मुख्य सामग्रीवर वगळा

इथून पुढे कधीच विसरणार नाही.....!


इथून पुढे कधीच विसरणार नाही.....! 

      बायकोचा वाढदिवस जर नवरा विसरला तर त्याची काय अवस्था होऊ शकते याचा अंदाज आपल्या सर्वांनाच आहे. नाही का?, पण बायको मात्र नवऱ्याचा वाढदिवस विसरली तर जास्तीत जास्त काय होत ओ....? मी सांगते.... ऐवढा मोठ्ठा काही गुन्हा होत नसतो. हो पण हे त्या पुरुषावर अवलंबून असत कि तो कोणत्या दृष्टीकोनातून बघतो हेहि मात्र तेवढेच खरे... आमच लग्न ठरतांना आम्ही एकमेकाला जन्मतारखा सांगितल्या होत्या. आमच्या साहेबांनी मला त्यांची खरी जन्मतारीख सांगितलेली होती. तिचा काही येवढा कधी विषय झाला नाही. खरी म्हणजे कागदोपत्री वेगळी लावलेली आहे. थोड्या दिवसांनी मला एक नवीन सिमकार्ड घ्यायचं ठरल, दुकानात गेले असता का कोण जाणे पण मला एक नंबर आवडला तो घेतांना असंच मनात विचार केला यांची जन्मतारखेचा आकडा आहे ह्या नंबर मध्ये चला तर घेऊया हाच.
       लग्न झाल, Visa च काम करण्यासाठी मुंबई ला दोघे निघालो होतो, तेव्हा एकमेकांचे कागदपत्र व्यवस्थित फाईल मध्ये लावत असतांना आढळल यांची जन्म तारीख वेगळी आहे. अं..अ...अ.... फसवल कि काय मला याने. ते आपले कागदपत्रांमध्ये व्यस्त होते, मग म्हंटल तुमची शाळेत जन्मतारीख वेगळी लावलेली आहे का? हो अग, शाळेत घेत नव्हते ना! मला म्हणून. मी गावभर भटकायचो मग जबरदस्ती शाळेत घालण्यासाठी फेरबदल केलेला असावा. अरे..., पण तुमच्या फेरबदला पाई माझ मन-बदल झाल ना, त्याच काय.? काय बडबडतेय. मला तर हसायला आल.. ‘आता, हे सगळ तुम्हीच ठेवा’ म्हणत गुपचूप त्या सगळ्या पसाऱ्यातून उठून गेले.
      जपान ला आल्यावर कागदोपत्री वाढदिवस घरच्या घरी साजरा झाला. आणि ऑक्टोबर महिन्यातला खरा वाढदिवस येण्याधी आम्ही मित्र मैत्रिणी सहजच भेटलो होतो. तेव्हा ह्यांच्या जपानच्या-भारतीय मैत्रीण सोबत माझी सुद्धा खूपच छान मैत्री झालेली असल्यामुळे तिने मला विचारल, राश्री, सतीश का बड्डे कब है? २४ ऑक्टोबर. तो क्या प्लान है? देखते है, मैनेभी अभी सोचा नही है! साथ मे मिलकर करते है सेलिब्रेट. उसको सरप्राईज देते है रात मे...! हा चलेगा.. अगर तुम लोग दोनो हि एन्जोय करणा चाहते हो तो करो, कूछ रोम्यांटिक प्लान है तो, एन्जोय...! अरे नही नही सब साथ मे ही सेलिब्रेट करते हैI घरी येऊन यांना सांगितल ती अशी म्हणाली, आणि शनिवार पण आहे तर वीक-एंड असल्यामुळे आपण करू शकतो रात्रीचा प्लान. शनिवार???????????? हो....! माझा बड्डे कधी आहे राजू...? शनिवार २४ ऑक्टोबर.. काययय????? मग कधी आहे.? अरे बापरे! काय झाल? तुम्हीच तर म्हणाले होते दोन तारखा आहेत तर एक झाली आणि आता हि दुसरी ना? अरे हो पण २४?? मग कधी आहे सांगा? मला नाही माहित तूच शोध मी कुठ्ठून शोधू सांगा तुम्हीच अरे तू विसरली तरी कशी? अहो एकदाच तर आपल बोलण झालेलं, त्यानंतर....,,,,, मी कदाचित दोन तारखांमुळे थोडी गोंधळलेय वाटत. बर, सांगा ना आता प्लीजजज.....२२ ऑक्टोबर आहे. सॉरी..सॉरी...सॉरी.....
जाऊदे आता काय सॉरी...? बघा कशी बायको आहे माझी.... मग लगेच मैत्रिणीला मेसेज केला तर ती म्हणाली वीक-डे है फिर तुम दोनो हि सेलिब्रेट करो वीक-एंड पे मिलकर कूछ पार्टी करते हैI ओके ठीक हैI आता त्यांना हळूच म्हणाले अहो मला वाटल तुमची जन्मतारीख २४ आहे. तर, तुम्हाला आठवत का मी लग्नाआधी एक सिमकार्ड घेतलं होत इंटरनेट साठी. हो त्याच काय आता?. नाही त्याच काही नाही आता, पण त्या नंबरचा शेवटचा आकडा २४ आहे म्हणून ते मी निवडल होत... “आई, शप्पत”....! हसून हसून चक्रावलो आम्ही तर....
        चार दिवस होते माझ्या कडे पार्टी अरेंज करायला. मग मस्त घर सजावट पासून, जेवण, गिफ्ट सगळच ठरवल आणि कामाला लागले. बऱ्यापैकी तयारी दोन दिवसात आटपून घेतली. कारण आम्हाला २१ तारखेला “कॉन्फरन्स” साठी “टोकियो” ला जायचं होत. आमच्या सोबत देबा भाई होते. दोघांची कॉन्फरन्स चालूच होती दिवसभर. यांच्या बॉस आणि टीम सोबत लंच केल. मी मध्ये-मध्ये फिरून यायचे यांचे ब्रेक असेल तेव्हा हे दोघे बिल्डींग च्या खाली येऊन भेटत असत. मी फिरून कुठे काय भेटत ते शोधून यांना आणून दाखवत होते. आता शेवटचा ब्रेक होता तिसरा, त्यात मला यांच्या बॉस ने खूप छान छान कॉम्प्लिमेंटस दिल्या, पुहा ह्या एरिया मध्ये कुठे फिरायचं हे सांगितल. मी खूपच खुश झाले कारण एवढ्या मोठ्या माणसाकडून आपल कौतुक ऐकण मला खूपच छान वाटल. आणि त्यात त्यांनी तर मला बरंच काही नवनवीन गोष्टी करण्यास सुचवलं. ह्या दोघांनी मला सांगितलं तू शार्प २.३० ला ए, आम्ही इथेच भेटू. ओके.. काय मग सांगायचं मी एवढी मस्त खुश होऊन उड्या मारत एकदम बिनधास्त अशी फिरत होते. एकदम मजेत.... अगदी लहान मुलीसारख पाठीवर ब्याग अडकवलेली, मस्त शूज, छान अशी पाण्याची नवीन बाटली, एकदम लहान मुलाला जशी बाहेर जाण्याची परवानगी भेटते तशीच मला मिळाल्या सारख वाटत होत. मी फिरू लागले. सगळ काही जग विसरून टोकियो मध्ये असल्याचा आनंद घेत होते. एका ठिकाणी मला जापनीस लोणचे दिसले. ते मी घेत असतांनाच यांचा फोन आला. २.५ झालेले होते. एवढी घाई केली मला बोलवण्याची तू लवकर ए आम्ही फ्री झालोय आणि इथे एका म्यूझियम मध्ये आपल्याला जायच आहे. तीन तासात ते बंद होईल, तेवढ्यात पाहून झाल पाहिजे लवकर ए. मी हि लोणच्याचे घाई गडबडीत पैसे दिले. किती झाले काय झाले माहित नाहीत देऊन टाकले असेच. आणि जे सुटले ५,७ मिनिटांच अंतर असेल त्यात सिग्नल ला अशी जोरात पडले गुडघ्याला जबरदस्त मार लागला. जीन्स थोडी फाटली. तशीच उठले धडपडत. कारण इथे कुणी लगेच धावून उचलण्यासाठी जात नाही. रडत-रडत कॉन्फरन्स बिल्डींग पर्यंत आले आता तर खरच अगदी लहान मुलीसारखच वाटल. हे दोघे पण घाबरले. काय झाल? देबा भाई पण घाबरले. आणि ओरडायलाच सुरवात केली, क्या रे तुम ऐसे कैसे चल सकती हो? इतना क्यो जल्द्बाजी? तुम खुद अपना ध्यान नही रख सकती हो क्या? ज्यादा कूछ हो जाता तो? आणि माझा नवरा बिचारा घाबरून पाय चोळत होता. पाणी पाजत होता. त्याला वाईट वाटत होत कि मीच घाई केली हिला बोलवायची म्हणूनच झाल आणि खरच जास्त काही झाल असत आता तर?, तुम्हारा जीन्स फाट गया है मतलब कितना लगा होगा. कैसी लाडकी हो यार?..... अब चल नही सकते हो तो चलो घर निकलते हैI म्हंटल नही-नही चल सकती हुं, चलो. चालता येत नव्हत पण मला त्या दोघांचा दिवस घराब नव्हता कायचा. त्यादरम्यान वातावरणही इकत छान होत. आणि हे दोघे कधी कॉन्फरन्स मधून सुटून फिरायला भेटेल याचीच वाट बघत होते. म्हणून मग मी तेवढ सहन केल आणि खूप छान फिरलो. तशी माझी काळजी चालूच होती. मग काय, काळजी करणार सोबत कुणी असल तर कितीही मोठा त्रास असो तो सहन करता येतो. पण फिरतांना माझ्या डोक्यात उद्या घर सजवायचं कसं तेच चालेल होत. कारण मी जे बनवलेलं होत ते सगळ उंचावर लावायचं होत. रात्री अकराला परतलो जेवण करून आल्यामुळे येऊन लगेच पायाला गरम पाण्याने शेकवल मूव्ह आयोडेक्स वगैरे लावल पेनकिलर च्या दोन गोळ्या घेतल्या. गोळ्यांमुळे मस्त झोप लागली. सकाळी सगळी आवरासावर स्वयंपाक आवरला गुलाबजाम, छोले पुरी, पालक पनीर, तिरंगी पुलाव सगळ आवरल. हे जेवण करायला आले. तो पर्यंत यांना काही माहित नव्हत. ते म्हणाले आता आराम कर, मस्त झोपून घे. मी पण मान डोलवली. मला गोळी दिली आणि कामावर गेले. मी पण ब्लांन्केट घेतल आणि झोपली, जशी यांची सायकल निघाली तस ते काढून फेकल. वरती छताकडे पाहिलं आता कशी टेबल वर चढू? पाय तर जागचा हालत नाहीये. मग काय जेवढ्या कागदी पट्या वरती लावायच्या होत्या त्या गळ्यात, खांद्यावर टाकल्या आणि एकदाच काय ते टेबल वर सरळ उभी राहून जमेल तेवढ्या पट्या चिकटवल्या ज्या पडत होत्या त्यांनी मात्र बराच त्रास दिला. कसं बस आवरल. टॉवेल चे हंस करून टेबल सजवाला. काही कागदी फुले आजू-बाजूने ठेवली. गिफ्ट ऑलाईन आलेलं होत. सगळ आटोपलं. आणि केक घ्यायला सायकल वर निघाले. कशी चालवली ते आता मलाच आठवत नाही. कारण गुडघा लहान नारळा येवढा सुजलेला होता. मला वाटलेलं गुडघ्याची वाटी वगैरे सरकली असावी, पण मम्मी म्हणाली नाही, तस असत तर तुला वेदना सहन झाल्या नसत्या तू अशी आरामात नसतीच राहिली. ते दुखण भयाण असत. मीठ हळद वगैरे लाव. जाताना मनात खूप वाईट वाटत होत. कि आता जर मी छान नौकरीला असते तर रेडी मध्ये कुठेतरी पार्टी ओर्गनाईज केली असती. मी हे जे सगळ केल ते काही एवढ मोठ नाही. पण तस काही नव्हत. जेव्हा माझ्या नवऱ्याने घर बघितलं मी केलेली सर्वच काही तयारी पाहिली तेव्हा तो एवढा खुश झाला. त्याला खूप आनंद झाला. बराच वेळ गालातल्या गालात हसत होता. थांकू वाईफी... थांकू...थांकू... चाललेल त्याच...हाहाहः... मलाही तेव्हा अचानक खूप बर वाटल. माझ्या मनातला विचार चूकीचा जो ठरला. आता त्याचा आनंद द्विगुणीत केला तो माझ्या साडीने मी मस्त मुमताज च्या स्टाईल मध्ये साडी घातली आणि त्याप्रकारचे आंम्ही दोघांनी फोटो काढले. “आज कल तेरेमेरे प्यार के चर्चे हर जबान पर” गाण त्याला चार वेळा दाखवल. पार्टी मस्तच झाली. अगदी अनपेक्षित अशी.
       दुसऱ्या वाढदिवसाला म्हणजेच २०१७ ला केक ऑर्डर न करता त्याच दिवशी आणूया अस ठरलं. पण नेमकच त्या दिवशी इथे मोठ्या प्रमाणात वादळ सुरु होत. आणि घरातल सामानही फार कमी होत. काय बनवूया काय? खाणार? बोलता बोलता ठरलं सामोसे बनवूया आणि केक आणूया मस्तच.. आता न घरात बटाटे न वाटाणे, मग काय केक आणि बटाटे वाटणे आणायला जाऊया म्हंटल तर तू नको येउस मी आणतो सगळ. अशा वातावरणात सायकल चालवता येणार नाही तुला. हो पण केक नक्की आणा हं.. हो आणतो. आले सगळ घेऊन पण लहानशा पेस्ट्री आणल्या. केक नाही मिळाला. मला फारच वाईट वाटल.
       तिसरा वाढदिवस म्हणजे कालचा. बऱ्याच दिवसांपासून मी ठरवलेलं होत. काय करायचं ते. त्यासाठी मोठे पेपर, रंगीत तेलकट खडू फुगे आणून ठेवले. आणि छानस थोड्या काही ओळीत त्यांच्या बद्दल लिहू अस ठरवलं. २४ तारखेला अजून बराच वेळ आहे अस डोक्यात ठेऊन मी चालले. २० तारखेला रविवार असल्यामुळे आमचा दिवस आरामात सुरु होता. दोघे आपआपले लैपटॉप घेऊन चाललेल काहीतरी आपल. म्हंटल तुझ्या बड्डे ला आपण काय जेवण बनवूया?. कधी आहे माझा बड्डे? २४ ला. २४ ला आहे?? हो, २२ आहे कि २४ आहे? अठव बर जरा... मनात:-- अरे यार हि २२ आणि २४ परत एकदा गोंधळ करते कि काय? काय करू आता? सांग-सांग, कधी आहे ते. २४च आहे ओ...! तोपर्यंत गुपचूप मोबाईल बघितला मागच्या वर्षीचे फोटो अल्बम फेसबुक वर पाहिले तर २३ तारीख होती. मला वाटल २३ च्या रात्रीलाच सेलिब्रेट केला असेल म्हणून मी २४ वर ठाम होते. मग तेच म्हणाले २२ आहे २२. म्हंटल कसं काय? काय प्रूफ आहे?. तुला एकदा कुणालातरी माझी जन्मतारीख सांगायची होती आठवत का? म्हंटल हो मग पाठवलेला मेसेज बघ. अरे हो रे..................! बापरे कस-कस कन्फुजन होतंय माझ मलाच नाही कळाल. गप्प बस माझा बड्डे विसरलीस ना?, आता बघ मी तुझा बड्डे कसा करतो ते. ओह्ह्ह्ह वाह:.... मला सरप्राईज आहे तर. मस्त मोठ्ठ सेलिब्रेशन करा हं... जा आता, बघ इथून पुढे नाहीच करणार तुझा बड्डे मी. अरे नाही बाबू, मी खरच खूप छान प्लान केलाय तुला खूप आवडेल. हो केलाय ना तू..,,, माहितीये मला. तुला काय वाटत? मी काही करणार नाही का? आता काय करणार आहेस तू?.... जाऊदे. खरच तुला अस वाटत मी काहीच नाही करणार. हो करशील ना, का नाही करणार फक्त सगळ्यांमध्ये शॉटकट मारशील. स्केचपेन च्या जागी खडू वापरायचे, जेवणाच्या जागी डॉमिनोस पिझ्झा.. माहितीये मला कागद आणून ठेवलेत, खडू आणून ठेवलेत, डेकोरेशन साठी पण त्या खडूचा बॉक्स अजून काही उघडला नाहीये. आय्यो..! तुला कस कळाल? जोर जोरात आम्ही हसलो पोट दुखे पर्यंत डोळ्यात पाणी येई पर्यंत. आमची मस्ती सुरु झाली. अरे तुझा बड्डे खूप मोठ्ठा गाजावाजात साजरा करणार आहे मी. कोणत्या तारखेला? ज्या तारखेला बड्डे असतो त्याच करेल ना.. हा पण कोणती फायनल आता कन्फर्म सांग चल.. उद्या. हम्म काय प्रीपरेशन केलस? खडूचा बॉक्स खोललं नाही. हो खडूचा बॉक्स खोलला नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही होत कि माझ प्रीपरेशन नाही झाल, काय माहित खडूच काम फायनल टच च असेल? २४ तारखेला करणार होतीस ना तू खर बोल? तुला कोणी सांगितलं २४ ला करणार होते?. तूच... हो कशावरून मी २४ लाच करणार होते कदाचित ते पण सरप्राइज असेल तर., हो ते सरप्राइजच आहे पण माझ्यासाठी नाही तुझ्यासाठी हा..हा...ह:... अगदी बरोबर ना?. आता गफलत कोणी केली तुझ्या बड्डे ची सांग मला?, तू... हा..आ.आ.. मी कशी केली भाई?.., एक ओफ़िशिअलि, एक शाळेत, एक बायकोसाठी, एक गर्लफ्रेंडसाठी, एक मित्रांसाठी, मित्रांनी तर कालच विष केलय..२०लाच तुझ्या तर सगळ्यात जवळचे मित्र असतात ना? मग मित्रांनी कशी गफलत केली सांग बरं... हा विषय जर आपण आज काढला नसता तर तू उद्या आरामशीर उठली असती. अरे काय चाललय काय? हो आरामशीरच उठेल उद्या. बर उद्या काय आहे. २२ तारीख उद्या तूझ इनफ्लून्जा व्याक्सीनेशन आहे. सकाळी ९ला. अरे हो रे...! आता मला मनात खरच वाटल कि मला काहीच करता येणार नाही कारण माझा संपूर्ण दिवस पूर्ण बिझी-बीझी असेल केक पण आणावा लागेल ना? ई..ई...ई..... सगळे काम उद्याच आहेत.  ब्ल.ब्ला..ब्ला...आं.आ.आ.... तरी मी त्याला तोंडावर टेन्शन दाखवलं नाही. हसतच मस्ती करत होतो. चला आता आवरा पटपट, आला तुला कामाचा ताण....! आला..आला... विसर..णा... अजून विसर.. अर्रे पण मी पूर्ण पणे विसरली का?, अजून वेळ आहे ना? मिस झाल का काही? ओके.. ओके... तू नाही विसरलीस हं...! सॉरी हबी..! नो प्रोब्लेम.. वायफी.. म्हणूनच तुला सांगितलं सांगणार नव्हतो पण तुला नंतर खूप वाईट वाटल असत...... बस मग मला अजून काय हवात होत. आम्ही एकमेकांना इतक्या चांगल्या प्रकारे ओळखतोय या पेक्षा अजून काय हवय... आमच्या जागी दुसर कुणी जोडप असत तर कदाचित त्यांच्यात वाद झाले असते. आणि ह्या चुकीचा वेगळाच दुष्परिणामही झाला असता. हेsss “हबी” पण याच सुद्धा क्रेडीट मलाच जात बर. कारण तुला माहित होत कि मी किती जीवतोडून प्रत्येक गोष्टीची तयारी करत असते ते. Am I right?... हा सगळा विश्वास मीच तुझ्याकडून मिळवलाय तो असंच नाही बर का? लक्षात असू दे....!
      दुसऱ्या दिवशी सकाळीस लवकर उठून नाश्ता बनवून, करून. क्लिनिक मध्ये जाऊन इनफ्लून्जा व्याक्सीनेशन घेऊन आली येऊन मी ठरवलेलं चित्र पूर्ण केल. जेवण बनवून, जेवून, अकिको-सन यांच्या सोबत जाऊन केक, गिफ्ट आणल. जाते वेळी घर लॉक “ते” करून गेल्यामुळे चावी त्यांच्याकडे होती, माझी घरातच राहिली. मग ती घेण्यासाठी त्यांच्या ऑफिस मध्ये गेले. असे २.३० वाजले होते. अर्धा दिवस संपल्यामुळे मला खात्री नव्हती कि माझ ठरवलेलं काम पूर्ण करेल. म्हणून दिवसभर काम करत बसले. थोड काम बाकी असतांनाच फोन करून विचारल जेवण काय बनवू? सांगा. तर म्हणाले काही नको पिझ्झा ऑर्डर करूयात. नाही मस्त बटर चिकन आणि बटर रोटी करते. तर नकोच म्हणाले. मग काय माझ काम पूर्ण होण्याची शाश्वतीच मिळाली. मग जोमाने दोन चित्र पूर्ण केले. फुगे फुगवले---- हो मी लहान मुलांसारख सगळच घर सजवते. मला छान-छान फोटो जे काढायचे असतात. एक मात्र खर चित्र खडूने रंगवायच म्हणजे माझ्या समोर पुन्हा एक प्रश्न पडलेला होता. कि खडूने कसं रंगवतात? नाही आता बरेच वेगवेळ्या प्रकारचे रंग आपण वापरतो शक्यतो खडू नाहीच वापरत आपण, लहान मुल तेवढे वापरतात. केली सुरवात, जमल मस्त पैकी. पण रंग देतांना हात जाम झाला, बोट दुखायला लागली. कारण तेलकट खडू खूपच कडक असतात.. अस वाटत होत, माझ बाळ आता असत, तर त्याने पटापट सगळे रंग भरून दिले असते. आणि इथे आजूबाजूलाही कुणाच बाळ नाही. नाहीतर त्याच्याकडे नेऊन दिल असत. सुंदर रंग भरून दिले असते त्याने मला. ते ७ला येतो म्हणाल्या बरोबर मी मनात कधीच नाही तो आज पाहिलांदा विचार करू लागले ७.३० पर्यंत आले तर बर होईल, अजून थोड उशिरा म्हणजे माझ सगळच आवरेल. शेवटी ते अगोदरच आले. आणि आल्यावर एवढे खुश झाले. मस्तच भारी..! त्यांना माझी सगळीच आईडिया आवडली. मस्तच.. खूप छान.. माणूस भलताच खुश झाला. लहान पण कुठे हरवलं कधी येऊन गेल तेच कळाल नाही. पण आता बायको मात्र लहान मुलासारखच वागवते. याचा आनंद किती झाला आणि किती नाही ते शब्दात सांगता येणारच नाही. हो पण आम्ही ते फोटो आणि व्हीडीओ मध्ये मात्र कैद करून ठेवलेलं आहे. आणि आज दिवसभर ते फोटो दोघही किती वेळा बघत होतो ते एकमेकांना ज्या आनंदाने सांगितल ते तुम्हाला सांगण्या सारख नाही ओ.... हा:.हः..हा:.....  
         पण ह्या तीनही वर्षातून मला एकच गोष्ट लक्षात आली. आपल्याला जे दुसऱ्यासाठी करता येत ते नेहमी करत रहाव त्यात लहान-मोठ्ठ, एवढच-तेवढच आणि हे आवडेल कि नाही या यापेक्षा चांगल करायला हव होत ह्या असल्या कोणत्याच गोष्टीचा विचार करू नये..... बस खुश रहो आपके साथ जो है ओ अपने आप खुश रहेंगे........!  

आज उजळल्या या दाही दिशा,
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.....  
       


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...