मुख्य सामग्रीवर वगळा

#PingPong_Vegetables....


                   मी हि रेसिपी शाळेत असतांना एका वर्तमानपत्रात वाचली होती. तिचा रंग आणि नाव आम्हाला फार आकर्षक वाटले. तो म्हणजे “बीट” वापरल्यामुळे. आणि वाचल्याबरोबर आम्ही तिघा भावंडांनि चल आपण बनवूया?. हा चल.., पण मम्मीला विचारल तर ती ओरडेल. कारण, आम्ही खूप पसारा करून ठेवायचो. स्वयंपाकघरात काहीही बनवून झाले कि बाहेर पळायचो, बाकी सगळ तिला आवराव लागायचं. मग काय विचारल घाबरत-घाबरत.. करा काय करायचं ते, जास्त भांडी काढू नका... नही काढणार--नही काढणार, मोठ्या उत्साहात सुरुवात केली. रविवार असल्यामुळे सगळा भाजीपाला घरात होताच.
                   सगळ्या भाज्या निवडून, कापून उकडवून घेई पर्यंत बराच वेळ लागला. माझ्या हाताखाली दोघ पटापट काम करू लागले. त्यात भाऊ सगळ्यात लहान त्याची भारी लुडबुड, दीदी काहीतरी बनवतेय म्हणून तो आपला भारी खुश. नंतर त्याला सांगितल तू जा टी.व्ही. बघ आम्ही तुला बोलावतो तयार झाल्यावर. पाच मिनिटांत त्याच्या चार फेऱ्या झाल्या. सगळ सारण तयार होई पर्यंत बाहेरून जोरात आवाज आला. झाल का रे तुमच?, माझ शिवणकाम झालय. पप्पा येतील आता, मला त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे आवरा लवकर.. अग मम्मा तुला अजून काही बनवावं लागणारच नाही हे खूप हेल्दी आणि हेवी आहे. पोट भरून जाईल. गप्प बसा आणि बाहेर या तिघे पण. तिला विश्वास नव्हता आम्ही काय करतोय यावर आणि पप्पांना रोज काय जेवण हव हे तिला माहित होत.
                  पप्पा आले, का रे काय करताय?, अभ्यास नाही का तुम्हाला?, कायरे...?!, यांना काम सांगत बसते, त्यांना अभ्यासाला बसवायला तुला काय रोज सांगाव लागत... ती आपली गप्प होऊन आत आली “वड्याच तेल वांग्यावर निघणार” तेव्हढ्यात म्हंटल झाल मम्मा...! आता फ्राय करतो बस १० मिनिट दे... काय उद्योग केलेत दाखवा मला. त्या आकर्षक रंगाकडे बघून तीही आमच्यावर भाळली. तेलाच काम आम्हाला नको म्हणून स्वतःच PingPong Vegetable चे Balls तळून दिले.
पप्पा फार काही रोजच्या पेक्षा वेगळ जेवण करत नाहीत. पण तरी आजचा पदार्थ सगळ्यांनी फस्त केला. आणि थोड्यावेळात पप्पा म्हणाले, दे जेवायला...! हा.हा..हा... आम्ही तिघे फार हसलो.... हे काय आहे जेवण आहे ना?, नाही, याला जेवण नाही म्हणत नकली आयटम असतात हे... त्या पोरांनी एवढ भारी काहीतरी केलय तरी तुम्हाला समाधान नाही... लागली बिचारी मम्मी “स्वयंपाकाला”... नवऱ्याच्या आवडीनिवडी पुढे सगळ्याच गोष्टी हारत असतात.. पण आम्हाला मात्र हा नवीन पदार्थ फार आवडला. चवीलाच नाही तर तो स्वतःच्या हातांनी बनवला म्हणून देखील... भलतेच खुश झालो.. तेव्हा पासून मी बीट कुठेही पाहिलं तरी मला त्या रेसिपीची आठवण येते.
               आज मी खूप वर्षातून बनवले पण, तो दिवस आठवून-आठवून, गोष्ट छोटीशीच असते, पण त्यातला आनंद खूप मोठा असतो.

रेसिपी पाहूया:--

साहित्य:-- बीट, गाजर, वाटाणे, मका, फ्लॉवर, बटाटा, धना पावडर, जीरा पावडर, अद्रक, लसून पेस्ट किंवा किसलेले, लिंबू, मीठ, कोथिंबीर आणि ब्रेड.

कृती:-- बीट सोडून सगळ्या भाज्या बारीक कापून, थोड मीठ घालून, कमी पाण्यात उकडून घेणे, वेगळ्या भांड्यात बीट, अद्रक, लसून किसून घेणे... सगळ्या भाज्या एकत्र करून, बाकीच्या साहित्याच मिश्रण करणे. थोडस मीठ पुन्हा घालणे. हवे त्या आकाराचे बॉल्स बनविणे. आणि ब्रेड हलकासा ताटलीत बुडवून(अगदी थोडस पाणी वापरावे) घडी न होता पिळून घेणे, त्या ब्रेड मध्ये मिश्रणाचा बॉल ठेवून सगळ्या बाजूने घट्ट करणे. बॉल्स जास्त ओले झाल्यास मायक्रोवेव्ह मध्ये थोडे गरम करून घेणे. छानसा गोल्डन रंग येई पर्यंत तळणे. अगदी हळू-हळू तळावे, फुटता कामा नये. वरतून भरपूर चीज घालून, केचअप किंवा चटणी सोबत सर्व्ह करणे...

टीप:-- १-बीट उकडायची अवशकता नाही, रंग महत्वाचा आहे. २-चीज बॉल्स वरतूनच पसरवणे कारण, ब्रेड फार नाजूक असल्यामुळे बॉल्स तेलात फुटू शकतात.

स्टॉक सूप:-- भाज्या उकडतांना जास्त पाणी वापरल नसल्यामुळे हे सूप कमी होते. वाया जाऊ नये म्हणून ते करू शकता. गरम तेलात जिरे, कांदा फ्राय करून, हिरवी मिरची, कॉर्न फ्लॉवर च चमचा भर पाणी, आणि मीठ घालून एकम यम्मी सूप तयार...
.
टीप:-- दोन्हींच्या साहित्याचे प्रमाण चवीप्रमाणे घेणे....

©राजश्री जगताप....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...