जपानीज सरकार...!
काही दिवसांपूर्वी जपान बद्दल
एक बातमी सगळ्याच वृतपत्रांमध्ये तसेच Social Sites वर लेखाच्या रूपाने प्रसारित
झालेली होती. “होकैदो” हे जपान मधील एक शहर आहे. तेथील “क्युशिराताकी”
या गावात एक ट्रेन थांबत नव्हती. एका मुलीच्या वडिलांनी जपान सरकारला पत्र लिहून
विनंती केली. तिच्या शाळेसाठी जपान सरकार ने या पत्रा विषयी तत्पर नोंद घेऊन त्या
स्थानकावर ट्रेन थांबविण्याचा निर्णय घेतला. आणि बरीच वर्षे त्या मुलीच्या
शिक्षणासाठी हि ट्रेन थांबण्यास परवानगी जपान सरकारने ने दिली. एका व्यक्तीच्या
शिक्षणसाठी जे सरकार निर्णय घेऊ शकत अशा देशातील नागरिकही त्या देशासाठी काहीही
करण्यास तत्पर असतात. नागरीकांमध्ये देशा बद्दल चा अभिमान वाढवण्याचे काम हे त्या-त्या
देशाचे सरकारच करत असते.
तसाच अनुभव मला ह्या शुक्रवारी आला. आपणाला
सर्वच गोष्टी माहित असतात, पण जेव्ह्या त्या स्व:नुभवल्या जातात तेव्हाच त्यावरचा
विश्वास हा अटळ बनतो. मी रोजच्याच वेळेत “नौरीन गीगास्तु” या बस स्थानकावर
पोहचले. तिथून कंपनी ची कॅब पिक-अप करत असते. पण आज तिथे कॅब नव्हती. मी पाच एक
मिनिटांत कंपनी ला कळवल, तर त्यांनी विचारल तुला घरी जाण्यास किती वेळ लागेल?
म्हंटल ४५ मिनिटे, तर अवघ्या १५ मिनिटांत कंपनीने Taxi ची व्यवस्था केली. कारण
कंपनीची गाडी हि ठरलेल्या वेळेतच असते. केवळ माझ्या एकटीसाठी गाडी पाठवल्यामुळे
मला जपानीज लोकांच्या कृतज्ञ ते बद्दल फारच कौतुक वाटल. आणि चटकन त्या “होकैदो”
मधील मुलीची आठवण झाली. आणखी एक अप्रूप म्हणजे त्यांनी मला एकदाही उलट प्रश्न केला
नाही, किंवा कामावर हजर होण्यास मनाई केली नाही. कारण “किनुगवाया Factory”
हि “नौरीन गीगास्तु” या बस स्थानकापासून ४०,४५ मिनिटांवर आहे. आणि तेथे
वाहतूक हि फक्त स्वतःच्या गाडीनेच नेच केली जाते. Taxi परवडत नाही.
पण Factory मध्ये पोहचे पर्यंत माझ्या
मनात टिकटिक चालू होती. जपानीज लोक खूप काळजी पूर्वक वागतात. आपल्यामुळे कुणाच
नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन चालतात. आमचा वाहन चालक कधीही सर्वाना
घेतल्या शिवाय तिथून निघत नाही. कुणी वेळेत पोहचल नाही तरी वाट बघतो. कंपनी ला कळवतो.
मग रवाना होतो, मग आज अस कसं झाल असाव बरं...?
९.३० ला काम सुरु केले. अर्धा तास
उशिरा. थोड्यावेळानंतर मैत्रीणीसोबत बोलताबोलता कळाले कि आजच्या ९ वाजताच्या लिस्ट
मध्ये माझ नाव नव्हतच, ते ८ वाजताच्या लिस्ट मध्ये होत. अर्थात तो वाहन चालक वाट
पाहून नीघुन गेला असावा. म्हणजेच आमच्या वाहन चालकाची काही चूक नव्हती. असोत, चूक
कुणाचीही असो पण याला महत्व न देता, कामगाराचे नुकसान होऊ नये यावर जास्त भर
कंपनीच्या लीडर ने दिला.
म्हणूनच आज थोडी खंत वाटते, आपल्या देशातील
सरकार किंवा नौकरीतील वरिष्ठ हे कामगारांबद्दल अति दक्ष केव्हा होतील...? जपान
मध्ये राहून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळत आहे. अशा प्रकारचे बदल आपल्या देशात घडावे,
यासाठी स्वतःला सक्षम कार्यरत बनवण्याचे प्रयत्न करण्याची उम्मेद वाढते आहे....!

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा