मुख्य सामग्रीवर वगळा

खुबसुरत है तू जन्म लेती हुई, खुबसुरत है तू जन्म देती हुई!


खुबसुरत है तू जन्म लेती हुई,
खुबसुरत है तू जन्म देती हुई!

         सकाळीस आठच्या सुमारास जपान मधून व्हिडीओ कॉल केला. आज्जीने उचलला. ए... कुणाच बाळ मांडीवर घेऊन बसलीस??? तुझ….! अस म्हणे पर्यंत माझ्या हातातल नावच ब्यांड तिला दिसल आणि तिला कळाल मी आज्जी झाले. अहोओओ... बाहेर या बाहेर या... तुम्ही आजोबा झाले. बापरे....!!! तू कधी हॉस्पिटल ला गेलीस? कधी बाळ झाल? अशा आनंदाच्या आश्चर्याचा धक्का आपल्या आई वडिलांना मी दिला.
गरोदर असतांनाहि मी जपान मध्ये एकटीच राहिले, नवऱ्याची मदत सोडून बाकी कुणाचीही मदत न घेता नऊ महिने सुखात आनंदात पार पाडले. आणि बाळंतपणासाठी देखील कुणालाही काहीही न कळवता हॉस्पिटल ला गेले. कारण खुशखबर मिलळेपर्यंत किती वेळ लागणार याची काही कल्पना नव्हती आणि तोपर्यंत भारतात असणाऱ्या माझ्या घरच्यांची काळजीस्तव काय अवस्था झाली असती याची मला कल्पना होती. त्यामुळे थेट बाळ झाल्यानंतरच सगळ्यांना फोन केले. माझ्या आई वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सगळ्या नातेवायकांमध्ये, शेजारी पाजारी सगळ्या ठिकाणच्या ओळखीत फोन पोहचले. माझे भरपूर खूप खूप कौतुक झाले.

         भरपूर मेसेजेस फोन आले कौतुक सोहळा तर अगदी जोरात सुरु झाला.
ताई तू हॉस्पिटल मधून घरी कधी जाणार आहेस? आम्हाला बाळ बघायचं आहे. व्हिडीओ कॉल कर... हो नक्की!
घरी आल्याबरोबर सगळ्यांचे व्हिडीओ कॉल सुरु झाले. काकी: अग चिऊ तू बाळंतीन आहे का काय? काय बोलू तुला? माझ्याकडे शब्दच नाहीत. बाळ जन्माला घालणे म्हणजे काही सोप्पी गोष्ट नाही ग.... पण, तू ती एकटीने सगळे काही कसं काय निभवलस? खरच बाई मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. एवढ छोटस बाळ तू एकटी सांभाळते बापरेरेरे. मला तर विचार सुद्धा करवत नाही ग बाई. काका: अभिनंदन चिऊ बेटा! अरे तू तर खूप खूप डेरिंग बाज आहेस. तुझ्या हिमतीची दाद द्यावीशी वाटते. जगताप खांदानीच नाव केलेस तू बेटा. बहिणी ताई तू तर एकदम जशीच्या तशीच आहेस ग स्लिम ट्रिम. वाटतच नाही तुला बाळ झालेय. हा.हा..हा....
मावशी मामा आज्जी यांना तर मी घेतलेल्या निर्णयावर सुरुवातीपासून फार काळजी वाटत होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा नव्याने आश्चर्याचा धक्का दिला.
त्याचप्रमाणे इथे जपान मधील आमच्या ज्या दुभाष्य करणाऱ्या आना-सन आणि निशिकावा-सन ह्या माझ्या सोबत संपूर्ण गरोदरपणात आणि बाळंतपणात सोबत होत्या पण त्यांना देखील सुरुवातीपासून माझ्यावर विश्वास नव्हता कि मी एकटी हे सगळ सुव्यवस्थितरित्या पार पाडू शकेल. कारण माझ वजन खूप कमी होते त्यावर स्वतःला सांभाळून घर सांभाळणे म्हणजे माझ्यासाठी खूप मोठे आव्हान होते, तेही परप्रांतात राहून. पण आज त्यांनाही माझा फार अभिमान वाटतो. आमच्या संबंधित जेवढेहि लोक इथे आहेत त्या सगळ्यांकडे त्या आवर्जून माझ कौतुक करतात. मातृत्वाचा आनंद हा सगळ्याच मातांसाठी नगण्य असतो. ह्या आनंदापुढे आभाळ ठेंगणे होते. पण आज मी जो अनुभव घेतला आहे तो केवळ खरच खूप नशीबवान असल्यामुळेच मला मिळाला.

         स्त्रीशक्ती मध्ये निश्चयाच बळ असणे आवश्यक आहे. आणि ते मी माझ्यामध्ये दिवसेंदिवस वाढवत गेले.  
त्यानंतर मैत्रिणींच कौतुक तर विचारायला नको कारण, आपल्याच वयाची व्यक्ती जेव्हा आपल्या पेक्षा वेगळ काहीतरी करते हे जेव्हा कळते तेव्हा भयंकर आश्चर्य तर होतेच पण कल्पना देखील करणे अवघड वाटते. तसच काहीस माझ्या मैत्रिणींच झाल. ग्रेट आहेस बाई तू, डेरिंग आहे तुझ्यात माझी नाही हिम्मत झाली, मी तर विचार सुद्धा करू शकत नाही, बरं बाई जमल तुला सगळ, तुझी आत्ता पर्यंत ची मजल पाहून लक्षात येतय कि तू बाळाचा सांभाळ देखील योग्य पद्धतीने करशील. तुला काही सल्ला देण्याची गरजच नाही वाटत. हा.हा..हा....
अशा प्रकारे हा कौतुक सोहळा होता, नाही म्हणेज हि फक्त काही उदाहरण आहेत यावर अजून बरीच शाबाशकी मिळालेली आहे.

         मला आज स्वत:चाच खूप अभिमान वाटतो. खूप आत्मविश्वास आणि आत्मसन्मान देखील वाढत आहे. आई वडिलांना खुठ्ल्याही प्रकारचा त्रास मी दिला नाही, कोणत्याही प्रकारची माझी जबाबदारी त्यांचावर येऊ दिली नाही. सगळ काही जपान मध्ये(विदेशात) राहून एकटीने सुखा-समाधानाने मुख्य म्हणजे सुधरूढ पद्धतीने सुधरूढ बाळाला जन्म देऊ शकले. आज आयुष्यातली खूप मोठी गोष्ट साध्य केली. माझ्या मेहनतीला आणि धैर्याला यश मिळाले. हे सगळ काही माझ्या नवऱ्याच्या मदतीशिवाय शक्य नव्हते. त्यांच्या योग्य समर्थनामुळे सगळे काही सोयिस्कर रित्या पार पडले. पण खर सांगायचं तर नवऱ्याच श्रेय केवळ बाळाचा जन्म होई पर्यंतच आहे बर. त्यानंतर मला वाटल अरे ए तो “चाय कम पाणी ज्यादा ऐ रे..... हा.हा..हा.... मजेत म्हणाले ओ.... परंतु सत्य हेच आहे कि पितृत्वासमोर मातृत्व नेहमीच जिंकत आलेलं आहे. स्त्रीत्वाच्या यातनेपुढे पुरुषाचा वाटा फिका पडतो. पुढचा जो संघर्ष आहे तो केवळ माझा म्हणजे माझाच आहे. आणि या सगळ्याहून महत्वाच सांगायचं म्हणजे सगळ काही शक्य झाल ते केवळ माझ्या गुणी बाळामुळे कारण, त्याने गर्भात असतांना देखील मला काहीही त्रास होऊ दिला नाही, त्याच्या जन्माच्या वेळी देखील मला कुठल्या गुंतागुतीला किंवा समस्यांना तोंडे देण्याची वेळ आली नाही. गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांत मला जाणवत होते, काही नाही आता आपल्याला फक्त हॉस्पिटल ला जाऊन बाळ घेऊन यायचे आहे बस्स्स.... आणि अगदी त्याच प्रकारे मी गेले आणि परततांना माझ्या बाळाला घेऊन आले हा.हा..हा.... थोडक्यात माझ्या मनाची तयारी मी एवढी मजबूत ठेवली होती कि नियतीला माझी साथ देणे भागच होते. माझी इच्छाशक्ती मी फार प्रबळ ठेवलेली होती. आणि त्याच प्रकारचे संस्कार माझ्या बळावर देखील झाले. बाळांतीन होण्याच्या दिवसापर्यंत घरतील सर्व काम केले, हॉस्पिटलला जाण्याआधी शतपावली करून आले, स्वतः जेवण बनवून जेवून गेले.
            
           सातव्या महिन्यात दुसऱ्या शहरात एकटी जाऊन दहा दिवस वन्यपरिसरात राहून विपशना(मेडीटेशन) करून आले. आठव्या महिन्यात समुद्र किनारी फिरायला जाऊन आमचे बेबीमून करून आलो. नवव्या महिन्यात डोहाळे जेवण मोठे जोरदार केले त्याची सगळी तयारी आम्ही होणाऱ्या आई वडिलांनीच केली. संपूर्ण नऊमहिने मी फोटोशूट वरच होते. भरपूर नीरनिराळ्या प्रकारचे फोटो व्हिडीओ मी नवऱ्याकडून काढून घेतले. गरोदरपणाचे सारे काही थाट, लाड, डोहाळे, सगळ्या इच्छा नवऱ्याकडून पुरुवून घेतल्या, आणि त्यांनीही ते खूप खुश होऊन हौसेने पुरवले.   
    
           बाळंतपणानंतर मला कुठल्याही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागले नाही. घरी पाचव्या दिवसापासून स्वयंपाक करायला सुरुवात केली. वीस पंचवीस दिवसात सगळ्या कामांना सुरुवात झाली. बाळाला सांभाळणेहि मला कुणी शिकवले नाही. सर्वच गोष्टी अगदी अनुभवी स्त्री प्रमाणे मी केल्या. जणू काही मला उपजतच हे सगळ ज्ञान मिळालेलं होत. कदाचित निसर्गाने सगळ्या गोष्टी आपल्यासाठी योग्य वेळेसाठी ठरवलेल्या असतात. जिथे धाडस आणि मेहनत आहे तिथे यश नक्कीच मिळते. त्याहून महत्वाच म्हणजे जेवढा मोठा निर्णय तेवढे मोठे यश....
आता याहूनही सगळ्यात मोठी आणि स्त्रियांची आवडती गोष्ट म्हणजे बाळंतपणानंतरही आपले सगळे ड्रेस, पेहराव सुवास्थित मनसोक्त वापरता येणे. अजिबात वजन वाढू न देणे. हि सगळ्यात मोठी गोष्ट जी फार कमी स्त्रियांना जोपासता येते. आयुष्यातील सगळे काही संघर्ष एका बाजूला आणि स्वतःची देखरेख करणे हे एका बाजूला हा.हा..हा....
आज हा छोटासा लेख लिहू शकले ते केवळ माझ्या बाळाच्या मदतीने. त्याने मला माझ्या स्वतःच्या कामासाठी देखील आज खूप वेळ दिला. थ्यांकयू प्रत्यूष बेटा. मम्मा लव्स यू बेबी....


दरवर्षी दोन महिने आधीपासूनच वाढदिवसाची तयारी सुरु असते. पण ह्यावर्षी नवऱ्याने स्वतःहून विचारले तुला काय गिफ्ट हवय? नाही माहित, मी काही विचारच नाही केला.  

बाळाला जन्म दिल्या नंतर स्वतःचा जन्म दिवस विसरले, कदाचित यालाच मातृत्व म्हणतात.  

म्हणूनच तर,
खुबसुरत है तू जन्म लेती हुई,
खुबसुरत है तू जन्म देती हुई.......

अभिमान वाटतो स्वतःचा.....
आहे कि नाही मी ग्रेट?....!

राजश्री जगताप.....


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...