मुख्य सामग्रीवर वगळा

स्वदेशी_दुःख


#स्वदेशी_दुःख

             ह्या वर्षी विदेशी दुःख जरी नसल तरी विदेशात जाण्याच दुःख मात्र आहेच. स्वदेशात असतांना आपल्या सांस्कृतिक पदार्थांचा भरभरून आस्वाद घ्यायला मिळाला. आंबे, कैऱ्या, मासे, भाज्या भरपूर हव्या तेवढ्या प्रमाणात खायला मिळाल्या. पण आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला स्वादिष्ट जेवण खाऊ घालता आले नाही की भारतीय स्त्रीला फार दुःख होते. घरात काहीही पदार्थ बनवू सर्वात आधी ताट वाढायचं ते पुरुषांना. आणि त्यांना जेवण आवडले म्हणजे आपल्या कष्टाला यश मिळाले.

मी कुठलाही पदार्थ बनवायच्या आधीपासूनच सत्त्या हे बनवूया ते बनवूया चल तुझ्यासाठी मी आज हे बनवते ते बनवते. आणि तो ही त्यावर भारीच खुश असतो त्यामुळे स्वयंपाक करण्याची मज्जा काही औरच असते. आणि मला आनंदात पाहण्यासाठी तोही खूप प्रोत्साहन देत असतो. घरात हव्या त्या स्वयंपाकाच्या वस्तू उपलब्ध करून देतो.
मागील वर्षी मी मे महिन्यात गरोदर असतांना मला डोहाळे लागलेले होते त्यावेळेस मला जे जे खावसा वाटल ते ते त्याने शोधून काढल. हा आंब्यांचा मौसम असतो त्यात मला आंबे हवे म्हणजे हवे तर केवढा तो खटाटोप त्याने त्या आंब्यांसाठी केला.
                     👇
https://www.facebook.com/1773734782927157/posts/2134007373566561/?d=n

ह्या वर्षी मला सगळ काही हव्या तेवढ्या प्रमाणात खायला मिळाले. ह्या वर्षी खायला मिळाले म्हणजे?, तिकडे खायला मिळत नव्हते अस नव्हे बर. भारतीय पदार्थ फळे थोड्या कष्टाने मिळाले. पण माझ्या नवऱ्याने त्यात थोडीदेखील कसर ठेवली नाही.

आणि आज मला त्याला हे सगळ पुरवता येत नसल्याच दुःख वाटत.
मला मम्मी बहीण छेडत असते सारख तीच चाल्लेल असत सतीश ला हे आवडत ते आवडत मला हे बनवायला सांगतो ते सांगतो अग बाई..... तू भरपूर खा त्याच्या पण वाट्याच खा तुझ्या प्रेमातून पोहचेल त्याला.
सांगायचा उद्देश माणूस कुठेही असो त्याचे दुःख मात्र पिच्छा सोडत नसतात. कोणत्या न कोणत्या स्वरूपातून टोचत असतात.

आजच्या शेवया आणि आंबारस मला फारशा आवडत नाहीत पण थोड्याफार स्वादासाठी खाल्या. नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ त्याला न देता आपण खातांना वाईट वाटत असत. पण काही नाही जेव्हा ज्या फळांचा भाज्यांचा हंगाम असेल त्या त्या नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न आपण करू. अशा समजुतीवर खुश व्हायचं. मग विदेशात असो किंवा स्वदेशात.

बाकी, सत्त्या......शेवया आंबा रस जबरदस्त झाला बर..!😉
तुला नाही देणार, तुला नाही....👎👎🤣😆😝

राजश्री जगताप .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...