मुख्य सामग्रीवर वगळा



 #प्रत्युष_अँड_फ्रेंड_सर्कल.....


कुठलाही सण येणार असला कि लहान मुलांची लगबग सुरु होते त्यांना सण साजरे करण्याची फार उत्सुकता असते. आणि त्यांची उत्सुकता पाहून मला सुद्धा फार आनंद होतो, त्यांच्या सोबत त्यांच्या वयाप्रमाणेच बागडावस वाटत. त्यात आता माझं छोट कांगारू टुणटुण उड्या मारत इथून तिथून लुडबुड करत फिरत. एक वर्षाचं चुणूकल पण चार पाच वर्षाच्या मुलासारखी मस्ती, खेळ आणि सुसाट पळत सुटायला त्याला आवडत. सकाळ होतेय नाही कुठे तर दिवभर मोठ्या मोठया मुलांमध्ये खेळतो आणि ह्या मुलांमध्ये हाच लहान असल्यामुळे तेही केवळ तो झोपेल तेव्हाच गायब होतात नाहीतर त्याची अंघोळ खाणंपिन होई पर्यंत आमच्या घरात मुलांचा नुसता कल्ह्हा चालू असतो. सतत हल्ला बोल चालू असतो. 

आणि लहानग्यांची हीच मज्जा मस्ती पाहून मी ठरवलं आपण दहा दिवस दांडिया ठेवूया. तस पण लॉकडाऊन मध्ये मुलांची शाळा नव्हती तरी देखील त्यांना सुट्टीचा आनंद काही घेता येत नव्हता. मग आता बाहेरील वातावरण थोडस बदलत आहे तर मुलांची हि हौस होऊनच जाऊदेत असा काही निश्चय मी केला आणि कामाला लागले. 

त्यात सगळ्यांना रोज हलका फुलका नाश्ता ठेवू, काही स्पर्धा ठेवू, आणि रोज दांडिया गरबा ठेवू. शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभ ठेवू. थोडक्यात काही मिनिटातच मी सगळं ठरवलं. आणि काय मग मुलांमध्ये बोलायचा उशीर त्यांनी तेच लावून धरलं आणि माझा पीच्छाच सोडला नाही. मुलांची तर कुणा कुणाला बोलवायचे याची भली मोठी यादीच तयार झाली. मग मला सुचलं कमी मुलं आणि आपल्या आजुबाजुचीच मुलं ठीक आहेत. पण त्यासाठी मुलांना कसे थांबणार तर प्रत्येक दिवस 10 रुपये म्हणजे  10 दिवसाचे 100 रुपये प्रत्येकी आणायचे. म्हणजे आपण केलेल्या गोष्टीची जाणीव लहान मुलांना राहते. ह्या लहानग्यांच्या मनावर योग्य त्या गोष्टी बिंबवता आल्यापाहिजे आणि प्रत्येक गोष्टीची किंमत त्यांना समजावी हा एक छोटासा प्रयत्न याचप्रमाणे आपणही बांधील असलो कि रोज नियमाने सगळं करूच नाही तर एक दिवस केले चार दिवस राहिले असे नको व्हायला म्हणून हे वर्गणीच बंधन असायला हवंय. आणि कुठल्याही पालकांना मुलांच्या आनंदासाठी 100 रुपये महाग नाहीत अशा काही अनेक छोटया छोट्या विचारांनी मी ठरवलं नऊरात्री ह्या लहानग्यांसोबत छान पद्धतीने साजरी करू..

कार्यक्रमाची रूपरेषा पाहून आधी माझी मम्मी खुश होती परंतु पैसे जमाकरून कार्यक्रम करणे हे तिला पसंत नव्हते. कारण कुणा पालकांना पटत कुणाला नाही पटत. तर तुला जमेल तो खाऊ आणून एक दोन दिवस तुझ्या तर्फे वाट आणि एक दोन दिवस नाचू दे त्यांना.... हो, पण मुलं आता ऐकणारी नव्हती. दीदी गरबा खेलेंगे ना नांटुची मम्मी दहा दिवस दांडिया गरबा खेळू असा नाच सगळ्यांचा सुरु होता. 


आणि मग काय नांटुच्या ह्या "प्रत्युष अँड फ्रेंड सर्कल" ला जे काम सांगितलं ते करायला ते तत्पर असतात. त्यांनी सगळ्यांकडून वर्गणी गोळा करून आणली. जुन्या काही दांडिया मी शोधून काढल्या तर त्या फार वाकड्या तुकड्या काठ्या वाटल्या मग सगळ्यांसाठी नवीन आणि सारख्याच घेऊन येण्याची बोली झाली. दांडिया सगळ्या दुकानात भरपूर शोधल्या पण काही मिळाल्या नाही. मग जुन्याच दांडिया ह्या लहानग्यांच्या मदतीने थोड्याश्या नटवल्या. 

भरपूर अशी लायटिंग पिल्लुच्या मम्मीने दिली.

त्याचबरोबर आजची स्पर्धा हि चमचा लिंबू.

आजचा मेनू साबुदाणा वडा + दही. 

असे छान छान मेनू दहा दिवस रोज वेगळे वेगळे असणार आहे. 

माझे चिमुरडे सकाळपासून भयंकर खुश आहेत. उड्या मारताय मस्ती करताय. फुल धम्माल चालू आहे.

आता पुढची मज्जा मस्ती दांडिया गरबा जय्य्त तयारीत होओ... माझ्या छोट्या छोट्या मुल्लांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. 

आजचा रंग राखाडी त्या रंगाचे कपडे सगळ्यांनी कालच ठरवून ठेवलेत कोण कोण काय काय घालणार आहे सगळं ठरलंय. माझ्या नांटु कडे जे रंग नाहीत ते मी त्याला नवीन घेऊन येईल. भरपूर धम्माल करा पिल्लांनो..... 

उदय : अरे दीदी पर अपने दांडिया मे देवीहिचचच नही है..! हा..हा...हा..... 

मी : ये क्या, है ना उदय...! पिल्लू गुड्डू किट्टू श्रमिका  देवीहीच तो है.! 

उदय : हा..हा...हा...हा..... तो क्या दीदी मैं उनकी आरती उतारू क्या?

मी : नही, उनसे प्यार से बात कर , अच्छेसे बात कर सन्मान से बात कर बस आरती करणे कि जरुरत नही है!

उदय : सन्मानसे मतलब वो क्या होता है? हा..हा...हा...

मी : जैसे हर एक बडे इन्सानसे बात करते है ना वैसे बात कर.., उसे केहेते सन्मान... तू जैसे मुझसे बात करता है वैसेहीच....

उदय : मतलब क्या मैं पिल्लू गुड्डू किट्टू श्रमिका उनको आप आप बोलू क्या? हा..हा...हा....

बेटा आज तुने खुद सन्मान शब्द का अर्थ मुझे बताया है तो तू जरूर करेगा.... होशियार उदय.....

आज मला छोट्याशा स्वसरुपात का होईना मला स्त्री सन्माना बद्दल छोटस काहीतरी छोट्या मुलाला समजवता आल. 

आणि माझ्या नांटुला तर सांगायलाच नको तो सगळ्या मुलींसोबत एवढं प्रेमाने खेळतो त्या पण सगळ्या त्याला खूप जीव लावतात. अशी आमच्या सणाला सुरवात झालीय. त्यात कोणतीही अंधश्रद्धा नाही त्यात कोणतंही बंधन नाही. आनंदाने नाचा, बागडा उड्या मारा मज्जा मस्ती धम्माल करा.... 

संपूर्ण प्रत्युष अँड फ्रेंड सर्कल ला नांटुच्या मम्मीचे अनेक अनेक आशीर्वाद....


राजश्री जगताप....

Rajashri Jagtap Rashri Jagtap-Shinde

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...