मुख्य सामग्रीवर वगळा

अशी हि दिवाळी....!

अशी हि दिवाळी....!      
   
          
         दिवाळी म्हणजे सगळ्यात भिकारडा सण, अशी काही मनोधारणा माझी 
बरीच वर्षे झाली होती. 
आमच्या घरात लहान पणापासूनच हे सगळ काही सुख छान आणि हव्या तेवढ्या 
प्रमाणात आम्हाला मिळत आल. म्हणजे फार काही हालाकीचे दिवस होते किंवा हे नाही
मिळालं, ते नाही मिळाल अशी काही फारशी तक्रार कधी मला कुणाकडे नव्हती. 
 वेळेकडून,  आपल्या माणसांकडून. हो त्या-त्या वयात मात्र सगळ्याच प्रकारचे 
अट्टहास केले. तेव्हा काय एवढ समजत’? अस म्हणू शकतो. मी घरात एकटीच 
लहान असल्यामुळे माझे भयंकर लाड झाले. 
त्यातल्यात्यात आजी-आजोबांसोबत सोबत राहिले म्हंटल्यावर अजूनच लाडाची. 
सगळ्याच सणांचे आनंद लुटले. दिवाळी म्हंटल कि सगळ्याच प्रकारची मज्जा 
अनुभवास मिळाली. अगदी  चुकता दरवर्षी... पण शालेय जीवनातली एक दिवाळी 
मला आठवते. मम्मी पप्पांना पैशांची थोडीफार अडचण भासली होती. 
त्यावेळेस त्यांनी दागिने मोडून आमची दिवाळी साजरी केली होती. हे काही आम्हाला 
माहित नव्हत. आम्ही काय आमचे प्लान तयार केलेले होते. असा ड्रेस घ्यायचा, 
तशी तयारी करायची, हे फराळ बनवायचं ते फराळ बनवायचं, मम्मी ह्या वर्षी आपण
अजून एक दोन फराळाचे आयटम बनवूयात नेहमी पेक्षा जास्त. मोठ्ठी दिवाळी करूया.. 
ती काय सवयी प्रमाणे हो ला हो म्हणत असे. बाकी काय अडी-अडचणी आम्हाला 
सांगत नसे. झाली, आली दिवाळी! सगळी शोप्पिंग, फराळ, रांगोळ्या, फटाके सगळ 
मोठ्या दणक्यात सुरळीत झाल. त्यावर्षी आम्ही दोघींनी पटीयाला ड्रेस घेतले.खूप सुंदर
होते. राणी मुखर्जीचा बंटी और बबली यातून ती फॅशन प्रचलित झालेली. मोठ्या 
आनंदात दिवाळी साजरी झाली.
         जेवायला बसलो असता.. आता जशी दणक्यात दिवाळी झाली तसच 
दणक्यात अभ्यास करायचा 
नाहीतरी एक-एकला असा दणक्यात हानील ना का बास रे बास....! आक्खी दिवाळी 
बाहेर काढेल तुमच्या तिघांची. आणि तू? ह्या तीन पोरांची आई, तू.. तू... जर त्यांच्या
अभ्यासात लक्ष नाही दिल तर तुझापण चांगलाच अभ्यास घेईल... काय? हो, नक्की? 
का नुसत होच?... सांगितल का यांना तू? नाही.. नाही..! तर सांग मग आत्ता.. सांगा 
तुम्हीच.. तोपर्यंत आम्ही तिघे एकमेकांकडे बघतोय. काय सांगणार आहेत हे आपल्याला?
मोठी धाकधूक... हे तुमच्या हौसे साठी आम्ही काही दागिने मोडले आणि तुमची दिवाळी
साजरी केली. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश असा कि, याची जान मुलांना नेहमी 
असावी, 
आणि त्याबदल्यात त्यांनी स्वतःहा त्यांच्या आयुष्यात नेहमी मेहनत करून यशस्वी 
व्हाव.. तर लक्षात घ्या सगळी सुख कमवावी लागतात. ती अपोआप आकाशातून पडत 
नाहीत. त्यासाठी हि सगळी तडजोड करावी लागते. आम्ही शांतपणे तिघे ऐकत होतो. 
फक्त एवढच करा अभ्यासात मेहनत करत रहा. बाकी मग, तुम्हाला तुमच्या आयुष्यात
कुठलीही तडजोड करावी लागणार नाही. 
त्यांच्या ह्या वाक्याचा असर काही दिवस अथवा महिने असावा. 
पण खेळकर बुद्धी असल्याने.... ठीक आहे... 
          काही वर्षांनी मात्र मी नोकरीला असतांना पप्पांनी सगळ्यांना स्ट्रीकली 
सांगितलेलं, काही दिवाळी बिवाळी करायची नाही. कारण, मी मुंबईत होते सोनी-सोन्या, 
मम्मी नाशिक मध्ये, पप्पा अकोल्याला मग कुठे काय करायचं.?, कुणाला काही त्याच 
वाईट नव्हत वाटल, पण मी दिवाळीच्या दोन दिवस आधी घरी जात असतांना ठरवूनच 
गेले पप्पा बोलले तर बोलूदेत मी सर्वांना कपडे घेईल, मला बोनस छान झालेला होता. 
मम्मी ने संपूर्ण घराची साफसफाई आटोपलेली होती. मग मी तिला म्हंटल चल आपण 
सगळ्यांना कपडे आणूया आणि पप्पांना सरप्राईज देऊया. ती म्हंटली, अग दीदी त्यापेक्षा
घरातल फाराळाच सामान आण.ना.!, माझे हात शांत बसत नाहीये गं....! मग तिला 
विचारल किती लागतील तुला काही हजार म्हणाली. म्हंटल तेवढच न?, मग आहेत न 
माझ्याकडे मला येवढा-येवढा बोनस झालेला आहे. आ.आ..आ... शहाणी मला सांगितले 
नाहीस.? हा.हा..हा... मस्त सगळी तयारी आम्ही दोन दिवसात केली. आम्ही खुश झालो 
आणि पप्पांना याच तुम्ही असा आग्रह केला बघतो-बघतो करत करत त्यांनी सुट्टी 
मिळवलीच आणि बरोबर लक्ष्मीपुजन ला आले. आता खर आम्ही खुश झालो. आम्ही 
पप्पांना सगळ काही घाबरत-घाबरत दाखवल. 
त्यांना मी घेतलेला शर्ट पण इतका आवडला कि म्हणाले यावर प्यांट घालायची नसते 
का?, हा.हा..हा... सगळ्यांनी सुटकेचे उसासे टाकले. आणि म्हणालो तुमची साईज माहित
नव्हती ना, चला घेऊन येऊ. आता नको मी दमलोय उद्या जाऊ. मला म्हणाले तूच चल
तुझी चॉइस छान आहे. खूप छान अशी कधीही न विसरता येणारी दिवाळी साजरी झाली.
आणि दोन दिवसात सुट्या संपल्या. भाऊबिजेच्या दिवशीच मला पुन्हा जाव लागल. 
पप्पाही दुसऱ्या दिवशी निघणार होते. मोठ्या मुशकीलीवर मी माझ्या मनाला सावरल 
घरातून पाय काढायची अजिबात इच्छा होत नव्हती, आत्या, काका, भावंडे सगळे जमलेले
असतांना मला निघायच म्हणजे माझ काळीज चिरत होत. पण नाविलाज होता. शेवटी 
मम्मी पप्पांनी त्यांच्या चेहऱ्यावर काही न दाखवता शब्दातून धीर दिला..
         ट्रेन मिळाली पण गाडीला तुफान मरणाची गर्दी, पाय ठेवायला देखील जागा 
नव्हती. मी बारीक असल्यामुळे मला सीट मिळवण्यासाठी जास्त तसदी लागत नसे. 
स्लीपर वर जागा मिळाली. शरीराला जागा मिळाली पण मनाला मात्र थारा लागत नव्हता.
मला खूप रडायला येत होत. खुप त्रास झाला. आजूबाजूला सगळे असल्यामुळे मनमोकळे 
पणाने रडता देखील येत नव्हत. प्रचंड गर्दीचा देखील त्रास होत होता. मला आयुष्यातील 
सगळ्याच दिवाळ्या आठवू लागल्या. पण का कुणास ठाऊक मनाला टोचणाऱ्या त्या 
क्षणांनी पुढील प्रवासतील चार तासात माझ सणांबद्दलच बरचसं मत बदलून टाकल. 
मला सगळ काही दांभिक वाटू लागल. मी ह्या सगळ्या गोष्टींचा खोलवर विचार करत 
गेले.
        आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केवळ ह्या सणांसाठी किती-किती मेहनत
आजपर्यंत घेतलीय. कशा-कशा वेळा त्यांनी सुखकर रीतीने पार पाडल्या आणि आपल्याला
त्याची जराही कल्पना येऊ दिली नाही. पप्पा पोलीस ऑफिसर असल्यामुळे कित्येक वर्षे
तर त्यांच्या सोबत सण साजरे करायलाही मिळत नव्हते. दिवळी, दसरा, गणपती 
कोणतेही सण असो त्यांचा चोवीस तास बंदोबस्त असायचा. एवढ्या भयंकर कामच 
स्वरूप सांभाळून ते घरीही फार छान लक्ष देतात. मम्मी तर दिवाळीच्या आठ 
दिवसांपासूनच कामाला जुपलेली असायची. सुखासाठी किती झटतात न ह्या बायका..!? 
भांडी घर स्वच्छ असल तरी दिवाळी ह्या शब्दामुळे त्या एवढ जीवतोड काम करतात. 
कि सार काही घर लख्ह उजळवून टाकतात. आपण कधी विचार केलाय का याचा कि 
ह्या कामानंतर हाताची बोट फुटून निघतात, तळवे फणफण करतात, कंबर पाठ जाम 
झालेली असते. त्यात शरीराला किती दुखापत होत असते. लागत-भागत पण ह्या 
सगळ्या गोष्टींकडे दूर लक्ष करून पुढच्या कामाची तयारीहि फार जोरदार सुरु असते. 
ती म्हणजे रात्रीची एक दोन पेनकिलर घ्यायची, खोबरल तेल दोन्ही हातांना चोळायच, 
कापलकुपलेल असेल तर एखाद ब्यान्डेज लावायचं झाल सगळ काही ठीक. कि उद्या 
पुन्हा कामाला नव्याने सुरवात. फराळाचा प्रत्येक पदार्थ हा फारच नाजूक असतो. 
सगळ्याच वस्तू तळून-भाजून, मोजून-मापून घ्यायच्या असतात. सगळे पदार्थ अगदी 
जीव लावून बनवावे लागतात. त्यात तीळ मात्रही चूक झाली तर सगळीच फेक झोक होते.
बर एवढच नाही हं.... सगळ्याच पदार्थांचे आकार एक सारखेच आले पाहिजे, रंग हवा 
तसाच भाजल्या-तळल्या गेला पाहिजे, तुटकी-फुटकी जडण-घडण अजिबात स्वीकार नसते.
पण, मम्मी मात्र कधीही कशातही चुकत नाही. तीच दिवाळी फराळ, उन्हाळी फराळ, 
सगळ्याच प्रकारच जेवण हे फक्त चाविलाच नाही तर दिसायलाही अगदी सुरेख 
असल्यामुळे ती यातही फार चोख रित्या काम करत असते. त्याचबरोबर छान-छान 
रांगोळ्या, कंदील बनविणे, सुरेख पणत्या बनविणे, फुल-तोरण, एखाद्या वर्षी घराला रंग 
देणे, फटाके, पाहुण्यांची उठबस. अशी बरीच खूप खूप काम.  
        आता हे सगळ काही माझ्या साठी नवीन नव्हत, लहानपणापासूनच आपण हे 
सगळ घराघरांत पाहत आलोय पण का कोण जाणे मला सगळ काही दुख:द वाटत होत. 
सगळा काही त्रास ताण मला ह्या विचारांत जाणवत होता. सगळ असह्य होत होते. 
काही चुकीच्या गोष्टीही आठवत होत्या जसे उदा:- बहुतेक लोकांच्या घरात सणासुदिचीच 
भांडण होत असतात. त्यात सगळ्यात जास्त मला वाईट वाटत होत ते त्या स्त्रीच जी 
राब राब राबून देखील तिला त्याचा मोबदला असा वाईट मिळतो. लक्ष्मीपूजन च्या 
दिवशीच एका शेजारील घरात कडाक्याच भांडण झाल, फराळाच्या ताटांची देवाणघेवाण 
सुरु होती. शेजारील काकू-मामी आल्या, देवाणघेवाणीच काम झालय मग निघायचं न.?,
 तर त्या बाई बद्दल टीका करायला सुरवात केली. त्यावर आमच्या मम्मी ने तिला 
इतक छान उत्तर दिल. “अस कशाला बोलता हो? ती पण बिचारी आपल्या सोबत 
गेल्या आठदहा दिवसांपासून राबराब राबतेय. तिला तिच्या मेहनतीच फळ अशा प्रकारे 
मिळाले तर ह्यात तिची काय चूक आहे. थोडासा समजूतदारपणा जर घरातल्यांनी 
दाखवून हे सगळ टाळल असत तर ती बिचारी किती सुखावली असती.”? कधी-कधी 
वेळेची साथ असण सुद्धा गरजेच असत”... त्या टीका करणारीच मत चटकन क्षणार्धात 
बदलल.. हो...ओ..हो.हो... बरोबर बोलताय तुम्ही... मला त्या दुखः सोसणाऱ्या बाई पेक्षा 
जास्त ह्याच बाई वर दया आली. 
तर, थोडक्यात.! मला इथेही एक दुखद, वाईट क्षण आठवलेला होता.
        ह्या सगळ्या भावनिक दुःखात कळलच नाही दादर केव्हा आले. झोपेतून जाग
अल्याप्रमाणे मी हडबडून उठले. ब्यागा घेतल्या आणि धावपळ करत सेंन्ट्रल लाईन 
पासून वेस्टर्न लाईन घेतली दादर ते बॉम्बे सेंन्ट्रल फास्ट लोकल च्या दरवाजात उभी 
राहून ह्या नाशिक ते दादर मधील जे काही मनात विचारांनी थैमान घातल होत त्याचा
निष्कर्ष लावला. आणि खर सांगते तो असा काही मनाला भावला. कि त्यावेळेस 
स्वताला देखील पटवून घ्यायला जड जात होत. 
        तो म्हणजे “स्वतःच्या मनाने घरातील सुखाची उचललेली जबाबदारी”....! होय..........! हे कटू सत्य मलाही तेव्हा पचवने अवघड झाले होते. तस पाहता हि काही पहिलीच वेळ नव्हती माझी, परंतु ती मजेने घेतलेली जबाबदारी होती आणि आजची जबाबदारी खरोखरच खूप वेगळी वाटली.  
त्याच कारण असे कि, आपण कमवलेला पैसा, आपण घेतलेली मेहनत हि खर्च झालेली 
होती. त्याच क्षणाला कळाले, कि आई वडील मुलांना सुख देतांना त्यांना कोणत्या 
चरख्यातून पिळून निघावं लागत. 
वाचकहो.. मी काही एवढी मोठी गोष्ट केली नव्हती. पण तरी देखील मला त्यातून जर 
आयुष्याच मर्म लक्षात आला असेल. तर नक्कीच ती गोष्ट सगळ्यांसाठी मोठी आहे. 

        आणि मनापासून अजून एक गोष्ट. तिथून पुढे मला कुणाहीसाठी कोणतीही 
जबाबदार घेतांना कधीहि त्रास झाला नाही. ती मी स्व:खुशीने आनंदाने घेत आले. 
चार तासाच्या त्या दुख:द भावनिक प्रवासात मी माझ आयुष्य बदलवल. खऱ्या सुखाची 
जाणीव त्या दिवशी झाली. 
तेव्हापासून मी कधीही कुठलेही सण फार काही आवडीने किंवा खूप धार्मिकतेनेही केले 
नाहीत. फक्त माझा सभोवताल सुखावतोय यासठी करत आले. खूप महिलांची तक्रार 
असते सणावाराला हे नाही, ते नाही. असंच नसत, तसच नसत. पण मी मात्र 
एकमेकांना भेटता यावे, एकमेकांतील गोडवा वाढावा, आपल्या सोबतनिस जो कुणी 
असेल त्याला छान-छान पदार्थ खायला मिळावेत, आपल्या कडे असणार किंवा 
आपल्याला सहजासहजी देता येत असणार सुख-आनंद वाटणे, मुख्य आणि शेवटच 
म्हणजे आपल्या समाजसुधारकांच्या हेतूने चालण्यासाठी हे सगळे सण साजरे करते. 
यात कुठलीही श्रद्धा, अंधश्रद्धा, वा रूढी परंपरा चालवणे मला मान्य नाही. 
 
अशी काही दिवाळी मला साजरी करायला आवडते.      
     राजश्री जगताप....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...