मुख्य सामग्रीवर वगळा

माझ्या बऱ्याच मैत्रिणींची तक्रार असते घरात फार कंटाळा येतो तू कशी ग एकटीच आनंदी राहतेस?, सगळे सोबत असतांना सुद्धा आयुष्याचा कंटाळा येतो तुझ्या सोबत तर कुणीच नसते मग तुला कस करमत? काय करतेस दिवसभर? तर,
मी एकटी याच कारणाने आनंदी राहू शकते कि, मी एकटेपणात नाही तर एकांतात राहते. आणि माझ्या ह्याच एकांताला मी छंदांची जोड दिलेली आहे. अर्थात मला अनेक छंद आहेत. ज्यामुळे एकाचा कंटाळा जरी आला तर दुसर काहीतरी करता येत. माझ्या कामाची आणि त्याचबरोबर छंदाची यादी मी दिवसाला आठवड्याला महिन्याला आणि वर्षाला सुद्धा करून ठेवत असते.
       जसे दिवसाची सुरवात घरातील काम, स्वयंपाक आटपून लेखन करायचं, वाचन, स्वतःचे फोटोशूट करून घ्यायला आवडते, फोटो एडिट करायचे, व्हिडीओ बनवायचे, कधीतरी उगाच नट्टापट्टा करायचा, गाणी ऐकायची, कधीतरी रुमालावरील(कपड्यावरील) नक्षी काम करायचं, चित्र काढायचं, रांगोळी मेहंदी काढायची, फुलझाडे आणून लावायचे, माझे मेकअप, साड्या आणि दागिन्यांचे डबे आवरून सुव्यवस्थित ठेवायचे, नवीन नवीन पदार्थ बनवायचे, कधीतरी विसरलेली ज्वेलरी डिझायनींग करायचं, फिरायला जाऊन यायचं, कधी थकलेलं असेल तर थोडाफार आराम म्हणून झोप घ्यायची, कधीतरी मैत्रिणींसोबत तास अन तास गप्पा मारायच्या, नाहीतर नवऱ्याला फोन करून त्रास द्यायचा, रोज थोडंफार मेडिटेशन करायचं, भरपूर शॉपिंग करायला आवडत, सगळं काही म्याचिंग दागिने कपडे मेकअप छान एकमेकांना शोभेल असच घालायला आवडत आणि फारच कंटाळा आला तर भविष्यात दागिने साड्या कोणत्या हव्यात त्याची यादी करून फोटो शोधून ठेवायचे, ऑनलाईन हव्या त्या वस्तू सापडून सापडून ऑर्डर करायचं, शो च्या वस्तू बनवायच्या, घर सजवायचं, कधीतरी काही अधुरे स्वप्न पूर्ण करावेत अशी लहर आली कि अभ्यासहि करते, नवीन नवीन ओळखी करून मैत्री करायला आवडते, पार्टी, सण साजरे करण्याचे प्लांनिंग्स करायला मला फार आवडत त्याची तयारी पुरेपूर झालीच पाहिजे असा अट्टहास असतो, जास्तीत जास्त भविष्यात रमायला आवडत नंतर वर्तमान काळात आणि भूतकाळ कधीतरी डोकावत असतो पण चांगला आणि आनंदी असला तरच त्यात रमायचं दुखी: वाईट वाटलं तर वरील यादीतील काहीतरी जे त्या क्षणात करता येईल ते करायचं. मला नोकरी करण्याची फार हौस होती जपान ला असतांनाही मी ती हौस पूर्ण केली स्वावलंबी आत्मनिर्भर राहायला मला आवडत. त्रास द्यायला म्हणजे फक्त दोन माणसांनाच आवडत पप्पा आणि पतीदेव तिथे स्वालंबीपणा ह्या गुणाला फारशी जागा नाही देत मी हा..हा....हा.....हा......  खूप खूप प्रेमळ आणि निर्मळ मनाची माणस मिळावीत अशी आशा रोज मनी उमलत असते. प्रत्येक स्वप्न हे अपल्याला सत्यात उतरवता आल पाहिजे यासाठी सकारात्मक विचारांची घट्ट वीण मनी असावी लागते.
अशी माझ्या छंदांची यादी फार मोठी आहे. हि फक्त उदाहरण झाली. अजून बरेच छंद आहेत. आणि ह्या सगळ्या छंदांमुळेच मी आनंदी राहू शकते, यात मला फारसे कुणाबद्दल वाईट किंवा चांगले असे कोणतेच विचार येत नाहीत. त्यामुळे दुसर्यांमुळे किंवा दुसऱ्यांसाठी आपला वेळ वाया न जाता तो छंदांमध्येच जातो. आपण आपल्यासाठी किंवा आपल्या स्वप्नांसाठी झटत राहिलो तर एकनएक दिवस नक्कीच हव्या त्या गोष्टीत यशस्वी होऊ. कुणाचं काय चाललय यापेक्षा आपल काय चाललंय आयुष्यात हे महत्वाचं असत.
आज एका बाळाची आई झाले परंतु मी माझ्या छंदांना मूठमाती दिली नाही. जे जे जमेल ते ते मी करत आहे. याच श्रेय मी नेहमी माझ्या गुणी बाळाला देत जाईल. उलट आता माझ्या छंदांची यादी हि वाढली आहे त्यामुळे ती जबाबदारीने पार पाडता यावी हीच खबरदारी सद्या मी बाळगून आहे.
लग्नाच्या वाढदिवसाला मी एक लेख लिहिला होता आणि त्याबरोबर एक व्हिडीओ ची लिंक पोस्ट केली होती त्ति हि
                 👇
https://www.facebook.com/1773734782927157/posts/2374830629484233/?d=n

याच व्हिडीओ मधील आणि आणखीन काही फोटो मी एडिट केले. सगळेच फोटो व्हिडीओ ला शोभणारे नव्हते त्यामुळे त्यात काही मोजकेच फोटो मी घेतलेले होते उर्वरित फोटो आज पोस्ट करते आहे. बराच वेळ लागला पण मला आवडतील असे एडिटिंग करण्याचा मी प्रयत्न केला. जुनी पोस्ट आज करतेय म्हणजेच मी आमच्या ह्या खूप खूप गोड आणि सुंदर आठवणीत रमले होते. त्यावेळेसही अशीच मेहनत घेतली होती आणि पुन्हा त्यावर लेख लिहितांनाही घेतली आणि आज पुन्हा तशीच मेहनत फोटो एडिटिंग आणि काही ओळी लिहिण्यात घेतली. त्यामुळे आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण असा जगा कि चिरंतर काळ तो स्मरणात राहिला पाहिजे. असेच सुखाचे आणि आनंदाचे दिवस पुन्हा लवकर येवोत करोनामुळे फ्लाईट लॉकडाऊन लवलरच संपुष्ठात येवो. नवीन नवीन स्वप्नांना बळ येवो. निसर्गाने मानवावरचा रुसवा लवकरच सोडून द्यावा.

दिल की धड़कनें तुझे पुकारें
आजा बालम आई बहारें
बैठके तनहाई में करले
सुख-दुख की दो बातें
चाँदनी रातेंचाँदनी रातें


राजश्री जगताप.....

टिप्पण्या

  1. खुपच सुंदर लिहिले आहेस उत्साहाच्या धबधबा आहेस.असं काही वाचलं की छान वाटतं आयुष्य असं भरभरून जगायला पाहिजे...

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...