मुख्य सामग्रीवर वगळा

तूच माझी Valentine.......!


तूच माझी Valentine.......! 
    
भाग-१
         बारा तारखेच्या रात्रीच्या बारा नंतर कानाजवळ फूसफूस करतोय Happy Valentines Day... मी ब्ल्यांकेट मध्येच हळूच हसले येड्यायाया उद्या तेरा तारीख आहे. अस बोलू वाटल होत, पण म्हंटल जाऊदे, जाऊदे गम्मत बघ.. I love you Raju... हा.हा..हा... सकाळीस उठल्याबरोबर अरे..!, आज तेरा तारीख आहे, मी रात्रीच विष करत होतो तुला... गालातल्या गालात हसले.
एरवी नेहमी म्हणत असतो “मी असले डे वैगरे काही साजरे करत नाही ग.. प्रेमाचा एक दिवस ठरवावा लागतो.. याचा अर्थ किती दयनीय परिस्थिती त्या “प्रेमाची” आजच्या युगात झालीय बघ”....!

         असच मला लग्न ठरल्या नंतरच्या Valentine च्या दिवशी म्हणालेला. पण न विसरता आठवणीने त्याच्या आधल्या रात्री फोन वर विचारून मला विष मात्र केल. लग्न ऑगस्ट मध्ये ठरलेलं होत. फेब्रुवारीच्या तेराला रात्री विचारतोय “तर, मग उद्या Valentine Day! आहे. मी विष करायचं का तुला? हा.हा.हा.. अग हसतेय काय?, बोल... जाऊदे करतो विष Happy Valentines Day..! I love you म्हणू का? अजून जोरात हसायला आल. जाऊदे म्हणतो I love you...! अजून हसायला आल. काय मी जोक मारतोय का? नाही नाही मला असच हसू आल. जाऊदे चल माझ्याकडे ३.३० झालेत मी झोपतो. मला नाही कळाल तुझ्या मनातल काहीच... गुड नाईट.

         दिवसभर दोघेही भरपूर कामात असल्यामुळे फारसा काही विषय नाही झाला. रात्री फोन केला. ब्ला ब्ला ब्ला सगळ बोलण झाल.. अग काल मी तुला विष केल, पण, तू मला आज सकाळ पासून एकदा पण विष नाही केलस...? काही बोलली पण नाहीस.. काही विषयच नाही..  “मी असले डे वैगरे काही साजरे करत नाही ओ.. प्रेमाचा एक दिवस ठरवावा लागतो.. याचा अर्थ किती दयनीय परिस्थिती त्या “प्रेमाची” आजच्या युगात झालीय बघा”....! हा.हा...हा.... “हमरी बिल्ली हमकोही म्याव” Unique आहेस तू.. म्हणून मला आवडतेस. {मनात:- तू तर माझ्या पेक्षा जास्त Unique आहेस... जे लग्न ठरून सहा महिन्या नंतर I love you... म्हणू का विचारतोयेस... म्हणून तूपण मला आवडतो.. हीई.हीई..हीइई....}

         बर जाऊदे चल तुला Valentine Day ची स्टोरी माहित आहे का? नाही मी चोवीस तास ल्यापटॉप च्या समोर नसते, जे मनात येईल ते गुगल बाबा ला विचारत नाही बसत.. हा.हा..हा... किती बोलते तू मला... मग बरोबर आहे ना..? माणूस ल्यापटॉप समोर असला कि खूप हुशार असतो ना...? जाऊदे जाऊदे विषयच सोडून दे आता...
         जाऊदे हे सगळ जाऊदे तुला कुणी कुणी विष केल?, ओह्ह्ह.... खरा मुद्दा हा होता तर...?, याची वाट पहात होते काआआ?, आता तू कुठल्याच विषयावर बोलत नाहीस मग मीच नवीन नवीन काहीतरी बोलतोय... मला तर खूप जणांनी विष केल. किती? बोटावरमोजता येणार नाहीत. जाऊदे मग नाव सांग?, कशाला म्हणजे तुम्हाला त्यांच फेसबुक रिसर्च करायला का?, बर मग....???? काही गमती जमती सांग चल... होओओओ... भारी गमती आहेत, सांगते....हं...!

          बघा, मी कॉलेज मध्ये असतांना ठार येडी होते.. हा.हा..हा...! हो.ओओ... मला ह्या सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या आणि काही कळायचं सुद्धा नाही. सिनियर कॉलेज “फर्स्ट ईयर” ला मी “ज्वेलरी डिझायनिंग” करत होते. त्यात आमच एक फंक्शन होत. कि आज पर्यंत आम्ही जेव्हढ्या डिझाईन्स काढल्या आहेत त्यातून सिलेक्शन होणार आणि त्यांच तीन दिवस १४ ते १६ फेब्रुवारी “एक्झीबीशन” ठेवलं जाणार. सगळ प्लानिंग दिपाली मिस ने आम्हाला सांगितल आराखड्याच्या काही प्रिंट्स पण दिल्या. आता आम्हा मुलींचा विषय आला तो म्हणजे ड्रेस काय घालायचे. आम्ही जाम खुश होऊन मिस ला विचारल, तीन दिवसाच्या तीन थीम ठरल्या. पहिल्या दिवशी साडी, वेस्टर्न, शेवटी एक रंग...
आता क्लास सुटला. फार दुखी होऊन विचार केला, माझ्या कडे नवीन छान साडी नाही,?.. मग काय? नवीन घे एवढ काय त्यात. पण घरी हाता-पाया पडून घ्याव लागणार.. पडले, रडले... मिळाले पैसे... मग क्लास मध्ये ठरल चला आपण सगळे राजश्रीला साडी घ्यायला जाऊ... ग्रुप ने दादरला गेलो. छान लाल(मरून) रंगाची भारीतली बांधणीची साडी घेतली. घरी आल्यावर जाम खुश होते गाणे म्हणत, नाचत मज्जा चालली होती. पप्पा घरी आले. त्यांनी हा सगळा प्रकार पाहिला.. सगळे वारे उलट दिशेला वाहू लागले. हिला कॉलेज ची हवा लागली. ही बिघडली, हिला कोणत्या तरी मुलाने साडी घेऊन दिली...

        सत्यानास्स्स्स.... आता पुरावा म्हणजे “एक्झीबीशन” च्या प्रिंट्स. झाल कसं तरी सावरल. पण शंका हि संपलेली नव्हती. सगळी तयारी आटोपली ब्लाऊज, ज्वेलरी, मेकअप सगळ साहित्य जमा झाल. “एक्झीबीशन” साठी काही नवीन डिझाईन बनवायच्या होत्या त्या पण तयार झाल्या.

       झोपले काहो....?, नाही नाही बोल ऐकतोय...(आमच्या फोन च्या गप्पा चांगल्याच रंगत चालल्या होत्या) मी उत्सुक आहे शेवट ऐकायला... तू बोल ऐकतोय. हा.हा..हा..., हा मग पुढे.... कॉलेज पण जोरात चालू होत. त्यातच मध्येच शेख मिस ने सांगितल १४ तारखेला इतिहासाचा पेपर आहे(महिन्यातून एकदा होणारा). मी ओरडले आ.आ... मिस...?, का ग राजश्री? तुला Valentine Day ला कुठे जायचं आहे का?, हो मिस... संपूर्ण वर्ग माझ्यावर हसला. गर्ल्स कॉलेज असल तरीही..., तस नाही मिस, माझ डिझायनिंग च “एक्झीबीशन” आहे. मिस ला पण विश्वास नाही बसला.. नेमकं कसं तुझ त्याच दिवशी आहे, नाही मिस ऐकूण तीन दिवस आहे, तो पहिला दिवस आहे. पुन्हा सगळ्या हसल्या. गेली ती वेळ कशीतरी. त्यासाठी मी सगळ्यांना आमंत्रण दिल.  

        आला “Valentine Day” मस्त साडी नेसून तयार होऊन सकाळीस लवकर क्लास मध्ये जाऊन तिथे रांगोळी वैगरे काढली. सगळी सजावट झाली. दिपाली मिस ला म्हणाले, मिस मुझे कॉलेज जाना है, हमारा History का एक्झाम हैI इथे पण सगळे हसले. मिस ला पण हसू आल, पण त्या हसल्या नाही. त्यांनी हसू आवरल. आणि सगळ्यांना शांत केल. पर तू सारी पे कॉलेज जायेगी?, हा मिस अब क्या करू हमारा हर महिने एक टेस्ट होता है वह देनाही होगा. “दिपाली मिस खूप छान आहेत”. अच्छा जा पर संभलकर जाना, तू सारी के ऐक्साईटमेंन्ट मे गडबडी कर देगी... नही मिस मै ठीक से जाऊंगी.. आणि तिथेच धडपडले. देख..देख....देख.... अभी से शुरू होगई.... हा.हा..हा... बाकी ग्रुप ला कुणालाही विश्वास नव्हता कि मी गर्ल्स कॉलेज ला आहे आणि पेपर साठीच जातेय सगळ्यांना खोटच वाटलेलं होत.

       आता पुन्हा कॉलेज मध्ये पोहचले, सगळ्यांना माहित होत कि माझ “डिझायनिंग एक्झीबीशन” आहे. पण मी साडी नेसणार हे नव्हत माहित. मग पुन्हा सगळ्यांची शंका एकदम खात्रीत बदलली. मिस पण लट्टू झाल्या, त्यांनी माझ फार कौतुक केल, कसा तरी पेपर लिहिला आणि पळाले.. कोणी काही बोलो, मला दिवसभरात किती काम होते आणि धावपळ होती ते माझ मलाच माहित होत. फार मेहनत केली होती मी ह्या दिवसासाठी. कॉलेज चा अभ्यास, डिझाईन चा अभ्यास-प्रक्टिकल, साडी ची तयारी कारण तेव्हा जेमतेम वस्तू होत्या त्यातच सगळ जमा करायचं फार अवघड होत. चर्चगेट ते चर्नी रोड च्या प्रवासात मला माझ्या दोन्ही मिस खूप खूप आवडत होत्या कारण त्यांनी माझ तोंड भर कौतुक केल होत. मी खूप खुश आणि आनंदात होते. त्याच बरोबर मला हेही जाणवत होत. कि जी गोष्ट आपल्याला माहित सुद्धा नाही, काय असतो हा दिवस? काय करतात? नक्की कशा पद्धतीने साजरा करतात? वैगरे वैगरे.. त्यावर आपला सभोवताल आपल्यावर किती शंका घेत आहे., किती अविश्वास दाखवत आहे. पण मला जो आनंद जे सुख मिळतंय ते वेगळच आहे. नाही...?,,

        क्लास मध्ये येऊन थोडावेळ छान पद्धतीने घालवला, थोडा अभ्यास, थोडी माहिती घेण देण, एकमेकांच्या डिझाईन्स बघन, बरेच पालक, मुल आलेले होते त्यांना आपल्या डिझाईन्स दाखवण, त्यात काय वापरल आहे?, किती पर्यंत एक डिझाईन जाऊ शकते. अशी बरीचशी माहिती दिली घेतली. खूप छान सुरळीत एक्झीबीशन सुरु होत. त्या दिवशी मी खूप काही शिकले होते.. खूप काही... माझ्या आयुष्यातल सर्वात आवडत वर्ष म्हणजे माझ सिनियर कॉलेज च फर्स्ट ईयर.. आमच्या शेख मिस नेहमी म्हणायच्या कॉलेज ची हि तीन वर्षे गोल्डन ईयर्स आहेत मुलींनो मनसोक्त जगा... कारण ह्या वर्षा नंतर कोण कुठे जाईल?, काय करेल?, घरीच बसेल, लग्न होईल त्यामुळे एन्जोय युअर धिस थ्री ईयर्स आणि ह्याच मनसोक्त जगण्याचा आनंद मी फार वेगळ्या पद्धतीने घेतला होता. लोक आपल्या बद्दल कधीही चांगला विचार करू शकत नाहीत म्हणून आपण चांगल वागायचं सोडून द्यायचं का?, नाही अशाच पद्धतीने जगायचं. “मुख्य म्हणजे, हव तसच जगायचं”.... आणि तीच गोष्ट मी आजही करते.... मी समाजाकडे कधीच भीतीच्या नजरेने पाहत नाही.

        तेव्हड्यात मिस म्हणाल्या चलो लंच के लिये जाते हैI गायवाडीच्या राजा रेस्तौरंट मध्ये मस्त छान पैकी तिखट व्हेज कोल्हापुरी, गार्लिक नान, आईस्क्रीम... भारी पार्टी झाली. पुन्हा एक्झीबीशन मध्ये छान सुंदर आणि सुखद दिवस घालवला. घरी जातांना पुन्हा पाणीपुरी द्नकावली... रात्री नऊ ला घरी हजर.. मम्मीचा मोबाईल नेलेला होता त्यामुळे सहा दहा फोटो घरी येऊन दाखवले मग घरी सगळ्यांना छान वाटल.... मी वाया गेले नाही, आणि नाही मला कॉलेज ची हवा लागली. हा.हा..हा... याच समाधान मनोमनी लाभत होत..... मी चुकीची नाही, आणि पुढेही चूक वागणार नाही...    
फार मोठी गम्मत होती हि, आयुष्यात कधीही न विसरता येणारी...

         तुम्ही कुठे गायब झाले ओ....? मी फार मन लावून ऐकत होतो. मला सुरुवातीला जाणवलच नाही कि तू नक्की काय सांगणार आहेस. मी फार गमतीत सुरवात केलेला विषय होता, पण त्यातूनच खरच मला माझी बायको कळाली... “मला तुझ्या पेक्षा स्वतःवरच जास्त अभिमान वाटतो कि मी तुझी निवड करू शकलो. आणि त्यावर तुही होकार दिलास”.
तुला नेहमी वाटत असेल मी कधीच असा Romatic बोलत नाही. कधी प्रेम आहे अस व्यक्त करत नाही. पण मनोमन मी सुखावत असतो. आणि माझ्या मनाला स्पर्श करणारी गोष्ट म्हणजे “तू”... हे मला शब्दात सांगावस वाटत नाही... “तूच माझी Valentine”....!

खूप छान पसंती आहे सतीशराव तुमची....! हा.हा..हा... कुणाला सांगताय हो..? स्वतःच स्वतःला सांगतोय.... हा..हा..हा....

          बस मग कशाला हवेत गुलाब?, चॉकलेट, टेडी, कसला आलाय प्रपोज?, एवढ ऐकल्यानंतर कशाला हवय कुठल प्रॉमिस?, राहील किस डे हग डे ते रोजचच असतंय हा.हा...हा.... त्यामुळे असा कुठला एक आठवडा किंवा एखादा दिवस का ठरवायचा प्रेमासाठी.. प्रेमासोबत मानसन्मान मिळण फार गरजेच असत. आणि तोच जर एकमेकांना दिला नाही तर मग नक्कीच ह्या Valentine आठवड्याची गरज पडते.

      त्यामुळे,
“”हर दिन हर डे सेलिब्रेट करते जायेंगे””......
हम प्यार मे जिते प्यार मे मरते जायेंगे....
देखेंगे....., देख लेना.....!
देखो अपनी तस्वीर मेरी निगाहों मे,
क्या हुआ गर काँटे है अपनी राहों मे,
इन राहों मे फुल बिखर ते जायेंगे....
हम प्यार मे जिते प्यार मे मारते जायेंगे....
देखेंगे....., देख लेना.....!
हमने जीवन का साझी हां जी तुम्हे बनाया है,
दिल कि नईया का माझी तुम्हे बनाया है,
इस पार से ऊस पार उतरते जायेंगे....
हम प्यार मे जिते प्यार मे मरते जायेंगे....
देखेंगे....., देख लेना.....!


