मुख्य सामग्रीवर वगळा

#सुगंधित_गोंडा 

            दसरा आणि दिवाळीला खास गोंड्याच्या फुलांचा मान असतो. नाही म्हणजे तस गोंड्याच्या फुलाला वर्षाचे बाराहि महिने तेव्हडाच मान असतो., नाही?!, मला गोंड्याची फुल अगदी मोगऱ्याच्या फुलांप्रमाणेच आवडतात. त्यांचा सुगंध त्यांच्या रंगांचे प्रकार आणि मुख्य म्हणजे जेव्हा ते आंब्याच्या पानांसोबत जोडले/ओवले जातात तेव्हा ते जे काही आकर्षक दिसतात आणि दोघांचा एकत्रित सुगंध म्हणजे आहा.!!! 


बऱ्याचशा सणांना पूजेला घरी नेहमी गोंड्याची फुले आवर्जून आणली जायची. बाजारात गोंड्याच्या फुलांचे ढीग आणि ते फुले विकण्यासाठीचा विक्रेत्यांचा आरडाओरडा, ग्राहकांची लगबग, घरी फुल आणल्या नंतर त्याची तोरण ओवायचे त्यासाठी लागणाऱ्या दोऱ्या पासून, जाडी सुई शोधून, आंब्याचे पानं तोडून आणायचे ते स्वच्छ धुवून पटापट दोन्ही चारी दारांसाठी तोरण, बाबासाहेबांच्या फोटोला हार, गाड्यांसाठी हार काही उरलेली किंवा जाणीवपूर्वक काही फुले उरवून ठेवायचे मम्मी आठवणीने ओरडून सांगते बाई काही सुट्टे फुल बाजूला काढून ठेव बुद्धांना वाहायला. आम्ही लहान असतांना ती स्वतःच हे सगळं करायची तीची हि कलाकुसर पाहूनच तर मोठे झालो आणि आता स्वतः ते बनवू शकतो. अशा प्रकारे तोरण आणि हार तयार व्हायचे सणाच्या आदल्या दिवशीची हि सर्वात महत्वाची तयारी ती फार लवकर पण करून ठेऊ शकत नाही आणि अगदी वेळेवर पण करू शकत नाही. त्यांनतर मग रांगोळीचा क्रमांक, मग पुढे उर्वरित  सणाची तयारी. अशा प्रकारचं महत्व ह्या गोंड्याच्या फुलाला सणाच्या दिवशीच आहे.

नाही म्हणजे हे मी अगदीच अलगद आठवणाऱ्या आठवणी बद्दल लिहलं तस पाहिलं तर गोंड्याच्या फुला बद्दल बोलत बसलो तर रात्र छोटी पडेल. आता माझ खरं दुःख मांडायचं म्हणजे ते असं की विदेशात यातील कुठलाच सुगंध दरवळत नाही, केवळ आठवणीतच तो दरवळतो. कधीतरी कुठेतरी गोंड्याची फुले मिळतात पाहायला पण बोटॅनिकल  गार्डन सारख्या ठिकाणी, असोत... म्हणून काय मी आता दुखी होऊन बसू होय?, बऱ्याच वर्षांपासून म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून माझी इच्छा होती गोंड्याच्या फुलांची  सजावट आपण स्वतः वूलन चे फुल तयार करून करू पण, ते राहून जायचं आणि भलतीच  वेगळी काहीतरी सजावट घरात केली जायची. नाही म्हणजे तीही अगदी मनपसंतच बरं. ह्या वर्षी योगायोगाने वूलन ची फुले आणि पानांसाठीच साहित्य महिनाभगर आधीच आणून ठेवल होत कुठल्याही कामासाठी लागणार साहित्य हाताखाली असलं की कधीही कामाला सुरवात होते. विचाराप्रमाणे दिवाळीच्या चार दिवस आधी तोरण बनवायला सुरवात झाली. तोरणाला लागणारे सोनेरी लटकन हे पिल्लुच्या खेळणीतील चेंडू घेऊन सोनेरी कागदाने सजवले एकंदरीत संपूर्ण तोरण हे हस्तनिर्मित आहे आणि सुंदर माझ्या मनाला आवडेल असं छानस सुरेख तोरण माझ्या हातून विणलं गेलं फार आनंदी आणि सुखद असा क्षण क्षणांनी भरलेल्या आभाळात अधिक झाला. सुट्टे फुलंही आठवणीने मोजून बनवले बरं.... हा..हा...हा....

पिल्लू हे बघ अस गोंड्याच फुल बनवतात गोंदया.या गोंदया.या गोंदया.या..., गोंदया.या नाही रे पिल्ल्या गोंडा म्हण गोंडा.. गोंदाआ गोंदाआ... गेंदा फुल बोल बाबू गेंदा फुल.. गेंदाआआ गेंदाआआ.... जाऊदे पिल्लू तू आता पुढच्या वर्षी गोंड्याची फुलंच बनवून दे मला. मम्मा आत्ता आत्ता... आत्ता नको बाळा आत्ता मम्माने बनवले ना...?, हंम्म्म... हुशार माझं बाळ पुढची पिढी सुद्धा गोंड्याची फुले तोरण बनवण्यास सज्ज आहे. अजून काय हवंय..?! अगदी साद सोप्प काम होत छोटीशी ईच्छा होती परंतु त्यातील आनंद भला मोठा आभाळाएवढा मिळाला. कल्पना शक्ती सत्यात उतरवण्याचा आनंद. नाही म्हणजे इतर कुणी नेहमीच बनवत असेल अशी फुले पण मी केलेल्या कुठल्याही कामाचं कौतुक मी स्वतः आधी करतेच करते. 

त्याचबरोबर गोंड्याच्या सुगंधित आठवणी देखील जाग्या झाल्या. त्यामुळं वूलन च्या ह्या गोंड्याला देखील आठवणींचा सुगंध आहे बरं... त्याचप्रमाणे त्यांच्याकडे पाहिल्या नंतर कुणीही ओळखू शकणार नाही गोंडा असली? की नकली?.... आहे कि नाही गंमत. 

एवढी मेहनत ती कशासाठी तर म्हणे माझे सुंदर सुंदर छान छान फोटो काढण्यासाठी.....! 

Happy गोंदया🌼.....  Happyपिल्लू♥️…….


राजश्री जगताप.....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...