पुरणपोळ्यांचा घाट.....!
मला
माझ्या स्वतःवर भारीच आत्मविश्वास अगदी लहानपणापासून धडाडीची कार्यकर्ता म्हंटल
तरी चालेल. मी कोणतही काम हाती घेतांना फारसा त्याच्या परिणामांचा विचार करत नाही. माझ्या मते आपल्यात धमक असावी जे काम हाती घेतलय
ते उत्तम प्रतीने पार पाडता यावे. त्यासाठी लागेल त्या पद्धतीने झगडता आल पाहिजे. प्रत्तेक
गोष्ट कृतीत केल्याशिवाय तिच्यातील उणीवा आपल्या लक्षात येत नाही, काही न करता हे
जमणार नाही-ते जमणार नाही याची बोंब ठोकणे मला अजिबात पटत
नाही. अवघड गोष्टींना प्रयत्न हि खडतर मार्गावरूनच असतात.
साधी स्वयंपाक घरातली गोष्ट बघाना.., पोळ्या शिकायला किती दिवस लागतात..? तरी सुद्धा
स्त्रिया शिकतात आणि काही दिवसानंतर तो त्यांच्या डाव्या-हाताचा खेळ होऊन जातो. मी
तर खूप शिव्या खाल्ल्या राव पोळ्या शिकायला, मला लहापणापासूनच पापड अगदी गोल-गोल
लाटता येत होता, पण पोळ्यांच काय असत..ना... फक्त आकार देऊन चालत नाही. त्यांच पीठ
कस मळलय, उंडा कसा बनवलाय, तो हि वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्यात चौघडी उंड्याच्या
पोळ्या छानच मऊ लुसलुशीत होतात चौघडीला आतून तेल लावल्यावर फुगतातही छान, पोळी कोणत्या
बाजूने केव्हा लाटावी, तव्यावर टाकतांना कोणत्या बाजूने टाकावी लाटलेल्या कि पोळपाटाच्या?
भाजतांना आच कशी असावी कमी-जास्त ब्ला..ब्ला....ब्ला.... हुशश्श्शश्श्श एवढ करून देखील
पोळी कडक, वात्तड, जळालेली, तेलकट वाकडी-तिकडी बापरे काय-काय सांगू आता,? कशी-कशी
बनू शकते याचा अंदाज पुरुषांना देखील चांगल्याच प्रकारे लावता येऊ शकतो. हाहाहाहः....

मम्मी तू खूप Cute
येसस्स्स्गअंअंअं... bye... संध्याकाळी मी पोळ्या बनवते हं.... कसली संध्याकाळी
उगवते. न सकाळ उगवते. मला येत होत्या पोळ्या बर नाटक करत होते...हाहाहः....
लग्न ठरलं नवरा विदेशात असल्यामुळे
त्याला पोळ्या हा प्रकार दोन-तीन महिन्यातून एकदाच बनवता येत असे त्याही कडक,
वात्तड, जळालेल्या.. पण त्याला हे जेव्हा कळाल कि मी खूपच छान स्वयंपाक करते. फारच
खुश झाला. त्याने सगळ्याच मित्रांना लग्नाबद्दल सांगितलं सगळेच खुश झाले. अरेव्वा सर्वांनीच
फार्माईश आधीच सांगितली होती, भाभी आने के बाद पुरणपोली चाहिये भाई... सगळेच नॉन-महाराष्ट्रीयन.
सगळे येत जाता याला तेच म्हणत, हमारी फार्माईश मत भुलना भाई.. कोणाच काय आणि कोणाच
काय...?

तोपर्यंत बघतेय तर ‘डाळीतल पाणी काही आटेना,
काय झाल काही समजेना’. मम्मीला फोन केला अग हे काय झालय..? व्हीडीओ कॉल केला ती
म्हणाली अग गुळ जास्त झालाय किती प्रमाण घातलस दोन्ही सारखच, अगं बाई माझे...! अर्धा
किलो डाळीला पाव किलो गुळाच प्रमाण घालायचं असत. मग आता काय....? दुसरी डाळ घाल
पुन्हा, नको मी ह्याच डाळीत वाढवते. नाही जमणार..! नवीन डाळ घे.. मग नवऱ्याने
सोपस्कार घेतला आणि स्वतः मोजून-मापून डाळ गुळ घेतला आणि पुरणही स्वतःच बनवून
दिले. तोपर्यंत मी तिखट सार बनवला कारण तो डाळीच्या पाण्यातूनच बनवला जातो. मी तर
थकून गेले होते, कामाने नाही तर, डाळीची अवस्था पाहून.. ईईई... ए क्या होगया है
मेरे साथ...? Don’t worry मै हु ना...! हो बाबा कर तूच आता. तसच सोडलं आणि मी गेले
फ्रेश होण्यासाठी. नटने-थटने पण तेव्हढच गरजेच असत ना, नाही का..? पण तयारी करताना
माझ्या सगळ लक्षात आल कि आपल्याला पुरणपोळ्या येतात ह्या आत्मविश्वासात आपण होतो, “”पण
आपल्याला फक्त आयत पुरण बनवून दिलेल्या पुरणाच्या पोळ्या लाटता येतात””, पूरण
बनवता येत नाहीईईईइ...! समजल का...आआ? एवढे दिवस आपण फक्त डोळ्याने बघत होतो आणि
ते खूप सोप्प वाटत होत, पण त्यासाठी स्वतः कृती केली असती तर हि वेळ आली नसती. कधी-कधी
दृष्टीविश्वास माणसाला फसवू शकतो. आणि हिच फसवी नेत्र वेळेवर दगा देतात. अर्थात पुरणपोळ्यांचा
घाट मम्मी ने घातलेला असतांना आपण फक्त मध्ये-मध्ये लुडबुड करायचो तर....! ओह्ह्:..
ए बात है....!

मी काही एवढ्यावरच थांबले नाही काही
दिवसातच पुन्हा पुरण घातल आणि एकदम मोकळ सुटसुटीत पुरण भरगच्च पोळीने भरून पुरणपोळ्या
केल्या.... आता हा पुरणपोळ्यांचा घाट केव्हाही घालाता येतो अगदी आत्मविश्वासाने, दुसर
काही नाही, धडाडीची कार्यकर्ता शोभली पाहिजे ना....? म्हणून.....
राजश्री जगताप
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा