मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

एप्रिल, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

BAGHBAN

BAGHBAN बाग को जनम देने वाला बागबान , परिवार को जनम देने वाला पिता .. दोनो ही अपने खून पसीने से अपने पोधो को सींचते हैं …. न सिर्फ अपने पेड़ से उसके साए से भी प्यार करते हैं “ क्या मिसाल दूँ मैं तेरी , नाम लूँ मैं किसका”....!        “माणसाने नेहमी महत्वकांक्षी असावं” हे त्याचं “ब्रीद” वाक्य आहे. अर्थात ते आम्हा तिघांना नेहमीच मोठ्या मोठ्या उदाहरणांतून हे समवून सांगतात. जिद्दी पणा अंगी असल्याशिवाय आपण कोणतीच गोष्ट साकारू शकत नाही, ना कोणतेच ध्येय, उद्धिष्ट गाठू शकत. हो पण त्यासाठी आयुष्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या हे समजलं पाहिजे, त्या गोष्टी ओळखता आल्या पाहिजे. नुसतच आपलं काहीतर मनाला वाटलं म्हणून कराव किंवा कोणतीतरी वेळ मारून नेण्यासाठी झगडाव असं नाही तर, आपल्या प्रत्तेक निर्णयाला, प्रत्तेक कृतीला महत्वं असावं. जो माणूस महत्वकांक्षी असतो तोच उज्वल भविष्य गाठू शकतो. कोणत्याही कामात फक्त मेहनत जिद्द असून चालत नाही तर ती गोष्ट किती महत्वाची आहे यावर आपलं भविष्य ठरत. फक्त जिद्द नाही तर महत्वाच्या गोष्टीत जिद्दी अ...

Need Of Quick Action....!

Need Of Quick Action....!        काल Factory मध्ये माझ दोन Foreigners सोबत संभाषण झाल, आम्ही सकाळी भेटल्याबरोबर एकमेकांना शुभ दिनाच्या शुभेच्छा देत असतो. त्याचप्रमाणे कालही दिल्या. गेल्याबरोबर थोडफार काम आटोपलं. माझ नवीन Joining असल्यामुळे मी सर्वांनाच काही ओळखत नव्हते, एक Philipines ची मुलगी होती तिने विचारलं Your from?, मी चटकन हसत उत्तर दिल “I am from India”. Ohhhh Really...? Yes! त्यावर ती उत्तरली... “नमस्ते” ती भलतीच खुश होऊन बोलायला लागली, You know Salman Khaan? Yeah i know. मला कळून चुकल हि सलमान खान ची भारीच Fan असावी बहुतेक. I Loooove him toooo much, Ohhh waahhww....! आता प्रतिउत्तर नाईलाजाने त्यावेळेला Possitive च द्याव लागल. पण बाई काही थांबेना You know this movie, this song अशे बरेच गाणी आणि सिनेमांची नाव तिने घेतली. तिला Amitabh Bachchan न ही खूप आवडतो अस म्हणाली. “ कभी ख़ुशी कभी गम ” हा तिचा आवडता सिनेमा, त्यातल बोले “ चुडिया, बोले कंगना ” ... हे गाणंही तिने म्हणून दाखवलं, मी पण छान प्रतिसाद दिला. पण ती त्यावर म्हणाली, Why Salmaan Khaan is s...

करवंदाच्या जाळ्या.....!

करवंदाच्या जाळ्या.....! वाटे कधी कधी , जावे भेटीस... या क्षणांनी भरलेल्या अभाळास.....!                            जेमतेम चार साडे चार वर्षांची होते. काका Doctor होऊन त्यांची बदली नुकतीच दाभाड या गावात झाली होती. वर्षभरात त्याचं लग्न हि झाल, चार सहा महिन्यातून ते घरी नाशिकला येत असत. ह्या फेरीला त्यांनी काही दिवसांसाठी काकी सोबत मम्मीला आणि मला नेण्याच ठरवलं. मी भलतीच खुश झाले, अस ऐकल्याबरोबर आनंदाने नाचू लागले, घरात नुसता कल्लाह माजून ठेवला. घरातले सर्वच खुश झाले. मी घरात एकुलती-एक लाडाची “चिऊ” होते. त्यामुळे माझ्यासाठी कुणाचाही कोणत्याही गोष्टीसाठी नकार नसे. मम्मी सासुरवाशीण असल्यामुळे तिला कधीच कुठेच जाण्याची संधी मिळत नव्हती. तिलाही थोड बर वाटल. पप्पांचा स्पर्धा परीक्षांचा (MPSC) अभ्यास चालू असल्या कारणाने ते येऊ शकले नाही.             दाभाड हे एक छोटस खेड गाव, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. मजेत पोहचलो. नाशिक ला Cement-Concret च...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर      समाजातील प्रत्येक घटकाला समान हक्क मिळावे यासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलेले व्यक्तिमत्व म्हणजे “ भारतरत्न डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर ” . पण, समाजात आंबेडकर हे नाव फक्त दलित नेते, भारतीय संविधान, बौध धर्म, आरक्षण आणि जातीयवादा विरोधात लढा यासाठी ओळखले जाते किंवा मर्यादित ठेवले आहे, याची फार खंत वाटते. आजकाल आंबेडकर किंवा भीम जयंती दिवशी थोडी फार आंबेडकरांबद्दल माहिती दिली जाते आणि फक्त जातीयवाद, आरक्षण याबद्दल बोलणे सुरु होते. राजकीय नेत्यांना स्वतःच्या फायद्यासाठी हि तर आधुनिक शस्त्रे झाली आहे. समाजातील अल्पसंख्याक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, कामगारवर्ग, स्त्रिया या सर्वांना इतरांप्रमाणेच वागणूक आणि समान हक्क मिळावे यासाठी भारतीय संविधानात तरतुदी केल्या. आपण आंबेडकरांना इतकेच ओळखतो हे एक कटू सत्य आहे.       समाजातील काही घटक हे विशिष्ट जातीचे किंवा राहणीमानाचे आहे म्हणून त्यांना हीन वागणूक द्यावी...! हा कोणता न्याय ? अशा प्रश्नांना सडेतोड उत्तरे शोधून डॉ. आंबेडकर यांनी लोकांसाठी असे प्रयत्न केले कि त्यांना स...

शोध स्वतःचा....!

  शोध स्वतःचा...!                   मला स्वतःलाच अनेकदा खूप प्रश्न पडलेले असायचे , त्यांची उत्तरे शोधता-शोधताच मला यशाचा मार्ग सापडला. आणि तो सापडल्यावर , “ स्वतःवरच एक स्मित हास्य ओठी आलं” , कारण , अतिशय सोप्या अशा मार्गाला ही आपण कितीतरी खडतर बनवून टाकतो... हे लक्षात आले.! माझ्या यशाची सुरवात झाली.... , मी जेव्हा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी वादविवाद करण्याचे सोडून दिले. जे लोक माझ्याबद्दल बोलता , त्यांच्या बद्दल विचार करणे मी सोडून दिले. मी माझ्या काही अपेक्षा इतरांकडून पूर्ण होतीलच , हा गैरसमज दुर केला. इतरांना माझ्याकडून काय हवय , याचा विचार करणे मी सोडून दिले. मी माझ्या हक्कांसाठी , मूर्ख लोकांसोबत लढणे सोडून दिले. ज्यातून काही निष्पन्न होणार नाही , निरर्थक असे वादविवाद मी सोडून दिले. आणि....! मी सुरवात केली ती.... , माझा दृष्टीकोन सशक्त करणे , माझ्या स्वप्नांना साकार करणे , माझ्या कल्पनांना सत्यात उतरवणे , आणि माझ्या ध्येयांना गाठणे.           ज्या दिवसापासून मी ह्या गो...

स्वप्नांचा कणा “विचार”.......!

स्वप्नांचा कणा “विचार”.......!              विचारांना वास्तवात आणणं म्हणजेच स्वप्नं पूर्ण करण..... कुठलीही वस्तू निर्माण होण्याआधी प्रथम ती वैचारिक स्वरुपात निर्माण होते.              मोठी मोठी स्वप्न पाहण, मोठ्या-मोठ्या मोठ्या उड्या घेण हे मला खूपच आवडत. माझ्या प्रत्तेक स्वप्नाचा मी इतका पाठलाग करते कि जोपर्यंत ते स्वप्नं सत्यात उतरत नाही तो पर्यंत मला चैन पडत नाही. अक्षरशः माझी झोप उडालेली असते, इतकी बेचैनी मनात, वागण्यात, आणि विचारांत असते कि अन्न हि गोड लागत नाही. खुप Saturation होत, मनात एक प्रकारच वादळ उठलेल असत अशा चलबिचल अवस्थेत राहण मला कधी कधी फार कठीण होत, कारण याअवस्थेमुळे माझे सोबती, माझे आप्तस्वकीयही फार काळजीत पडलेले असतात. परंतु त्याचा एक फायदाही मला होतो, त्यांचे आशीर्वाद त्यांच्या कल्पना, त्यांची मनापासून मिळालेली साथ, त्यांची मदत, माझ्यासाठीची त्यांची धडपड, त्यांचे Good Luck माझे स्वप्न पूर्ण करण्याच धैर्य वाढवते. यामुळे ती स्वप्न पूर्ण होतात.      ...