मुख्य सामग्रीवर वगळा


माझं घर माझा संसार २०१६......

      लग्नांनंतर अवघ्या तेरा दिवसातच जपानला आले, त्यामुळे माझ्या संसाराची सुरवात हि ल्यक्स सेंघेन, त्सुकुबा इबाराकी, जपान. इथूनच झाली. विदेशात असल्यामुळे रेंटल हाउस होते. भाड्याने घेतलेलं घर हे काही दिवसानंतर बदलावच लागत, त्याची कारणे अनेक असतात. त्या घरात घडलेल्या बऱ्याच आठवणी तिथून घेऊन जातांना जेवढा आनंद होतो तेव्हडाच मात्र जीव कासावीसही होतो. पण हा नैसर्गिक नियमच आहे कुठलीही जागा सोडताना दुःख उराशी बाळगावच लागत. भविष्यातील येणाऱ्या सुखद आठवणी ह्या जुन्या, चांगल्या वाईट, गोड कडू आठवणींना जोडून पुढे चालावच लागत.  

जपान मधून भारतात पिल्लूला घेऊन जातांना थोडफार मनावर दडपण आले होते कि पुन्हा जपान मध्ये यायला मिळेल कि नाही किंवा मिळालेच तर आपल्या ह्या घरात पुन्हा राहायला मिळेल कि नाही. कारण एकदा सहजच नवऱ्याला म्हंटल होत हे घर आपल्याला आता फार छोट पडत, पिल्लू आल्यावर आपण मोठ घर घेऊया..! त्यावर नवरा उत्तरला हा...! काय गरज आहे? आहे ते छान आहे मोठ घर घेणे म्हणजे मोठे पैसे मोजणे... अशा हेके खोर माणसाला ना त्याच्या वेळेवर सोडून दिलेल केव्हाही चांगलच असत. जेव्हा त्याला खुद्द अनुभव येतात तेव्हा आपण सांगितलेलीच गोष्ट तो करतो हे नक्की. त्यामुळे नाही तर नाही म्हणून विषयातून पळवाट काढून घ्यायची. इथे असतांना खूप काही सुख, खूप काही आनंदी क्षण मिळाले, जपान मधील आकर्षक पर्यटन ठिकाणांची भ्रमंती केली. इथे असतांनाच गोंडस बाळ जन्माला आले. अशा गेल्या चार ते पाच वर्षात भरपूर खूप खूप आठवणींचा संग्रह तयार झाला. आणि हे सगळ इथे विदेशात सोडून जायचं या विचारानेच माझ मन सैरवैर होऊ लागले. घरातून बाहेर पाऊल टाकतांना अगदी कळवळून इच्छा व्यक्त केली एकदातरी मला पुन्हा ह्या घरात यायला मिळाव. उंबरठ्याच्या पाया पडले आणि निवांत निघाले.

       भारतात असतांनाच कोविड ची साथ सुरु झाली अन आता पुन्हा जपानला केव्हा येऊ याची काहीही शास्वती उरली नाही. तरीही मनातून कुठेतरी एक सकारात्मक साथ होती. असे करता करता काही महिन्यातच जपानला पिल्लूला घेऊन यायचं ठरल आणि नवरा स्वतः उत्तरला आपण मोठ घर घेऊ हे घर पिल्लुसाठी खूप लहान होईल.... ओअअ.. तेर्र्रेक्की... अब आया न उंट पहाड के नीचे.... बर ठीक आहे, आता काय तू म्हणतोय तर घेऊच..., हा.हा..हा....!

      नवीन घर नवीन सामान भारतातल्या अमच्या तयारी सोबतच इकडे जपानची तयारी सुद्धा सुरु झाली. मग “सेंघेन” मधील घर हे एका डेविड नावाच्या स्पेन मधील मित्राला सामना सहित स्वाधीन करायचं ठरवल. सगळे कागदपत्र बनवले गेले. नवीन घर घेण्याचा आनंद आणि जुन घर सोडण्याच दु:ख मग काय पुन्हा स्वतःची समजूत त्याच वाक्यात “जीवन हे सुख दुःखाचा सुरेख संगम आहे”. अरे..रेरे...रे....!

       पुढे काही दिवसानंतर कळले पिल्लू आणि मी आपल्या घरी क्वारंनटाईन राहू शकत नाही. आपल्याला हॉटेल वर रहावे लागेल. सात आठ दहा दिवस जवळचे खिशाला परवडणारे हॉटेल शोधण्यात गेले. शेवटी जवळच्या परिसरातच हॉटेल बुक केले. काही दिवसाने पुन्हा विचार केला आपण जर हॉटेल वर राहिले तर पिल्लूला थोड्यावेळासाठी सुद्धा बाहेर फिरायला घेऊन जाता येणार नाही, तो दोन खोल्यांमध्ये राहून खूप कंटाळून जाईल, आधीच आई बाबापासून दुरावलेला असणार. हॉटेल वाले कर्मचारी आपल्यावर निगराणी ठेवतील ते बाळासाठी खूप त्रास दायक ठरेल. त्यात अचानक माझ जुन्या घरातील आठवणींच दु:ख जागृत झाल आणि मी चटकन उत्तरले अरे डेविड ला सांगा तू पंधरा दिवस आमच्या घरी रहा आणि आम्ही तुझ्या घरी म्हणजे आमच्या आमच्या घरी हा..हा...हा..... राहतो. तुला मस्त नवीन घर आहे नवीन सामान आहे. तुला हॉटेल सारखी सुविधा माझ्या घरात उपलब्ध आहे. आणि तो जर नाहीच म्हणाला तर त्याला म्हणाव अरे जा लॉकडाऊन मध्ये कंटाळला अशील दुसऱ्या जागेत राहून फ्रेश हो.... हा.हा..हा.... हा.! हि भारी आयडिया आहे, मी लगेच विचारतो त्याला. दोन दिवस चार दिवस लोटले विचारल का डेविड ला? विचारल का डेविड ला? माझ आपल सारख सुरुच... अग नाही गं मला ते बरोबर नाही वाटत. जाऊदे नको... त्यातही हो नाही हो नाही करून शेवटी एकदा विचारून बघितलच.... डेविड तर काय खूशच झाला. वॉव...! नो प्रॉब्लेम... त्यानेहि तेच सांगितले कि मी लॉकडाऊन मध्ये एक जागी राहून कंटाळलो मला पण थोडाफार बदल मिळेल... आणि काय मग पंधरा दिवसांसाठी का होईना “सेंघेन” मध्ये राहण्याचा योग पुन्हा नव्याने आला.... आणि आम्ही बुक केलेले हॉटेल रद्द केले. याबद्दल डेविड आमचा आता नेहमीचा पाहुणा झाला डेविडला हे जेवण बनवू ते जेवण बनवू त्याच्यासाठी भारतीय पदार्थांचे स्पेशल मेनू कार्ड रेडी झाले. फक्त क्वारंटाईन संपण्याची वाट बघत होतो.

बस फिर क्या “दिल से चाहो तो कायनात भी जुड जाती है मेरे दोस्त”...

अशा पद्धतीने कोविड टेस्टेड पिल्लू आणि मम्मा ड्याडी ला घेऊन आमच्या “सेंघेन” च्या जुन्या सुंदर घरात पंधरा दिवस आनंदात राहिलो. आणि संपूर्णपणे कैद न राहता पिल्लूला दुपारच्या वेळी जवळपास फिरायलाही नेले. आमच्या रहदारीचा जो रस्ता आहे तेथे कुणीही बाहेर येत नसल्यामुळे हे शक्य झाले.

माझ्या “क्षणांनी भरलेल्या आभाळात” अजून एक असा आगळा वेगळा कधीही न विसरता येण्यासारखा क्षण म्हणजे आमच छोटस कुटुंब पंधरा दिवस वर्क फ्रॉम होम करून एकत्र राहू शकले. अगदी जसे आपण लॉकडाऊन मध्ये काही महिने राहिलो तसेच. तेए.ए.. आम्ही आमच्या ड्याडी सोबत लॉकडाऊन साजरा केला नव्हता ना... हा.हा..हा... म्हणून मम्मा आणि पिल्लुडीने मिळून ड्याडीच्या आयुष्यात ती परिपूर्णता केली.

दृष्ट लागण्याजोगे सारेगालबोटही कुठे नसे
जग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे

 

स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे
दोघांनाही जे जे हवे ते, होईल साकार येथे

 

आनंदाची अन्‌ तृप्तीची,
शांत सावली इथे मिळे

जग दोघांचे असे रचू की,
स्वर्ग त्यापुढे फिका पडे
स्वर्ग त्यापुढे फिका पडे..

         खूप त्रास, कष्ट, दु:ख, मेहनत, वर्षभराचा दुरावा, हे सगळ सहन करून शेवटी आज २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनादिवशी काही सर्दी खोकला किंवा तब्येतीचा आणखी कुठल्याही प्रकारचा त्रास न होता पंधरा दिवसाचे क्वारंनटाईन आम्ही सुखा सुखी पार पाडून आमच्या “त्सुकुबा सेंटर” च्या नव्या घरी आगमन केले.

आपल कस ना भाऊ थोड लेट असतंय, पण एकदम थेटच असतंय बघा.....

बाकी नवीन घराचे फोटो मौज मज्जा क्षणांनी भरलेल्या आभाळात वाढतच जातील....

After_Pandemic #Newhouse #Newyear #Newbeginning #Newfriends #Newlife #Newexperience  from this 26th January 2021.… Happy Republic Day to all…..

सगळ्यांना २६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.....

प्रजासत्ताक दिन चिरायू होओ.....

 

 

जय हिंद जय भारत

भारत माता कि जय......

 

राजश्री जगताप.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...