मुख्य सामग्रीवर वगळा

वाढदिवस.....


वाढदिवस.....


        वाढदिवस साजरा करण्याच वेड मला लहान पणापासूनच आहे. हा दिवस सगळ्यांच्याच खूप खूप आवडीचा असतो मी तर, आज वाढदिवस झाल कि लगेच पुढच्या वाढदिवसाची वाट पाहत असते, नवीन दिनदर्शिका आणताच कोणत्या वारी वाढदिवस येतोय मागच्या-पुढच्या दिवसात कोणते सण वार आहेत. हे तपासात असते. दरवर्षी त्याच सोहळ हे सारखच असत बरं... नाही, म्हणजे नवीन-नवीन छान-छान कपडे घेण, त्यावर सगळ काही जुळणार म्हणजे (Matching-maching) जस कानातले, गळ्यातल, बांगड्या, नेलपोलिश, लिपस्टिक सगळ सगळ सगळच... जे आवडत ते केक आणणे, घर सजवणे, आवडीच जेवण बनवणे नाही Sorry-sorry चुकले-चुकले लग्ना अधी मम्मीला बनवायला सांगायची आणि लग्ना नंतर कुणी जेवण बनवत का? अशा खास दिवशी हाःहाहा:.हा:... आणि यात सगळ्यात मुख्य म्हणजे मला मम्मी जेव्हा औक्षण करते तेव्हा खूपच आवडत अगदी मी लहान असल्यापासून, मम्मीच्या हातातल ताट फिरत तशी आपली नजर फिरत असते, त्या दिव्याची वातीचा लख्ख प्रकाश त्यादिवशी फक्त आपल्यासाठीच असतो. वाह:... किती छान वाटत ना?, अगदी आपण वयाने कितीही मोठे जाहलो तरी, त्या ओवाळणाऱ्या हातात किती सकारात्मक ऊर्जास्त्रोत असतो. आपल्या सुखरूप भावीआयुष्यासाठी.. आयुष्यमान होण्यासाठी तेवढच पुरे असत नाही का.?, बाकी चैनीच्या वस्तू मानसिक समाधानासाठी.. म्हणूनच मम्मी आम्हा सगळ्यांच्या वाढदिवसाला न विसरता औक्षण करतेच.

         लहानपणीचे आपले वाढदिवस असे व्हायचे परंतु, माझे आताही तसेच होतात आणि मी ह्या दिवशी खूपच खुश असते. अर्थात म्हणजे सगळेच खुश असतात. सगळ्यांनाच हा दिवस तेवढाच प्रिय असतो. सगळेच ह्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात त्या दिवशी सगळेच शुभेच्छा देतात, शक्य असल्यास भेटतात, कधी तरी बोलणारे किंवा अगदी कधीही न बोलाणारे सुद्धा एक मेसेज का होईना पण पाठवतातच. हल्लीच्या एवढ्या व्यस्थ जीवनात आजून काय हव असत.

         पण, एवढा सगळा आनंद ह्या दिवसात असतांना देखील मला थोड वाईट सुद्धा वाटत असत त्या दिवसाला.. त्याच कारण अस कि, खरच आपल एवढ आयुष्य गेल...! आपल्याला खरोखरच जे यश गाठायचं होत ते आपण गाठल का? किंवा नसेल तर, ते कसं मिळवता येईल? थोड खंत वाटते मला ह्या विषयाची आणि खरच आयुष्य किती लहान आहे याचा पुरावा देखील मिळतो. अगदी मोजता येण्यासारखे दिवस, वर्षे असतात. पण ध्येय्य किती मोठी-मोठी असतात नाही..?, पुरेल का एवढ आयुष्य आपल्या ध्येयांना?, शेवटी जेवढ आयुष्य आहे तेवढ्यातच शक्य तितकी शिखर गाठायची म्हणूनच तर याला “आयुष्य” असे नाव आहे.... “आयुष्य” या शब्दाचा अर्थ वाढदिवशी कळतो.    

       तस वाढदिवस साजरे करणे आजकाल फारच ट्रेन्डी झालेलं आहे जुन्या काळापेक्षा. तेव्हाची आई गोड शिरा, रोजच्यापेक्षा चांगल जेवण एवढ जरी करू शकली तरी सगळेच समाधानी असायचे, असोत जसा काळ बदलतोय तस आपण हि बदलत जातो. माझ्या लहानपणीच्या काळापासूनच केक वगैरे ची फॅशन आली होती. त्यामुळे शिरा वगैरे मला काही फारसा आठवत नाही. मी दहावीला असतांना माझा वाढदिवस छान साजरा करायचं अस ठरवल. त्याचे दोन कारण म्हणजे असे कि,
एक म्हणजे मी सातवीला असतांना अशीच आनंदाच्या भरात दरवर्षीप्रमाणे वाढदिवस-वाढदिवस म्हणून खुश होऊन सगळ्यांना आमंत्रण द्यायला गेले, सर्व तयारी झालेली होती फक्त मित्र-मैत्रिणी येणे बाकी होते. माझ्या शिकवणीतील ताई ला आणि तेथील वर्ग परिवाराला बोलवायला जात होते. तिसऱ्या मजल्यावरून तळमजल्याला पोहचले आणि ताई च्या दाराजवळ जाणार तेवढ्यात एक मुलगा भर धाव वेगात पळत येत होता, आणि त्याने जोरात धडक दिली तशी मी भिंतीच्या कठड्यावर आपटले, आणि माझ्या डाव्या हाताच, मान आणि खांदा याला जोडणार हाड मोडल. त्याला “पिंजनी” अस म्हणतात. माझा रडणारा आवाज ऐकून ताई व सगळे बाहेर आले. अजुबुचे सर्वच जमले तशीच मला उचलून तिसऱ्या माळ्यावर आणल मम्मी पप्पा दोघे भावंड माझी अशी अवस्था बघून रडू लागले. ते रडण्याच कारण म्हणजे सगळीकडे आनंदी वातावरण होत आणि आता अचानक हे अस बघून सर्वच दु:खी झाले, घाबरले. आयोडेक्स, मूव्ह हे ते काय-काय लावलं, पेनकिलर देऊन तसाच केक कापायचा प्रयत्न झाला, पण तो केके कापण्यासाठी देखील माझ्यात त्राण नव्हता. कारण मोडलेल्या हाडाच आतल्या-आत घर्षण होऊन जीव जावोस्तोवर वेदना होत होत्या. अवघ्या दहा मिनिटांत तेवढ आवरल आणि सगळ काही शेजारच्या मामींच्या हवाले करून आम्ही “सेन्जोर्ज हॉस्पिटल” गाठल. माझ्या यातना अशा वाढत होत्या, जस मरण जवळ येतंय. आणी माझी हि परिस्थिती पाहून मम्मी-पप्पा रडून हैराण. पप्पांची नाईट ड्यूटी क्यांसल, घरी भावंड बिचारे रडले, त्याचं त्यांनी खाल्ल-पिल्ल, आणि वाट पाहून झोपी गेले. आम्ही रात्री बारा नंतर घरी परतलो. दोन दिवसात काडी मात्र फरक मला जावला नाही. कारण, मला एक फक्त दोन्ही हातांना मानेवर पट्टा अडकवून दिलेला आणि वेदना कमी होण्यासाठी गोळ्या दिलेल्या. पण हाड आतमध्ये अक्षरशा खूळखुळ्या सारख वाजत होत, दोन तुकडेच होते ते. मग मम्मी पप्पांच्या काकांना बोलावलं ते हाड वैद्य होते. आता २०१८ मध्येच वारले ते, तर त्यांच्या प्रयत्नातून आठ दिवसात हाड बसल देखील, ते म्हणालेच होते तशी पिंजनी हि पटकन जोडली जाते, काळजी करण्याचे कारण नाही, सतत मांसाहार, सुप्स आणि सुका मेवा याने लवकरात लवकर भरून जाईल. पण दुर्दैव माझ, पुन्हा ते निसटल, त्यावेळेस ते बाबा दुसऱ्या शहरात असल्यामुळे नाशिक वरून मुंबईला मम्मीच्या वडलांना बोलावलं तर त्यांनीही काही विलाज केले. तेही आठ दहा दिवस यशस्वी झाले, पुन्हा आहे ती परिस्थिती. मग मम्मीने च काय केल, तो जो पट्टा मला अडकवून दिलेला तोच पट्टा तिने कर्कस्स बांधून घेतला अगदी ताकत लावून आणि दोन ते तीन दिवसात ते हाड व्यवस्थित बसून गेल. पुढच्या दहा दिवसात मी शाळेतही जाऊ लागले.

        पण आता पुढे जवळजवळ एक महिन्या नंतर च्या ह्या गोष्टी असतील बरं का... पप्पा हसून हसून विचारात होते चीमे तुझ हाड कस वाजत होत?, हो न पप्पा.! एकदम खूळखुळ्यासारख वाजत होत, मला आवाज पण येत होता. त्यावर घरातील सगळे अजूनही हसतात. मला मम्मी-पप्पा ह्या दोघांनी चांगल ठणकावल.., त्याच कारण म्हणजे एवढी मस्ती कशी रे तुमच्या तीघांच्याही अंगात? तुम्हाला गप गुमान अभ्यास करता येत नाही का? शांतपणे खायला प्यायला काय रोग येतो. नुसत्या हुनाडक्या मारायला पाहिजे, इकडून तिकड भटकायचं आणि मग होत हे सगळ आणि निस्तरत बसतो आम्ही दोघ.. आता इथून पुढ तू बड्डे-बड्डे तोंडात आन मग बघतो तुझ्या कडे आम्ही.. अजिबात नसते उद्योग करायचे नाहीत. सगळे लाड बंद इथून पुढ, आणि तुम्हाला खर नाही वाटणार पण, खरच बंद केले हो...ओ.... आणि तिकड शिकवणीतील सगळे त्या मुलाला चिडवत असायचे, कारण मी पडली आणि हाताला खूप लागल अस त्याच्या लक्षात आल्याबरोबर तो घरात जाऊन लपून बसलेला... काय रे तुझी काय दुष्मनी होती तिच्या सोबत कशाला तिला ढकलस.? तो बिचारा सुरवातीला घाबरायचा आणि नाही, तस काही नाही, तस काही नाही ती.. जिन्यातून आली आणि मी धावत येत होतो तिला मी नव्हत पाहिलं.. नंतर मात्र त्याला कळाल आपल्याला वेड्यात काढतंय सगळे. आणि घरातील ओरडा हा खरच बदल करण्यासारखा होता. कारण माझ्या त्या वेदनेत सगळेच दुखावले होते. मग दोन वर्षे नो बड्डे वड्डे... पण तिसऱ्या वर्षी मात्र मम्मीनेच ठरवलं ह्या वर्षी माझ्या चिऊ चा बड्डे छान करूयात....
हे झाल पाहिलं कारण....  
           
         दुसर कारण म्हणजे दहावीच वर्ष शेवटच वर्ष होत आणि ह्या सगळ्या मैत्रिणी पुन्हा कधी कशा भेटणार ह्या ओढीने सगळ्यां सोबत हा एक दिवस साजरा करू असा एक उद्देश... मी म्हंटल माझ्या सगळ्या मैत्रिणींना मी जेवायला बोलवणार, मम्मी पण म्हणाली ठीक आहे. अय्या हो.ओ..ओ...मम्मा मग तू काय जेवण बनवणार? काय बनवू? अं.अ..अ.... डाळ-भात, वांग्या-बटाटयाची भाजी, आणि शिरा-पुरी बनवते... काय..??? माझ दहावं घालतेय का..??? इतका राग ओकला मी त्या शब्दात कि, ती पोट धरून-धरून हसली खर तर आजही तिला आठवलं कि ती तशीच हसते... काय मम्मी तू पण, काय बोल्ली होतीस मला तेव्हा?., आणि आम्ही दोघीही त्या आठवणीने हुरळून जातो.. पण तिने जेवण मात्र इतक सुरेख बनवल होत कि मला आजही तो स्वाद आठवतो. तिरंगा व्हेज पुलाव, छोले-पुरी, केक, गुलाबजाम, सलाड वगैरे..वगैरे...वगैरे...

