मुख्य सामग्रीवर वगळा

मुंबई ते टोकियो.....!


मुंबई ते टोकियो.....!

भाग १.....

 मुंबईची पोरगी विमानी बसली,
पिरतीच्या देशाला आली आली.

पंखावरी प्रीतीच्या ह्या येईल मी फिरुनी,
हाय आस्मानी रंगाला गेले मी भुलूनी.(१०मार्च२०१८)


          मला घरी जायच आहे. घरी जायच आहे?... आत्ताच तर मे मध्ये आलो आपण आणि आता ऑक्टोबर पुन्हा काय आहे घरी?, कशाला जायच? इथेच राहायचं आता. मी नाहीईई..., मला जायच म्हणजे जायच...! बस नो एनी आर्गुमेन्ट.. हो पण कशाला? मला Friquent Flyer व्ह्यायचं आहे.. तुला काय व्हायचय?, इंग्लिश समजत नहि व्हय मराठीत सांगू?, मला “नियमित विमान प्रवासी” व्हायचं आहे. हा.हा..हा.... त्यासाठी तू छान अशी उद्योजिका हो.. तुला आठवड्यातून जायला भेटेल. आणि मुख्य म्हणजे परवानगी सुद्धा घ्यावी लागणार नाही. मी काय तुझी परवानगी घेत नाहीये, तुला सांगतेय माझ तिकीट काढून दे मला घरी जायच आहे. आणि फक्त जाण्याचच काढ येण्याच रिटर्न नको., का? कारण.... यायचं कधी, कि यायचं नाही ते मी ठरवेल. ठीक आहे बघूया.. हम्म्म,,,, स्वतःच्या मताने विचार करणारा माणूस असतो ना तो चटकन निर्णय घेतो. चार डोक्यांना विचारून निर्णय घेणारी माणस बिन बुडाच्या तांब्या सारखी असतात. कधीपण लुद्पुड होऊन जातात. स्वतःच्या मतावर ठाम नसणे. अतिशय संताप जनक गोष्ट वाटते मला... ए बाई...! तुला जायच आहे ना, जा मला एवढ बडबडू नकोस. हो ना?, एवढ लागल तर, काढ ना मग तिकीट आत्ता लगेच. हा मी बघतो कधी काढायचं ते. हट्टट.....!

          दहा दिवस झाले, पंधरा दिवस झाले, वीस दिवस झाले... तिकीट पण नाही आणि नेहमी खोट काढतो.. काढतो.. ह्या रविवार पर्यंत जर नाही काढल ना तर माझ्या जपानीज मैत्रिणी कडून काढून घेईल मग मला ओरडू नकोस. धमकीची कमाल शुक्रवारी रात्रीच १६ डिसेंबर ते १० मार्च रिटर्नच तिकीट मिळाल... अडीच महिनेच राहू का मी? अजून दोन महिने राहायचं आहे. वेड लागल का तुला? आपल्याला फिरायला जायच आहे मार्च मध्ये.. हा.हा..हा... लालच दे रहा है?, हो....!,,,,,, मग काय झाली शॉपिंग सुरु कपडे, शूज, पर्स, पैसे.. हव ते मिळाल, मी नुकतेच लेख लिहिण्यास सुरवात केली होती. मग त्यासाठी नवीन ल्यापी सुद्धा वाहः... खुशियो का पिटारा खूल गया...

          भारतात काही महिने राहण्यासाठी येण्याचा माझा खरा उद्देश हा होता कि मी लग्नानंतर घरी एकही दिवस राहिले नव्हते, कुणालाही भेटले नव्हते. लग्नानंतर एक वर्षाने गेलो होतो, परंतु वीस दिवस कुठे निघून गेले काही कळालच नव्हत. त्या वीस दिवसांत माझ्या मनाप्रमाणे एकही दिवस मला मिळालेला नव्हता. आणि ह्याच गोष्टींचा राग माझ्या मनात उसळत होता. गेल्यावर याला एकही फोन मेसेज करायचा नाही, बोलायचं सुद्धा नाही. सगळ्या सोशल साईट बंद करून टाकायच्या पक्क मनाशी ठरलेलं होत. हा विसरला होता ना मला वीस दिवस तिथे असतांना?, दाखवते मी पण आता. मला पण कळेल नक्की काय असतो हा सगळा प्रकार.

          पण खर तर तस काहीच घडल नाही, कारण आपला राग हा काहीतरी चांगल घडाव, आपल्या माणसाच्या मनात आपल्या विषयी दुरावा राहू नये हाच प्रयत्न असतो. आणि तो दुरावा कमी करण्यासाठी अजून दूर जाणे गरजेचे असते. हे मला तिथे राहून आल्यांनतर समजले. आपली बायको आपल्यापासून एवढ्या लांब जातेय याच दुख नक्कीच त्याच्या चेहऱ्यावर जाणवल अगदी आनंदातच सगळ चालेल होत, परंतु त्याच्या मनात जे टोचत होत ते त्याने मला सांगण्यासारख नव्हत. लग्नापासून आत्ता पर्यंत एकही दिवस लांब न राहिल्यामुळे कधीहि दुराव्याचा अनुभव नव्हता. आणि तो अनुभव मला ह्याला देणे फार गरजेच होत.

          जातांना माझ्या सोबत एक मैत्रीण दिल्ली पर्यंत होती. तू तर जाशील तिच्या सोबत त्यामुळे तुला एवढ वाईट वाटणार नाही, पण मला एकट्याला घरी परत यायचं आहे... भयंकर वाटतय...
यस्स्स्स... यही तो हम चाहते हैI विमात बसे पर्यंत मला आनंदी वाटल फ्लाईट टेकऑफ झाल्याबरोबर वाईट वाटू लागल, ढसा ढसा रडले. कारण याअगोदर मी कधीही त्याच्याशिवाय प्रवास केला नव्हता आणि तोही विमान प्रवास.
दिल्ली एअरपोर्ट वरती एक तासात लगेज घेऊन पुन्हा मुंबई च्या फ्लाईट मध्ये देऊन कन्नेक्टिंग फ्लाईट घेऊन सव्वा अकरा पर्यंत मी मुंबईत हजर. नवऱ्याने सगळ काही सुटसुटीतपने शिकवलेलं होत. सगळ्या सूचना काटेकोरपणे दिलेल्या होत्या, त्यामुळे अडचण?, ह्यायाया... आजाबात न्हाय. बरोबर सव्वा अकराला नवऱ्याचा फोन.. मी किती धाडसी निडर आहे याच भरभरून कौतुक ऐकल आणि मग लगेज घेतल. घरच्यांना सांगितलेलं मुंबई ला कुणीही येऊ नका मी स्वतः एकटी नाशिक पर्यंत येईल चिंता नसावी. पण त्यांनी ऐकले नाही रात्रीचा प्रवास विमानाने चालतो परंतु ट्याकसी ने नको. त्यामुळे हे कारण पुढे करून मम्मी पप्पा नऊलाच एअरपोर्टवर हजर होते. मम्मीने छान गुलाबांचा गुच्छ आणलेला होता. मी एअरपोर्ट च्या बाहेर आल्याबरोबर पप्पांनी हात केला. आयुष्यात कधीही न विसारणाऱ्या क्षणांमध्ये आता अशी काही भर पडणार होती. कि “क्षणांनी भरलेल्या ह्या आभाळात” अजिबात जागा मावणार नाही कि काय अस वाटत होत... पण आभाळात काय मावत नाही?. संपूर्ण जग ह्याच्या कवेत आहे.
खूप छान छान गप्पा मारल्या आम्ही तिघे खूप खुश झालो. जगातल्या सगळ्यात मोठ्या सुखापैकी एक मोठ सुख... ढाब्यावर चिकन हंडी, मक्केदि रोटी, बिर्याणी, लस्सी, कोला जाम थकून आल्यानंतर जेवणाची इच्छा नसते पण, त्या थकव्याकडे तीळ मात्रही लक्ष नव्हत. भर पेट जेवण केल. आम्ही तिघांनी खूप धम्माल उडवली. तिघा भावंडांपैकी मम्मी पप्पांन सोबत एकजण असते तेव्हा आपण एकुलतीएक संतान असल्याचा आभास होतो. भरपूर लाड होतात. रात्रीच्या बारा वाजता मस्त मोकळ्या थंड हवेत जेवण भारी मज्जा आली, त्या जेवणाची लज्जत आजही आठवते.

          रात्री दोन ला पोहचलो घरी गेल्याबरोबर पप्पांच सुरु झाल तुझ्या सासूला फोन कर मी पोहचले आणि उद्या सकाळी अकरावाजे पर्यंत येते अस सांग.... मग तिथेच का नाही सोडल मला इकडे कशाला आणल?, ए शू.शू..शू... चूप अजिबात चिडचिड नको, जा उठ फ्रेश हो आणि झोपून घे, तुम्ही पण जा फ्रेश व्हा... उद्याच उद्या बघू. मम्मीने लगेच सगळ सावरल. मी हातपाय आपटतच वरती गेले. माझ्या रागाची कल्पना सगळ्यांनाच होती अगदी सगळ्यांना त्यामुळे सगळेच घाबरलेले होते. दुसऱ्या दिवशी मला भयंकर सर्दी झाली. इंजेक्शन घेऊन आले. केला का तुझ्या सासूला फोन? हो केला. चल मग जाऊया मी येतो पोलीस स्टेशन ला जाऊन. तयार रहा. मी सोफ्या वरच्या सगळ्या उशा फेकून मारल्या... ए....! पागल झाली का? भावाला हसायला आणि माझी खिल्ली उडवायला मिळाल.. ए तू पण ए, तुला पण मारते. तुम्हाला मी एवढ्या लांब आल्याच सुख नाहीयेका? बरी होते मी तिथेच माझ्या माझ्या घरी... हा.हा...हा... तिथे त्या बिचाऱ्या दाजींच डोक खाते आणि आता इथे आमच खाणार...

           बर ऐक तू आता आराम कर, चार वाजता आपण शॉपिंग ला जाऊ, माझ रेकॉर्डिंग आहे त्यासाठी. आणि लेट येऊ मग तू सासरी उद्या जा... काय? मस्त ना..? येस्स्स्स.. दोन वाजल्या पासूनच त्याला सारखे फोन करते चल ना पप्पा येतील त्या आधी जाऊया, अरे पप्पा चार पर्यंत नाही येणार आपण कलटी मारू त्याआधीच,. पप्पा घरी येण्याआधीच आम्ही छू...मंतर... गायब... मस्त सात वाजे पर्यंत फिरलो खाऊनपिऊन घरी आलो. कुठे आहे रे तुम्ही? आलो पप्पा दहा मिनिटांत हा.हा..हा.... म्हणजे एक तासाने...हिहीहिः.... दिवसभरात सगळ्या नातेवायकांचे, मित्र-मैत्रिणींचे फोन आमंत्रण, काळजी वाह:.... मस्तच वाटत होत. दुसऱ्या दिवशी अकरालाच तयार होऊन बसले. पप्पा जायच आहे ना?, कधी येताय?, हा आलो आलो, हा आलो आलो. चार वाजले निघायला. मस्त नव्या नवरीसारखीच सजून निघाले. भावाने मोगऱ्याचे सुंदर गजरे आणले. आहा:.... फिलिंग रीफ्रेश... नवऱ्याला फोन करून सांगितलच नाही कि मी निघाले म्हणून, नटल्या थटल्याचा फोटो पण नाही पाठवला, त्यामुळे तिकडेही कुणाला माहित नव्हत. मी राहायला येईल कि नाही याचीही खात्री नव्हती. यासाठी आपण बायकोला कधी विसरायचं नसत. तिच्यावर पण बरच काही अवलंबून असत बर का “डॉ. सतीश लक्ष्मण शिंदे”. इथून पुढे लक्षात ठेवालं अशी आशा बाळगते.

          तिथेही पाच सहा दिवस राहिले मस्त गप्पा गोष्टी केल्या, फोटो काढले, मला एक गोष्ट तर नक्कीच माहित आहे, आपण सगळ्यांना आनंदी ठेऊ शकतो माझ्या येण्याने दोन्ही घरातील वातावरण सुखावलेल होत. सगळे भारी खुश होते. नवऱ्यालाही त्या रात्री शांत झोप लागली असावी. पण मी त्याला न सांगता सासरी आले होते. तू मला न सांगता आलीस?, मला का नाही सांगितलस. एक बंधन म्हणून त्याचा हा प्रश्न मुळीच नव्हता पण तीळ भराची गोष्ट सुद्धा बायको आपल्याला नेहमी विचारूनच करते आणि आज एक तीळ सांडला....!!! भलेही तो आपल्याच सुखाच का असेना तरीही तिने आपल्याला सांगाव, तेव्हा लक्षात आल कि आपल्याला जर बायकोने न विचारता कुठले काम केले तर कसं वाटत?,... चांगलच बोचकत हो...!  मी काय बाहेर कुठे गेली का? आपल्याच घरी आलेय ना? सरप्राईज दिल मी सगळ्यांना, येणार आहे हे माहित होत पण कधी हे मीच ठरवल. मम्मी पप्पांनी जबरदस्ती सासरी पाठवल्याच श्रेय मीच बळकावून घेतल.

          पाच सहा दिवसाने माहेरी निघाले भारी थाटात लग्नाचा हिरवा शालू नेसला मग कच्या हिरव्या द्राक्षांच्या बागेत जाऊन भावाने फोटो काढले. नंतर घरी निघालो. आई-बापाला लेक माहेरी आल्याच जेवढ सुख समाधान लाभल नव्हत तेवढ सासरी गेल्याने आणि राहिल्याने लाभल. पुढचा प्लान होता पुणे बहिणीकडे जाण्याचा तू ए चार दिवस माझ्याकडे रहा आणि खास माझ्या टीचर आणि मैत्रीणीना भेटण्यासाठीच ऐ ते पण पिंक साडी नेसून आपण फिरू, शॉपिंग करू, खाऊपिऊ आणि मग घरी नाशिकला जाऊ, हा प्लान आमच्या म्याडमचा होता आणि त्या नुसार मला चालायचंच होत. घरी आल्याबरोबर उद्याची-पुण्याची प्याकिंग झाली. सकाळी सात ची बस घ्यायची. सगळ आवरल, पप्पा माझ्या नवऱ्याने पैसे दिले नाही, मला पैसे पाहिजे. पप्पांना माहित होत पैसे आहेत बाई कडे तरी पण त्यांच्याकडून सुद्धा भरपूर पैसे लुटले. एकच वाक्य बोलायचं... वर्षभर माझा काही त्रास असतो का तुम्हाला?, उत्तर न देता पैसेच देतात. भाऊ...! आपल कामच अस असतय पाय? सगळ्यांकडून लाड पुरवून घेणे हा माझा आवडीचा छंद असल्यामुळे तो मी आवर्जून पूर्ण करते. अगदी न लाजता न घाबरता. सासर कडचा फीडब्याक नवऱ्याला भारीच पोह्ल्यामुळे तोही फिदा होता. मी घरातून निघायच्या आधीच मला विडीओ कॉल त्यात पिंकू-पिंकू साडी, वाह:...! मस्त-मस्त ट्रिपल एस बायको माझी. “ल्ब्यू”.... त्याची फोन वरची काळजी काही खाल्ल का? बॉटल घेतली का? पैसे? मोबाईल? रुमाल? गोळ्या, सगळ्या सगळ्या गोष्टींची आठवण त्याने करून दिली. जावयाच मुलीवरच प्रेम पाहून सगळे सुखात न्हात होते. भाऊ सोडवायला आला. बस निघे पर्यंत थांबला बाय बाय मोटू...

           बस निघाल्याबरोबर नवऱ्याचा एक व्हिडीओ कॉल झाला. आणि नेट वर बघते तर माझा नवाकाळ वर्तमानपत्रात “एकांत के सौ वर्ष” हा लेख छापून आलेला होता. भरपूर खुश झाले. सगळ्यांना पाठवला. नवरा अजूनच खुश. ज्या प्रमाणे मी त्याला त्रास द्यायचा ठरवून आले होते त्याप्रमाणे काहीच घडले नाही. कारण तो स्वतःच तासातासाला फोन करत होता. आणि त्याच कारणाने माझ्या घरचे तर मलाच क्रूर व्यक्ती समजत होते. एक वाजता आमच्या दोघींची भेट झाली. ती एवढ्या आतुरतेने माझी वाट पाहत होती कि तिने नाश्ता सुद्धा केला नाही. मीही बस मध्ये काही खाल्ले नाही मलाही अस झाल होत आम्ही केव्हा भेटू. गळ्यात पडताच दोघीही पुटपुटलो कडकडून जाम भूक लागलीय हा.हा..हा.... म्याडम ने रेस्तौरंत ठरवून ठेवलेले होत. सुसाट गाडी काढली. आणि थेट हॉटेल गाठलं. पनीर स्पायसी, पराठा, व्हेज बिर्याणी, आईस्क्रीम भारी ताव मारला. घरी आलो आराम केला पुन्हा पाच ला रग्गड नाश्ता केला. आणि काय शोप्पिंग ला सुरवात पुन्हा रात्री पाणीपुरी, भेळ, रगडा. जेवण तर नावाला मेस मध्ये गेलो, काही खाल्लच नाही.

          दुसऱ्या दिवशी सिंहगडावर स्वारी होती. सातलाच निघालो. नऊ च्या आत पोहचलो पोहे, कांदा भजी मस्त नाश्ता झाला. गड चढून जाऊया चल, नाही ग दीदी मी नाही चढणार “चल बुढीया चल” नाही बाई गाडीने जाऊया, पागल चल..., गडावर जायची मज्जा काय मग?, बारा वाजे पर्यंत गड चढलो. त्यात मी खंडीभर शिव्या खाल्या जसजस वर चढत होतो तसतस शिव्यांचा मारा आणि तिचा काही उन्हाचा पारा चढत होता. मी मस्त हसत फोटो, व्हिडीओ काढत शिवरायांच्या इतिहासाच संभाषण करत गड सरन केला. दिवसभर फिरलो भयंकर भूक लागली होती. गडावर खाण्यापिण्याची चंगळ नसल्यामुळे निवांत होतो. पेरू, बोर, चिंचा, बर्फाचा गोळा, भेळ, मका, पोंगे काय जेवढ गडावर आंबट चिंबट उपलब्ध होत ते सगळ खाल्ल संपूर्ण भटकून झाल आता भूक अशी लागली होती कि बस्स्स रे बस, मग काय पारा खाली थंड हवेत मस्त पिठलं, भाकरी, दही, कांदा चटणी, लिंबू हाणून ताव मारला. दणकेबाज जेवण झाल. वीस रुपयाला जेवणाच ताट पुन्हा भाकरी हवी असल्यास पंधरा रुपये. आय्यो दीदी एवढ स्वस्त कस काय रे...? काय माहित मला पण आश्चर्य वाटल...! एवढ्या उंचावर सगळ सामान घेऊन येतात, किती मेहनत करतात हि लोक, आपण त्या लोकांना पन्नास साठ रुपये जास्त देऊया हं..! हा यार देऊ नक्की.. दही वेगळे, भाकरी वेगळी पण असे करत करत शेवटी आमचे अडीचशे रुपये झाले ते कसे आम्हाला समजलेच नाही. हिशोब लावला बरोबर होते. हा.हा..हा... हि फसवणुकीची पुणेकरी स्टाईल आहे. दीदा वरचे पैसे? भाग बे..! कसले वरचे पैसे, चुना लावतात हे लोक. हमको येडा बनाके पेढा खिला दिया, पळ निघ खाली. अशी काही पद्धत त्या खानावळीची होती पुन्हा निघतांना कैरी, स्टारफ्रुट, काकडी, पेरू.. नवऱ्याने आणि पप्पांनी पाकीट फुल करून दिलेलं होत. रिकाम पण तर झाल पाहिजे ना..?, येतांना टमटम ने खाली आलो.

          येऊन आराम केला, नवऱ्याचे दिवसभर फोन येत होते. तो खूप कामात असतांना देखील त्याच लक्ष लागत नव्हत, लग्न झाल्यापासून मी त्याला सोडून तो मला सोडून कुठेही गेलो नव्हतो, एकटे फिरलो नव्हतो. आणि हि पहिलीच वेळ होती. त्याचा त्याला रागही येत होता राग म्हणजे You know kind of Jealousy असा काहीतरी प्रकार त्याच्या सोबत घडत होता हा.हा..हा... मला जाणवत होत. मग अस अचानक कसं बायकोला ओरडणार? मग फोटो वरून ओरडला बडबड केली. हम्म्म... जळकुकड्या कुनिकडचा.. मग रात्रीचा फोन नाही मेसेज नाही, मी पण नाही केला. सकाळी गुड मोर्निंग चा मेसेज मी वाचलाच नाही, दुसर्या दिवसापर्यंत. रात्री आमच्या दोघींचं ठरल उद्याचा दिवस इथे घालवण्यापेक्षा उद्या घरी जाऊया मम्मी पप्पा आणि सोन्या बरोबर टाईम स्पेंड करूया, आणि जातांनाच मुंबईला शॉपिंग करायला जाऊ मग तिथून नाशिकला. चालतंय ना...!

         मग काय स्वारी मुंबईला सकाळी सहाची ट्रेन. दहाला पोहचलो मस्त चीज सैंडविच खाऊन, क्रोफट मार्केट गाठलं दिवसभर खानपिन चालू होत. भरपूर मनसोक्त शॉपिंग केली. तिथून थेट बांद्रा गाठलं, तिथेही भरपूर शॉपिंग केली. आता भूक अशी लागली होती कि पोटातले आतडे बाहेर येऊन चोच मारत होते. स्टेशन ला येऊन एका इराणी हॉटेल मध्ये बटर चिकन, रुमाली रोटी, चिकन भुना, थम्सअप भारी जेवण झाल. मग दादर ला उतरलो. तिथेही पुन्हा शोप्पिंग केली. आता उशीर झालेला होता. पंचवटी ला फक्त पंधरा मिनिटे होते. आणि स्टेशन ला तेव्हड्यात पोहचणे अशक्य होते. कमी अंतर असल्यामुळे ट्याकसी मिळत नाही. मी सगळ सामान घेतल तिला म्हंटल तू धाव, पळ आणि तिकीट काढ मी पोह्चतेच. तिला अजिबात खात्री नव्हती कि आम्ही गाडी पकडू, पण मी चार वर्षे पंचवटीने प्रवास केलेला होता आणि कधीही पंचवटी ट्रेन सोडलेली नव्हती. त्यामुळे आम्ही ती मिळवलीच. आणि विंडोसीट देखील, दिवसभर किती थकलेलो होतो हे जागा मिळाल्यावर निवांत बसल्यावर समजले. एक एक पेनकिलर खाल्या आणि आरामात, दहा वाजे पर्यंत घरी पोहचलो.

           घरी पुन्हा चिकन भाकरी, रायता, लिंबू ची भारी मेजवानी मम्मीने तयार ठेवलेली होती. घरात संपूर्ण हर्ष उल्हास पसरलेला होता. आनंदी वातावरण होत. सगळे खुश होऊन गप्पा मारत रंगतदार मेजवानी झाली. जेवण करून सगळी शोप्पिंग सगळ्यांना दाखवली. नवऱ्याला सगळे फोटो पाठवावे वाटत होते. रात्री कर्मत नव्हत, पण माझी चूक नसतांना मला बडबड केली होती. आणि दिवसभर कुठे आहे हे विचारल सुद्धा नव्हत. मग अजून रागात राहिले. घरातून चारही माणस मलाच ओरडत होते. मी खूप दुष्ट आहे, आणि त्याला खूप त्रास देते असा काही शिक्का मोर्तब माझ्यावर झाला होता. एवढ्या आनंदात देखील मी त्या दु:खी कष्टी मनाने झोपी गेले. आणि पुन्हा सकाळी आठ वाजल्यापासून घरच्यांच्या शिव्या सुरु झाल्या त्या पोराला एक तरी फोन कर आल्यापासून तोच फोन करतोय तोच काळजी करतोय, येवढा नालायकपणा करू नये. हा..का? आणि त्यानी मागच्या वेळेस इथे येऊन माझ्या सोबत जो नालायकपणा केला होता त्याच काय? तो विसरले का तुम्ही सगळे? त्याची चूक होती ना? होती कि नाही? खरच बोला...! कुणाचीही बाजू न घेता खरच सांगा. हो होती त्याची चूक पण, असा मागच्या गोष्टींचा राग मनात धरून ठेवला तर पुढे चालायला माणसाला फार अवघड जात. सोड बाई राग आणि फोन कर त्याला, ए दीदी कर न दाजींना फोन कशाला अस करतेरे?, हा जा करेल मी नंतर... तो चुकला तेव्हा त्याला शब्द भराने कुणी सांगितल नाही कि तू तुझ्या बायको सोबत चुकीच वागतोय. उलट त्याला अजून प्रोत्साहन मिळत होत. त्याला मिळाली का अशी शिकवण?, मी फाडफाड सगळ विष उगाळू लागले... पण बायको चुकली कि सगळे नुसते टार्गेट करून ठेवतात तिला. आणि तस पण मी चुकलेली नाही... मग विषयच येत नाही.... मम्मी लगेच सगळ सावरून घेते, नेहमी प्रमाणे.... ए चला आपले आपले काम करा उठा. विषय तिथेच थांबला. आणि दुपारी दोन पर्यंत मलाच राहावल नाही, शेवटी मी चार फोन केले तेव्हा त्याने उचलले. आणि काय दहा एक मिनिट भांडून पुन्हा जसे काही झालेच नव्हते. सगळ काही सुरळीत झाल. बस एक फोन ची अवशक्ता होती. आणि तीही माझ्या फोन ची. अर्थात मी ठरवल तर नसताच केला, हा आली मोठी शहानी....! फोन नसता केला म्हणे हा..हा..हा...

मासोळी तू सोन्यावाणी प्रेमाच्या जाल्यात फसली,
तुझ्यात र राजा मला दर्याची वस्ती रे दिसली.
मुंबईची पोरगी विमानी बसली,
पिरतीच्या देशाला आली आली.
टोकियो ते मुंबई...!

पुढचे प्लान, दिवस, मज्जा.... क्रमश..... अडीच महिने आहेत ना?, खूप खूप मज्जा आहे... आठवणींचा जल्लोष....
एवढे आनंदाचे क्षण आहेत कि त्यापुढे आभाळ ठेंगण वाटत....
हेच माझ “क्षणांनी भारलेल आभाळ”......   

फोटो पंधरा दिवसाचे क्रमश आहेत, 
फोटोंसाठी भेट द्या फेसबुक पेज "क्षणांनी भरलेले आभाळ".
राजश्री जगताप.....       


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...