तर सगळेच खुश
राहतील... आणि एकत्र रहाणे हि संकल्पना खरोखरच किती दिवस फलास येते तीन वर्षे? पाच
वर्षे? की दहा वर्षे? शेवटी भांडणांचा कल्लोळच... रुसवे-फुगवे, हेवे-दावे, टोमणे-टाममे,
शिवीगाळ, रोजच्या रोज भांडण हे सगळ होईपर्यंत एकत्र राहण्याची हौस असते. शेवटी
कंटाळून, मुलाच्या हात जोडत... “जा बाबा
वेगळे रहा” हे म्हंटल जात. त्यापेक्षा हे पाउल उचलण्याची योग्य वेळ आई-वडिलांना
ठाऊक असली पाहिजे. वेळो वेळी सूखा-दुःखात एन-जान ठेवून पालकांच्या गरजा पूर्ण करत
रहाव. त्यांची काळजीही घ्यावी. रोजच्या रोज चौकशीही करावी,.... येथे “संसार” रेखा आणि राज बब्बर यांच्या हिंदी सिनेमाच उदाहरण मला द्यावस वाटत. बायको घर फोडते, आई वडिलांना
मुळापासून वेगळ करते ह्या दृष्टीकोनातून पाहत राहील तर सगळ्याच बायका वाईट ठरतील. आणि
चांगले बदल हे कधीहि होणार नसून चांगल्या क्षणांना देखील सगळे मुकणार त्यापेक्षा
सकारात्मक दृष्टीकोनातून विचार केला तर सुखाचे वारे योग्य दिशेने वाहतील. आणि खरोखरच
हि गोष्ट ज्या पुरुषांनी स्वीकारली आहे त्यांना सुखी संसाराचे गूढ नक्कीच कळाले
आहे.
आम्ही मूली जे करतो तसच मुलांनी ही
कराव.... “ज्या आई वडिलांना फ़क्त एकच मुलगी असते, ते काय करतात हो???? हा प्रश्न पडत नाही
का कधी” कुणाला????......
दुःख आहे आमच्या पिढीचे दिवस बदलता येत नसल्याचे
ज्या मुली विदेशात आहेत, काही मुली नौकरी करू शकत नाही. आपल्या आई वडिलांच्या सुखा-दुःखात
सामील होता येत नाही, त्यांच्या वाईट वेळेत त्यांना साथ देता येत नाही, काही मदत
हवी असल्यास ती करता येत नाही. त्यांनी काय कराव...???? पालकांना सोडण्याची परंपरा
चालवत रहावी.. नाही का...????? आणि स्त्रियांनी देखील “अगsss ती
आपली परंपरा च आहे ना” अस म्हणत तेच रेटत बसाव. सगळ्यात मोट्ठ दुःख
तर हेच, की बाईच बाईला साथ देत नाहीए..... उगाच सहन शक्ती
वाढून काही उपयोग होतो का..? पाठीमागून म्हणा, चारचौघात बोलतांना म्हणा, किंवा एक
प्रकारची पक्की झालेली मानसिकता म्हणा हि खरच किती चांगली आहे..?
दुःख आहे आमच्या पिढीचे दिवस बदलता येत नसल्याचे
![]() |
Image from- लेक माहेरचा कट्टा (fb-page) |
वर्षातून एकदा माहेरी जायच त्यातूनही
सासरी गेलच पाहिजे, राहिलच पाहिजे हा हट्ट.. अरेsss बाबा.... वर्षभर तुझ्यासोबतच तर
असते, म्हणजे सासरीच असते.. तू स्वतः किती तास बायकोच्या घरी राहू शकतो. वर्षातून बायको
एकदा माहेरी गेली तर तिच्या बरोबर एक रात्र राहिला नाही कुठे, तर सकाळी नऊ वाजल्या
पासूनच फोन वर फोन कधी येतोय..? आई शप्पत.......................
मग का मुलींनीच हि गोष्ट स्वीकारत राहावी??
काही मुलींचा संसार याही परिस्थिती
असेलही सुखात, कारण त्यांचे सासरचे माणस आणि त्या देखील खूपच समजदार असतील. पण
सर्वांनाच सगळ काही जमत नसत. म्हणून कुणी वाईट आहे असा अर्थ मुळीच लागत नाही.
टीप:. हा लेख आवडला नसल्यास
वाईट किंवा चुकीच्या Comments देऊ नये. हा लेख त्याच स्त्रीयांसाठी आहे ज्यांना
आयुष्यात अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे. आणि यामध्ये काही बदल व्हावा अस
ज्यांना वाटत त्यांच्यासाठी.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा