मुख्य सामग्रीवर वगळा

गोष्ट आमच्या लग्नाची....!


गोष्ट आमच्या लग्नाची....!
       
         वर्षभरात हि चौथी वेळ आहे तुला हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची. संपूर्ण घरा-दाराला तू हैराण करून सोडलस. एकदा टायफर्ड, एकदा दुर्घटना, पुन्हा टायफर्ड आणि आता कावीळ मी तर तुम्हा तीन पोरांचं पुढे पुढे करून वैतागले. घरात उत्तम प्रतीच खाण-पिण, साफ सफाई, सगळ्या प्रकारची ठेप असून देखील आजारपण काढायची वेळ येते....
तुझ्यासाठी अकोल्यावरून नाशिकला हव तेव्हा धावपळ करत यायला मी रिकामा असतो का रे..?, इकड काम पहायचं कि तुमच आजारपण पहायचं स्वतःच्या जीवाची काळजी स्वतःलाच घेता येत नाही का?, बाहेर खाण-पिण, भटकण जरा कमी करा तुम्हाला ह्या गोष्टी सांगायला शिकवायला लहान आहात का? जसे जसे मोठे होताय तस तसे वायाला जाताय, काय सांगायचं आणि काय बोलायच....
मी अभ्यास करू का नको? सारखा तुझा दवाखाना काढत बसायला आम्ही रिकामे नाही, दरवेळेला माझ्या परीक्षांच्या वेळेस आजारी पडतो. माझी एवढी धावपळ होते, जेवण बनवून दवाखान्यात डबे ने आण करायच, मम्मी तुझ्यासोबत आणि दीदी कामावर असल्यामुळे घरपण आवरायच मग मी अभ्यास कधी करू?....
सोन्या तू ना जरा जपून वागायला शिक तू एकुलताएक असल्यामुळे आम्ही सगळेच तुला फार जीव लावतो. पण तू स्वतःची काळजी अजिबात घेत नाहीस. आयत सगळ काही मिळण्याची सुद्धा एक मर्यादा असते....

           अशा प्रकारे आम्ही चौघे आणि तो सुद्धा सोन्याच्या आजारपणावर फार वैतागलो होतो. हॉस्पिटल एक दुसऱ्या घराप्रमाणे झाल होत. परंतु त्याच्यावर आमचा असणारा हा राग काही काळा पुरताच होता. तो कधी बरा होऊन घरी येतो याची आम्ही वाट पाहत होतो. सर्वांना जमेल त्या प्रमाणे हॉस्पिटलच्या वाऱ्या करत होते. मी संध्याकाळी ऑफिस मधून येतांनाच जाऊन यायचे. त्याला हवा तो खाऊ, फळे घेऊन जायचे. तोपर्यंत सोनाबाईंचा डबा पोहचत असे. जेवण अप्रतिम असायच. आणि आमच्या पाचही जणांची हि कसरत, एकमेकांविषयीची काळजी पाहून शेजारील बेड वरील पेशंट काका आणि त्यांच्या पत्नी यांना आमच कुटुंब फार आवडल. रोजचा डबा एकत्र खाण, गप्पा गोष्टी करण असा काही धडाका हॉस्पिटल मध्ये ह्या दोघी स्त्रियांनी लावलेला होता. मग सगळीच वैयक्तिक माहितीची देवाण-घेवाण होणे साहजिकच. मोठी मुलगी बँकेत आहे, लहानीच शिक्षण चालू आहे. मोठी साठी स्थळ शोधत नाही का मग तुम्ही?, शोधतोय पण, एवढी काही घाई नाही. नाही म्हणजे, तुमची हरकत नसेल तर आम्ही एक स्थळ सुचवू का? कारण आम्ही तिला त्या दिवशी साडी मध्ये येथे पहिले दिसायला खूप सुंदर, छान रेखीव आहे, स्वभाव पण तुमच्या सारखाच आहे. माझ्या भावाच्या ओळखीतल स्थळ आहे.  

          साडी मध्ये मला ह्या लोकांनी पाहिलं याची मला काही फारशी कल्पना नव्हती, १४ ऑगस्ट च्या कार्यक्रमासाठी मी बँकेत पांढरी-मरून किनारीची साडी नेसून गेले होते, आणि येतांना तशीच हॉस्पिटल मध्ये सोन्याला भेट देऊन आले. जातांना त्याला बॅंकेतल्या सजावटीचे फुगे काढून घेऊन गेले, केक, फळे, नानकटाई असा बराचसा खाऊ घेऊन गेले. पण माझ्या नकळत तिथे मुलगी(मला) पाहण्याचा कार्यक्रम सुरु होता. आणि त्याच वेळेस त्या काकी-काका आणि त्यांच्या भावाने त्यांच्या ओळखीतल्या मुलासाठी माझी पसंती दाखवली. दुसऱ्या दिवशी आमच्या दोघांचे फोटो सहित बायोडाटा अदलाबदली झाले आणि मुलाच्या घरच्यांना पुढच्या रविवार घेऊन येतो. तोपर्यंत आपले पेशंट पण पिंजऱ्यातून सुटतील हा.हा..हा....
पेशंट सुखरूप घरी पोहचले. एक आठवडाभर मला काहीच कल्पना नव्हती जी काही कुजबुज होती ती मम्मी पप्पा सोनी सोन्या ह्या चौघांन मध्येच होती. शनिवारी रात्री ८ पर्यंत मी कामावरून येऊन फ्रेश झाले.

          मम्मी: काय ग दीदी? तुला जर फॉरेन मध्ये कुठे जाण्याचा योग आला तर कुठे जाशील? मी..ई.....?????, हो...! मी जाईलललल....????? लंडन..प्यारेस....न्यूयॉर्क......स्वित्झर्लंड.......युरोप........ब्ला.ब्ला...ब्ला.... आहाहा... माझा हा आवाज ऐकून सोनी सोन्या आजूबाजूला येऊन बसले. का? तुला जपान आवडत नाही का? आवडत ना...! जपान तर सर्वात सुंदर आहे. डीजीटल देश.! जाईल ना तिथे पण, तिथे पण नाही तिथेच जा अगोदर.... चल दे मला तिकीट, देते का? उद्या कन्फर्म तिकीट देते तुला आज कन्फर्म नाही माझ्याकडे. बर दे हं....! आणि तिघेही माझ्यावर खदखदून हसू लागले. मग सांगितल कि उद्या तुला पाहुणे पाहायला येणार आहेत. मुलगा सद्या जपान मध्ये नोकरी करतोय. नाशिक चेच आहेत. हॉस्पिटल मध्ये अशा अशा प्रकारे ओळख झाली आमची. तिथेच सगळ काही ठरवल, पप्पांनी देखील परवानगी दिली आहे त्यांना उद्या येण्याची. बापरे तुम्ही कुठेही काहीही उद्योग करता. आम्ही नाही केले बाबा... त्याच लोकांनी आम्हाला विचारले. ठीक आहे घेऊ बघून, असे आत्ता पर्यंत बरेच स्थळ पाहिलेत तिथे हे एक अजून... मी काही फारस मनावर घेतल नाही.

         आमच्या घरी मला पाहुणे पाहायला येणार म्हणजे एखाद्या सणाप्रमाणेच दिवसाची सुरवात होत असे. पटापट साफ सफाई झाली पाहिजे, सगळ घर आवरलेल पाहिजे, चहा, बिस्कीट, पोहे सगळ सामान ओट्यावर तयार हवय, नवीन कप-बशा, ट्रे धुवून रांगेत चहा ची वाट पाहत वाळत बसलेल्या हव्यात. म्हणजे पाहुणे आले तर भांड्यांचा आवाज नको आणि शांतपणे त्यांच्या सोबत गप्पा गोष्टी विचारपूस करता येते. मम्मी च एक सूत्र असायचं दारात आलेल्या सगळ्याच पाहुण्यांना पाहुचार हा चांगलाच करावा मस्त खमंग असे कांदेपोहे, आल्याचा सुगंधित चहा पुढे जुळून येवो अथवा ना येवो.. सगळी तयारी आणि जबाबदारी तिघांची असायची मला फक्त “साडीच नेसून येणे” हा एक मात्र आदेश असायचा. आज काही चिडचिड केली नाही, नेहमीचच आहे जाऊदेत साडी नेसून तेवढाच आपला टाईमपास. अकरा पर्यंत दोन गाड्या पाहुणे पोहचले. पाणी नेल्याबरोबर सगळ्यांनी कशी गोड स्माईल दिली. मला फोटो काढण्याची एवढी प्रक्टिस झालेली होती कि मी नेहमी हसत मुखीच असायचे. त्यामुळे फर्स्ट इम्प्रेशन आपल भारी पडणारच होत. थोडीफार माहिती दिली घेतली. पप्पांन सोबत फोन झाला, मग मुलाचा फोन आला. त्यात त्याने ठरवलेल होत. मुलगी आवडली तर मला सांगा कि, तुला मुलगी पाहायला आलोय... नाही आवडली तर, सांगा बाहेर आहे, नंतर फोन करतो.
मग काय हो डायरेक्ट माझ्याच हातात फोन दिला गेला आणि किचन मध्ये जाऊन बोल इथे आवाज नाही येणार सगळ्यांचा हास्य कल्होळ चाललेला होता. मला बरीचशी माहिती कळली होती, त्यामुळे मी त्याला स्वतःहून काहीच विचारले नाही. परंतु, त्याने प्रश्नांना जोरदार सुरवात केली. नाव, शिक्षण, कुठे राहते, शिक्षण कुठे झाल, कोर्स काय केले, नोकरी कुठे करते अशी भरपूर मोठी प्रश्न पत्रिका मी सोडवली. आता तू विचार माझ्या बद्दल...(तूच एवढी बडबड केलीस आता मी काय विचारू.?, विचारतील माझ्या घरचेच) अग बोल.. बर मीच सांगतो माझ नाव सतीश, सद्या जपान मध्ये नोकरी करतो, घरपरिवार, शिक्षण ब्ला.ब्ला..ब्ला..... किती बोलतो हा.... ठीक आहे देऊ फोन.... हो दे... काय रे? अग ती काही बोललीच नाही मीच बडबडतोय... अरे मग तू विचारायचस ना, थांब स्पीकर वर ठेवते. मम्मी ने फोन घेतला सगळ काही सविस्तर पुन्हा तेच सांगीतील.. (बापरे हा खरच किती बोलतोय).... आम्हाला मुलगी पसंत आहे. तुम्ही विचार करा आणि कळवा जर तुम्हाला पटलेल असेल तर तुमचे माणस घेऊन या.... त्याआधी मुलासोबत तुम्ही बोलून बघा आणि काय मग पुढच्या महिन्यात आमचे दोन गाड्या पाहुणे पोहचले. झाल लग्न ठरल. दोन्ही कडून होकार मिळाला.
        
          मला अजूनही अस काही वाटल नव्हत कि हे खरच जुळलेल आहे. कारण आम्ही एकमेकांना पाहिलेलं नव्हत. हि पद्धत तर फार जुन्या काळातली होती. त्यामुळे आता हे कितपत शक्य आहे किंवा काय करायचं असा काहीच प्रश्न मला पडला नव्हता जे होत आहे ते चांगल होतंय चालुदे... बघू वेळ आल्यावर... दुसऱ्या दिवसापासून व्हाट्सएप्प सुरु झाल. घरच्यान समवेत एक व्हिडीओ कॉल झाला. एक महिना उलटला दोघांच्याही पसंती नुसार सगळ काही व्यवस्थित अगदी सुरळीत सुरु होत. आम्ही एकमेकांना पाहण्यापेक्षा समजून घेणे यावर जास्त विश्वास ठेवला. एक महिन्यात एकमेकांना छान ओळखू लागलो. तो काटेकोर पणे कधीही न चुकता वेळेवर फोन करत असे. मला कधीच लांब असल्याची कोणतीही तक्रार जाणवली नाही न त्याला माझ्याकडून. महिना भराने असंच कुंडली जुळत नसल्याच वार आल, मग काय दोघांमध्ये थोडस बिनसल माझा कुंडली या प्रकारावर विश्वास नव्हता आणि त्याचाही नव्हता परंतु, दुसऱ्याच्या सांगण्यावरून थोडस ढासळल. मला पप्पांनी सांगितल होत हे लग्नाला नकार देण्याच काही कारण नाही, तुला करायचच असेल तर तू स्वतःहून पुढाकार घे आणि त्याच्यासोबत बोलून बघ. आयुष्यात चांगले योग हे एकदाच येतात. प्रयत्न करून बघ, नाही जमल तर सोडून दे. ठीक आहे बघू आरामात. मी काही फोन करणारी नव्हते. दोन दिवस थांबले तोपर्यंत आम्ही सगळेच सगळ काही विसरलो होतो. तिसऱ्या दिवशी मला फोन आला. छान विचारपूस झाली. बोलणही छान झाल पण कुंडली कडे पुन्हा घोड अडकल त्यावर काहीतरी उपाय सुचवलेले होते. हे बघ खर तर माझाही विश्वास नाही मीही यासाठी नकार देतोय, पण थोडफार प्रयत्न करूया. नाही करायचे मला असे प्रयत्न. ठीक आहे मग नाही काराच लग्न, जाऊदेत राहूदेत. ठीक आहे... मी पुन्हा विचार सोडून दिला चार दिवसाने अचानक लहर आली आणि फोन करायचं ठरवल आणि तो फोन यशस्वी झाला कारण, चार दिवसात त्याच्या विचारांना योग्य दिशा मिळाली मला पण कसे माहित नाही पण जुळून येणार होत म्हणून कि काय त्यासाठी आपणही एक पाऊल टाकण गरजेच आहे अशी जाणीव झाली. आणि मग काय आमचा प्रवास पुन्हा नव्याने सुरु झाला. आणि ह्या चुकीच्या गोष्टीमुळे आम्ही दोघांनीही भविष्यात कधी एकमेकाला दुखावल नाही. कारण यात माझ्या नवऱ्याची काडीमात्रही चूक नव्हती आणि मी डिसेंबर ला लग्ना आधी येईल अशी कबुली त्याच्याकडून मला मिळाली. काही करणास्तव ते शक्य झाल नाही. पण आम्ही एकमेकांवर खूप विश्वास ठेवला.
         
          इथे नवऱ्याने त्याच्या मित्र परिवाराला सगळ्यांना सांगितले होते, तिकडे माझी मैत्रीण म्हणाली राश्री? तू साइंटिस्ट से शादी करणे कि सोच रही हैं? हा....क्यो? देख भाई थोडा संभल के... ए बडे पागल किसम के लोग होते हैं.... हा.हा..हा.... तोपर्यंत माझ्या ऑफिस मध्ये सर्वांना माहिती झाली होती. मला जपानीज फॉरेनर म्हणून चिडवू लागले होते. डिसेंबर मध्ये एका लग्नाला जाऊन आले तेव्हा दोन्ही हातभर मेहंदी पाहून सगळ्यांना वाटले माझा साखरपुडा झाला त्या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव झाला. मी खूप विचारात पडले गोंधळून गेले. नक्की काय चालय हे सगळ मलाच काही कळत नव्हत मग मी फोन करून नवऱ्याला सगळी कल्पना दिली आणि आता हे लग्न तुला कोणत्याही परिस्थिती मध्ये करावच लागणार अशी हमी घेतली. हो.हो..हो... हसून म्हणाला कुणाच्या बोलण्यावरून एवढ घाबरू नये. ह्याहि गोष्टीचा आनंद घे, काळजी करू नकोस सगळ काही सुरळीत होईल. पण पुढे पुन्हा जेव्हा सगळ्यांना कळाले कि, अजून माझा नवरा भारतात आलाच नाही. त्यावेळेस मात्र हद्द पार झाली. माझ्या मागे सगळ्यांचीच कुजबुज सुरु होती. कि मी मुलाला न बघता लग्न करते त्याचा पैसा आणि फॉरेन बघून मी निर्णय घेतला. किंवा त्या मुलाची काहीतरी हिस्टरी तरी नक्कीच असेल. माझ्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टीकोन मला काहीतरी भयंकरच वाटू लागला. मी पुन्हा त्याला सगळ काही सांगितल त्यावर तो जोरजोरात माझ्यावरच हसू लागला. मला रडायला आल मग शांतपणे त्याने मला विचारल.. तूला काय वाटत ते मला आधी सांग, काय वाटततत?,,,,  अरे मी तर अजून तुम्हाला कधी पगार विचारला नाही, प्रॉपर्टी विचारली नाही. मी फक्त आपल्या रोजच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. आणि राहिला तुमचा हिस्टरीचा प्रश्न काहीही हिस्टरी असती तर, असा मोठ्या हुद्यावर पोहचला नसतास. मी लग्नाचा निर्णय घेतांना अजिबात डगमगले नाही अजिबात चांगला वाईट विचार केला नाही. तुम्ही तरी एकदा विचार केला पण मी अजिबात घाबरले नाही. अगदी पहिल्यापासून मोठ्या विश्वासाने चालत आलेय.  मग झाल तर माझ्या पेक्षा चांगल्या प्रतीच उत्तर तुझ्याच कडे आहे. मी तुला समजवण्यापेक्षा तूच मला खूप छान सांगितल मी तर अशी अपेक्षा पण केली नव्हती. उलट आज त्या लोकांमुळेच मला कळून चुकल कि माझी होणारी बायको किती हुशार आहे, मला अभिमान वाटतो तुझा. तुझ्या ह्याच विचारांची पारख मी करून लग्नाचा निर्णय घेतलाय. बाकी एकमेकांना पाहिलच पाहिजे हे काही एवढ महत्वाच नाही. फोटो वरून पसंती आहे माझ्यासाठी एवढच पुरे. आपण एकमेकांना न पाहता जर हे सांगू शकतो कि माझा जोडीदार कसा आहे. तर मग आपल पारड मोठ कि त्या लोकांच?, आपललल....... ऐ.ऐ..ऐ.... चल तुला एक गाण ऐकवतो...
पाहिले न मी तुला तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले
मृदुशैया टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूपदे कळी बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले 
पाहिले न मी तुला....
(सुरेश वाडकर)
आणि आमचा हाच समजूतदार पणा आम्हाला लग्नाच्या तारखेपर्यंत साथ देत होता. म्हणुनच हे सगळ काही शक्य झाल.
        त्या दिवसापासून नव्याने माझ्या लक्षात आले, आपल्या विषयी कुणीही कधीही कोणत्याही प्रकारे आपल्यापाठीमागे कुजबुजत असेल तर नक्कीच आपण काहीतरी महत्वाच व्यक्तीमहत्व आहोत आणि आपली कुठेतरी प्रगतीला सुरवात झाली आहे. याचा हा पुरावा कारण, आपली स्वतःची होणारी प्रगती आपल्या ला कशी दिसणार ना? ती आपल्या समोरच्यालाच दिसणार नाही का?, पुढे नेहमीचे फोन अगदी सुरळीत होते, आम्ही फोन वर गाण्याच्या भेंड्या खेळायचो, नाव गाव फळ फुल खेळायचो, लहान मुलांच्या कविता म्हणायचो, एकमेकांच्या बालपणीच्या आठवणी, मित्र परिवार, चांगले वाईट अनुभव, भविष्यातील स्वप्न कोणते, आयुष्यात सगळ्यात मोठ्ठ काय मिळवायचं आहे. असे काही सगळेच विषय आमच्या बोलण्यात असायचे. हो हेच विषय असायचे कारण रोम्यांटिक बोलायला दोघेही तसे लागतात. साहेब आमचे मस्ती मज्जा करण्यातच खुश असायचे. जानेवारी मध्ये सुपारी फोडली तेव्हा आम्हा दोघांना थोडफार खर खर वाटू लागल. कि हो आता काहीतरी लग्नाबद्दल सुरवात झाली राव. ऑगस्ट ते फेब्रुवारी तब्बल सहा महिन्यानंतर लक्षात आले.. आपण व्हिडीओ कॉल केलेच नाही.. अरे हो रे...! आपण व्हिडीओ कॉल करू शकतो. आपण करतच नाही ना?, तिथून मग सुरवात झाली ती व्हिडीओ कॉल ला.

           पुढील एक महिन्यात मी कसं तरी माझ ऑफिस संपवलं जेवढ्या पेंडिंग सुट्या होत्या तेवढ्या घेत गेले. मार्च महिन्यात अधूनमधून केवळ सात आठ दिवस काम केले बाकी दिवस घरीच लग्नाची शोप्पिंग लिस्ट मस्त मजेत सुरु झाली. ३० मार्च ला मी जॉब सोडला आणि लगेच एक एप्रिल ला पप्पांनकडे अकोल्याला मम्मी सोबत शोप्पिंग ला गेले. चार दिवस मस्त पैकी तीघेही मज्जा करत होतो. आयुष्यात एक चांगली गोष्ट घडणार असते, परंतु ती तिच्या बरोबर भविष्यासाठी किती सुंदर-सुंदर आठवणी बनवत असते याची आपल्याला अजिबात कल्पना नसते. बघता बघता माझा बस्ताहि बांधून झाला. माझ्या सगळ्या साड्या ह्या मम्मी पप्पांच्या पसंतीने घेतल्या गेल्या. पप्पा हि तोपर्यंत नाशिक ला आले आम्ही तिघींनी सुटकेचा श्वास टाकला आता काय काय बाकी आहे ते पप्पा घेतील बघून. पुढे पत्रिका वाटप सुरु झाले. तेव्हा अजून एक गोष्ट नव्याने समोर आली ती म्हणजे नातेवाई... हो ना ह्यांचे पण तर विचार बाकी होते ना?, आणि काय मग तेही असच काहीतरी लोकांप्रमाणे कुजबुजत होते. मुलगा आलेला नसतांना एवढी मोठी गोष्ट करताय? काय खर्च चाललाय? सगळ काही आपल्या आपल्या मनाच करताय कुणाला काही विचारत सुद्धा नाही. वैगरे..वैगरे...वैगरे.... पण आता आम्हाला ह्या सगळ्या बोलण्यावर मात्र हसू येत होत. आम्ही तेही फार मजेत घेतल. कारण नवरा फक्त २० दिवसासाठी येणार होता लग्नाच्या पाच दिवस आधी पुढे पंधरा दिवस मग हे सगळ आवरून घेणे फार गरजेच होत सगळ काही प्लानिंग मम्मी ने आणि बहिणीने केलेलं होत. कारण लग्न जमवणारा भाऊराया मुंबई ला सहा महिन्याच्या कोर्स साठी गेलेला होता. तो लग्नाच्या अधी चार दिवस येणार होता. माझ्या लग्नाची सगळी जबाबदारी हि बहिणीनेच पार पाडली.
 
           हळदी कुंकवाचा बाजार करायला देखील भारी धम्माल केली. सुहासीन स्त्रियांना जेवणाच आमंत्रणही पोहचले. तोही कार्यक्रम मम्मी ने आणि बहिणीने उत्तम रित्या पार पाडला. आता तर सर्वांनाच अजून मोठा प्रश्न पडू लागला. मुलगा इथे नसतांना एवढी मोठी जोखीम उचलताय?. कुणीही अशा गोष्टी तोंडावर काही बोलत नसत, पण आम्हा चारजणांना ते चागंल्या प्रकारे ठाऊक होत.
बघताच महिना संपत आला विमान भारतात पोहचण्याची वेळ आली. लग्ना आधी केवळ आठ दिवस साहेब आले. त्या आठ दिवसात त्यांची सगळी शोप्पिंग आटोपायची घाई होती. पहाटे तीन ला विमान प्रवास करून आलेला माणूस सकाळीस दहालाच घरात हजर... आमच्याही घरात दिवाळी आल्या प्रमाणे सगळी आवरासावर झाली. दारात भली मोठी रांगोळी, जेवणाची जय्यत तयारी, वेलकम बुके, मोतीचूर चे लाडू, गुलाबजाम, माझी तयारी वेगळीच, मोगऱ्याचा सुगंध दरवळलेला, सगळीकडे आनंदी वातावरण पसरलेले होते. फोन वर एवढे बोलणे झालेले होते कि पहिल्या भेटीत काय बोलणार? असा प्रश्न एकमेकांना पडलाच नाही. आता पुढे कोणती काम पूर्ण करायची त्याकडे लक्ष होत. जेवण आटोपली, फोटोंचे अल्बम, माझी कलाकुसर, हास्य कल्होळ, गप्पा छान पैकी रंगल्या. दुपारी चार पासून नवऱ्याच्या शोप्पिंग ला सुरवात, दागिने कपडे सगळे काही तीन चार दिवसात ओर्डर वर बनवून मिळाले. तोपर्यंत भाऊरायांचे आगमन झाले. लग्न जुळवणाराच सर्वात उशिरा हजर झाला. तिथून खरी धम्माल सुरु झाली. नवरा माझ्या घरी रोज हजेरी लावत होता. त्याच्या मेहंदी पार्लर साठी देखील मीच सोय केली. जमलेल्या पाहुणे मंडळीला जावयाच फार कौतुक वाटत होत. एवढ्या सगळ्या गडबडीत आम्ही एकमेकांसोबत निवांत पणे बोललो देखील नाही, पण एकमेकांच्या सानिध्यात असल्याच सुख मात्र अनुभवत होतो.
फुलले रे क्षण माझे फुलले रे                    मेहंदीच्या पाना छान रंगशील ना?
मेहंदीने शकुनाच्या मेहंदीने                      आमच्या सखीचे नखरे ग नाना
सजले रे क्षण माझे सजले रे                    बाई बाई नखरे ग नाना....(सरकारनामा)
                           
         
          कसे दिवस संपले काही कळालच नाही, हळदीचा दिवस उगवला
“हळदी ग हळदी” तुझ कस होणार? सावळ्या मुलीला गोरी कशी करणार?
आता मुलगी(आपणच आपल्या घरात) किती परकी असते याच्या जाणीवेला सुरवात होऊ लागली. आपल्या सामानाची आवरासावर केवळ एक दोन ब्यागेत होते यावर विश्वास बसेना, एरवी घर भर आपलाच पसारा आपलेच कपडेलत्ते मम्मी ओरडून ओरडून बिचारी दमून जायची पण सगळ काही आवरता येणे फार कठीण असायचं सगळ काही आवरलेल असणे हाच तो आयुष्यातला एक दिवस असावा बहुतेक कि त्या दिवसात आपल संपूर्ण सामान छोट्याशा जागेत आवरून भरून ठेवलेलं असत. ज्याप्रमाणे माणूस मेल्यावर काही फुटांची जागा त्याला पुरेपूर असते. त्याचप्रमाणे ह्या दिवसाला एका मुलगी स्त्री होणार असल्याची अनुभूती देते. आणि सुरवात होते ती नवीन जन्माला नवीन आयुष्याला. माहेरच अस्तित्व संपल... हा विचार म्हणजेच मरण यातना भोगल्याचा अनुभव....

नको नको सये मला हरणाची गाडी,
नको नको सये मला चांदण्याची साडी.
नको नको? का ग नको नको?
सासरी जाशील, राणी तू होशील.
छोटस गाव हे विसरून जाशील.
माहेरीच्या आठवाला गुळाची ग गोडी
सासरच्या दारी उभी साखरेची गाडी.
नको नको बाबा मला सासुरवाडी नको...
नको नको? का ग नको नको?
इवल्याशा घरट्याच्या पल्याड ग वाट पाहते आभाळ ग,
सोनुली माझी मोठी हो झाली, राजाच्या घरी निघाली.
छोटीच तुमची सोनुली बाबा तुम्हीच माझी हो माऊली
नेण्यात बसून वाजत गाजत लाडाची लेक निघाली
वाजत गाजत सासरी लेक निघाली....(सरकारनामा)

        दारात मंडप सजला, मेहेंदी खुलली, चुडा भरला, सुहासिनी जमल्या, हळद फोडली, गाणे रचले, रांजण- पाच तांबे सजले, लग्नातल्या पहिल्या सोहळ्याला सुरवात झाली. मन भारावले, अश्रू दाटले, अंग शहारले. मांडवात डोक्यार पाणी पडले.
“हळद लागली, खुलली मेहेंदी,
कानी बुगडी, नथनी, बिंदी
बोहल्यावर नवी नवरी हि
बावरली थोडी,
नेसली माहेरची साडी”....
मोठ्या गाजावाजात हळद पार पाडली मानपान, नाच-गाण, डीजे, जेवणाचा आस्वाद खूप वर्षातून सगळे भावंड, नातेवाईक एकत्र आले. दुसरा दिवस हा पाहुणे मंडळीच्या आरामाचा, मेहेंदीचा(दरवळलेला सुगंध), मंडपात बसून सगळ्यांची मस्ती धिंगाणा, मंद वाऱ्याची झुळूक, आया बायांची स्वयंपाकाची लगबग, नवरीच्या राहिलेली सामानची आवरा सावर आणि संध्याकाळी पप्पांच्या वाढदिवसाची जय्यत पार्टी.... भला मोठा केक नाच गाणी चिल्लर पार्टीचा गोंगाट....
  
          पप्पांनी छान असा घागरा कॉम्प्लीमेंन्टरी गिफ्ट घेतलेला होता. मग तो मी केव्हा घालणार त्यासाठी मीच ठरवल आपण लग्नातच साखरपुडा करूया, सगळ्यांना आयडीया भारी आवडली होती. काय करणार साहेबांनी त्यासाठी वेगळा असा वेळ काढून आलेच नव्हते. मग दोन वाजल्या पासूनच पार्लर गाठलं. नवरा माझा वेळेचा पक्का असल्यामुळे तो अगदी वेळेवर हजर होता. मलाही याची कल्पना असल्यामुळे मीही वेळेवर पोहचले परंतु, लग्न लावायला जायला मात्र मी फारच उशीर केला. माझा सोळाशिंगारच भारी असल्यामुळे त्याने मला काही उलट प्रश्न केला नाही. न कुणी ओरडले.
पडती अक्षता डोई वरती 
सनई चौघडे गाणी गाती
बघत सोहळा उभे वऱ्हाडी
वरातीसाठी सजून उभी ही 
घोड्याची गाडी 
नेसली माहेरची साडी....
अशा पद्धतीने थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. यात सगळ्यात महत्वाच म्हणजे सगळ काही माझ्या मनाजोग झाल. अगदी ज्या पद्धतीने मला हव त्याच पद्धतीने मम्मी-पप्पा, भाऊ, बहिण, नवऱ्याने सगळ्या गोष्टी मनाजोग्या करून दिल्या. एक तीळ मात्रही गोष्ट राहून गेली नाही.
आणि म्हणूनच माहेर आणि त्यानंतर देश सोडून जाण्याचा त्रास मला झेपवला गेला. आठवणीत रमत गमत पुढच्या प्रवासाला जे लागले.

              संपूर्ण लग्नाची गोष्ट लिहिण्या मागचे कारण हे कि, अगदी जुन्या पद्धतीने आमच लग्न झाल ज्या प्रमाणे पूर्वी नवरी नवऱ्याला दाखवली नाहीदाखवली तरी ऐवढा फारसा फरक पडत नव्हता. आणि हल्लीच्या युगात अशा पद्धतीच लग्न होणे म्हणजे सगळ्यांसाठीच आश्चर्याची गोष्ट होती. याची खबर आम्हाला जस जशी वेळ सरते तशी तशी मिळत गेली. आजूबाजूचा शेजार वर्ग, नातेवाईक, मित्रमंडळी, सोशल साईट्स वरील फोल्लोवर्स यांच्याकडून अचंभित कौतुकावरून आम्हाला आमच्या लग्नाच वेगळे पण कळत गेल. यासोबतच बरेच नव नवीन लोक जोडले गेले. परंतु अजून एक अनोखा अनुभव असा म्हणजे काही लोक तुटत सुद्धा गेले. दोन्ही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. आलीस का हनिमून(जपान) वरून, नाही आता मी इथेच राहणार आहे, ते इथेच असतात. झाल सोशल साईट्स वरून ब्लोक, काही नातेवाईकांना लग्न होई पर्यंत शाश्वती नव्हती पण सुरळीत पार पडल मग त्यांनाही त्याचा त्रास झाला. तर अशा प्रकारे आपल्या विषयी कोणाचे विचार काय आहेत हे वेळ दाखवून देत असते. आपल वाईट झाल किंवा फार फार फार चांगल झाल कि जवळची माणस ओळखण्याची एक संधी नियती मात्र नक्की देते. तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या सानिध्यातला माणूस ओळखता येतो. असोत आपल्यासाठी खऱ्या मनाने खुश होणारी लोक आज आपल्या सोबत आहेत, यात अभाळाएवढ सुख समाधान सामावलेल आहे.
           दुसरी एक मोठ्ठी गोष्टी म्हणजे कुंडली, नस, नाडी अशा भाकडकथांना आम्ही दोघा नवरा बायकोने मुठ माती देऊन, सामाजिक स्तरावर देखील काही बदल घडवून आणण्यात फार मोठी मोलाची भर घातली. याचा जास्त अभिमान वाटतो.  
           आणि तिसरी पण शेवटची नाही हा.हा..हा.... गोष्ट म्हणजे माझ्या नवऱ्याच्या काही मित्रांनी अशा पद्धतीने अगदी अशाच पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला, कारण विदेशात असलेल्या सगळ्याच मुलांना खास मुली पाहण्यासाठी स्वदेशी जाणे जमत नाही. घरच्यांना मुली पाहण्यास सांगितले, फोन वर जुळूनही आल. आम्ही पण त्या मित्रासाठी फार खुश झालो. आम्हाला खरच मनोमन फार छान वाटत होत, लग्नासाठी आपला आदर्श घेतला जातोय वाह:...! आम्ही त्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शनही केल. परंतु, ते दूर दूर पर्यंत शक्य झाले नाही, अक्षरशा तीन वेळा घडण-मोडण झाली. याच आम्हाला वाईट वाटल पण, त्या मित्राने स्वतःहूनच आमच्या लक्षात आणून दिले, तुमची जोडी हि फार जगा वेगळीच आहे. तुम्ही जो विश्वास एकमेकांवर ठेवला ज्या नात्याला एक सुंदर रूप दिल ते प्रत्येकालाच जमणार नाही निदान ह्या जमान्यात तरी. आम्ही मोठ्या समाधानाने एकमेकांकडे पाहून भारावून गेलो. अगदी तसेच जसे नव्याने एकमेकांच्या प्रेमात पडावे.
ज्या प्रमाणे माझ्या घरच्यांनी आणि मी लग्नाची सगळी तयारी नवरा तिथे नसतांना करून ठेवली होती त्याच प्रमाणे माझ्या नवऱ्याने जपान मध्ये सिंगल रूम सोडून फ्यामिली रूम घेऊन ठेवली, माझे सगळे कागदपत्र बनवून ठेवले, संसारात लागणाऱ्या सगळ्याच वस्तू घेऊन ठेवल्या मला इथे आल्यानंतर कोणत्याही गोष्टीची अडचण म्हणा किंवा चणचण भासली नाही. अगदी सुरळीत पणे मी इथे रमले.
आम्ही घेतलेला निर्णय आज साफल्यास आला. गुण्या गोविंदाने तीन वर्षे उलटली अशीच साथ आयुष्यभर माझी तुला राहील सतीश शिंदे.... आणि तू दिली नाहीस तर, तुझा गळा दाबीन.... हा.हा..हा....  हैप्पी हैप्पी थ्री इयर्स..... Happy Anniversarry.....    
कोन्या राजान राजान शेवडी खंदली, कोण्या राणीन राणीन पानीज भरल.
कोण्या रानीचा रानीचा तोडेज हरपल, कोण्या राजान राजान उचलून घेतल.
कोण्या राजाच्या राजाच्या डोल्यात भरली, कोण्या राणीला राणीला दिठ्ज लागली.
हा पाय शेणाचा हा पाय मेणाचा, बंधून बायको केली माय पदर सोन्याचा. 
पायल्या बांधती चिमण्या गोंधती, फुलाच्या फडकीवर माय लगीन लाविती,केळीच्या पानावरी माय बाम्हण जेविती
बंधून बायको केली माय पदर सोन्याचा, बंधून बायको केली.. बाईल केली..... माय पदर सोन्याचा... माय पदर सोन्याचा.....(जैत रे जैत)
अजून थोडस मनातल..... 
          आपल्या आयुष्याचे निर्णय आपण स्वतःच घ्यावे दुसऱ्यांसाठी ते बदलवू नये, कुणालाही न घाबरता न डगमगता आत्मविश्वासाने जगावे हे फार महत्वाचे असते.
आणि माझा सायंटिस्ट फक्त त्याच्या कामापुरताच पागल आहे. माझ्या मैत्रिणीची काळजी वाचली हो हा.हा..हा... त्याचप्रमाणे बऱ्याच सायंटिस्ट च्या बायकांकडून ऐकल होत, ते कुटुंबाला वेळ देत नाहीत, परंतु तसे काहीच झाले नाही, माझा नवरा मला पुरेपूर वेळ देतो. त्याच्यासाठी रिसर्च आणि कुटुंब दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. हैप्पी हैप्पी...... Happy Annivarsarry Hubby ल्ब्यू......!
 

            अजूनही आम्ही आमच्या सोन्याला चिडवतो. आता सोनाबाईच्या लग्नासाठी हॉस्पिटल गाठू नकोस... आपण सगळे मिळून छान स्थळ शोधू तिला... त्यासाठी अशी काही करामत करण्याची आवश्यकता नाहीईईई.... कळाले?..... कळाले....


राजश्री जगताप.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...