मुख्य सामग्रीवर वगळा

पंचवटी Express....!


पंचवटी Express....!


      मी College च्या Second last year ला असतांना पप्पांची बदली मुंबई हून बुलढाणा इथे झाली. मुळचे नाशिककर असल्यामुळे नाशिक मध्ये स्थाईक होण्याच ठरलं आणि पप्पा एकटे नौकरी ठिकाणी. मे च्या सुट्यांमध्ये नाशिकला Shift झालो. मी College मधून माझे L.C. वगरे सर्व कागदपत्र काढून घेतले. आणि Last year साठी नाशिक च्या एक दोन Collage मध्ये Admission साठी गेले. तर तिथे कळाल कि S.Y. ज्या College मध्ये केले तिथेच T.Y. करावे. कारण S.N.D.T. College ला स्वतंत्र University असल्यामुळे तेथील Addmission होण कठीण आहे. आ..आ... मला तर ऐकून Shock लागला. त्यावर पर्याय विचारले तर, ते म्हणाले एक तर S.Y. ला पुन्हा Admission घ्या नाहीतर T.Y. ला ३५ टक्यांनी पास चा Result घ्या. मला एक वर्ष वाया घालवन पटल नाही, आणि ३५ टक्केही नको होते. कारण S.Y. चा Result First Class मध्ये लागलेला होता. भयंकर चिडचिड, घरात भांडण,.. घरच्यांचं म्हणन होत कि, त्यातलच काहीतरी मी Adjust कराव. माझ्या बुद्धीला ते अजिबात पटत नव्हत. आणि निर्णय थोडक्यात घेण गरजेच होत. कारण Admission च्या Dates संपत आल्या होत्या. त्याच रात्री निर्णय घेतला, चलो मुंबई Return....

       नाशिक ते मुंबई सकाळी पंचवटी Express पकडली. जुलै महिना उजाडला असल्यामुळे मुंबई चर्चगेट S.N.D.T. ला सुद्धा सरांनी Request Basis वर कसं तरी Admission करून दिल. आता कॉलेजच्याच होस्टेल मध्ये Inquiry ला गेले तर ते Full झालेलं. मग काय पुन्हा संध्याकाळची पंचवटी पकडली मुंबई ते नाशिक Return, Train मध्ये असतांना विचारांचं काहूर माजलं, काय कराव..? काही सुचत नव्हत. मधेच चांगलीच Tube पेटली. अरे ज्या गाडीने एका दिवसात काम करून निघालो तीच गाडी रोज ने आण करेल ना...? काय हरकत आहे. आठ तास प्रवास करायचा. आणि तस पण पंचवटी Express हि सकाळी ६ ते ११ या वेळेत Daily किंवा Weekly Up-Down करणार्यांसाठीच Famous आहे, कारण ती मनमाड ते नाशिक अगदी Offices च्या वेळेवर कर्मचार्यांना पोहचवते. आणि रात्री सुद्धा ६ ते ११ पर्यंत घरी पोहचवते, ठरलं तर मग.... पंचवटी Done...!

       सुरु झालं Routing त्यात Hostels ची चौकशी तशी चालूच होती. दररोज येवढा प्रवास करून अभ्यास कारण शक्य नव्हत. मग मी Ultarnat days college करायचं ठरवल. पंचवटी Train मध्ये दोन Ladies Compartmaint होते. एक Pass आणि एक General पण त्या Pass च्या डब्यात जुन्या Regullar महिलांनी आपली सत्ता चांगलीच ठोठऊन ठेवलेली होती, बऱ्याच पास असणार्या महिलांनी Complents वगैरे केलेल्या पण काही असर होत नव्हता. त्या इतर महिलांना डब्यात घुसुच देत नसत. Pass असणार्या महिलांना देखील General Ladies Compartmaint मध्ये बसाव लागत असे. अस कस-बस सप्टेंबर महिन्या पर्यंत केल. पण त्यादरम्यान (२००९ मध्ये) Swine Flu ची साथ आली होती. त्यात मी तापाने फणफणली सर्वांना वाटल Swine Flu च झाला. मग काय पुन्हा घरच्यांची बडबड ऐकावी लागली. पण नशीब तस काही नव्हत तापच होता. लवकरात लवकर Recover होऊन College Join केल, आणि त्याच दिवशी डब्यात एका मावशींनी सोबत ओळख झाली. त्या School Teacher होत्या. आणि नाशिक मुंबई Weekly Up-Down करत असायच्या. अशा बऱ्याच महिलांची माझी ओळख झालेली होती. पण ह्या मावशींनी माझी छान मदत केली. त्या डोंबिवलीला Hostel मध्ये राहत होत्या, त्यांनी सर्व Details दिले. आणि मी दोन-तीन दिवसात त्याच Hostel मध्ये मी राहायला सुरवात केली.

       डोंबिवली ते चर्चगेट हा प्रवास दोनच दिवस केला. नको वाटला, कारण माझ Sandwich होऊ लागल. त्या Sandwich होण्याच्या क्षणातच पंचवटी Express आठवली. आणि तिसऱ्या दिवसापासून एक Station मागे म्हणजे डोंबिवली ते कल्याण येऊन पंचवटी Express पकडायची, तीच्याने मी अकरापर्यंत Collage मध्ये असायची १२.३० च College असल्यमुळे मस्त Nashta हि होऊ लागला आणि थोडा अभ्यासही वाढला. Library त खूप छान वेळ जाऊ लागला. जानेवारी पर्यंत डोंबिवली ते VT Up-Down केल मग college च्या Hostel मध्ये दोन महिन्यांसाठी Guest Student म्हणून Admission मिळवलं. दोन महिने सुखाने अभ्यास केला Hostel वर जेवणही छान मिळाल. २८ मार्च ला परीक्षा संपली ३१ मार्च ला घरी जायचं ठरवलं.

      पण दोन दिवसात एक कामं केल एका Seven-S नावाच्या Agency मध्ये Interview दिली Banking Sector ला. आणि आश्चर्याची गोष्ट अशी कि Second day पासून Joining सांगितलं, मी म्हंटल उद्याचा एक दिवस द्या मी परवापासून Join करते. Ok, No Problem...! That’s it त्यादिवशी घरी नाशिक ला गेले Packing केली आणि तिसऱ्या दिवशी नाशिक ते मुंबई कामावर हजर. जुन्या राहत्या ठिकाणी शेजारील मामींकडे ८ दिवस राहिले. आणि त्या आठ दिवसात पुन्हा डोंबिवलीच्या Hostel ला Admission घेतलं आणि असे तीन महिने काढले, त्या तीन महिन्यात चर्चगेटला V.T. पासून जवळ राहत ठिकाण शोधन चालू होत. त्यानंतर Elphinstone Road ला एकाठिकाणी P.G. म्हणून तीन महिने राहिले, पण मला ते काही येवढ आवडत नव्हत. यातही मी Mumbai Central ला होस्टेल मिळवलं आणि Finally तिथून Weekly Up-Down मुंबई ते नाशिक केल पंचवटी Express जिंदाबाद......!

      तर आज हा सगळा प्रसंग, संपूर्ण प्रवास आठवला तो या निमित्ताने कि पंचवटी Express ला “आदर्श Express” बनविणारे “रेल्वे परिषद अध्यक्ष बिपीन गांधी” यांना बुधवारी (दि. १०) सकाळी सव्वासातच्या सुमारास नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर गाडीला हिरवा झेंडा दाखविण्यापूर्वीच प्लॅटफार्मवर हृदयविकाराने त्यांचे निधन झाले. तब्बल २६ वर्षे त्यांनी प्रवाशांना सोईस्कर सुख सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न केले. त्यात ते यशश्वी झाले पण अखेर ते स्वतः पंचवटीच नाव हे आदर्श Express करून तिच्या आगमनाचा पहिला दिवस पाहू शकले नाही, कारण ती येण्याआधीच पाच मिनिटे अगोदर हृदय विकाराने त्यांचे प्राण ज्योत हि फलाटावरून सुटली ती अनंत प्रवासासाठी..... हे स्वप्न पूर्ण तर झाले.... पण बिपीन गांधी हरपले.......!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...