मुख्य सामग्रीवर वगळा

विदेशी दुखः....!


विदेशी दुखः....! 


      
       जपान मध्ये आंबे भेटणे म्हणजे मला स्वर्ग सुखाप्रमाणे भासले. सुरवातीला मला इथे एवढी कल्पना नव्हती कि टोकियो मध्ये आंबे मिळतील म्हणून एक दोन वर्षी आम्ही चार चार आंबे आणले होते. मात्र ते भारतीय नव्हते, त्यामुळे त्यांची चवही फारशी आम्हाला आवडली नव्हती. आणि किंमतही सोने खरेदी केल्याप्रमाणे. पण हल्ली बरचस आयात निर्यात वाढल आहे. उद्योग-धंदे वाढले आहेत. त्यामुळे विदेशातही स्वदेशी वस्तू मोठ्या प्रमाणत उपलब्ध होत आहेत. परंतु त्या प्रेत्येक गावात किंवा शहरात अजून पोहचत नाहीत. त्यामुळे त्यासाठी डिलिवरी चार्ज भरून आपल्या शहरात मागवावे लागते. आता काही वेळेस हे शक्य होत असते परंतु काही वेळेस दुपटी तिपटीने पैसे देऊन देखील एवढ्या लांबहून वस्तू मागवणे यात काही शहाणपण वाटत नाही. सोशल साईट वरून जस जस मला भारतीय वस्तूंचा पत्ता लागत असतो तस तस मी नवऱ्याला कळवते आणि लगेच माहिती काढून एकदा तरी ती गोष्ट मागवून बघायची हा ध्यास मनी असतो. मग काय आवडल तर पुढच्या वेळेस देखील मागवायच.

       विदेशात राहणाऱ्यांचे भारतीय पदार्थ, फळे, भाज्या खायला न भेटणे या बद्दल फार हाल होतात. आता आमच्या टोकियो मधील बऱ्याचशा लोकांना सहजासहजी हे सगळ मिळत पण आमच्या त्सुकुबापर्यंत येई पर्यंत मेथी कोथिंबीर सारख्या भाज्या खराब होतात. अथवा किंमत वस्तूपेक्षा पोहचवण्याची जास्त असते.

मी बऱ्याच दिवसापासून आंबे मागवा म्हणून नवऱ्याचा पीच्छा पुरवला होता. नाही तसे दोन तीन वेळेस खाल्ले ह्या वर्षाचे आंबे परंतु, मेक्सिकन म्यांगो.. हापूस, केसर आंबा जोपर्यंत खायला मिळत नाही तोपर्यंत आत्मिक समाधान लाभत नाही. सकाळीस उठल्या बरोबर एक पोस्ट पाहिली आणी लिंक नवऱ्याला पाठवली आणि आजच मला आंबे ओर्डर करून दे असा आदेश सोडला. आणि ठरवल देखील आज जर याने नाही मागले ना, तर मी स्वतःच ओर्डर देईल जाऊदेत डिलिवरी चार्ज किती जातोय तो. आणि गंमत काय तर मी स्वतःच विसरून गेले. संध्याकाळी मला म्हणाला मी ओर्डरसाठी फोन केला होता आणि सहज मित्राला बोललो कि केसर आंबे ह्या वर्षी खायला मिळणार. तर तो चटकन उत्तरला अरे मला पण एक बॉक्स सांग मी पण पैसे देतो, हो.. छानच ना मग दोघे मिळून डिलिवरी चार्ज देऊ.
हा.हा..हा.... भारीना मग.. योगा योगाने तुमचे थोडेफार पैसे कमी होण्याच समाधान, नाही का?, हो.... मी त्वरित मुग मोड येण्यासाठी ठेवले पुरी-भाजी, हुसळ, आंबारस, पुलाव अस काहीतरी करूयात.

         सकाळीस आंब्यांची आतुरतेने वाट पाहत होते. बरोबर ९.३० ला बेल वाजली. तशी मी ताडकन उठून गेट उघडल आणि बघते तर काय दोन भल्या मोठ्या पेट्या जाम खुश झाले. लगेच फोन केला ऐ.ऐ..ऐ...ऐ.... म्यांगो आगये म्यांगो आगये... चांगले आहेत का बघ, मी नाही तू ए मग बघूया मला फोटो काढायचे आहेत. ओके ठीक आहे. तोपर्यंत माझे मेनू ठरले आता दोन डझन आंबे आहेत तर लवकर खाऊया खराब झाले तर उगाच नुकसान नको. एक वेळेस पुऱ्या, एक वेळेस पुरणपोळी करूया. मुगाचे मोड फार छोटे होते मग दुसऱ्या दिवसापर्यंत मोठे होण्याची वाट पाहूया, कडधान्याला छान मोड आल्याशिवाय हुसळ खाण्याची मज्जा नाही.

