मुख्य सामग्रीवर वगळा

किमोनो मॉडेलिंग.....!


       मी दिसायला खूप सुंदर आहे, माझे फोटो खुप सुंदर येतात... असंसंसं... माझ्या घरच्यांचं, मित्र-मैत्रिणींच, जे कुणीही नव–नवीन ओळखीत येतात त्यांच्या सगळ्याचंच आणि खास करून फेसबुक फ्रेंड्स, व्हाट्सएप्प फॉलोवर्स अर्थात मी जेमतेम दिसायला आणि स्वभाला देखील बर का! सगळ्याचं आवडते. हे पण मी नाही म्हणत. हे सुद्धा तेच लोक सांगतात. हा.हा..हा... हा झाला एक मजेचा भाग ओ.ओ....

       पण खरच, त्यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढत असतो. आणि हि साहजिकच गोष्ट आहे. कुठल्याही प्रकारची प्रशंसा हि मनुष्याला फक्त सुखावतच नाही तर, आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यास यश प्राप्त करून देत असते. मी “होकैदो” शहरात असतांना माझ्या एका जपानीज मैत्रिणीचा मेसेज आला. एक कार्यक्रम आहे. वय “वर्षे१३ सोहळा”. जपान मध्ये मुलींच्या वेगवेगळ्या वयाचे सोहळे केले जातात. त्याला “Shichi-Go-San” म्हणजे “Seven-Five-Three” असे म्हणतात. पुढे १३ आणि २० यावर्षांत देखील असेच सोहळे असतात. हे अगदी सणांप्रमाणे साजरे केले जातात. त्याबद्दल एक स्वतंत्र लेख लिहिलच मी, तर त्यातलाच हा एक १३वर्षांच्या मुलीचा सोहळा होता. त्याच सोहळ्यात ग्रुप मॉडेलिंग करायची होती. मी हि हो म्हंटल. त्यावर तिने पुन्हा विचारल तुम्ही दोघे हसबंड-वाईफ कराल का?, तुम्हाला वेडिंग किमोनो घालायला मिळेल. मी भलतीच खुश झाले. नवऱ्याला हाता-पाय पडले पण, तो काय एक नंबरचा “बोरिंग आयटम” आहे. नाही तर, नाहीच. जा म्हंटल ती जर म्हणाली तिथे मॉडेल आहेत तर, मग पस्ताऊ नकोस.. मी कशाला पस्ताऊ?, कर मोड्लिंग मला काही प्रोब्लेम नाही. माझ्याकडे कामाचा ढीग पडलाय हा.हा..हा... तो तरी तोपर्यंत पूर्ण होईल.. “आ..आ..आं...! चल...णारे:... तुझ्यामुळे मला “ब्रायडल किमोनो” घालायला मिळेल. का? आता का? तुला परवानगी आहे, करू शकतेस. हो का?, तुला चांगलच माहित आहे, तिथे कुणीही मुल नाहीत. त्यामुळेच तर ती तुला भाव देतेय हा.हा..हा... नाहीतरी तिने फक्त मलाच बोलावल असत. तुझी परवानगी ठेव तुझ्या खिशात. जा..आ... मीच मस्त एकटी जाईल... हम्म्म्म....

       शुक्रवारी रात्री १२,१ च्या दरम्यान “होकैदो” वरून परतलो, चार दिवस थंडीगारठ्याच फिरून जाम थकलो होतो. बघ राजू तुला जमणार असेल तरच जा, नाही तर नाही म्हणून सांग... घाबरलास का?, हाआ..हाआ..हाआ... जा बाई जा नाहीतर गोडगैरसमजुती मध्ये राहशील... सकाळी उठले तर खरच जायची इच्छा नव्हती. तरी सगळ आवरून स्वयंपाक करून १०ला तिथे पोहचलो देखील. तिथे ह्यांना बघून माझ्या मैत्रिणीला वाटल कि ते तयार झाले म्हणून आले. ती वेलकम-वेलकम बोलायला लागली तर, हा लगेच नो.नो..नो...म्हंटल भोकाड्या बाबा बघितल्यासारख काय घाबरताय???हाहाहः.... जस का ती सोडणारच नाही आता ह्याला... हा.हा..हा.... तिला काही कळलच नाही आमच काय चाललय ते... हा.हा..हा....

        हे जपानीज लोक खूप गोड बोलणारे असतात. खूप हास्य, खुललेला चेहरा अशा पद्धतीने स्वागत करतात. आम्ही मस्त सगळ्या खुश झालो. त्यात माझ्या एक “साकेय कितागावा”-सन नावाच्या मैत्रीण आहेत त्या भेटल्या जेमतेम ७५ पेक्षा जास्त वयाच्या असतील पण एवढ्या चपळ आहे ह्या वयात सुद्धा कि जराही थकत नाहीत. पाठीवर कुबड आहे. ग्रुपच्या वॉलेन्टियर म्हणून काम करतात. आमची भेट दोन वर्षा पूर्वी “भातलावणी” “(Rice Plantantion Event)” च्या वेळेस झालेली होती. तेव्हा पासून फेसबुक वर आम्ही संपर्कात आहोत. पण काही कल्पना नव्हती कि इथे भेटू. खूप आनंद झाला आम्हाला एकमेकींना भेटून. खूप गप्पा केल्या, त्या तर नाचतच होत्या. त्यांनी आणि अजून काही वॉलेन्टियर्स ने मिळून प्रक्टिस म्हणून मला किमोनो घातला, हेअरस्टाईल केली, खुप सुंदर असा मेकअप केला. त्यांना जेव्हा कळाले कि माझ्याकडेहि किमोनो आहे. तेव्हा त्यांना फारच आश्चर्य वाटले..! किमोनो फारच महाग आहे, आमच्याकडे देखील काही जणींकडे नाही. खूपच छान... हो म्हंटल, माझ्या नवऱ्याने मला लाग्नानंतर च्या पहिल्या वाढदिवसाला गिफ्ट दिला, तर अजूनच खुश झाल्या “तू खूप लकी आहेस”.... मग थोडावेळ रीहलसल केली. स्टेप्स आम्हीच आमच्या बसवल्या. अजून काही नवीन मैत्रिणी झाल्या. जेवणात मी साधा खिचडी भात नेलेला होता. कारण आम्ही दोघे चार दिवस होकैदोला बाहेरचच जेवण जेवत होतो. मग आज साधच जेवण हव होत. पण ते साध जेवण देखील त्या सगळ्यांना खूप आवडल आणि मला दुसऱ्या दिवशीही पोट्लॉक पार्टी साठी आणायला सांगितला. आता त्यांना जरी आवडला तरी आपल्यासाठी खूप साध जेवण म्हणजे खिचडी भात मग मी त्यासोबत मिसळ पावाचा बेत केला आणि सोबत काही फळे नेली. दुसऱ्यादिवशीही ८.३० ला पोहचायचं होत. माझा नवरा माझ्या सगळ्या कामात खूप मदत करत असतो. म्हणूनच मला सगळ काही शक्य होत. त्यांनी सकाळी बरीच काम केली तेव्हा कुठे माझ वेळेत आवरून सोबत आरामात ब्रेकफास्ट सुद्धा करू शकलो आणि मग मैत्रीण कार ने घ्यायला आली.

              लग्नानंतर आज मी पाहिलांदाच प्रोफेशनल ब्युटीशियन कडून मेकअप केला तस मी फारस कधी पार्लर मध्ये जात नाही. आयुष्यात हि तिसरीच वेळ होती. मेकअप आणि हेअरस्टाईल कुणा दुसऱ्याकडून करून घ्यायची. शक्यतो नेहमी मम्मीच मला तयार करायची, आणि मीही तिच्याकडूनच शिकले. पण ह्या ब्युटीशियन ने देखील मला खूपच सुंदर नटवले. खूप छान वाटत होत. आमच्या लग्नातली वर्दळ आठवली. जपानीज मुली ह्या देखील ह्या सगळ्या गोष्टीत फार हुशार आहेत. त्या दररोजचा मेकअप करतात शक्यतो बिना मेकअपच्या त्या बाहेर पडतच नाही. त्याबद्दल सविस्तर नंतर पाहूच आपण. ह्या सगळ्यांसोबत मला माझ्या किमोनो वर मैचिंग अशी छानशी लाकडी जपानीज चप्पल देखील मिळाली. मला ह्या बाबतीत नेहमी अगदी हव्या तशा गोष्टी मिळतात. आमच्या सोबत बऱ्याच लहान मुली देखील होत्या त्या एवढ्या गोड आणि सुंदर बाहुल्या दिसत होत्या. आणि बोलायलाही हुशार असल्यामुळे त्यांच्याकडे बघून मन प्रसन्न होत होते. मेकअप, ड्रेस, पोट्लॉंक पार्टी, यानंतर आमचा ३मिनिटांचा डान्स झाला. जपानीज डान्स अगदी सोप्पे असतात. अगदी हळुवार, हातांच्या काही हालचाली परफेक्ट आल्या पाहिजे. आणि तेव्हढ्या वेळेसाठी मी नवऱ्याला बोलावून घेतल. डान्स झाल्यावर माझ्या कडे मेहंदी काढण्याची जबाबदारी होती. अर्ध्या तासात ७,८ हातांवर मी मेहंदी काढून दिली. जातांना सगळ्या खुश झाल्या, संपूर्ण दिवस खूप छान गेला. अगदी मजेत... अजून बऱ्याच नवीन मैत्रिणी देखील झाल्या.

       विदेशात असे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमीच अयोजीत केले जातात. फक्त आपल्या देशस्थ कला देखील सादर करता आल्या पाहिजे. त्याचबरोबर बाहेरील संस्कृती शिकण्यात रस असला पाहिजे. तरच आपल्याला हे सगळ मजेत करता येत, अन्यथा सगळ वायफळ वाटत. शिकण्याची आवड असल्यामुळे इथे कधीही एकटे वाटत नाही. सतत काहीना-काही धडपड केल्याचे समाधान वाटत असते.


राजश्री जगताप...

                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...