मुख्य सामग्रीवर वगळा

ओळख तारा ज्वेलरीची....

 




ओळख तारा ज्वेलरीची...


        नमस्कार, मी राजश्री जगताप. सर्वात आधी सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्ष आनंदचे सुखाचे समृद्धीचे जावो त्याच बरोबर आपण केलेले संकल्प पूर्ण करण्याचे सामर्थ्य निर्माण होवो. कसे आहात? निश्चितच मी गृहीत धरते सर्व कुशल मंगल असावे. कोविडच्या वातावरणातून आपण बाहेर येतो न येतो तोच आता ओमिक्रोन नावाच्या विषाणूने पुन्हा लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केलेले आहे. परंतु आपण घाबरून न जाता स्वत:ची आणि आपल्या कुटुंबाची योग्य पद्धतीने काळजी घेणे महत्वाचे आहे. कोविड ओमिक्रोन अशा प्रकारचे अनेक विषाणू भविष्यात उद्भवण्याची संभावना आहे परंतु, जग आणि जगातील मनुष्य प्राणी हा कधीच थांबला नाही न त्याची प्रगती थांबते हे आपण अनुभवल आहेच. त्यामुळे प्रत्येकाने निवडलेल्या आपापल्या मार्गावर निर्धास्थ चालावे हीच सदिच्छा...


       आज अचानक व्हिडीओ बनविण्याचे कारण असे कि, जानेवारी २०२२ नवीन वर्षात मी माझ एक छोटस स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगू इच्छिते आणि त्याच्या पुढील वाटचालीस तुमच्या शुभेच्छा मिळाव्यात अशी आशा व्यक्त करते.     


मी छोटासा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरु करीत आहे. माझ खूप वर्षांपासूनच स्वप्न पूर्ण करण्याची सुरवात आज मी करीत आहे. हा एक फक्त व्यवसाय नसून त्यातील दागिने हि माझी एक आवड आहे. आभूषन हा मुळात स्त्रियांच्या आवडीचा विषय आहेच, त्यामुळे ह्या स्वप्नांची सुरवात नक्की केव्हा झाली हे सांगणे मला थोड कठीण आहे. परंतु मी २००८ मध्ये सिनियर कॉलेज फर्स्ट इयरला असतांना ज्वेलरी डिझायनिंग चा कोर्स केला होता. त्याची सुरवात आणि शेवट मी थोडक्यात सांगू इच्छिते.

          


                  माझ्या सगळ्याच वह्यांवर्ती रांगोळी, मेहेंदी, दागिने, मॉडेल्स चे चित्र काढलेले असायचे त्यावर घरी किती बोलणे बसायचे हे काय सांगायला नको. एक दिवस पप्पांची भेट ज्वेलरी डिझायनिंगच्या इंस्टीट्युट मधील मुख्याध्यापकांसोबत झाली, त्यांनी लगेच सरांचा सल्ला घेतला आणि “माझी मुलगी सतत ह्याच डिझाईन काढत बसते”, अस ते पटकन उद्गरले. अहो मग, साहेब विचार कसला करताय?, तीला ज्वेलरी डिझाईन, फ्याशन डिझायनिंगच्या क्षेत्रात रुची आहे द्या सुरवात करून. पप्पांनी घरी येऊन आम्हाला सगळ्यांना कल्पना दिली मम्मी थोडी बडबडली, अहो ती पोरगी अजिबात अभ्यास करणार नाही, हेच काम करत बसेल. नाही, मम्मी मी तस नाही करणार अशी खोटी खोटी खात्री/हमी मी मम्मीला दिली. पप्पा मला म्हणाले चीमे फ्याशन डिझायनिंग नको घेऊ ते सगळेच करतात ज्वेलरीच मी अजून फारस ऐकलेलं नाही, त्यामुळे तुझ्यासाठी हि नवीन संधी आहे तू यात प्रवेश घे,. लगेच दुसऱ्या दिवशी माझा प्रवेश कला विद्या संकुल. चर्नी रोड, मुंबई. येथे ज्वेलरी डिझायनिंगसाठी झाला. डिझायनिंग क्षेत्रात भरपूर क्लासेस होते परंतु पप्पांनी ज्वेलरी डिझायनिंगचा कोर्स माझ्यासाठी निवडलेला होता आणि तो मलाही खूप आवडलेला होता. मी चर्च गेट वरून कॉलेज संपल्यावर ट्रेनने चर्नी रोडला जायचे. कॉलेज पासून हाच मार्ग सोप्पा आणि जवळचा होता. मुंबई मध्ये लोकल ट्रेनने यायला जायला मिळायचे हा एक नवीनच आनंद होता कारण, आम्ही कुलाबा मध्ये राहत होतो, त्यामुळे शाळा क्लासेस जवळचेच होते. ट्रेनचा संबंध नव्हता. क्लासच्या निमित्ताने हि एक संधी होती आणि येताना बसने सोप्पे, जवळचे होते. मझ्या मिस पण खूप छान होत्या आजही त्या मला मार्गदर्शन करतात. मी पहिल्या बाकावर बसायचे त्यामुळे मिसला खूप आवडायचे. शिक्षकांना आपण जेव्हा आवडतोना तेव्हा कुठलीही गोष्ट शिकण्याचा कंटाळा येत नाही किंवा अवघड जात नाही. ज्वेलरी डिझाईन करून ती म्यान्यूफ्याक्चरिंग करणे ह्या दोन्ही गोष्टी फार अवघड होत्या. पण त्या मी फर्स्ट क्लास डीस्ट्रीक्शनने पास झाले. वर्षभराची मेहनत आणि संपूर्ण वर्गाने केलेली धमाल, सेमिनार्स, आपल्या डिझाइन्स सेमिनार मध्ये लावणे खूप सुंदर अनुभव होता तो. अजून एक मुंबईतील सर्वात आवडती गोष्ट म्हणजे तेथील खाऊ गल्ल्या पाणीपुरी, भेळपुरी, शेवपुरी, रगडाप्याटीस, स्यांडविच, मसाला पापड, चायनीज, चायनीज डोसा, मैसूर डोसा, मसाला इडली, व्हेज कोल्हापुरी, बटर चिकन रुमाली रोटी, चिकन भुना आहा....! हे सगळ आठवून मला स्वर्गसुखात राहिल्याचा भास होतोय. मुंबई मध्ये जो राहिला त्यालाच ह्या गोष्टींची मजा माहित असावी.


त्याचप्रमाणे त्याच वर्षी मी स्वत: जमवलेल्या पैशातून शिमला, कुलू, मनाली, रोतांग्पास, चंदिगड अशी कॉलेजची दहा दिवसांची ट्रीप केली होती. त्यामुळे माझ्या आयुष्याची हि नवीन सुरवात होती. त्याला आमच्या कोलेजच्या मिस पण म्हणायच्या These three years are golden years आणि अगदी त्याच शब्दांन प्रमाणे माझ हे वर्ष खूप सुंदर सुंदर आठवणीने भरलेल वर्ष आहे. कॉलेजची वर्षे आपल्याला हवी तशी घालवली कि खर सांगते पुढील आयुष्य कसहि जावो काही जास्त फारसा फरक पडत नाही. जबाबदाऱ्यांमध्येच आयुष्य घालवायचे आहे अशी एक संकल्पना मनुष्यामध्ये निर्माण होते. हव तेव्हा हव तस जगलो., आता चालायचच सगळ.... पण आपले छंद सोडायचे नाहीत, मग त्याच आठवणी आता जतन करून त्यावर ज्वेलरीच्या व्यवसायाची हळुवार फुंकर मारण्याच मी ठरवल. माझा छंद माझी आवड जोपासण्याच सामर्थ्य नव्याने माझ्यामध्ये ह्या २०२२ व्या वर्षी निर्माण झाल. आपल्या छंदांना जर योग्य मार्ग मिळाला तरच आपल्या आयुष्याच सार्थक होते. नाहीतर आयुष्यभर काहीतरी आपल्या हातून सुटून गेले किंवा राहून गेले याची खंत जाणवत राहते. त्यामुळे ती खंत मला आज मागे टाकून माझा छंद यशस्वीरित्या जोपासायचा आहे.


         आता सद्या मी दोन वर्षाच्या बाळाची आई आहे. तरी देखील विदेशात राहून त्याच संगोपन एकटीने करून त्याच्या शाळेसाठी नोकरी करून, जापनीज भाषेचा क्लास करून, घरातील सर्व कामे वेळेत आटपून, स्वतःची काळजी स्वतः घेणे पुन्हा बाळाची सततची काळजी, त्याची शाळा, शाळेत लागणाऱ्या वस्तू, त्याची शॉपिंग, त्याचे खेळ त्याचा अभ्यास, त्याच दुखल खुपल, त्याच्या जेवणाची यादी, तसेच जपान हा अगदी घड्याळाच्या काट्यावर चालणारा शिस्त बद्ध देश म्हणून ओळखला जातो त्यामुळे त्याच्या जेवणाच्या वेळा पाळणे, त्याचं दैनदिन वेळापत्रक सांभाळणे, त्याला गोष्टी सांगणे, नाच गाणे शिकवणे, वेळेवर झोपवणे, प्रत्येक गोष्ट शाळेने सुचवलेल्या वेळेनुसार करावीच लागते आणि ती केली तरच येथील घड्याळा सोबत धावता येणे शक्य होते. येथील बुलेट ट्रेन हि जास्तीत जास्त १८ सेकंद उशिरा येऊ शकते, त्यापलीकडे तिला जास्त उशीर कधी होत नाही. अगदी मनुष्याला देखील दैनंदिन आयुष्य ह्याबुलेट ट्रेनच्या वेगातच सुरु ठेवाव लागत. महिन्यातून एकदा लांबची ट्रीप करणे, तेथील फोटो व्हिडीओ एडीट करून पोस्ट करणे हा देखील माझा एक छंद मी आवडीने जोपासते, त्याचप्रमाणे जपानीज म्हणा, भारतीय म्हणा सगळे सण अगदी उत्साहाने थाटामाटात योग्य पद्धतीने साजरे करते.


खरच अगदी मनापासून सांगते माझ्यासाठी हे सगळ खूप अवघड होत, एक तर परदेस, परदेशी भाषा त्यांचं खान-पान त्यांची संस्कृती हे सगळ आपल्याला स्वीकारावच लागत. तरच आपण कुठल्याही देशात सुखी, समाधानी, राहू शकतो आणि आपल्या बौद्धिक पातळीचा विकास करू शकतो. ते म्हणतात न देश तसा वेश हे अगदी परदेशात जाऊनच शिकायला भेटत, परंतु दिवसरात्र मेहनत घेऊन मी माझ्या स्वप्नांचा पाठपुरवा करतेय, माझा हा छंद आणि त्यातूनच हा व्यवसाय मी सुरु करतेय. संपूर्ण दिवसातील कुठलीच वेळ हि वायाला जात नाही प्रत्येक तास अन तासाच प्लानिंग मी केलेले असते. त्यामुळेच दिवसाची, हफ्त्याची, महिन्याची आणि तसेच वर्षाची म्हणजेच त्याला मी संकल्प म्हणते ते पूर्ण करण्याची क्षमता माझ्यात निर्माण होत असते.


         आता थोडफार मी माझ्या व्यवसायाबद्दल सांगते.

“ओळख तारा ज्वेलरीची”

माझ्या व्यवसायच नाव “तारा ज्वेलरी” आहे. आमचा ब्रांड म्हणजे तारा देवीचा लोगो प्रत्येक स्त्रीमध्ये दैवी शक्ती प्रक्षेपित करण्याचा प्रयत्न करतो, कारण स्व:तावर नियंत्रण ठेवणारी तीच, तिच्या कल्पनेनुसार तिचे सौंदर्य सादर करण्याची कला आणि क्षमता तिच्याकडे आहे. माझ्या व्यवसायामध्ये सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी असणार आहे, हा व्यवसाय सद्या तरी मी ऑनलाई सोशल माध्यमातून करणार आहे, आहे  जसे फेसबुक, व्हाट्सएप, इंस्टाग्राम यूट्युब, टेलिग्राम त्याचप्रमाणे माझी वेबसाईट देखील आहे. त्या सर्व लिंक्स मी माझ्या ह्या व्हिडीओच्या डीस्क्रीप्शन बॉक्स मध्ये देतच आहे, तिथून तुम्ही मला जॉईन होऊ शकता आणि तिथून खरेदीहि करू शकता.

त्याचप्रमाणे तुम्ही कुठली अजून वेगळी सोशल साईट वापरत असाल जी माझ्या यादी मध्ये नाही, तर तुम्ही ती मला सुचवा शकता. मी त्यावरही माझे प्रोडक्ट्स लिस्टिंग करत राहील. तुम्हाला कुठल्याही शहरातून, गावातून, राज्यातून अथवा कुठल्याही देशातून खरेदी करता येणार आहे. प्रोडक्ट्सची क्वालिटी आणि प्याकेजिंगकडे विशेष लक्ष दिले जाईल. पेमेंट हे ग्राहकाला सोईस्कर असेल त्या मोड मधून करता येईल. कस्टमर केअर ची सेवा उत्तम प्रकारची दिली जाईल. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स हातात मिळत नाही तोपर्यंत तुमचे पैसे सुरक्षित राहतील याची खात्री, तुम्हाला ऑर्डर मध्ये कुठलाही अडथळा येत असेल तर थेट माझ्याशी संपर्क करू शकता.


       आता दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे असा कि, माझ्या कुठल्याही मित्र मैत्रिणीला अथवा फॉलोवर्सला माझ्याकडील प्रोडक्ट्स चे रीसेलिंग करायचे असतील तर मोस्ट वेलकम. यात सर्वात मोठा फायदा असा कि रीसेलिंग करताना बऱ्याचदा लोकांना माहित नसत कि आपण नक्की कुणाला ऑर्डर देत आहोत, आपल्याला आपले प्रोडक्ट्स कुठून येत आहे, ते कोणत्या प्रतीचे असेल, ते आपल्या ग्राहकांपर्यंत कधी पोहचेल, बऱ्याचदा हि सगळी काम अंदाधुंदी चालू असतात आणि मग रीसेलर्स किंवा नंतरचा त्यांचा ग्राहक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. एकदातर मी एका रीसेलर कडून एक साडी घेतली. आणि ती खूप विचित्र प्रतीची आली, मी तिला फोन लावताच खूप बडबड केली. त्या बिचारीने ऐकूनही घेतल खुपदा सॉरी म्हणाली ती साडी तिने मला बदलून दिली. मला साडी पुन्हा मिळाली त्याबद्दल मी तिला कॉल करून सांगिलते थ्यांक्यू मला साडी रीप्लेस करून दिल्याबद्दल वगैरे वगैरे तेव्हा ती म्हणाली खर तर ताई मला पण माहित नव्हते हे सगळे मी नवीनच सुरवात केली आहे परंतु सुरवातीलाच मला डीलर्स कडून खूप त्रास सहन करावा लागतोय तुमच्याही साडीच्या कुरिअर चे पैसे मी माझ्या पदरचे भरले. तीच हे बोलणे ऐकून मला फार वाईट वाटले. त्यावर मी म्हणाले काळजी करून नका मी पुढील ऑर्डर तुम्हाला नक्की देईल. नाराज होऊ नका बरं....


पुढील काही दिवसाने मी तिला ऑर्डरसाठी कॉल केला तर ती म्हणाली सॉरी ताई मी रीसेलिंग सोडून दिले. हे ऐकून मला जास्तच वाईट वाटले, कुणास्त्रीच काम थांबल आणि ते तिने कंटाळून थांबवल याच जास्त काळजाला लागल. तेव्हाच मी ठरवल भविष्यात मी माझ्या व्यवसायात कुठल्याही माझ्या रीसेलर्सला असा त्रास होऊ देणार नाही याची मी हमी देते.

म्हणून मी इथे सांगू इच्छिते कि मी तुमच्या प्रत्येक समस्यांसाठी हजर असणार आहे, काही अडचणी आल्यास रिसेलर्सला अशी वेळ येऊ देणार नाही. 