        बॉक्स उघडल आहा.हा.....! काय सुगंध पसरला. बापरे माझ तरी वासानेच समाधान झाल. भयंकर गोड असणार बर.... सत्त्या तोपण बॉक्स खोलून बघून घे... नको ग त्याला द्यायचा आहे, बरोबर वाटत नाही. त्याला वाटेल मी निवडून घेतल. ओह्ह्ह्ह नो..... मी समजले आपल्याला दोन बॉक्स मी विसरूनच गेले, कि त्याला द्यायचा आहे. नको ना देऊ त्याला, दोन्ही मलाच हवेत. त्याला बोल तू ओर्डर केलेच नाही. हा.हा..हा... माहित आहे त्याला. मग बोल आलेच नाही, हो आलेच नाही गप्प बस तू.... मग तू त्याच्यासाठी दुसरे ओर्डर कर. अग त्याची मुलगी लहान आहे ती पण वाट बघत असेल, तिला पण भरपूर आवडतात ती रडत बसेल. म्हणून तर तो तिच्यासाठी तयार झाला ना... मी पण तुझी लहान मुलगी आहे, मला पण आवडतात, मी पण रडतेय.... माझी लहान मुलगी आता मोठी जाहलीय जेवढे आहे तेवढे तूच संपव चल, मी एकपण खाणार नाही. बघ बर का बाबा. मी दया करून सुद्धा तुला देणार नाही. चालेल का? हो चालेल.. मग दे मला कापून चल.. कापल्या बरोबर सत्त्या कसला खाण्याचा थांबतोय हो... एक खाप खातो हं फक्त एक.... खा खा खा चल.... तुला पण तर मिळत नाही ना... माझ्या हट्टा पाई तरी खा... हो ना यार.... आपल्याला आंबा, चिकू, बोर, चिंचा, आवळे, आळव(चिकूच्या रंगाचे), जांभळ, पेरू, करवंद, फणस, रामफळ, सीताफळ, ऊस, तितू हा रान मेवा मिळत नाहीच नाही पण डाळिंब, नारळ यासारखे महत्वाचे फळ सुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळतात. आणि भारतात जाऊन खायचे म्हणजे त्या त्या सिझन मध्ये आपण जात नाही. वर्षातून एकदा गेलो तरी त्या वेळेस जी फळ, भाज्या असतील तेवढच काय ते. पुन्हा एक दोन वर्षाने जाणार म्हंटल्यावर साधारण तोच सिझन येतो. आणि ह्याच सगळ्या कारणाने मी गेल्या पाच वर्षा पासून किती गोष्टी खाल्या नसतील काय माहित, कितीतरी गोष्टींचा तर विसर पडल्या सारखा झालय. कधी मिळेल सगळ काही खायला?.... विदेशी दुखः आहे ग माझ, विदेशी दुखः.... कसं सांगू तुला... माझ दुखः ग, विदेशी दुखः.....

गप नाटकी दुख:वाल्या, आधी तयार नव्हता आब्यांसाठी आणि आत्ता व्या.व्या..व्या... करतोय. खा सगळे आंबे तूच आणि समाधानी हो.... चल रडू नको, मी तुझ्यासाठी उद्या आंबारस-पुरी-भाजी, हुसळ, पुलाव, मुग-कांदा-टोमाटो मिक्स कोशिंबीर पापड मस्त बेत करते आणि रविवारी आंबारस पुरणपोळी करूया... करू...या.या..या...?..... हा.हा..हा.... बर मी करून देते. मागचा रविवार तुझा बिर्याणीचा होता ना?, म्हणजे याच्या पुढचा रविवार माझा आहे, अस सरळ सरळ सांग ना.... नाही तसा तू फार हुशार आहेस... म्हणून मला सांगायची आवशकता नाही.... हा.हा..हा.....

          तर आंबे मिळवण्यापासून ते सगळ काही ताट करे पर्यंतचा हा थाट केवळ त्या केसर आंब्यासाठी....
का नसावा?, फळांचा राजाच तो...!

आता रविवारी पुरणपोळी आंबारसाची जय्यत पार्टी.... 

टीप:- ज्याला यायचं असेल त्याने आपल्या आपल्या घरून चार सहा डझन वजनाने काही पाकिटाने झेपतील तसे आंबे आणावेत. केवळ आंबे आणनाराचेच स्वागत केले जाईल आणि पुरणपोळ्या मिळतील सोबत तिखट सार भजे कुरडया पापड्या सगळ काही मिळेल चिंता नसावी.

आम्हाला थोडस विदेशी दुखः आहे ना हो, म्हणून.....!        



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...