मुख्य सामग्रीवर वगळा
#भात_लावणी🌱🌾👩🏻‍🌾👨🏻‍🌾

जपान मध्ये सगळ्यांकडेच स्वतःची शेती नसते. आणि ज्यांना शेती करण्याची आवड आहे त्यांनी काही पैसे भरून दिवसभर, महिनाभर किंवा काही वर्षे तेवढी जागा घेऊन शेती मध्ये काम करू शकता. पण हे केवळ आपली आवड, छंद जोपासण्यासाठी आणि आपल्याकडून शेतकरी बांधवांसाठी काही मदत होत असल्यास छोटेसे योगदान आहे. त्यात लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत लोक सहभागी होत असतात. आणि मी देखील एक दिवसाचे 3500¥(येन) भरून यात सहभागी होऊन शेतकऱ्यांसाठी माझे योगदान दिले होते.
त्याचप्रमाणे ह्या सोबत जपानीज सांस्कृतिक सोबा नूडल्स सुद्धा त्यांनी आम्हाला शिकवले. सोबा नूडल्स हे जपान मधील सर्वात प्रिय आवडते असे नूडल्स आहेत त्या सोबत सूप सुद्धा असते. स्प्रिंग ओनियन (कांद्याच्या जाड लांब काड्या), कांद्याची पात नव्हे. त्याच्या चकत्या आणि वसाबी (खूप तिखट असा सॉस), सोया सॉस, पाण्याची छोटी पुडी असा लंच सेट बनवला जातो.
सोबा नूडल्स चे पीठ मळणे हे फार कठीण असते ते टणक मळता आले पाहिजे त्याला जवळजवळ एक तास पूर्ण लागतो आणि एक शंखाच्या आकाराचा त्याचा उंडा बनवता आला पाहिजे. त्यानांतर नूडल्स एका आकारात (जाडीत आणि लांबीत) कापता आले पाहिजे.
जपानीज लोकांचे हे वैशिष्ट्यच आहे कोणतेही काम क्रमाने करावे आणि हव्या तशा पद्धतीनेच त्यात कोणत्याही प्रकारचा बदल झालेला त्यांना आवडत नाही. भलेही तो पदार्थ चवीला सारखा होईल पण वेगवेगळ्या क्रमाने केले तर तुम्ही चुकलात समजा.
तर हे अवघड काम सुद्धा मी त्या एक दिवसात शिकले. दिवस मार्गी लागल्याचे सुख, समाधान आणि आनंद वाटला. दिवसभरात दोन वेळचे जेवण आणि घरी निघताना काही गमतीदार खेळ खेळलो लहान मुलांना खेळणी आणि सर्वांना सोबा नूडल्स, ग्रीन टी चे पाकीट देण्यात आले.
अशा प्रकारे जपान मधील शेती करण्याचा सुद्धा आनंद मी लुटला. एक दिवसातही आपण बरच काही शिकू शकतो.

भारतात आल्यावरही मी असा मौका सोडत नाही. पण यात मला वाटेकरू व्हावे असे कधीच वाटत नाही. तरी एक खेद मनाला नक्कीच वाटत असतो हे सगळं जर आपल्या हक्काच असत तरी आपण कंबर कसून किती काळजी पूर्वक काम केलं असत. योग्य पद्धतीने मशागत केली असती आणि मग हाच खेद वर्षभर तरी मनाला वाटू नये म्हणून शेतात काम करण्याची एकेदिवशी मज्जा मी दरवर्षी लुटत असते.
#Happy_forever👩🏻‍🌾🥳
व्हिडीओ कमेंट मध्ये😃

Rajashri Jagtap Rashri Jagtap-Shinde

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...