मुख्य सामग्रीवर वगळा

दोहो पार्क.....



दोहो पार्क.....



आधी व्हिडीओ बघा आणि मग सांगा.....!, आहे कि नाही “मनमोहक” आमच त्सुकुबा मधील दोहो पार्क?,......  व्हिडीओ मोबाईल मधला असल्यामुळे फुलस्क्रीन नाही. पण “मनमोहक” जरूर आहे....  
     
       घरापासून अगदी जवळच मोठ्ठ पार्क आहे. थोडफार जंगला प्रमाणे देखील वाटत. लांब सडक एक नागमोडी वळणाचा रस्ता आणि त्याच्या दुतर्फा भरपूर झाडी, ह्या झाडांचे रंग ऋतू प्रमाणे बदलत असतात. मुख्य म्हणजे त्यामधून डोकावणारा सूर्य.... सकारात्मक उर्जा निर्माण करणारी सूर्याची पिवळी तांबूस किरणे,
 

 एक छोटस तळ त्यात बदके पिले सुरेख, प्रत्येक ऋतू मधील फुले जसे आत्ता सुरु असलेला ऑटम, चेरी ब्लोस्सोम, टूलीप सगळ्याच प्रकारचे सौंदर्य ह्या छोट्याशा पार्क मध्ये सामावलेले आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर या सगळ्याच ऋतूंच्या समीकरणातून विवध सण जपानीज परंपरेने ह्या पार्क मध्ये साजरे केले जातात.

       पॉटलॉक पार्टी साठी खूपच साजेस अस ठिकाण आहे. घरी जेवण करायला कंटाळा आला कि डबे घेऊन दोहो पार्क मध्ये जायचं हे आमच ठरलेलं असत. सुट्टीच्या दिवशी बाहेर कुठे गेलो नाही तर, तिथे जाऊन फोटो काढत बसायच. वरील सांगितल्या प्रमाणे सगळ्याच ऋतुंमधील निसर्गाचे फोटो फार छान येतात. मग काय निसर्गाच्या सानिध्यात वेळ कसा निघून जातो हे कळत सुद्धा नाही. मी जॉब ला नव्हते तेव्हा सायकल, पुस्तक, मोबाईल आणि ल्यापटौप घ्यायचा ते थेट दोहो पार्क गाठायचं २,३ तास गाणी ऐकत हव ते काम हि व्ह्यायचं, वाचन, आणि फोटो काढायचे संपूर्ण आयुष्यच रेफ्रेश झाल्या सारखे वाटत.

      दोन दिवसापुर्वी काही कामानिमित्त दोहो पार्क मधून गेले. एवढा सुंदर नजरा पाहून तिथून पुढे जाऊच नये वाटत होत. पण काम महत्वाच होत. मग येतांना फोटो काढूया, पण विचार केला फोटो पेक्षा व्हिडीओ सुंदर येईल. मग पुन्हा आठवलं येतांना दुसऱ्या कामासाठी दुसऱ्या रस्त्याने यायचं आहे. जाऊदेत उद्या स्पेशल व्हिडीओ साठी येऊन लाईव्ह व्हिडीओ करू. गाण पण ठरवलं. “तेरी उम्मीद, तेरा इंतजार करते हैI ऐ सनम हम तो सिर्फ तुमसे प्यार करते हैI” कारण ह्या गाण्याच्या सुरवातीला जशी व्हीडीओ ग्राफी आहे. त्याच प्रकारची झाडे जपान मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. अशा ठिकाणी माझे बरेच सुंदर-सुंदर साड्यांमध्ये सुंदर-सुंदर फोटो माझ्या ह्यांनी काढलेले आहेत. त्यामुळे हे गाण नेहमी माझ्या ओठांवर असत. त्यात पुन्हा लक्षात आल फेसबुकवर ऑडीओ सहित पोस्ट नाही होणार. त्याला मी पर्याय युट्युब च्यायनल बनवलेला आहे. मग लिंक शेअर करू. आणि मस्त सकाळी येऊ. त्या व्हिडीओसाठी सकाळीस लवकर उठले, बघते तर पाऊस हुशश्श्श्...! दोन वाजे पर्यंत वाट पहिली मग थोडफार ऊन पडले तेही तीन ला पुन्हा अंधार सुरु होतोच. म्हणून झटपट आवरल निघणार तेव्हा लक्षात आले गाण व्हिडीओ मध्ये एडीट कराव लागेल. त्यापेक्षा गाण लावूनच व्हिडीओ काढूया, पण पुन्हा समजले कॅमेरा ऑडीओ सोबत काम करत नाही. आता काय करणार?. जुना मोबाईल दहा मिनिटे चार्ज केला मग काय दहा मिनिटांत पोहचले दोहो पार्क मध्ये.

             आता सायकल वर हा स्टंट करायचा. एका मोबाईलने सायकलच्या बास्केटमध्ये गाण गायला सुरवात केली. एक मोबाईल त्याच्या आत निसर्गाला कैद करत होता. आणि मी एका हाताने सायकल दोन-दोन मोबाईल सांभाळत होते. सहा मिनिटांच गाण आणि रस्ताही तेव्हडाच असल्यामुळे मला दोन्हींचा अंदाज छान होता. ३.५० मिनिटाच गाण होई पर्यंत व्यवस्तीत जात होते तशी सायकल धडपडली मीही तिला सोडून दिल. आणि पाय रोऊन उभी राहिले. अधी मागे पुढे पाहिलं हं...अं.... कुणी नाही, हुशश्श्श्...वाचले...! हा.हा..हा... बास्केट मधला मोबाईल आपटून स्वीच ऑफ झाला. म्हंटल चला उर्वरित अडीच तीन मिनिटांच गाण आहे. अजून एकदा धडपडल तरी चालेल हा..हा...हः.... आणि अशा पद्धतीने शेवटी निसर्गाच्या सानिध्यात असतांना निसर्गाची साथ नाही असे कधी होईल का? आणि ह्याच सिद्धांतावर समुद्र किनारी, नदी किनारी, किंवा लहानशा पार्क मध्ये काअसेना आपण जो वेळ घालवतो तो केवळ सकारात्मक उर्जाच घेऊन येत नाही तर कुठलेही अडखळलेले काम पूर्ण करण्याची ताकत निर्माण करत असतो. कधी-कधी आयुष्य फार किचकट आणि प्रश्नांनी भरलेल वाटत, अगदी थोडा वेळ अशा ठिकाणी निवांत जाऊन बसल कि सगळेच प्रश आपसूक सुटून जातात. सगळ्यांनी उत्तरे जणू काही त्या वेळेकडे असतात. आणि ह्या सगळ्या विचारात मी माझा व्हिडीओ पूर्ण केला. इथे माझ्या युट्युब च्यायनलची लिंक मी शेअर करते.

       आयुष्यात यापेक्षा सुंदर आणि शांत शीतलता दुसरी कुठली असेल...

अस आमच दोहो पार्क त्सुकुबातील सर्वात छोटस, पण चित्ताआकर्षक, मनमोहक, सुंदर..... दोहो पार्क.....!


राजश्री जगताप.....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...