        मी सद्या जपान मध्ये आहे, जपानमध्ये राहून आपल्या भारतात व्यवसाय सुरु करून तो इथून नियंत्रित करणे हि खूप मोठी जोखीम मी उचलू शकले कारण माझ्या ह्या सगळ्या भल्यामोठ्या धाडसामागे माझ्या आई वडिलांचा पाठींबा मला मिळाला म्हणूनच आज मी हे पाऊल उचलू शकले. मम्मी ज्वेलरी डिझायनिंगसाठी नको म्हणत होती पण आज तीच माझा ज्वेलरीचा संपूर्ण व्यवसाय सांभाळतेय. आणि माझ्या ह्या सगळ्या कल्पनाशक्तीला प्रोत्साहन देणारी म्हणजे माझी बहीण तिच्या हट्टापाईच माझ्या व्यावसाईक आयुष्याची सुरवात झाली. तिला माझ्यावर कमालीचा विश्वास आहे. भाऊ त्याच्या रोज रोज एक एक भन्नाट कल्पना घेऊन समोर येत असतो. दोघ भावंड माझ्यापेक्षा सहा आणि सात वर्षांनी लहान पण त्यांचा हट्ट होता कि मी माझी कल्पनाशक्ती सत्यात उतरवावी. त्यांच्या मित्र मैत्रीणींन मध्ये त्यांनी मला नेहमीच प्रसिद्धी मिळवून दिलेली आहे....हा.. हा... हा....

त्याचप्रमाणे प्रत्येक कामासाठी मी निवडलेली माणस मला खूप छान मिळत गेली. आतापर्यंतच्या माझ्या ह्या संपूर्ण यशाचे श्रेय मी माझ्या बाळाला देऊ इच्छिते. त्याने मला दिलेला वेळ, त्याचा लहान वयातील समजूतदारपणा, त्याच माझ्यावरील प्रेम आणि=\]विश्वास आईसाठी तीच बाळ म्हणजे जगातील बलाढ्य ताकत असते. हे आज माझ्या बाळाने सिद्ध करून दाखवल. त्याच्या उज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी मला स्वबळावर यशस्वी होण्याची शक्ती नेहमी मिळत राहो. माझ्या बाळाला अनेक अनके आशीर्वाद. भाग्यवंत हो बाळा.


“तारा ज्वेलरी” मधून माझ “क्षणांनी भरलेलं आभाळ” नेहमी ताऱ्यांप्रमाणे चमकत राहो अशी आशा मी व्यक्त करते आणि तुमच्या शुभेच्छा माझ्या सोबत असतीलच हे मी गृहीत धरते.  

धन्यवाद!


पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!


Rajashri Jagtap 


Whatsapp👇

https://wa.me/message/RKGSMD5LFFGOA1


Facebook page 👇

https://www.facebook.com/Taara-The-Jewellery-Place-103145992250707/


Instagram👇

https://www.instagram.com/p/CYLgow-PjzY/?utm_medium=copy_link


Youtub👇

https://youtube.com/channel/UCqHmlo9ECg0k8e5FlgWYYtw


Telegram👇

https://telegram.org/faq


Website🙏 Please wait for few days

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

झाहली पहाट उठ शिंप सडा माऊले, दाराकडे वळली तुझ्या गौतमाची पाऊले.....             २०२० हे वर्षे संपूर्ण जगासाठी फार दु : खद आणि भयानक असे वर्ष आहे. खिडकीतून बाहेर डोकावले तरी कुठेतरी काहीतरी वाईट बातमी म्हणा, घराघरात क्लेश म्हणा, कुणाच्या आजारपणाची बातमी तर, कुणाच्या मृत्यूची बातमी, त्यात ह्या एवढ्या मोठ्या जागतिक संकटात देश जगत असतांना काही बलात्काराच्या बातम्या ऐकून तर मन खिन्न राहून जात. सगळीकडे नैराश्यमय वातावरण असल्याने घराघरात मानसिक संतुलन राखून ठेवणे, शांतात राखून ठेवणे आणि सकारात्मक आनंदीमय वातावरण टिकवून ठेवणे हे फार कठीण झाले आहे. घरातून बाहेर जरी काही कामानिमित्त पडले तरी, सगळी कामे निटनेटकी होतीलच असे अजूनही परिस्थिती सुधारलेली नाहीये. दळणवळ सुविधा अजून नीटनेटकी सुरळीत झालेली नाहीए, कारखान्यातून येणारा माल अथवा त्याची बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाहीए, आर्थिक परिस्थिती समान्य नागरीकापासून ते देशापर्यंत ढासाळलेली आहे. हि अशी मुख्य करणे आहेत, त्यात अजून कटाक्षाने पहिले तर गोरगरीबांचे हाल कसे कसे झाले आहेत याची तर ...

