ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू
मैं
जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू…..!
तू ही मेरी मंजिल, पहचान तुझी से
पहुंचू मैं जहां भी
मेरी बुनियाद रहे तू
मेरी बुनियाद रहे तू
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू…!
देशाचे प्रतिनिधित्व
करणे हे प्रत्येक नागरिकावर अवलंबून असते. त्याचा सर्वात मोठा भाग हे त्या-त्या
देशातील सैनिक, सीमेवरील जवान, आर्मी, नेव्ही, खेळाडू, वैज्ञानिक, राजकारणी, सिनेतारका,
शेतकरी तसेच प्रत्येक सामान्य नागरिक हा कोणत्या न कोणत्या रूपाने करत असतो. काही
गोष्टी त्याचा आढावा देत असतात तर काही गोष्टी कळत न कळत होत असतात. आपल्या देशाला
अभिमानास्पद सन्मान मिळवून देण्यासाठी प्रत्येक नागरिकाने निश्चयाने प्रयत्नशील रहावे.
आपल्यात जर एखाद्या गोष्टीचे सामर्थ्य/कौशल्य नसेल तरी आपण त्या देशाचा जागरूक आणि जबाबदार नागरिक कशा
प्रकारे होता येईल यावर नेहमीच भर द्यावा. प्रत्येकालाच उच्चांक गाठता येत नसतो. परंतु
उच्च दर्जेदार नागरिक होणे प्रत्येकाला आलेच पाहिजे.
आज मी विदेशात “जपान” मध्ये राहत असतांना माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक
घडामोडीत, माझ्या वागण्यात, राहण्यात, बोलण्यात, भाषेत, स्वयंपाकात, पेहरावात, माझ्यातील
कला गुणांत मी भारतीय असल्याचे प्रतिनिधित्व करत असते. मला भारतातून जेव्हा फोन
येतो तेव्हा बरेच लोक विचारत असतात, तुला कधी-कधी भारतीय असल्याचा अभिमान
वाटतो...? खर तर मुळात मी कधी विसरतच नाही, कि, “मी भारतीय आहे”. हे रोज एकदातरी
शब्दातून व्यक्त होत असते, जसे आपल्या कडे विचारले जाते तुम्ही कोणत्या जातीचे? तसच
इथे मला विचारल जात You are from? I am from India... अगदी गर्वाने आणि खुश होऊन
उत्तर दिल्यानंतर मनाला जे समाधान लाभते तोच माझा भारत देशाबद्दल चा अभिमान....!
कारण इथे जात, धर्म, कुल, वंश अशा काही गोष्टी
कोणी विचारत नाही त्यामुळे स्वतःला हि त्या गोष्टींचा विसर पडलेला असतो. आणि जे
माणसाच्या शब्दांत असते तेच आचरणात येते. अर्थात जर आपल्याला कोणी जात विचारलीच
नाही तर, आपण भारतीय आहोत. अशी आपल्याला आधी जाणीव होईल आणि मगच ती आचरणात आणणे कठीण
न राहता, अगदी सोप्पे होईल.
मी अडीच वर्षांपासून जपान मध्ये आहे परंतु
त्यातील एकही दिवसात मला आठवले नाही कि मी कोणत्या जातीची आहे. आता माझा दृष्टीकोन
हा केवळ मी एक भारतीय आहे अशा निष्ठेने बोलू शकते. भारतात २९ घटक राज्यांमध्ये
विविध जाती म्हणजेच भाषा आहेत तरी देखील आम्ही एकात्मतेने राहतो हे अभिमाने इथे
सांगता येते, (ते नसतांना देखील). आणि विदेशी लोकांना त्याचे फारच कौतुक वाटते. एवढ्या
भाषा..?? बापरे...! खरोखरच भारतात किती एकता असेल याचा विचार ते करू लागतात. भारताचा
इतिहास जरी काही वेगळच सांगत असला तरी वास्तविकता आपण कसे मांडतो यावर आपल्या
देशाचे प्रतिनिधित्व जोमाने उभे राहते.
लहान असतांना, खरतर मोठ झाल्यावर देखील मला नेहमीच प्रश्न पडत असायचा
आपल्या देशाच नाव मोठ करण्यासाठी आपल्या सहकार्याच योगदान मोलाच कस ठरवायचं.? आपण
न उत्तम खेळाडू आहे, न खूपच बुद्धिमान, न आपण सीमेवर जाऊ शकत.... अर्थात आपल्यात
कोणताच असा गुण नाही जो आपल्या देशाबद्दलच नाव अभिमानाने उंच करू शकेल.. परंतु माझ
लग्न एका “शास्त्रज्ञ”(Scientist) मुलासोबत होत असल्याचे एक अशा प्रकारचे समाधान
मला लाभू लागले कि, माझ्या विचारांना एक दूरदृष्टीकोन मिळू लागला.
माझ विदेशात येनं हि माझ्या साठी एक सुवर्णसंधी
ठरली. आणि नकारात्मक विचारांना एक सकारात्मक चालना मिळाली. माणसाला संधी मिळणे
फारच गरजेचे असते, तेव्हाच त्याच्या लक्षात येते, नक्की कोणती कृती केल्यानंतर आपल्या
चांगल्या विचारांना अमलात आणता येईल.
माझ्या दृष्टीकोनातून संपूर्ण देशाची प्रगती हि शास्त्रज्ञांनवरच अवलंबून आहे. त्यांनी केलेले संशोधन म्हणजे
आपल्या डोळ्यासमोरील रोजच्या वापरातील प्रत्येक वस्तूंपासून ते परग्रहावर जाण्यापर्यंतची
क्षमता त्यांनी मिळवली. त्यामुळे देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे योगदान हे
सर्वप्रथम शास्त्रज्ञांनवरच ठरते. हि माहिती शालेय जीवनात आपल्या सर्वांनाच असते
परंतु, ती आता मी स्व:नुभवली.
जब ज़ीरो दिया मेरे भारत ने, दुनिया को तब गिनती आयी,
तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलायी,
भारत का रहने
वाला हूँ , भारत की बात
सुनाता हूँ...
देता ना दशमलव भारत तो, यूँ चाँद पे जाना मुश्किल था,
देता ना दशमलव भारत तो, यूँ चाँद पे जाना मुश्किल था,
धरती और चाँद की दूरी का,
अंदाज़ा
लगाना मुश्किल था,
भारत का रहने
वाला हूँ भारत की बात
सुनाता हूँ ...
जपान मध्ये बरेचशे सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, त्यामध्ये आप-आपल्या
देशाच्या संस्कृती ची देवाण घेवाण करायची. (Culture Exchange Programme). मग त्यात
जेवण, पेहराव, संगीत, वेगवेगळ्या प्रकारची माहिती देणे, कला, अभ्यास, साहित्य, सर्वच प्रकारच्या
क्षेत्रांमधील आपणास अवगत असलेले गुण प्रदर्शित करायचे. “जे काही आपल्याला येत
असेल ते.” भलेही ती गोष्ट खूप मोठी असो किंवा लहान पण तिला महान बनवण्याचे कर्म
करता आले पाहिजे. आपल्या देशाबद्दल माहिती देताना एक परखड वक्ता असणे गरजेचे आहे.
तुझपे कोई ग़म
की आंच आने नहीं दूं,
कुर्बान मेरी
जान तुझपे शाद रहे तू..
ऐ वतन, वतन मेरे, आबाद रहे तू....!
भारतीय
कुटुंब व्यवस्था, लोकांमधील प्रेम, जीव्हाळा आणि अपुलकीचे नाते कशा प्रकारे ते
निभावतात याची भावनात्मक कल्पना जपानीज लोकांना दिल्यानंतर त्यांच हि मन तितकच
भरून येत, त्याचरोबर शेजार धर्म हा कशा प्रकारे निभावला जातो, आमचे शेजारी
नातेवाईकांपेक्षा छान साथ देतात अगदी सुख-दुखत देखील. सांगण्याचे कारण असे कि जपान
मध्ये शेजारी किंवा संपूर्ण इमारतीत कोण राहते हे सुद्धा माहित नसते. जपानीज
लोकांची मानसिकता हि फारच कृतीशील (प्रक्टिकल) आहे. कुणाकडेही परवानगीशिवाय जात
नाहीत. ते फारसे भावनिक दृष्टीकोनातून निर्णय घेत नाहीत. जे नियम आहेत तेच ते पाळतात.
जगात नम्रपणाचे उदाहरण म्हणून जपान सुप्रसिद्ध देश आहे, पण आम्ही भारतीय माणुसकीला
जपतो आणि त्यातूनच एकमेकांची मदत करत असतो. मला आवर्जून सांगावस वाटेल आपल्या
भारता सारखा पाहुणचार इथे नसतो. याचा अर्थ तो वाईट किंवा चुकीचा असतो असे अजिबात
नाही. परंतु त्यांची पद्धत हि फारच वेगळी असते. त्यामुळे भारतीय पाहुणचार हा
मानसन्मानाने केला जातो हे लक्षात येते. जपानीज लोकही तेवढाच आदर करतात पण
वेगवेगळ्या परीने.
इतनी ममता नदियों को भी जहाँ माता कह के बुलाते है,
इतना आदर इन्सान तो क्या पत्थर भी पूजे जातें है ,
इस धरती पे मैंने जनम लिया, ये सोच के मैं इतराता हूँ
इतना आदर इन्सान तो क्या पत्थर भी पूजे जातें है ,
इस धरती पे मैंने जनम लिया, ये सोच के मैं इतराता हूँ
भारत का रहने
वाला हूँ, भारत की बात सुनाता हूँ....
जपान मध्ये मसाल्याचे पदार्थ वापरले जात नसताना देखील, माझ्या जापनीस
मैत्रिणींसाठी मी ते नेहमी बनवत असल्यामुळे त्यांना ते फारच आवडू लागले. इतकच नाही
तर, त्याची पाक कृती त्या माझ्याकडून शिकतात देखील. भारताची मसाल्यांन साठीची सुप्रसिद्धता
काही अशी वाढली कि, मीठ मिरचीचा सुद्धा आस्वाद न घेणाऱ्या लोकांना तिखट जेवणाची
आवड माझ्या स्वयंमपाकातून निर्माण करून दिली.
नृत्य हा प्रकार
जपान मध्ये अगदीच नाजूक आणि सुंदर पद्धतीने सादर केला जातो. परंतु भारतीय नृत्याची
ओळख जेव्हा मी माझ्या जपानीज मात्रीणींना करून दिली तेव्हा त्या मात्र अगदी ताल
धरू लागल्या. लावणी हा प्रकार बघताच त्यातील अदा त्या देण्याचा प्रयत्न करू
लागल्या. कोळी गीते, सैराट, हळदीतील नाच, डीजे वरील नाच त्यांना फारच आवडला. आणि
मग काय आमचे कोणतेही कार्यक्रम असो आम्ही भारतीय पद्धतीचाच नाच करतो.
जपानीज संगीत शिकण्यासाठी मी गेले असता, तेथे भारतीय वाद्य कशा
प्रकारची असतात ते त्यांना छायाचित्रातून दाखविले. वीणा, तानपुरा, बासरी यातील भारत
आणि जपान मधील फरक सांगितला काही संगीत वाद्यांची माहिती त्यांना दिली.
त्याचप्रमाणे स्त्रियांची आवडती कला मेहंदी रांगोळीच्या शिकवण्या मी
येथे घेतल्या. जपान मध्ये गडद रंगाचे कपडे किंवा इतर वस्तू जास्त कुणी वापरत नाही.
त्यामुळे त्यांना रांगोळीतील रंग हे फारच आकर्षक वाटतात. रांगोळी कशापासू बनवली जाते
आणि ती केव्हा-केव्हा वापरली जाते या कलेचे महत्व काय हे त्यांना योग्य रित्या सांगितले.
माझ्या जपानीज मैत्रिणी मेहंदीला “हेन्ना ट्याटु” म्हणतात. त्यांच्यासाठी एक मेहंदी आणि मी केलेले दागिन्यांचे डिझाईन्स
असे सादरीकरण केले. तेव्हा पासून माझ्याकडे त्या नेहमीच मेहंदी साठी येऊ लागल्या.
आम्ही भात लावण्यासाठी गेलो
असता मी पाहिले कि येथील लोक गुढघ्या पर्यंत पावसाळी बूट घालतात आणि हात पंजे हि
पूर्ण घालतात. परंतु मी बूट, पंजे काही न घालता भात लावायला सुरवात केली आणि त्यांना
सांगितले आमच्या भारतात शेतीसाठी पूर्वी खूप मोठी-मोठी साधन नव्हते तेव्हा सगळी
काम हातानेच केली जातात. तुम्ही जो बैल रोज जेवणात खाता तो आमच्याकडे देवा पेक्षा
कमी मानला जात नाही, खर तर तोच आमचा अन्नदाता आहे. हे चित्र पाहून ते सर्वच
आश्चर्य चकित झाले. जपान मध्ये शेतीसाठी मोठी-मोठी साधने उपलब्ध आहेत. परंतु शेती
हा असा व्यवसाय आहे जो माणसाने कुठलेही साधने वापरून कितीही मेहनत केली तरी,
निसर्गाची साथ जेवढी आहे तेव्हढच उत्पादन त्याला मिळते.
लग्न सोहळा हा एक आयुष्यातील येवढा मोठा क्षण भारतीय लोक कशा पद्धतीने
पार पडतात हे माझ्या लग्नाच्या चलचित्रात, छायाचित्रात मी त्यांना दाखवले, त्यातील
प्रेमळ काही रडतांनाचे क्षण पाहून त्यांच्याही डोळ्यात पाणी आले, आणि जिव्हाळा
आपुलकी या भावनांना किती जपल जात याचा अनुभव त्यांना आला. लग्न हि फक्त नवरा-नवरी
साठीच नाही तरी घरातील प्रत्तेक माणसासाठी किती सुखकर गोष्ट असते भारत हा भवानांवर
आधारित देश आहे, मनुष्याच्या प्रत्येक भावनेला किती महत्व दिले पाहिजे हे त्यांना पटले.
भारतीय कुटुंब पद्धती हि त्यांच्या अतूट भावनेवरच अवलंबून आहे.
मला साड्या नेसणे खूपच आवडते जेव्हाही एखाद्या पार्टी ला, इव्हेंट ला किंवा
कुठेही फिरायला जायचे असते तेव्हा मी आवर्जून साडीच नेसते. तेव्हा ते माझ्या भोवती
अगदी फेर घालून बघतात, कि मी ती कशी नेसली आहे. हा भारतीय किमोनो(जपानीज) ड्रेस
असल्याचे त्यांना सांगते, माझ्या सोबत त्या आवडीने फोटो घेतात. त्यांना मी खूपच
सुंदर वाटते. आणि हीच सुंदरता बघून त्या माझ्याकडे साडी नेसन्यासाठी येतात. त्यामुळे
मी इथे आपला पेहरावही खूपच प्रसिद्ध केला आहे.. After all Indian Beauty it’s
Famous in the World...! जपानीज मुली ह्या फारसे मोठे दागिने घालत नाहीत, त्यामुळे
त्यांना भारतीय दागिन्यांचे आकर्षण खूपच वाटते. माझे बरेचशे दागिने त्या घालुन फोटो
काढतात. काही मैत्रिणींनी त्यांच्यासाठी आणायलाही सांगितले आहे.
काही
वर्षांपूर्वी आपल्या भारतात जपानच्या बऱ्याच वस्तू आणि जपानीज स्टाईल खूपच
प्रसिद्ध होत्या. जसे जापनीज बाहुल्या, बूट, टोपी, किमोनो(वस्त्र), ग्रीन टी, तसेच
इकडचे कार्टून.. एक दशकच होते ब्ल्याक&व्हाईट सिनेश्रुष्टीतील ज्यात हि
लोकप्रियता वाढली होती. आज अगदी जसेच्यातसे भारतातील बऱ्याचशा गोष्टी जपान मध्ये
खूपच प्रसिद्ध झाल्यात आणि त्यात मी मोलाची भर घातल्याचा आनंद मला येतोय.
आता हि फक्त काही उदाहरणे झाली परंतु आम्ही
जेव्हा जेव्हा सगळे एकत्रित भेटतो, बोलतो तेव्हा मात्र प्रत्येक गोष्टीची तुलना
केली जाते किंवा उपमा दिली जाते ती भारतीय गोष्टी कशा आहेत ते... जसे आज इथे-इथे
अशा-अशा ओळखीच्या माणसाचा मृत्यू झाला मग त्यावर त्यांच्याकडील अंत्यसंस्काराच्या सर्व
पद्धती कशा असतात, आपल्याकडे कशा प्रकारे केले जातात. प्रत्येक गोष्टीत, रोजच्या
व्यवहारात जपान आणि भारतातील फरक त्यांना सांगितला कि आपोआपच देशाचे प्रतिनिधित्व माझ्या
हातून होत असते.
अशा प्रकारे संपूर्ण संस्कृतीची
देवाणघेवाण करता-करता माझ्या लक्ष आले आहे कि, अर्थात आमचा भारत देश व्यावहारिक, भावनिक
आणि मानसिक दृष्ट्या सगळ्याच देशांमध्ये एक सक्षम देश आहे... आणि जपान मध्ये भारत
देश प्रसिद्ध करण्यात माझा थोडाफार का होईना पण वाटा आहे याच समाधान आभाळा एवढे वाटते,
मी माझ्या देशाचे
प्रतिनिधित्व एक दर्जेदार नागरिक बनून करत असल्याचा अभिमान वाटतो......
है प्रीत जहाँ की रीत सदा
मैं गीत वहाँ के गाता हूँ,
भारत का रहने वाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ.....!
मैं गीत वहाँ के गाता हूँ,
भारत का रहने वाला हूँ
भारत की बात सुनाता हूँ.....!
जय हिंद....!
Well written...
उत्तर द्याहटवाThank you
उत्तर द्याहटवा