मुख्य सामग्रीवर वगळा

"मोग्याम्बो खुश हुआ"....!

After & Before look with expressions🥰 लहान मुलांचे प्रत्येक हावभाव टिपण आणि ते शब्दात व्यक्त करणं हे फार कठीण असत, लहान बाळाला ऐकूण एक गोष्ट समजत असते आणि प्रत्येक गोष्टीला ते वेगवेगळ्या पद्धतीने आनंदी होतात त्यांचा तो आनंद पाहूनच मोठी माणसं हर्षउल्हाहसित होत असतात. घरात लहान बाळ असणे म्हणजे आभाळा एवढं मोठं सुख 🥰🥳 पिल्लूचे केस कापायचे, त्याच टकलू करायचं किती दिवसापासून घरातील सगळे अक्षरशः नाचत होते. शेवटी आज टकलू केलच.👶 आमचा आनंद पाहून ते पिल्लू पण एवढं उड्या मारू लागलं कि त्याच्या हे निरागसपणे खुश होण म्हणजे ह्या घराचं खूप मोठं सौख्य.🏡 पिल्लू टकलू करायला भारी मजेत बसल पण थोडं दाबून चेपून धरलं तर भोकाड पसरून रडायला लागलं.😭😫 केस कापून होतंय कुठं तर बाबांनी उचल तस दुकानात नेलं आणि भरपूर खाऊ घेऊन दिला.🍫🍭🍪🍿 मग काय रडू कोणत्या गावाला पळाल कुणास ठाऊक🥰. नाटकी रडणं ते म्हणा....😉😆🤣 आणि काय बाईक वरून मोठा चक्कर घरी आला तर त्याचे सगळं मित्र मैत्रिणी आनंदात उड्या मारून टकलू नान्टू चिडवू लागले.☺️ सगळ्यांचा जल्लोष पाहून आमचा शाकालपण खुश..😁 मम्माने शाकाल नाव ठेवलं तर मासी ने फोटो पोजेस पाहून "मोग्याम्बो खुश हूआ" नाव ठेवलं..... आई चांदोबा म्हणतेय. नारळ गोट्या, उजडा चमन असे कितीतरी नवीन नाव माझ्या प्रत्युष ला आज मिळाले🥳. एवढे सुंदर कुरळे केस कापल्याचे थोडस वाईट पिल्लुपासून आम्हा सर्वांनाच वाटलं पण, त्याहून जास्त आनंदच झाला💃🏻👶🕺🏻. माझा शाकाल अधून मधून आठवण आली कि त्याच्या टकलू वरून हात फिरवून त्याचे केस शोधतो...😝😝😆🤣❤️😘 ल्ब्यू श्वीट श्वीट पिल्लू👶😘😘

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...