आणि हो ह्या सगळ्या आठवणींमुळेच आजचा दिवस सुखी करण्याचे सामर्थ्य वाढते. 

         आता लग्नानंतरचा वाढदिवस म्हणजे तोही तितकाच जैय्यत असतो माझा बरं.अं., पहिल्याच वाढदिवसाला नवऱ्याने विचारल तुला काय हवय? कुठे जेवायला जायच? कोणता ड्रेस घ्यायचा? वगैरे वगैरे... मग म्हंटल चला आता होऊन विचारलय तर का लाजायचं ना? नाही का? मग भली मोठ्ठी यादीच झाली. पण वाढदिवसाआधीच आमच असच छोटस भांडण झाल, नवीन जोडप असल्यामुळे भांडणांनानंतर कोणीही कुणाशी बोलायचं नाही अस चालायचं, मग त्यच्या दुसऱ्या दिवशी मी थोड ऑफ मूड मध्येच उडदाच्या पापडाच पीठ भिजवलं आणि बाकी सगळ काम आवरून जेवण वगैरे आटपून पापड करायला घेतले, त्यांना वाईट वाटल येऊन लगेच मांडी घालून बसले दे आण मी करतो, मी हि समोर आपटलं पण सकाळ पासून मी सगळ काम आवरत होते हे पाहून त्यांना जरा वाईटच वाटलेलं होत. म्हणून त्यांची मनोमन माघार झालेली होती. पापडाच्या पिठाला ठेचून काढायला ताकत लागते, जे मला शक्य नव्हत, म्हणून मला त्यांची गरज लागणारच होती हे मी जाणून होते. मीही मुद्दामच हा खेळ शनिवार सुट्टीचा दिवस पाहून काढला होता. मग काय त्यांनी हाफचड्डी, बनियान वर गळ्यात टॉवेल टाकला आणि ७०,८० टक्के काम त्यांनीच केल, मी त्याचे फोटो काढत बसले मस्त हसत-हसत मजेत पापड झाले. आणि त्या आनंदाच्या भरात दुसऱ्या दिवशी मला माझ्या जपानीस मैत्रिणीच्या मदतीने किमोनो (जपानीस ड्रेस) केक, वाढीव पोकेट मनी, गुलाब गुच्छ, पिज्जा वगैरे वगैरे खूप छान असा माझा वाढदिवस साजरा केला.

      २०१७ ला म्हणजेच मागच्या वर्षी च्या वाढदिवसाला मी नवऱ्याला सांगितलेलं, माझ्या ह्या वाढदिवसाला Grand Celebration करायचं. हो.ओ...? ते कस? ते अस कि...... मला ड्रेस, गिफ्ट, केक, नेहमी पेक्षा मोठी पॉकेट मनी, गुलाब गुच्छ, आणि जपानच्या सर्वात सुंदर ठिकाणी फिरायला जायच.... बअ..सं...??? हो... ठीक आहे. डन..... ओह्हह रिअली..?? एस्स.... कुठे जायच फिरायला? अंम... जिथे संपूर्ण जगाला आपण विसरून जाऊ आणि खूप खूप आनंदी होऊ अस ठिकाण... मग काय एक नाहीतर दोन ड्रेस, बाकी जे मागितलं ते सगळ आणि मुख्य म्हणजे माझ्या साठी सुट्टी घेतली जपान मधील “Disney Sea” येथे एक दिवसाची सहल. एक दिवसात सगळ फिरणे शक्य नव्हत तरी सुद्धा गेलो. जपानीस लोक तर संपूर्ण वर्षभरचा पास काढतात आणि वेळ मिळेल तस तिथे जातात. खूपच मोठ् अस हे Disney Land-Disney Sea दोन्ही खूप मोठे आहे.
 

आणि संपूर्ण जगाचा विसर पडावा असंच ते ठिकाण अनुभवायला मिळाले. खरोखरच एक दुसऱ्याच जगात आल्या सारखा भास होत होता. म्हणूनच त्याला Disney Word (दुसर जग) अस म्हणतात. लहान मुलांना Disney Cartoones का इतके आवडतात हे मला त्या दिवशी कळाल कधीतरी असंच वेळ घालवण्यासाठी मी हि बघायचे T.V. वरती परंतु, प्रत्यक्षात हे पाहिल्यानंतर आम्ही दोघेही हरवून गेलेलो, तिथे १५,२० मिनिटांचे छोटे-छोटे शो होत होते, त्यात जलरीचा शो मला खूपच आवडला. इतका कि मीही घरी येऊन जलरीचा ड्रेस घेतला. त्यात तिथे फिरताना हलकासा पाऊस पडत होता. खूपच अद्भुतरम्य असा कल्पना विश्वात हरवणारा दिवस होता. परत घरी यावस वाटतच नव्हत, १८ तासाला जास्त वेळ एक सलग आम्ही चालत होतो. पण जराही थकवा जाणवला नाही. पण दुसऱ्यादिवशी मात्र पायाचे तुकडे पडलेले होते. पण ते दुखण आम्हाला कालच्या दिवसभराची गोड आठवण देत होत. आम्ही दोघेही त्या दिवसाला कधीच विसरू शकणार नाही आयुष्यातील खूपच सुंदर अशी आठवण आम्हाला मिळाली. विदेशात गेल्यानंतर आवर्जून न विसरता Disney Word ला भेट दयावी.

         आणि ह्या वर्षीचा म्हणजेच २०१८ चा वाढदिवस म्हणजे तोही तितकाच उत्साह दायक आम्ही साजरा केला. मी तर पूर्ण जपनीस ड्रेस, त्यावर सुंदर केशरचना, घरातील सजावट, केक, माझ आवडत Maxican जेवण, सगळ काही सुंदर झाल. हो पण माझ गिफ्ट, वाढीव पॉकेट मनी, आणि सहल बाकी आहे ते विसरू नका हा... सगळ काही मी वसूल करणार आहे तुझ्या कडून माझ्या पतीदेवा....

         आता मुख्य म्हणजे Social Sites वरील वाढदिवस तोहि तेवढ्याच छान पद्धतीने साजरा झाला. सगळ्यांच्या खूप-खूप शुभेच्छा मिळाल्या. कितीतरी नवीन मित्र-मैत्रिणीनी काही फारशी ओळख नसतांना देखील त्यांनी शुभेच्छा दिल्या. खूपच छान वाटल त्यांच्यामुळे संपूर्ण दिवसाचा आनंद द्विगुणीत झाला. मम्मी-पप्पा, सोनू-मोनू यांनी खूपच आठवण आली. पण त्यांनी वेळेवर विडीओ कॉल करून दिवसातून दोन तीन वेळा फोन मेसेज करून माझ्यापासून दूर असल्यासारखे जाणवूच दिले नाही. मोनुला म्हंटल तुला आठवत का रे माझे वाढदिवस कसे-कसे साजरे झाले ते?, तो म्हणाला थांब मी मेसेज करतो आणि भला मोठा मेसेज त्याने मम्मीच्या मदतीने पाठवला, त्याचा फोटो मी लेखा सोबत जोडत आहे. 
हाहाह.... Thank you Mo2....


२४ तासाच्या दिवसा ऐवजी २८ तासाला जास्त मोठा दिवस मला साजरा करायला मिळाला जपान-भारत या दरम्यान असल्येल्या वेळेतील अंतराचा अजून एक मोठा फायदा बरंअअ... हा..हा...हा.....


         आयुष्यातील खूप खूप छान दिवस म्हणजे वाढदिवस.......


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...