जात्यावरील ओवी....

जात्यावरील ओवी....       “जात” म्हणजे दळणाच जात, हे आपल्या संस्कृतीचा अनमोल ठेवा आहे. परंतु ते हल्ली संस्कृती मधून जात आहे. तरी देखील त्याच्यातून दळल्या गेल्येल्या, पडलेल्या पिठातून मात्र जे विद्यापीठ उभारलं आहे ते मात्र अजूनही साबूत आहे. ते म्हणजे केवळ जात्यावर गायलेल्या त्या ओव्यांमधून. ओवी म्हंटल कि चटकन डोळ्यासमोर नाव येत ते बहिणाबाईंच, तसेच जनाबाई.. “बहिणाबाई” म्हणतात ह्या जात्याला मुळात जात म्हणू नये घरोट म्हणाव आणि त्यावर देखील त्यांनी एक ओवी गायलेली आहे. त्याची कारणे त्यांनी त्या ओवीत समजावली आहे. जात का म्हणू नये? देवा घरोट घरोट तुझ्या मनातली गुट साऱ्या दुनियाच पोट घरी कर्माचा मरोट तुझ्या मनातली गुट अरे जोडता तोडलं त्याले नात म्हणू नये ज्याच्यातून येत पीठ त्याले जात म्हणू नये घरोट का म्हणायच? त्यात आहे घर घर आपल्या घराची   अरे त्यात आहे घर घर भरल्या आभाळाची ओवी सुचते कशी? अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पीठहे तस तस माझ गाण पोटातून येत व्हटी        ह्या ओव्या...

नणंद.....

नणंद.....           मृणाल हि तिच्या नंदेचीच पसंती म्हणजे कांदा पोह्यांच्या कार्यक्रमात सर्वात आधी तिनेच पसंती दाखवलेली. तशी मृणाल दिसायला सुंदर, चपळ, आणि स्पष्ट वक्ता असल्यामुळे तिला नापसंती कुणाकडून मिळत नसे. मृणाल ला लाडाने सर्वच मनु म्हणत. लग्न ठरल्यानंतर नंदेच आणि तीच छान जमल दोघी नेहमी बोलत असत. दुसरी नणंद फारशी फोन वर बोलत नसे. पण मनु ला दोघीहि छान वाटल्या. लग्नानंतर काही दिवस मैत्रिणीं सोबत बोलायला भेटले नाही, त्यावेळेस मनु ला अस जाणवलं आता नंदाच आपल्या मैत्रिणी त्यामुळे ती त्यांच्यासोबत मनमोकळ बोलत असे. नवरा-बायकोतील नवीन गोड गोष्टी त्यांना सांगत असे. अस लाग्नानंतर जवळजवळ सात आठ महिने सुरु होत. पण त्यावेळेत मनु च्या लक्षात एक गोष्ट आली होती. नवरा बऱ्याचशा व्यवहारांची चर्चा मनु सोबत करत नसे. हि गोष्ट मनु ला सुरवातीला काही महत्वाची वाटली नव्हती. परंतु जसा-जसा काळ पुढे ढकलत होता. तस-तस मनुला तिची नोकरी सोडल्याच दुखः वाटू लागल, तिला भीतीदायक विचार घेरू लागले. कारण, खरच आजकाल कुणावर अवलंबून आयुष्य किती भयानक असत हे काही शब्दात सांगायची गरज नाही. प...