           ऐ...! नाही बाबा, याहून दुसऱ्या कुठल्या गमती जमती सांग... सूनना क्या चाहते हो..?, ठीक आहे. अजून एक सांगते हं.. बोर करू नकोस हं आता... आ.आ... चला राहुद्या मग, मी नाही सांगत.. सांग सांग सांग, बोल बोल मस्ती करतोय ग बोल.. जा..आ..! आता बोल ना... हम्म, मी सेकंड ईयर ला होते. मोबाईल घेऊन वर्ष झाल असेल, तर येत्या Valentine Day ला मला एक फोन आला. नंबर ओळखीचा नव्हता. हेल्लो? हेल्लो नही कूछ नही बस Happy Valentines Day..! आणि ठेवला. मी पुन्हा तो नंबर बऱ्याच वेळा लावून बघितला. पण नाही लागला. दुसऱ्या दिवशीही प्रयत्न केला. मग थोडासा विचार केला. मुल कुणीही मित्र नाहीत दोन सर आहेत त्यांच्याकडेच फक्त माझा नंबर आहे आणि आवाजावरून तर ते नाही वाटत ते हिंदी हि बोलत नाहीत, मग.....?, जाऊदे मरूदे तरी तीन चार वेळा कधीतरी लावून बघितला मी, नाहीच लागला.
पुढच्या वर्षी पुन्हा तीच गम्मत झाली. तेव्हा मात्र मला “डर” चित्रपटातली “किरण” आठवली आणि मी मनापासून हसले. तेव्हा लगेच गाण पण ऐकल...

“जादू तेरी नजर, खुशबू तेरा बदन,
तू हा कर, या ना कर....
तू है मेरी किरण, तू है मेरी किरण...
Feeling Heroin हो...! हा.हा..हा....

पुन्हा तिसऱ्या वर्षी तोच फोन तोच आवाज, मग मला मात्र थोडा विचार करावा लागला. तोपर्यंत एक दोन मित्र झाले होते. मी त्यांना सांगितल मला दर वर्षी असा असा फोन येतो, पण तस बघितल तर फक्त विष केल जात बाकी काहीच कुठलाच त्रास नाही. न मेसेज, न फोन काहीच नाही. मी रस्त्याने येता जाता हि फार काळजी घेते. पण तस काही कुठेच जाणवल देखील नाही.. एक मित्र भडकून तो नंबर त्याने मागितला, एकाने सांगितल एवढ काही नाही त्यात आणि तुला अति वाटत असेल तर नंबर बदलून टाक.. अरे हो... हे ठीक आहे. तसा फारसा एवढा काही माझा फोन नंबर महत्वाचा नव्हता. कारण मी फक्त गाणे ऐकण्यासाठी फोन घेतलेला होता.
        पण नंबर बदलण्यापुर्वीच मी मुंबई मधून नाशिकला आले, आणि तेव्हा मुंबई च्या सीमकार्ड्स ला दुसऱ्या शहरांत रोमिंग लागत होत. मग बदलावाच लागला.  

हा..हा...हा..... हुशार बायको माझी...! आधी खुश झाली, नंतर त्याच एका फोन ला घाबरली... हा.हा..हा.... नाही ओओ... घाबरले अजिबात नाही. तुम्ही तो शाहरुख आणि जुही चा “डर” पिक्चर पाहिला आहे का? नाही.., मग पहा. शेवटी किती त्रास देतो तिला तो. आणि मरतो. तस काही झाल असत तर माझ्याबरोबर... एक तर तुम्ही सनी देओल सारखे नेव्ही मध्ये पण नाही. काय केल असत मग मी... हा.हा..हा.....  पिक्चर होता सनी देओल च्या नावावर तो हिरो आणि शाहरुख व्हिलन, पण हिट झाला तो शाहरुख व्हिलन च्या नावाने.. मग परवडली असती का अशी स्टोरी आपल्याला... हा.हा..हा....

         बाकी गुलाब वैगरे पुढे बरेच मिळत गेले, डेरीमिल्क पण भरपूर मिळाल्या बरं....! काय वेडे मुल असतात, गुलाबाला गुलाब देतात... ओह्ह्ह्हहोहोहो.... आहा:....! क्या प्यार है..... सौ बात कि एक बात....
बरं..., आता तुम्ही सांगा तुम्ही कुणा कुणाला गुलाब दिले.. असले रिकामे उद्योग करत बसलो असतो तर असंच मज्नू बनून फिरत असतो. डॉक्टर नसतो झालो. धन्य ते डेज्....! खोटारड्या....! झोप...

पण, मला आज ल्ब्यूल्ब्यू वाटल तुझ्याबद्दल सगळ ऐकून....! आज पाहिलांदाच प्रेमात पडल्याच फिलिंग आल भो....!!!!... Happy Valentines Day! Good Night. ल्ब्यू....!
  

राजश्री जगताप....




          
              

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...