मुख्य सामग्रीवर वगळा

लेखन....!


लेखन....!

           आपण लिहिलेली कविता, लेख, कथा, कादंबरी हे नेहमीच वाचकांपर्यंत पोहोचावे अशी अपेक्षा लेखक मनोमनी ठेवत असतो. पूर्वी पुस्तकांच्या किती प्रती विकल्या गेल्या?, आपल्या लेखनास किती मागणी बाजारपेठेत आहे? यावरून आपले लिखाण कितपत लोकांना आवडले हे ठरवले जात असावे,,, परंतु आत्ताच्या युगात मात्र Social Sites ने पूर्ण जग कायापालट करून ठेवले आहे. कुठल्याही सोशल साईट वर लिखाण पोस्ट केल कि, ते कितीवेळा लेखकाकडून ते चेक केल जात याचा काही नेम नाही. किती लाईक्स आले, किती कमेंट्स आल्या, कुणी शेअर केलंय याच्या हिशोबावरून ठरवलं जात आपल लिखाण कुठपर्यंत आणि कस पोहचलेल आहे. कधी-कधी खूप छान अशा लेखनालाही फारसा असा वाव मिळत नाही. हेही ते आलेले लाईक्सच ठरवतात बरं... आणि त्यावरून पुढील लिखाण लिहिण्यास हिरमोड झालेला असतो. किंवा खूप प्रोत्साहन मिळालेलं असत...

          पण बहुतेक वेळेस मी अस नोटीस केलय या सगळ्या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या आहेत. बरेच लोक सोशल साईट वर काहीहि पोस्ट करत असतात काहीहि म्हणजे अगदी काही..ही.... फालतू जोक, पांचट काहीतरी फोटो, अगदी मनात येईल ते काही मोघमपणे लिहिलेलं असत, त्याला फारसा काही अर्थ देखील नसतो. कविता तर अशा भयंकर करतील, उगाच काहीतरी शब्दांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न मग त्यात यमक जुळो अथवा न जुळो.. काहीतरी मोठे-मोठे शब्द टाकण्याचा प्रयत्न करतील आणि त्या असल्या फाजील लेखनावर देखील हजारो मध्ये लाईकचा आकडा असतो. आ..आ...हा.... भाऊ खुशचना मग.. काय त्याचा तोरा,, फोटो तर अशे वंगाळ टाकतील पण कमेंट्स काय भारी-भारी येतील राव काही विचारताच सोय नाही.

          एकदा मी ललित लेखना बद्दल इंटरनेट वर सर्च करत होते “ललित लेखन म्हणजे नक्की काय”? तर त्यावर मी हि कमेंट वाचली
“तुम्ही सगळी मंडळी खुप अभ्यासु आहात आणि म्ला माहिती आहे की तुम्ही मला मदत करु शकता पण एक्मेकांना शिव्या द्यायला, भांडायला तुम्हाला जमतं, पण 'ललित गद्य म्हणजे काय' ह्या माझ्या प्रश्नावर काहिच रीप्लाय नाहीत. Sad
लाजुन पादणे अन ह्या भिकार कवितेवर ५६ प्रतिसाद देता आणि मला खरच मराठी साहित्याची माहिती हवी तर रीप्लाय जवळ्जवळ शुन्य.. Sad बहुतेक हा विषय गरमागरम नाही आणि भांडणाची खुमखुमी मिटवणारा नाही म्हणुन का  Angry....  
ह्या कमेंट मधून अगदी वाईट अशी परीस्थिती दिसते, मला यातून हेच सिद्ध करायचं आहे कि खरोखरच लोकांची मानसिकता किती थोटकी आहे... खरच चांगल्या प्रश्नांना उत्तर लोकांकडे नसतातच मुळी....

          तर सांगायचा उद्देश असा कि असे Blind Followers असणे म्हणजे लोकांना खूपच Famous झाल्यासारखं Feel करतात भाई...,,,,, हमारे जैसा कोई नही...

           पण खर पाहता चांगल्या गोष्टी लोकांना सहजासहजी आवडत नसतात. सोशल साईट्स वापरणारे काही लोक एवढ्या भयंकर मनोरुत्तीचे असतात कि बस्सस.. सगळे अपडेट त्यांच्याकडे असतात हं सगळ्या पोस्ट ते बघत असतात. पण समोरच्या माणसाला अजिबात दाखवणार नाही कि कधी त्यांचे लाईक नसतात कधी काही शेअर करत नाहीत. “एकदम सुमडीत कोंबडी” असतात. हो पण मात्र Friend Request न विसरता अगदी एखाद्या माणसाला शोधून शोधून पाठवतील. चाळीस फोटो एका अल्बम मध्ये असतील तर मध्येच एखाद्या फोटो ला यांच लाईक असत. कुठतरी ते माती खातात, अंन त्याचा पुरावा देखील सोडून जातात. मी म्हणते ते तरी कशाला करायचं..? कुणीतरी मध्येच एखाद लाईक करत अंन परत थोड्या वेळाने त्या लाईक वर क्लिक करत, म्हणजे ते अन्लाईक केल अस त्यांना वाटत पण त्याचदेखील नोटिफिकेशन ते सोडून जातात हे त्यांना माहित नसत. एखादा फोटोंचा चा अल्बम असतो त्यात आमचे आणि त्यांचे असे काही मित्र मैत्रिणी कॉमन असेल तर त्या अल्बम मध्ये जाऊन त्या कॉमन मित्र मैत्रिणींचे फोटो ते लाईक करतील पण आपण जो अल्बम शेअर केलाय तो ते चुकून देखील लाईक करणार नाहीत. हाहाहः.... मला तर भारी गम्मत वाटते अशा लोकांची.

           मी बरचस लिखाण पोस्ट केल मला त्यावेळेस अस जाणवल लाईक वगैरे मिळवण हा काही आपला उद्देश नाही, हो पण ते कुणी वाचलंय? कुणाला कितपत आवडलय हे हि कळणे गरजेचे आहे ना..? लाईक वगैरे नाही आले तरी, आपल्या लिखाणावर चर्चा व्हावी कुणीतरी त्यातील भाव ओळखावा, आपल्या व्यक्त
केलेल्या भावनांना एक व्यासपीठ मिळाव. हि अपेक्षा देखील काही चुकीची नाही ना...?? पण ते जरी झाले नाही तर, ते का झाले नाही. याचे उत्तर खूपच छान पद्धतीने मला मिळाले. त्यासाठी मी माझे लिखाण काही Closed Group काही Facebook वरील pages वर शेअर करू लागले. आणि तेथे खरच खुप छान व्यासपीठ माझ्या लेखनाला मिळाले. आणि तेवढेच नाही तर खूप छान-छान मैत्रिणी देखील मिळत आहेत. त्यावर खूप चर्चा देखील केली जातेय. आम्ही त्वरित फेसबुक फ्रेंड्स होत आहोत, मेसेज फोन चालू झाले, खूपच छान अशी माणस जोडली जात आहेत.

त्या दिवशी माझा एक लेख “लग्नातील शालू” हा मी एका ग्रुप वर पोस्ट करून काही चार-पाच दिवस झाले असतील, त्यावर एका मुलीने तोच लेख कॉपी पेस्ट करून त्याच ग्रुप वर शेअर केला. आणि लेखातील फक्त नाव मात्र आठवणीने एडीट केलेले, बाकी लेख अगदी जसा आहे तसाच हं.., धन्य....हो बाई तुमचे... पण मला मैत्रीचा गोतावळा इतका छान मिळाला आहे कि त्या सगळ्याच जनी त्या पोस्ट वर जणू काही अशा पद्धतीने तुटून पडल्या कि विचारता सोय नाही. “हा लेख राजश्री जगताप हिचा आहे, तुम्ही नावाशिवाय कुणाचेही लिखाण कसे शेअर करू शकता?, त्यात त्यांच्या भावना असतात, ते क्षण त्यांनी जगलेले असते, यावर लेखन चोरी म्हणजेच Plagiarism ची action घेतली जाऊ शकते. त्या सर्व कमेंट्स मला tag केल्या गेल्या वगैरे वगैरे... अर्थात त्या मुलीची चूक माझ्यासाठी एक प्रोत्साहन ठरली कारण माझा तो लेख मुलींनी इतल्या प्रेमाने वाचलेला होता कि त्यांच्या त्वरित लक्षात आले कि हा “राजश्री जगताप” हिचा लेख आहे.. माझ्या साठी हि एक Great Acchivement ठरली.  

           आभारी आहे त्या सर्वच मैत्रिणींची ज्यांनी माझ लिखाण वाढण्यासाठी मला प्रोत्साहन दिले. या गोष्टीच आता मात्र मला कौतुक वाटू लागल कि आपले Blind follower वगैरे नाहीत हाहाहः... जे आहेत ते लेखन वाचून, भावना समजून, त्याला मार्मिक असा अर्थ देवून. आपल्यासोबत चर्चा करतात. खूपच आनंददाई क्षण वाटतो. आणि मित्र परिवार वाढल्याचे सुखही वाटते.   

           एवढ सगळ सांगायचा एकच उद्देश कि ह्या सगळ्या फसव्या जगाच्या वागणुकीने आपल्या लिखाणावर किंवा नवीन काही क्रीएटीव्ह गोष्टींवर फारसा फरक न पाडता आपले कर्म चालू ठेवावे.

राजश्री जगताप....      


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...