मुख्य सामग्रीवर वगळा
संधी....!


         आयुष्यात कोणती संधी आपल्याकडे केव्हा चालून येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे कुठल्याही क्षणी आपण सतर्क, जागरूक राहणे आवश्यक आहे. कारण संधी हि जरी चालून येत असली तरी तिचा योग्य रीतींने फायदा घेता आला पाहिजे. आयुष्य हे येणाऱ्या संधीवरच घडत जात असते.

        “होकाईदो” शहरात कॉन्फरन्ससाठी येण्याची संधी मला दौडवायची नव्हती. त्यामुळे मी येणारच असा अट्टहास होता. तसे तेही तयार होतेच मला घेऊन येण्यासाठी त्यामुळे मला फारसे कष्ट उचलावे लागले नाहीत. त्याचबरोबर आपल्या मराठी वृत्पात्रीकेने माझ्याकडे एका लेखाची मागणी केली होती. त्यांना मी कळवले होते १३ ते १७ तारखेपर्यंत मी होकाईदो शहरात जाणार असल्यमुळे मी १२ तारखेला रात्री पर्यंत लेख पाठवेल आणि नाहीच जमले तर २० तारखेपर्यंत नक्की पाठवते. शक्यतो १२ तारखेलाच पाठवण्याचा प्रयत्न करते. तर त्या लेखासाठी मी अकीको-सन, असामी, माझ्या ह्या दोन मैत्रिणींची मदत घेतली.पण लिहिण्यासाठी मला फारसा वेळ मिळाला नाही.

         होकाईदो मधील “साप्पारो हॉटेल” चा स्टाफ बघितला तर सगळेच तरुण पिढीचे आहेत असे वाटले आणि ह्यांचेही काही विचार मत घ्यावे असे मला जाणवले. म्हणून सहजच मी एका स्टाफ ला विचारले. मी भारतीय वृत्तपत्रासाठी काही लेख लिहित असते. तुम्हाला काही मिनिटांचा वेळ असेल तर प्लीज मला माझ्या अमुक-अमुक ह्या याविषयावर तुमचे थोडे मत हवे होते. त्याने अगदी खुश होऊन त्वरित दुसऱ्या स्टाफ ला बोलावले. त्यांच्या मध्ये २,३ मिनिटे संवाद झाला. मला ५,१० मिनिटे थांबण्यास सांगितले. त्यावर मी उत्तरले, मी १० मिनिटांत रूम वर जाऊन आले तर चालेल का?, हो नक्कीच.., रूम नंबर विचारून आम्ही फोन करतो म्हणाले. रूमवर आले तर आमचे यजमान पण आलेले होते. ओह्ह्ह तुम्ही आत्ता? मध्येच कसे?, ब्रेक टाईम.. ओके.. आय ह्याव ओन्ली टेन मिनिट्स. फॉर व्हाट?, फॉर माय वन मिटिंग.. ओह्ह्ह...! रिअली... म्याडम?, एस्स्सस्... दहा मिनिटांत निघाले... बाय, सीयू...! बाय..सीयू....! ऑल द बेस्ट म्याडम.. थांकू-थांकू..., त्यांना वाटल मी सहज चेष्टा करते आणि खरच मीही सहज चेष्टा करत होते. पुन्हा खाली गेले तर तिथे स्टाफ माझी वाट पाहत होते. त्यांनी मला पुन्हा एकदा माझे प्रश्न विचारले, नक्की तुम्हाला कसली माहिती हवीय?, मी थोडक्यात समजावले आणि पुढील पाच मिनिटांत त्यांनी अगदी मिटिंग प्रमाणेच टेबल मांडला. अगदी प्रोफेशनल इंटरव्हू असल्यासारखेच. आणि खरच सांगू...!, मला खूप आश्चर्य वाटत होते त्या क्षणात आणि तेवढेच समाधान, आनंद देखील तेव्हढाच होत होता. मी कधी हे सगळ यजमानांना सांगतेय अस झाल होत. कारण, आम्ही दोघांनी सहज चेष्टेत म्हंटल होत आणि ते खर झालेलं. अर्थात तोच क्षण मला एक प्रकारची संधी घेऊन येत होता.

          आणि मग काय संपूर्ण दीड तास मी माझे प्रश्न त्यांना विचारले. माझीही काही मत मांडली. जेणे करून मला त्यांना माझे मुद्दे देखील समजावणे सोप्पे जाईल. कारण एक जपानीज स्टाफ पुरुष त्यांना इंग्लिश येत नव्हते. आणि दोन स्टाफ एक पुरुष, एक महिला या दोघांना फार छान इंग्लिश येत होते. त्यांचा संपूर्ण वेळ हा फार म्हणजे फार व्यस्त असतो. ते दिवसभर कामात असतात. परंतु माझ्या एका शब्दावर त्यांनी येवढा दीड तास काढला. मला खूप खूप खूप आश्चर्य आणि आनंद झाला. त्याच कारण अस कि कोणत्याही प्रकारची मिटिंग आपण ठरवलेली नाही. न कोणते असे ठोस कारण आपल्याकडे आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हे काही त्यांच काम नव्हत. केवळ आपण बोललेल्या शब्दाला मानसन्मान मिळतोय...???? खरच विदेशात हि संधी मिळवण फार मोठ्ठी गोष्ट आहे. हो....! हि माझ्यासाठी एक प्रकारची संधीच आहे. प्रोफेशनल मिटिंग अटेन्द करण हि माझी पहिलीच वेळ होती. आणि तीही विदेशात. यातून माझा आत्मविश्वास फार वाढला. सेल्फ कॉन्फिडन्स असणे आणि तो वाढणे ह्या क्रीयांवारच आपल्या आयुष्यातील धेय्य लवकर गाठण्यास मदत होते. आज मला मी खूप भाग्यवान असल्यासारखं भासत आहे. माझ इंग्लिश एवढ काही फारस छान नाही अस् मला नेहमीच वाटत असते. परंतु आज तेही खोट ठरलं... कारण जेव्हा आपल्याकडे पर्याय असतो तेव्हा आपण कुठल्याही गोष्टीला गृहीत धरून चाललेलो असतो. आणि आज माझ्याकडे इंग्लिश बोलण्याशिवाय पर्याय नव्हता. जपानीज मैत्रिणींसोबत काही गोष्टी भावनिक पद्धतीने सांगता येतात किंवा शब्दांची काही कमतरता भासली तर त्या माझ्या भावना ओळखून मला काय बोलायचे आहे हे त्या समजून घेतात. आणि त्यांचही इंग्लिश एवढ काही चांगल नसल्यामुळे आम्ही सारख्याला वारक्या बहिणी-बहिणीचं छानच जमत. पण इथे प्रोफेशनल इंग्लिश बोलणारे समोर आले आणि मीही खूपच छान इंग्लिश बोलू शकले. म्हणून हि माझ्यासाठी एक प्रकारची संधीच ठरली. तेही माझ्या सोबत बोलून फार खुश झाले. त्यांच्या कडून मला खूप छान अभिप्राय मिळाला. मी जपान किती आणि कोणत्या प्रमाणात अन्वेन्षण केलय हे त्यांना कळाल्यावर ते चटकन उत्तरले आम्ही देखील एवढ जपान फिरलो, पाहिलं नाही. तुम्ही फारच कार्यक्षम आहात. माझ्या स्वप्नांबाद्ल त्यांनी मला विचारले तेव्हा मी सांगत असतांनाच त्या स्टाफ चटकन उत्तरल्या “आणि तुम्ही तुमची बरीच स्वप्ने पूर्ण केलीत”....! खूपच छान आणि सुंदर देखील आहात. तुमचे हसबंड खूप नशीबवान आहेत.... बस्स्स मग अजून काय शेरा हवाय आपल्याला...?.... माझ एक छोटस काम होत, अगदी १५,२० मिनिटांच असाव पण त्या गुप ने खूप प्रोफेशनल रित्या पार पाडल अगदी वेळेचीही काही तक्रार न करता... जपानीज लोकांमधीलचा हा अजून एक गुण जो मी आज पर्यंत ऐकून होते तो स्व:नुभावला देखील.

          यातूनच मी माझ्या भविष्यातील आयुष्यात येणाऱ्या संधींना कधीच दौडवू देणार नाही याची मला खात्री वाढली. अशाच संधी मिळत राहो. मी त्या आलेल्या संधींना प्रयत्न पूर्वक मिळवून साध्य करेल. आलेल्या प्रत्येक संधीवर छापा टाकायला मला आवडेल. आपल्या साध्या सरळ आणि सोप्प्या भाषेत “प्रत्येक संधी च सोनं करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल”....  

           कॉन्फरन्स हॉल मध्ये जाऊन आधी यजमानांना सगळ सांगितलं. ते खूप व्यस्त होते, पण खुशही तेव्हढेच झाले. रूम वर आले आणि फेसबुक बघितलं तर कुणीतरी तिच्या स्वत:हा बद्दल What kind ऑफ WOMAN are you? अशी लिंक शेअर केलेली होती. मी शक्यतो अशा लिंक वर कधी जात नाही कारण आपला डाटा फेसबुक वरून त्या लिंक वर पोहोचतो. पण आज काय कुणास ठाऊक मीही सहज ट्राय करून पाहिलं आणि खरच मी माझ्याबद्दल जे काही आज अनुभवत हते तेच त्या लिंक मध्ये मला वाचायला मिळाले. हा सहज एक निव्वळ मजेत मी जोडलेला योगायोग आहे बर... फेसबुक पण ना.....!!!!! आनंदात भर घालत असत....      

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...