मुख्य सामग्रीवर वगळा

होली है.....! बुरा न मानो होली है.....
       होली रंगो का त्योहार है लाल, पिले, नीले, हरे, गुलाबी.... होली है भाई होली.....! बुरा न मानो होली है.....!

       लहानपणापासून नाशिक मध्ये जी होळी पाहत आलो ती म्हणजे होळीच्या दिवशी सुकलेले लाकूड, घास, गौऱ्या उभे करून नारळ हार-फुले, होळी भोवती रांगोळी. होळी पेटवल्या नंतर तिला पुरण पोळी-नारळाचा नैवद्य दाखवून पाणी घालणे. “होळी रे होळी पुरणाची पोळी, बाम्हण मेला संध्याकाळी त्याचा दिवस मंगळवारी” अस काहीतरी बोलून बोंबा मारायच्या... याचा अर्थ फारसा काही माहित नव्हता पण मोठ्यांच अनुकरण.. होळीतली खरपूस पोळी आणि खोबर खाण्याची मज्जा हि काही औरच. दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे “धुळवड” रात्री पेटलेल्या होळीत दुसऱ्या दिवसापर्यंत थोडा-थोडा आहार असतो.  होळीच्या राखेत पाणी ओतून त्यातच येणाऱ्या जाणाऱ्याला लोळवून काढायच आणि रंगपंचमी हि पाच दिवसानंतर. पण, मुंबई मध्ये आल्यानंतर एक वेगळी होळी पाहायला आणि खेळायला मिळाली ती म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगपंचमी केली जाते. शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये होळीच्या दिवशीच निघतांना रंग खेळले जातात. पण नाशिक पेक्षा मुंबई ची हि पद्धत मला फार आवडली. कारण सुट्टी असल्यामुळे दिवसभर चार-पाच वाजेपर्यंत रंगांचा आनंद लुटता येतो. आमची मम्मी आम्हाला बारा एक वाजताच फटके देऊन घरात घेत असे. भरपूर मनसोक्त अस पाणी रंग फुगे खेळायचो. पुन्हा नाशिक ला स्थाईक झाल्यानंतर मला लक्षातच राहत नव्हत कि इथे पाच दिवसानंतर रंग खेळले जातात.

         पुरण पोळी घरात जास्त कुणाला आवडत नसल्यामुळे ती बाकी कुठल्या सणाला असो नसो काही फरक पडत नाही. घरात खाणारी तोंड असली कि बनवणाऱ्याला हि प्रोत्साहन मिळत. मम्मी मुद्दामच आवर्जून ह्या सणाला पोळ्या करतेच. मला दोन पोळ्या आवडीने खायला आवडतात एक ताजी आणि एक शिळी. ताज्या पोळी पेक्षा शिळी खमंग भरपूर तूप घातलेली पोळी खायला रुचकर लागते, तिच्या सोबत नारळाचा गोड सार नसला तरी चालतो. बाकी लिंबू टाखून तिखट सार, कुरडई, भजे जबरदस्तअअअ. मी पोळी खास करून खाणे किंवा बनवण्याचा जास्त उद्देश म्हणजे तिखट सार मला भयंकर आवडतो. गरमगरम सारत लिंबू पिळून वाटीभर पिऊन घ्यायचा, मग जेवतांना पोळी-गोड सार, पुन्हा तिखट सार, भजे, कुरडई एकत्र करून खायचं शेवटी सार भात लिंबू भरगच्च पोट तृप्त आत्मा म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक होय....    

         माझा पोळ्यांचा पहिलाच प्रयोग अतिशय क्रूर पद्धतीने बिगडला होता. 

https://kshanani-bharlele-abhal.blogspot.com/2018/08/blog-post.html

पण माझ्या त्या प्रयोग नंतर आता मी धडाडीची कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता केव्हाही पोळ्यांच्या स्वयंपाकासाठी तयार असते. होळीला पोळ्या करायाच्या म्हणून चार दिवस आधीच आंबे आणून ठेवले. अग हे किती कच्चे आहेत. काही नाही होत स्वेटर मध्ये गुंडाळून हिटरच्या रूम मध्ये ठेवले होळी पर्यंत छान पिकले. ओ... आज आपल्याला पोळ्या करायच्या आहे.. अरे बापरे....!(शर्टाच्या बाह्या वरती सावरत) म्हणजे मला तयार रहाव लागेल, केव्हाही ल्याब मधून घरी याव लागणार दिसतय अय्यो येवढा खुश झालास...?, हा.हा..हा.... पुरण बिगडल तर पुन्हा नवीन करायला येण्याबद्दल बोलतोय... हट्टट..... पण, ह्या वर्षी अगदी दोन तासात मी स्वयंपाक आवरला नाही म्हणजे सुरवातीला मम्मी ला व्हिडीओ कॉल केला होता सगळ विचारूनच केल. डाळ शिजायला घाले पर्यंत फोन चालूच होता बाई आता काय तू तुझ्या पोळ्या बनेपर्यंत फोन चालू ठेवते कि काय?... हा.हा..हा... नाही ठेव आता पोळ्या झाल्यावर परत एक व्हिडीओ कॉल करते आणि पोळ्या तुला पाठवते सुद्धा. हो....! मस्त छान-छान छोट्या-छोट्या पोळ्या कर, जाळू नको, पोळी मध्ये भरगच्च पुरण असाव, तूप पण जास्त लाव मस्त लाल खरपूस भाज.. हो.....ग... माय माझे...! छान-छान बनवते.

         माझ्या सगळ्याच कोणत्याही स्वयंपाकावर माझा नवरा भयंकर खुश असतो, त्यामुळे मला कोणत्याही प्रकरचे पदार्थ करायला भीती किंवा कंटाळा येत नाही. मला मम्मी नेहमीच सांगायची कि नवऱ्याच्या मनात घुसण्यासाठी पोटातूनच रस्ता असतो. मला ह्या वाक्यावर कधीच विश्वास बसत नव्हता. अगदी लग्नाला वर्ष उलटून जाई पर्यंत, पण आता मला खरच कळून चुकल कि नवऱ्याच बायकोवरील प्रेम फक्त त्याच्या पोटातच असत. मनात काही नसत पार अगदी हात घालून जरी चाचपडून पाहिलं तरी हाताला काही लागत नाही. रिकामी खोली असल्यासारखं भासत. मग हा माझ्यावर एवढ प्रेम कसं करायला लागला असा प्रश्न मला पडलेला पण आता त्याच ठोस उत्तर मिळालेलं आहे. त्यामुळे आता त्याच्यासाठी वाट्टेल तो स्वयंपाक करायला मी तयार असते. राजू आज हे बनव ना.. ते बनवना... अस बोल्ला कि काय गोड वाटतो. मी पण टूनकून उडी मारून स्वयंपाकाला सुरवात करते. त्यासाठी घरात वाट्टेल ते समान तो मला आणून देतो. घरात कुठली वस्तू नाही अस कधीच होत नाही. छान-छान पोळ्यांनी होळी साजरी झाली. मैत्रिणीला आमंत्रण, नटूनथटून मस्त फोटो व्हिडीओ धम्माल केली.

       रंग खेळायचं काही ठरवलेलं नव्हत पण सकाळीस असच डीश मध्ये कुंकू घेतला कारण होळीचे रंग जे आणले होते ते मी मागे रांगोळीत वापरले मग विचार केला कुंकू आहे. 


https://www.facebook.com/1773734782927157/posts/1991864907780809?sfns=mo

मग पुन्हा विचार आला घरात वाढदिवसाचे छोटे फुगे आहेत. मग काय भरले फुगे पाण्याचे.

#अंग_से_अंग_लगाना_सजन_हमे_ऐसे_रंग_लगाना,......

#रंग_बरसे_भिगे_चुनरवाली_रंग_बरसे,......

#होली_आई _होली_आई
रंग लेके खेलते गुलाल लेके खेलते
राधा संग होली नंदलाल खेलते
बोलो तारारारा..... तारारारा....

       नवरा बायको छान मित्र मैत्रिणी असले कि त्यांना मित्र परिवार असावाच अशी काही फारशी अपेक्षा नसते. कुठलाही सण असो वा महत्वाचा दिवस असो यातील आठवणी चिरंतर काळ टिकून राहतात...
एकही शर्थ पर खेलुंगी होली
जितू तो तुझे पाऊ
हारू तो तेरी हो जाऊ....

हैप्पी होली.......





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...