“तूच आहेस तुझ्या
जीवनाचा शिल्पकार”.....
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार”-डॉ
बाबासाहेब आंबेडकर. माझ्या संपूर्ण आयुष्यात मला एक खंत वाटत असायची, ती म्हणजे
आपल्याला चांगला गुरु कुणी लाभलेला नाही. नाही म्हणजे, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन
शिक्षण, किंवा कुठल्याही शैक्षणिक ठिकाणी खूप चांगले शिक्षक
लाभले. त्यांच्या मार्गदर्शनानेच आपण घडलेलो आहोत. त्या त्या वेळेला त्यांचा
आशीर्वाद, मार्गदर्शन, शुभेच्छा ह्या योग्य पद्धतीने मिळाल्या आणि त्यामुळेच
आयुष्यातील प्रत्येक पायरी यशस्वी रित्या पार पाडली. नोकरी च्या ठिकाणी वरिष्ठ देखील. तरी देखील बुहुदा “आयुष्य नक्की कशा
पद्धतीने घडवाव”?, हा आपल्या समोर फार मोठा प्रश्न पडलेला असतो. त्याची बरीचशी कारणे
असतात. कधी कधी योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन, योग्य सल्ला असणे हे सुद्धा पुरेसे
पडत नाही. जगात आपला सर्वात मोठा गुरु हे आपले आई वडील असतात. परंतु आपण त्यांच्या
कडून खरोखर किती गोष्टींच मार्गदर्शन घेतो?, फारस नाही घेत. काही मोजक्याच विषयांवर
आई वडिलांच्या मार्गदर्शना प्रमाणे आपण चालत असतो. कितीतरी गोष्टी तर त्यांना
सांगत, विचारात देखील नाही. त्यामुळे मी जर माझ्या मम्मी पप्पांन कडे कधी अशी कधी
तक्रार केली कि मला आयुष्यात चांगला गुरु लाभला नाही, त्यामुळे मला बऱ्याचशा
गोष्टी करता आल्या नाहीत. त्यावर त्यांच्याकडे सडेतोड उत्तर उपलब्ध असत, आम्ही
सांगितलेलं तुला पटत नाही, आघावपणा हा ठासून भारलेला आहे, आणि चांगला गुरु नाही
म्हणून आयुष्यात कुठली कर्तबगारी नाही....! हे तुझ वाक्य आम्हाला अजिबात पटत नाही.
जीवनात स्वतःच स्वतःला मार्ग दाखवावेत. जर दुसऱ्याच पटत नसेलच तर स्वतःच स्वतःचा
गुरु व्हाव. पण प्रयेक गोष्ट आत्मीयतेने पूर्णपणे यशस्वीरित्या पार पडता आली
पाहिजे. “तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस”. हो पण, मी जर कुणाच ऐकून एखादी गोष्टी केली तर ती
फारशी यशस्वी होत नाही कधीकधी तर मला त्या गोष्टीचा पश्चाताप देखील होतो. त्यामुळे
मी जाणून बुजून ह्या गोष्टी करते अशातला कुठला भाग नाही. मला फार मोठा प्रश्न
पडलेला असतो. चाणक्य सारख्या गुरूने चंद्रगुप्त सारखा शिष्य निवडला आणि त्याला “प्रबुध्द भारताचा सम्राट” बनवले. गुरु द्रोणाचार्यांनी
अर्जुनाला, एकलव्याला घडविले. असे गुरु आपल्याला का नाही लाभले. एकतर माझ्या अंगी
काही करण्याची पात्रता नसावी, एकतर कुणी माझ्यातील गुणांना ओळखले नसावे. मनात
विचारांत कल्पनांत फार मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत. पण त्या सत्यात कशा
घडवायच्या?......., कोण शिकवणार मला?......,
खर तर वरील प्रश्नाच
उत्तर “तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या एका ओळीतच आहे. जगातल्या प्रत्येक यशस्वी
मनुष्याकडे असे गुरु होते का? डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कुणी सल्ले दिले होते का? सिद्धार्थ
भगवान बुद्धांना कुणी सुचवले होते का? पण तरी देखील त्यांनी त्यांचे मार्ग स्वतः
निवडले, त्यात यशस्वी झाले आणि संपूर्ण जगाला देखील ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले.
मग आपण कमीतकमी स्वतःला सुद्धा घडवू शकत नाही का?, घडवू शकतो. “तूच तुझा गुरु”
त्याची सुरवात आपल्याला आयुष्यात नक्की काय हवय हे ओळखता आल पाहिजे, ध्येय समोर
असेल तरच ते गाठता येते, त्यासाठी योग्य मार्गा, दिशेची निवड करता आली पाहिजे, चुकीचे
लोक चुकीच्या दिशा याने मनुष्य नेहमी हरवतो त्यामुळे कशावर, कोणावर, केव्हा, कसा आणि
कशाप्रकारे विश्वास ठेवायचा हे हि उमगल पाहिजे.
आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे हि मला आज मिळाल्या सारखी वाटत आहेत.
नवीन गोष्टीला नवीन आयुष्याला सुरवात झाल्याप्रमाणे ध्येया कडे वाटचाल करण्यासाठी
अतिशय कठीण पण सोप्पा असा मार्ग मला मिळाला. गौतम बुद्धांनी खऱ्या ज्ञानाची ओळख
करून दिली, सुखाचे मार्ग सांगितले आपण त्यांना फार मानतो असे ढोंग करत असतो, परंतु
खरोखर कधी त्यांच्या शिकवणुकीच्या खोलात जाऊन त्यातील मर्म जाणून घेतले का? नाही
अजिबात नाही.... आपल्याला फार वरवरच्या गोष्टी माहित आहेत जसे बुद्धांनी ध्यानधारणेतून
जगाला शांती संदेश दिला, त्यांचा जीवनक्रम, त्यांच्या विषयी बरच काही माहित आहे. परंतु
कधी त्यांच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न केला का? त्यांनी नक्की काय सांगितल
आहे ते आपण केल का? किंवा आपणाला ते कितपत शक्य आहे हे जाणून घेतल का? राग, द्वेष,
लोभ, कामना, मत्सर, हत्या हे मनुष्याचे शत्रू आहेत. पण त्यांचा विनाश कशा प्रकारे
करायचा हेच आपल्याला ठाऊक नसत. तर त्यांचा विनाश हा केवळ आपल्या स्वतःच्या
विचारांवर, व्यक्तीमहत्वावर, आणि आपल्या चुकीच्या वर्तणुकीवर नियंत्रण ठेवून बदल
घडवणे. याहून सर्वात महत्वाच म्हणजे आपल्या शरीरातील हालचाली, आणि त्यांची देवाण
घेवाण हि कशा प्रकारे होते, नक्की आपले अवयव काय आणि कशा प्रकारचे कार्य साधत
असतात या गोष्टींच्या खोलीत शिरणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी केवळ “ध्यान” हे
गरजेचे आहे. आधी स्वतःवर आधिपत्य गाजवता आले पाहिजे, स्वतःला नियंत्रणात आणले
पाहिजे, आपल मन काबूत आणणे आवश्यक आहे.
“ध्यान” म्हंटल कि
कसं एखादा साधू बाबा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो ना?,! पण त्यालाच “मेडिटेशन”
म्हंटल कि लगेच सगळ काही बदलत. असोत... शब्दाने दृष्टीकोन बदलतो, पण अर्थ नाही. एखाद्या
बद्दल राग, चिडचिड, द्वेष, मानसिक त्रास, मनावर विचारांवर ताबा न राहणे, सतत कुठल्यान
कुठल्या लालसेत झुरत राहणे, इतरांमुळे आपला वर्तमान खराब करून घेणे इत्यादी अशा
अनेक प्रकारच्या त्रासांतून आपण दैनंदिन जीवन पार पाडत असतो. आणि यातून सुटका करून
घेणे अतिशय अवघड असते. त्याच कारण रोज नकारात्मक लोकांच्या संपर्कात येणे, त्यांच्या विषयी बोलणे,
त्यांच्या वागण्या बोलण्यावरून स्वतःला त्रास करून घेणे. वाईट भूतकाळ, चिंता
ग्रस्त भविष्यकाळ ह्याच संपूर्ण चौरसाला आयुष्य मानून ते रोज रोज मनावर बिंबवत अशा
रटाळ आयुष्याची मुंडकी गच्च दाबून आपण त्याला ओढत असतो. आणि हे सगळ सहन करण्याची
जेव्हा मर्यादा संपते तेव्हा माणूस स्वतःच्या शोधात निघतो. आणि त्त्याच वेळेला काहींना
त्याचा शोध लागतो तर काहींना पुन्हा नव्याने त्याच त्याच त्रासाचा सामना करावा
लागतो.
माझ्या आयुष्यात
नियतीने मला माझे मार्ग शोधण्यास फार मोठी मदत केली. ह्या सगळ्या त्रासातून
मुक्तता मनुष्य नक्कीच करू शकतो, याचा मला आज पुरावा मिळाला. सुरवात केवळ पाच
मिनिटाच्या धान्यातून झाली, त्याची गोडी मला लागली मग हळूहळू वेळ वाढवला. बोरिवलीचा
“विपश्यना पेगोडा” बघून आले, आणि अजूनच ह्या सगळ्याच्या खोलीत जाऊ लागले. “विपश्यना”
च्या कोर्स ची माहिती काढली. आणि दहा दिवसांचा कोर्स यशस्वी रित्या पार पाडला.
आयुष्यातली सर्वात मोठी आणि अवघड गोष्ट आज केली. हि गोष्ट मला कुणी शिकवली नाही,
कुणी सांगितली नाही हा मार्ग मी स्वतःच स्वतःचा ओळखला आणि फार हळूहळू त्यावर
सुरवात केली.
संपूर्ण दहा दिवस जंगलात राहणे,
कुणाचाही कुठल्याही प्रकारचा संपर्क नसणे,
कुठल्याही प्रकारचे विचार न करणे,
आपल्या संपूर्ण विचारांवर ताबा ठेवणे,
पूर्णपणे पहाटे ४ पासून ते रात्री ९.३० या दरम्यान आठ तास ध्यान करणे,
जेवणात मिरचीचा सामावेश नसणे,
फक्त मुलभूत गरजेच्याच सुविधा उपलब्ध असणे,
असे अनेक बदलांना स्वीकारत दहा दिवसांची “विपश्यना” मी यशश्वी रित्या
पार पाडली. आणि हे केवळ माझ्या नवऱ्याच्या मदतीनेच मी हे सगळ करू शकले. त्यांचा पूर्णपणे
मला आधार मिळाला, परवानगी मिळाली. म्हणूनच विदेशात असतांना देखील “Dhamm Adicca
Vipassana Meditation Center” हे राहत्या ठिकाणापासून सहा तासांच्या अंतरावर अनोळखी
ठिकाणी राहायला जाणे हा अनुभव आमच्या दोघांसाठीही फार भयंकर होता. पण गोष्ट जितकी
अवघड आहे तितकेच कष्ट देखील अवघड असतात. आणि त्याचे यशही तितकेच मोठे असते.
आपल्या आयुष्यात खूप
मोठे मोठे प्रसंग येत असतात, जसे नवीन बाळाचा जन्म, शिक्षणाचा दिवस, नोकरीचा दिवस,
लग्नाचा दिवस असे बरेच बरेच बरेच यश गाठलेल्या दिवसांना आपण नेहमी म्हणत असतो. हा
माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस, तो माझ्या आयुष्यातील महत्वाचा दिवस मी मरे
पर्यंत विसणार नाही, मरणाच्या शेवटी सुद्धा हाच दिवस लक्षात राहील असे आपण म्हणतो.
पण ह्या सगळ्या दिवसांच्या प्रती जे सुख आहे ते खरच सुख आहे का?, तर आपल उत्तर हो
हेच असेल. परंतु, खरच हेच सुख आहे का?. जर नाही तर मग, नक्की सुख काय आहे?. हा प्रश्न
स्वतःला इतक्या वेळेस विचारावा कि जोपर्यंत त्याच खर उत्तर मिळत नाही. आणि आपल्यात
बदल घडून येत नाही.
मला य प्रश्नाचे
उत्तर मिळाले आणि माझ्यात मी घडवून आणलेला बदल, विपश्यना काय आहे?, ती कशी करायची,
त्याचप्रमाणे माझा विपश्यना केंद्रातील संपूर्ण अनुभव हा आपण नंतरच्या लेखात
पाहूच.
पण आज स्वतःच स्वतःचा गुरु असल्याचा अभिमान वाटतो. त्याहीची कारणे मी
नंतरच्या लेखात नक्कीच लिहील.
“तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार” ह्या वाक्याचा मला आधी फार राग येत
होता, कारण तेव्हा माझे मार्ग अस्पष्ट होते. धेय्य आहे पण धेय्याच्या मार्गावर वाटचाल
करणे फार अवघड वाटत होते. आज ते सारे काही सोप्पे झाले. जो मार्ग मी निवडला त्यावर
अजिबात गर्दी नाहीये, अडचणी नाहीत फार सरळ धोपट मार्ग आहे. निदान आज एवढ तरी उमगल
आयुष्य जगायचं कसं. सिद्धार्थ भगवान बुद्धांच्या शिकवणुकीतील खरे मर्म आज कळाले.
दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.
बुद्धमं शरणम गच्छामीI💐👏
धम्ममं शरणम गच्छामीII💐👏👏
संघमं शरणम गच्छामीIII💐👏👏👏
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा