मुख्य सामग्रीवर वगळा

पुरणपोळ्यांचा घाट.....!


पुरणपोळ्यांचा घाट.....!

        
         मला माझ्या स्वतःवर भारीच आत्मविश्वास अगदी लहानपणापासून धडाडीची कार्यकर्ता म्हंटल तरी चालेल. मी कोणतही काम हाती घेतांना फारसा त्याच्या परिणामांचा विचार करत नाही. माझ्या मते आपल्यात धमक असावी जे काम हाती घेतलय ते उत्तम प्रतीने पार पाडता यावे. त्यासाठी लागेल त्या पद्धतीने झगडता आल पाहिजे. प्रत्तेक गोष्ट कृतीत केल्याशिवाय तिच्यातील उणीवा आपल्या लक्षात येत नाही, काही न करता हे जमणार नाही-ते जमणार नाही याची बोंब ठोकणे मला अजिबात पटत नाही. अवघड गोष्टींना प्रयत्न हि खडतर मार्गावरूनच असतात.

         साधी स्वयंपाक घरातली गोष्ट बघाना.., पोळ्या शिकायला किती दिवस लागतात..? तरी सुद्धा स्त्रिया शिकतात आणि काही दिवसानंतर तो त्यांच्या डाव्या-हाताचा खेळ होऊन जातो. मी तर खूप शिव्या खाल्ल्या राव पोळ्या शिकायला, मला लहापणापासूनच पापड अगदी गोल-गोल लाटता येत होता, पण पोळ्यांच काय असत..ना... फक्त आकार देऊन चालत नाही. त्यांच पीठ कस मळलय, उंडा कसा बनवलाय, तो हि वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्यात चौघडी उंड्याच्या पोळ्या छानच मऊ लुसलुशीत होतात चौघडीला आतून तेल लावल्यावर फुगतातही छान, पोळी कोणत्या बाजूने केव्हा लाटावी, तव्यावर टाकतांना कोणत्या बाजूने टाकावी लाटलेल्या कि पोळपाटाच्या? भाजतांना आच कशी असावी कमी-जास्त ब्ला..ब्ला....ब्ला.... हुशश्श्शश्श्श एवढ करून देखील पोळी कडक, वात्तड, जळालेली, तेलकट वाकडी-तिकडी बापरे काय-काय सांगू आता,? कशी-कशी बनू शकते याचा अंदाज पुरुषांना देखील चांगल्याच प्रकारे लावता येऊ शकतो. हाहाहाहः....

          माझी मम्मी फारच कडक शिस्तीची असल्यामुळे तिला स्वयंपाक अगदी सुरेख लागतो. आता मी तिला नेहमीच म्हणत असे “बाई तू सुगरण आहेस, म्हणून काय मीहि व्हावच का..?”  हो... तुही सुगरण झालीच पाहिजे..! खर तर प्रत्येक स्त्री ने सुगरण असाव.... आपल्या स्त्रीत्वाचा अभिमान म्हणजे “सुगरण” असणे. बाई मी काही हे काम करत बसणार नाही बाकीचा सगळा स्वयंपाक करेल पण पोळ्या नाही. हा....!!!! हो...अं..... नवऱ्याला भाज्या उकडवून दे फक्त खायला.. अग सोबत भात, ब्रेड, पाव अस काहीतरी देत जाईल ना...! आणि ते त्याला नको असेल तर, स्वतः बनवेल ना तो... हिहिहीईईइ...
मम्मी तू खूप Cute येसस्स्स्गअंअंअं... bye... संध्याकाळी मी पोळ्या बनवते हं.... कसली संध्याकाळी उगवते. न सकाळ उगवते. मला येत होत्या पोळ्या बर नाटक करत होते...हाहाहः....

         लग्न ठरलं नवरा विदेशात असल्यामुळे त्याला पोळ्या हा प्रकार दोन-तीन महिन्यातून एकदाच बनवता येत असे त्याही कडक, वात्तड, जळालेल्या.. पण त्याला हे जेव्हा कळाल कि मी खूपच छान स्वयंपाक करते. फारच खुश झाला. त्याने सगळ्याच मित्रांना लग्नाबद्दल सांगितलं सगळेच खुश झाले. अरेव्वा सर्वांनीच फार्माईश आधीच सांगितली होती, भाभी आने के बाद पुरणपोली चाहिये भाई... सगळेच नॉन-महाराष्ट्रीयन. सगळे येत जाता याला तेच म्हणत, हमारी फार्माईश मत भुलना भाई.. कोणाच काय आणि कोणाच काय...?

          आली बाई जपान ला लग्न करून, १३ मे २०१६ शनिवारी आलो आणि लगेच पुढच्या आठवड्यातच Marriage Party देऊ ठरवलं आणि त्यातच पुरणपोळ्यांचा घाट घालू म्हंटल तर ते हि खुश झाले, मस्त भारीच युक्ती आहे. आधल्या दिवशी सगळ साहित्य आणल. दुपारी २ ला स्वयंपाकाला सुरवात केली. विचार केला सगळ आधी बनवून घेऊ आणि मग पुरण घालू शक्यतो मम्मी सर्वात आधी पुरण घालते. पण माझ्याकडे भांड्यांची तारांबळ होती. मग त्या सोयीनुसार मी सुरुवात केली. भात, मिक्स व्हेज भाजी, गोड सार, चार प्रकारचे भजी, कुरडया पापड्या, शेंगदाण्याची चटणी-मिरचीचा खर्डा सगळ तयार झाले आता पुरण टाखूया आणि सगळे आले कि मग गरम-गरम पोळ्या बनवू.. तोपर्यंत दोन मैत्रिणी आलेल्या त्यातली एक पंजाबी तिला काही माहित नव्हत त्यामुळे तिची मदत प्रश्नच नाही. आणि एक बिहारी, जमेल ते लुडबुड करत होती. मग त्यांनी विचारल जेवण वाढणार कशात म्हंटल आहेत हि भांडी तर नको म्हणाल्या, तुला येवढा त्रास आधीच झालाय आणि भांड्यांचा नको मग माझा नवरा हि त्यांच्या सोबत गायब, गेले तिघे कागदी भांडी आणायला. तो पर्यंत मी पुरणाची डाळ घातली, आणि बाकीचा पसारा आवरला. हे तिघे आले आणि त्या दोघी पुन्हा तयारी करण्यासाठी घरी गेल्या.

         तोपर्यंत बघतेय तर ‘डाळीतल पाणी काही आटेना, काय झाल काही समजेना’. मम्मीला फोन केला अग हे काय झालय..? व्हीडीओ कॉल केला ती म्हणाली अग गुळ जास्त झालाय किती प्रमाण घातलस दोन्ही सारखच, अगं बाई माझे...! अर्धा किलो डाळीला पाव किलो गुळाच प्रमाण घालायचं असत. मग आता काय....? दुसरी डाळ घाल पुन्हा, नको मी ह्याच डाळीत वाढवते. नाही जमणार..! नवीन डाळ घे.. मग नवऱ्याने सोपस्कार घेतला आणि स्वतः मोजून-मापून डाळ गुळ घेतला आणि पुरणही स्वतःच बनवून दिले. तोपर्यंत मी तिखट सार बनवला कारण तो डाळीच्या पाण्यातूनच बनवला जातो. मी तर थकून गेले होते, कामाने नाही तर, डाळीची अवस्था पाहून.. ईईई... ए क्या होगया है मेरे साथ...? Don’t worry मै हु ना...! हो बाबा कर तूच आता. तसच सोडलं आणि मी गेले फ्रेश होण्यासाठी. नटने-थटने पण तेव्हढच गरजेच असत ना, नाही का..? पण तयारी करताना माझ्या सगळ लक्षात आल कि आपल्याला पुरणपोळ्या येतात ह्या आत्मविश्वासात आपण होतो, “”पण आपल्याला फक्त आयत पुरण बनवून दिलेल्या पुरणाच्या पोळ्या लाटता येतात””, पूरण बनवता येत नाहीईईईइ...! समजल का...आआ? एवढे दिवस आपण फक्त डोळ्याने बघत होतो आणि ते खूप सोप्प वाटत होत, पण त्यासाठी स्वतः कृती केली असती तर हि वेळ आली नसती. कधी-कधी दृष्टीविश्वास माणसाला फसवू शकतो. आणि हिच फसवी नेत्र वेळेवर दगा देतात. अर्थात पुरणपोळ्यांचा घाट मम्मी ने घातलेला असतांना आपण फक्त मध्ये-मध्ये लुडबुड करायचो तर....! ओह्ह्:.. ए बात है....!

         पण बाकीचा संपूर्ण स्वयंपाक हा अगदी सुरेख सुगरनीने बनवल्याप्रमाणे झालेला होता. पुरणपोळ्या हि मस्त काठोकाठ भरून लाटलेल्या होत्या, संपूर्ण पोळी टरकन फुगलेली अशी चमचमीत तूप लावलेली.. फक्त मला फ्लॉवर ची भाजी आवडत नाही, आणि मी मिक्स व्हेजज केलेले होते, तर त्यातील फ्लॉवर्स ठेचून शिजवलेली होती. पण माझा हा संपूर्ण स्वयंपाक सगळ्यांच्याच अगदी लक्षात राहिला आणि अजूनही सगळे मित्र मैत्रिणी आठवण काढून माझ्यावर हसतात, फ्लॉवर वरून चिडवतात. मिक्स व्हेज मै फ्लॉवर जरुरी होता है, वही गायब था...


         मी काही एवढ्यावरच थांबले नाही काही दिवसातच पुन्हा पुरण घातल आणि एकदम मोकळ सुटसुटीत पुरण भरगच्च पोळीने भरून पुरणपोळ्या केल्या.... आता हा पुरणपोळ्यांचा घाट केव्हाही घालाता येतो अगदी आत्मविश्वासाने, दुसर काही नाही, धडाडीची कार्यकर्ता शोभली पाहिजे ना....? म्हणून.....  
                 
 राजश्री जगताप 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...