#स्वदेशी_दुःख
ह्या वर्षी विदेशी दुःख जरी नसल तरी विदेशात जाण्याच दुःख मात्र आहेच. स्वदेशात असतांना आपल्या सांस्कृतिक पदार्थांचा भरभरून आस्वाद घ्यायला मिळाला. आंबे, कैऱ्या, मासे, भाज्या भरपूर हव्या तेवढ्या प्रमाणात खायला मिळाल्या. पण आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला स्वादिष्ट जेवण खाऊ घालता आले नाही की भारतीय स्त्रीला फार दुःख होते. घरात काहीही पदार्थ बनवू सर्वात आधी ताट वाढायचं ते पुरुषांना. आणि त्यांना जेवण आवडले म्हणजे आपल्या कष्टाला यश मिळाले.
मी कुठलाही पदार्थ बनवायच्या आधीपासूनच सत्त्या हे बनवूया ते बनवूया चल तुझ्यासाठी मी आज हे बनवते ते बनवते. आणि तो ही त्यावर भारीच खुश असतो त्यामुळे स्वयंपाक करण्याची मज्जा काही औरच असते. आणि मला आनंदात पाहण्यासाठी तोही खूप प्रोत्साहन देत असतो. घरात हव्या त्या स्वयंपाकाच्या वस्तू उपलब्ध करून देतो.
मागील वर्षी मी मे महिन्यात गरोदर असतांना मला डोहाळे लागलेले होते त्यावेळेस मला जे जे खावसा वाटल ते ते त्याने शोधून काढल. हा आंब्यांचा मौसम असतो त्यात मला आंबे हवे म्हणजे हवे तर केवढा तो खटाटोप त्याने त्या आंब्यांसाठी केला.
👇
https://www.facebook.com/1773734782927157/posts/2134007373566561/?d=n
ह्या वर्षी मला सगळ काही हव्या तेवढ्या प्रमाणात खायला मिळाले. ह्या वर्षी खायला मिळाले म्हणजे?, तिकडे खायला मिळत नव्हते अस नव्हे बर. भारतीय पदार्थ फळे थोड्या कष्टाने मिळाले. पण माझ्या नवऱ्याने त्यात थोडीदेखील कसर ठेवली नाही.
आणि आज मला त्याला हे सगळ पुरवता येत नसल्याच दुःख वाटत.
मला मम्मी बहीण छेडत असते सारख तीच चाल्लेल असत सतीश ला हे आवडत ते आवडत मला हे बनवायला सांगतो ते सांगतो अग बाई..... तू भरपूर खा त्याच्या पण वाट्याच खा तुझ्या प्रेमातून पोहचेल त्याला.
सांगायचा उद्देश माणूस कुठेही असो त्याचे दुःख मात्र पिच्छा सोडत नसतात. कोणत्या न कोणत्या स्वरूपातून टोचत असतात.
आजच्या शेवया आणि आंबारस मला फारशा आवडत नाहीत पण थोड्याफार स्वादासाठी खाल्या. नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ त्याला न देता आपण खातांना वाईट वाटत असत. पण काही नाही जेव्हा ज्या फळांचा भाज्यांचा हंगाम असेल त्या त्या नक्कीच मिळवण्याचा प्रयत्न आपण करू. अशा समजुतीवर खुश व्हायचं. मग विदेशात असो किंवा स्वदेशात.
बाकी, सत्त्या......शेवया आंबा रस जबरदस्त झाला बर..!😉
तुला नाही देणार, तुला नाही....👎👎🤣😆😝
राजश्री जगताप .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा